Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पंचनामे ८० टक्के पूर्ण

0
0
जिल्ह्यामध्ये गारपिटीने कहर केल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश काढण्यात आले असून जिल्ह्यात जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले.

सारे काही चिऊताईसाठी

0
0
शहरातील तीन युवक व त्यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या संस्था गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत चिमण्यांसाठी काम करत आहेत. पदरमोड करून विविध उपक्रम राबवित आहेत.

महामार्गासाठी ‘एनओसी’चा खोडा

0
0
सोलापूर–धुळे या राष्ट्रीय महामार्गाला औरंगाबाद जिल्ह्यातील ४४६ हेक्टर जमीन लागणार आहे; मात्र राष्ट्रीय महामार्गाकडून अद्याप एनओसी दाखल केली नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पंचनाम्यात शॉर्टकट!

0
0
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठ्याने चक्क एजंट नेमल्याचा प्रकार समोर आला आहे. आडगाव (बुद्रुक) गावात पंचनाम्याच्या अर्जांचे वाटप करण्यात येत होते. ही बाब निदर्शनाला आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी तलाठ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

अनुजाने दिला पेपर

0
0
‘आलेल्या संकटाला धैर्याने तोंड द्या; परंतु कोणीही आत्महत्येचा विचारही मनात आणू नका’, ही विनवणी आहे आळणी (ता. उस्मानाबाद) येथील अनुजा कुलकर्णी या दहावीतील विद्यार्थिनीची. अनुजाने स्वतः हे दुःख पचविले आहे. वडिलांच्या आत्महत्येनंतर तिने दहावीचा पेपर दिला आहे.

चार शेतकऱ्यांची आत्महत्या

0
0
मराठवाड्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे, निराश शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतच आहे. विभागात मंगळवारी मध्यरात्रीनंतर चार शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, गारपीटग्रस्तांच्या कुटुंबीयांना अद्याप सरकारी मदत मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

क्रेझ टोप्या, स्कार्फ-स्टोलची

0
0
मागील काही दिवसांपासून ऊन वाढल्याने सनकोटची मागणी वाढली आहे. प्युअर कॉटनच्या सनकोटला अधिक मागणी आहे. स्कार्फपेक्षा स्टोल घेण्याकडे कल असून, स्टेपल व कॉटनचे स्टोल जास्त प्रमाणात घेतले जात आहे. स्कार्फ-स्टोलची मुलींमध्ये तर मुलांमध्ये टोप्या व बागायतदार रूमालांची क्रेझ आहे.

जपली दुर्मिळ वनसंपदा

0
0
मानवी अतिक्रमणामुळे जंगलातील दुर्मिळ वनसंपदा नामशेष झाली आहे. शेकडो जंगली वनस्पतींचा औषधीसाठी उपयोग होतो; मात्र संख्या घटल्यामुळे दुर्मिळ वनस्पती शोधणे कठीण झालंय. या परिस्थितीत बहुगुणी वनस्पतींचे ऊती संवर्धनातून जतन करण्याचा प्रयोग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात केला आहे.

​राजकीय वादाचे रंग

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुळवड सुरू आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप करीत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वैयक्तिक टीका सोडून विकासाच्या मु्द्यांवर वाद-विवाद अपेक्षित असल्याचे नवमतदारांना वाटते.

वृक्षसंवर्धन, किल्ले दर्शन, पक्षी निरीक्षण

0
0
आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्हयातील विविध वन परिक्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात साहसी पर्यटन, पक्षीनिरिक्षण, वन क्षेत्रातील किल्ल्यांची माहितीसह वृक्षसंवर्धनाबाबत माहिती देण्यचे उपक्रम आयोजीत करण्यात आले आहे.

मखमली स्वरांची सफर

0
0
कमोडिटी ट्रेड आर्ट औरंगाबाद व स्पॅन पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, आशिष गोखले संकलित मखमली स्वरोंका सफर ...बज्म-ए-तलत महमूद पुस्तक लोकांच्या हाती येणार आहे.

रणरणत्या उन्हात सनकोटचा आधार

0
0
होळी, रंगपंचमी शहरवासीयांनी जल्लोषात साजरी केली, तसा गारवा, थंडी आणि पावसानेही शहरातून काढता पाय घेतला आहे आणि उन चटका देऊ लागले. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाच्या पाऱ्याने छत्तीशी (३६ अंश) गाठली. तापमानात अचानक झालेल्या वृद्धीमुळे ऊन्हात बाहेर पडणाऱ्यांची मात्र चांगलीच गोची होते.

उर्दू माध्यमाचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित

0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उर्दू माध्यमातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची पाठ्यपुस्तकेच उपलब्ध केली नाहीत. त्यामुळे राज्यातील अकरावी व बारावीतील २३ हजार विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित आहेत.

पती, सासू, सासऱ्याला जन्मठेप

0
0
विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला पेटवून खून करणाऱ्या पती व सासू सासऱ्याला जिल्हा प्रधान न्यायधीश एस. एम. कोल्हे यांनी जन्मठेप; तसेच प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नोव्हेंबर २००७ रोजी ही घटना फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथे घडली होती.

‘जीपीएफ’ खाते क्रमांक द्या हो!

0
0
नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या राज्यातील प्राध्यापकांना नऊ वर्षानंतरही भविष्य निर्वाह निधीचा खाते क्रमांक मिळालेला नाही. विभागातील अशा प्राध्यापकांनी पुन्हा सहसंचालकांना घेराव घालत जीपीएफचे खाते क्रमांक द्या, अशी मागणी केली.

उद्याची परीक्षा पुढे ढकलली

0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाकरीता अधिकारी कर्मचाऱ्यांना जावे लागणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २२ मार्च रोजी होणारे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. या पेपरच्या नवीन तारखा विद्यापीठाने अद्याप निश्चित केल्या नाहीत.

काँग्रेस उमेदवार आज वा उद्या

0
0
कॉँग्रेसचा औरंगाबादमधला लोकसभा उमेदवार आज किंवा उद्या जाहीर करू, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते गुरुवारी रात्री उशिरा आयोजित कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या

0
0
माहूर तालुक्यातील लांजी येथील २८ वर्षांच्या कर्जबाजारी आदिवासी शेतकऱ्याने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल प्रेमसिंग आडे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

वर्ग बदलात प्रशासनाचा खोडा

0
0
कोर्टाने महापालिकेचा वर्ग बदलाचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार वर्ग बदलासाठी अत्यंत धिम्या गतीने कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात तरी पालिकेच्या वर्ग बदलाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता नाही.

कृषी अधिकारी रमले युरोपात

0
0
राज्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच असतानाच कृषी विभागाने प्रगतिशील शेतकऱ्यांची विदेशात सहल पाठवली. सहलीत दोन मोठ्या कृषी अधिकाऱ्यांसह कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाचा समावेश आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images