पक्षातील काही नेत्यांनी सातत्याने अन्याय केला, देवगिरी कारखाना विकण्याचा डाव रचला होता. हा अन्याय सहन न झाल्यानेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे माजी मंत्री डॉ. नामदेव गाडेकर यांनी मंगळवारी जाहीर केले.
नामदेव गाडेकर भाजपमध्ये
↧
↧
हिंगोलीत शक्तीप्रदर्शन
हिंगोली मतदारसंघातील निवडणूक काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हिंगोलीतील काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांच्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीच सभा होणार असून, शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे.
↧
मुस्लिम आरक्षणाचे आश्वासन
मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस न्याय देवू शकतो. राज्यातील आघाडीचे सरकारच मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ शकते, असे सांगत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आरक्षणाचे आश्वासन दिले.
↧
राष्ट्रवादीमध्ये चिंता
खासदार गणेश दुधगावकर यांच्या पक्षांतरानंतर परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेकडून खेचणार का, याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. मात्र, काँग्रेसचे जिंतूरचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी आघाडी धर्माला तिलांजली देत, बंड केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये चिंता पसरली आहे.
↧
मुंडे कृषिमंत्री होण्याचीच पवारांना भीती
राज्यात ‘न भुतो’ गारपीट झाल्यानंतरही केंद्राची मदत देऊ शकत नसतील, तर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडायला हवे होते, असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी परळी येथील सभेत दिले.
↧
↧
औरंगाबादमध्ये पाऊस
औरंगाबाद शहर व परिसरात मंगळवारी (८ एप्रिल) सकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्याचबरोबर दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे सरासरी तापमानात पाच अंश सेल्सिअसने घट झाली.
↧
चहा, नाश्ता महागला
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, घरांचे दिवसागणिक वाढणारे भाव यामुळे सर्वसामान्यांना झळा सोसाव्या लागतात. अशीच महागाईची झळ आपलासा वाटणाऱ्या नाश्त्यालाही बसली आहेत.
↧
गारपीटग्रस्तांचे कर्ज माफ करणार
उस्मानाबादसह राज्यामध्ये गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी अगदी तुटपुंजी मदत जाहीर केली आणि ही मदतही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही, अशी शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात ‘एनडीए’चे सरकार आल्यास गारपीटग्रस्तांचे कर्ज आणि वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले.
↧
...तरीही शेतकऱ्यांची दुर्दशा
केंद्रामध्ये कृषिमंत्री राज्याचेच कृषिमंत्री असताना, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. येथील गारपीटग्रस्तांना वेळेवर मदत मिळालेली नाही, शेतीच्या सिंचनाला पुरेसे पाणी मिळत नाही. मग, हे सरकार नेमके करते काय, असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली.
↧
↧
उद्धव ठाकरे उद्या नांदेडमध्ये
नांदेडमधील महायुतीचे उमेदवार डी. बी. पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी नांदेडमध्ये येत आहेत.
↧
एटीएम, नेट बँकिंगला फटका
जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीने ‘विंडोज एक्स पी सर्व्हिस पॅक ३’ या लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टिमचे तांत्रिक सहकार्य मंगळवारपासून काढून घेतल्यामुळे देशातील बहुतांश बँकांमधील एटीम व नेट बँकिंगच्या सेवेमध्ये अडचणी येऊ शकतात; असे संकेत खुद्द रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. त्याला विविध बँकांच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
↧
प्रचाराच्या जीपने मुलीला चिरडले
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांचा प्रचार करणाऱ्या जीपने शिवानी दादासाहेब भोसले (वय ५) या चिमुरडीस चिरडले. अपघातात ती जागीच ठार झाली असून, अन्य मुलगी जखमी झाली आहे.
↧
मोदी कोटीची फॅशन
रखरखत्या उन्हाळ्यात घामाघूम होऊन कोणी हौसेन जॅकेट घातलं असेल, तर डोळे झाकून समजायचं हा मोदींचा कार्यकर्ता. भाजप कार्यकर्त्यांत मोदी जॅकेटला प्रचंड मागणी वाढलीय. शहरातल्या अनेक दुकानं या वेगवेगळ्या जॅकेटनी खचाखच भरलीयत.
↧
↧
सुखकर प्रवासावर भर
↧
मराठा आरक्षणासाठी दोन महिन्याची मुदत
मराठा संघटनांनी गेली अनेक वर्षे आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने आक्रमक आंदोलने केली आहेत. शासनासोबत चर्चा, बैठकांनंतरही आरक्षण मिळाले नाही. सरकारने दोन महिन्यात आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेऊ,' असा इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी दिला.
↧
टाकळीतून पाणी सोडले
शिवना- टाकळी मध्यम प्रकल्पातून मंगळवारी रात्री अकरा वाजता शिवना नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी बुधवारी सकाळी सात वाजता बंद करण्यात आले. मात्र पाणी सोडताना प्रकल्पग्रस्त व पाणलोटक्षेत्रातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याने पाटबंधारे विभागाबद्दल असंतोष व्यक्त होत आहे.
↧
फळबागांच्या बांधणीला प्राधान्य
फुलंब्री परिसरातील पिकांना या वर्षी गारपिटीचा मोठा फटका सहन करावा लागला. त्यात शासनाने केलेल्या तुटपुंज्या मदतीमुळे शेतकरी नाराज झाले आहेत. या परिस्थितीत शेतकरी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने शेतीच्या कामाला लागले आहेत.
↧
↧
अल्पवयीन चालकांच्या पालकांवर कारवाई
'पालकांनी अल्पवयीन मुलांना चालवण्यासाठी वाहने देऊ नयेत. अल्पवयीन मूल वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर कडक कारवाई करण्यात येईल,' असा इशारा पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिला आहे.
↧
निवृत्ती वेतन रखडले!
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये झालेली वाढ पेन्शनमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे पेन्शनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
↧
आघाडीला फटका, महायुतीला फायदा
कार्यकर्ता हीच आपली संपत्ती अशी भावना बाळगून कार्यरत असणारे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी लोकसभा निवडणूकीत कार्यकर्त्यांचा अनादर होणार नाही अशी भूमीका घेतली आहे. त्यांनी आगामी काळात महायूतीच्या उमेदवारांच्या पाठिशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे.
↧
More Pages to Explore .....