म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मुंबई व नाशिक मध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. औरंगाबादहून मुंबईकड जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रविवारी नाशिकपर्यंत धावली, तर नंदिग्राम, देवगिरी व तपोवन या एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. पावसामुळे मुंबईत विमान, रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम राज्यभर जाणवत आहे. मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस तारूर, ताडोबा एक्स्प्रेस नाशिकजवळ थांबविण्यात आली. देवगिरी आणि नंदीग्राम एक्स्प्रेस मुंबईपर्यंत जाण्याची शक्यता कमी आहे. त्या मनमाड किंवा नाशिक येथून परत आणल्या जाऊ शकतात, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. …… \Bतीन रेल्वे औरंगाबादमार्गे \B मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्स्प्रेस, मुंबई-बिदर एक्स्प्रेस आणि मुंबई लिंगमपल्ली एक्स्प्रेस या तिन्ही रेल्वे औरंगाबादमार्गे वळविण्यात आल्या. \Bऔरंगाबाद-नाशिक बस रद्द\B पावसाचा फटका रेल्वेसह एसटी बस वाहतुकीलाही बसला. नदीचे पाणी निफाड ते चांदुरी मार्गावर आल्यामुळे बसची वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे औरंगाबादहून नाशिक जाणाऱ्या अनेक बस रद्द करण्यात आल्या आहेत, तर नाशिकहून येणाऱ्या काही बस पिंपळगावेमार्गे धावल्या. याशिवाय धुळे येथे पूर आल्याने औरंगाबाद ते अहमदाबाद बसच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. \Bमुंबईचे विमान दीड तास उशिरा \B एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान येण्याची नियोजित वेळ दुपारी ३.२५ची आहे. मुंबईतील पावसामुळे हे विमान दुपारी ४.४५ वाजता पोहोचल्याची माहिती विमानतळावरून देण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट