शहराच्या रस्त्यावर धावणाऱ्या अनेक रिक्षांचे वय वाढलेले आहे. या रिक्षांमुळे प्रदूषणचे प्रमाण वाढत आहे. यामुळे शहरातील रिक्षाचे वय १६ वर्षे निश्चित करण्यात आले होते. अखेर रिक्षा संघटनांच्या मागणीवरून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षांचे वय १६ वरून २० वर्षे करण्याचा निर्णय घेतला.
रिक्षांचे वय आता २० वर्षे
↧
↧
रसाळ केशरची निर्यातीत झेप
गोटीएवढा चेरी केशर आणि तब्बल एक किलोचा जम्बो केशर... मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आंब्याच्या या नवीन संशोधित जातींचा फायदा झाला आहे. निर्यातक्षम आंब्याचे वैविध्य जपण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी प्रयत्न करीत असून, त्याला चांगले यश मिळाले आहे.
↧
समाज बदलण्यासाठी स्वतः बदला
‘एक व्यक्ती बदलल्यास समाजात बदल घडू शकतो. नव्या पिढीला पैशाच्या मागे धावून चिरकाल समाधान मिळणार नाही. चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे समाज उभा राहतो आणि चांगले कामच व्यक्तीला समाधान मिळवून देते’ असे प्रतिपादन प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.
↧
टंचाईग्रस्त गावांना टॅँकर द्या
पाऊस लांबल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील गावामध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. ग्रामपंचायतीने पाणी टँकरचा अथवा विहीर अधिग्रहणाचा ठराव पाठविल्यास कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ टँकर प्रशासनाने सुरू करावेत अशा सुचना पशुसंवर्धन विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.
↧
'मी विलासराव होऊ शकत नाही'
मी काही विलासराव देशमुख होऊ शकत नाही. मी त्यांच्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत आहे, मी माझा स्वभाव बदलत आहे. त्यामुळे तुम्ही बदला असे आवाहन पर्यटन आणि उत्पादनशुल्क राज्यमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात केले.
↧
↧
प्रकल्पांनी गाठला तळ
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने परभणी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील विहिरी व कुपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. पावसाअभावी जिल्हाभरातील पेरण्या खोंळबल्या असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
↧
आरक्षणाचा निर्णय न्यायाचा
सधन समाज ही मराठा समाजाची छबी अतिशय विपर्यस्त आहे. समाजातील अवघे तीन टक्के लोक राजकीय नेतृत्व करणारे आणि श्रीमंत आहेत. ग्रामीण भागातील शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सामाजिक न्यायाचा आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
↧
माजी सैनिकाला लुबाडले
बँग तपासणी करण्याच्या बहाण करत तोतया पोलिसांनी माजी सैनिकांला २० हजार रुपयांना लुबाडले. मयुरनगर परिसरात शनिवारी (२८ जून) दुपारी ही घटना घडली असून, सिडको पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.
↧
इंजिनीअरिंगचे वर्ग १ ऑगस्टला
संस्थांच्या मान्यतेच्या प्रक्रियेमध्ये रखडलेल्या इंजिनीअरिंग प्रवेशावर सुप्रीम कोर्टाने नुकताच एक तडाखा लगावला असून, प्रवेश प्रक्रिया २९ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर इंजिनीअरिंगचे वर्ग १ ऑगस्टलाच सुरू झाले पाहिजेत, असा दंडकही सुप्रीम कोर्टाने घातला आहे.
↧
↧
बेरोजगार इंजिनीअरची आत्महत्या
बेरोजगारीला कंटाळून इंजिनीअर तरुणाने तीन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी उघडकीस आले. मानसिक आजाराने ग्रस्त असणाऱ्या त्याच्या आईला मुलाच्या आत्महत्येची कोणतीच कल्पना नव्हती. घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर मृतदेह लटकलेला दिसून आला.
↧
मोडस ऑपरेंडी ब्युरोचे आधुनिकीकरण
प्रत्येक गुन्हेगाराची गुन्हा करण्याची पध्दत वेगळी असते. या पध्दतीची माहिती ठेवण्यासाठी मोडस् ऑपरेंडी ब्युरो तयार करण्यात आले आहेत. गुन्हेशाखेत असलेल्या या ब्युरोचे आधुनिकीकरण लवकरच करण्यात येणार आहे.
↧
जुगार खेळणा-यांना अटक
कुंवारफल्ली भागात पत्त्यांचा जुगार खेळताना पाच व्यापाऱ्यांना गुन्हेशाखेच्या पथकाने रविवारी (२९ जून) दुपारी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून ४५ हजार रुपये जप्त करण्यात आले असून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
↧
संपादित जमिनीचा निवाडा रद्द
उमरगा (जि. उस्मानाबाद) तालुक्यातील जकेकूर ग्रामपंचायतीच्या वतीने दाखल केलेल्या रिट याचिकेत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गावठाण वाढीसाठी संपादित जमिनीचा निवाडा कालबाह्य झाल्याचे जाहीर करून रद्दबातल ठरवला.
↧
↧
पालिका पोटनिवडणुकीत ३७ टक्के मतदान
नांदेड पालिकेच्या कैलासनगर प्रभागाच्या
पोटनिवडणुकीसाठी रविवारी ३७.०१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानावेळी
कुठल्याच केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी सर्वत्र चोख बंदोबस्त
ठेवण्यात आला होता.
↧
पत्नीचा छळ करणाऱ्या डॉक्टरला सक्तमजुरी
नवविवाहीत पत्नीचा छळ केल्याचा गुन्हा सिद्ध
झाल्याने येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने डॉक्टर पतीस तीन वर्षे सक्तमजूरीची
शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. पतीच्या छळाला कंटाळून या
नवविवाहितीने १८ फेब्रुवारी २००८ रोजी आत्महत्या केली होती.
↧
‘पीक कर्जासाठी अडवणूक करू नका’
खरीप हंगामासाठी पीक कर्ज देताना राष्ट्रीयकृत सहकारी तसेच खासगी बँकांनी
शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना कर्जपुरवठा करावा, असे आवाहन आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी
जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केले. या वेळी निवासी
उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, आरबीआयचे
महाप्रबंधक सांगवीकर, जिल्हा
अग्रणी बँकेचे दुपारगुडे, नाबार्डचे
चंद्रशेखर देशपांडे, तसेच जिल्ह्यातील बँकांचे
अधिकारी उपस्थित होते.
↧
कामगारांची नोंदणी होणे आवश्यक
श्रम करुन उपजिविका करणाऱ्या कामागांराच्या
कामाला प्रतिष्ठा लाभावी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात
आणण्यासासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ कामगारांपर्यंत
पोहचण्यासाठी कामगारांची नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामगार
संघटनांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध
योजनांचा लाभ देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री
जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
↧
↧
अपघातात ३४ जण जखमी
नांदेड ते रोहिपिंपळगाव जाणारी एसटी पलटी होऊन
झालेल्या अपघातात ३४ जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी घडला. या बसचे पाटे
तुटले आणि चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस एका बाजूला पलटी झाली.
↧
गजानन महाराजांची पालखी उस्मानाबादच्या अंगणी
गजानन महाराजांची पालखी उस्मानाबादच्या अंगणी
↧
वाळू उपश्याकडे डोळेझाक
जून महिना संपत आला असला तरी पाऊस पडला नाही.
त्यामुळे विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी नदी व तालुका परिसरातील
नाल्याचे पात्र अद्याप कोरडी आहेत. त्याचा फायदा वाळू माफिया घेत आहेत. पाच ते सहा
वाळू घाटावरून बेकायदा वाळूचा उपसा सुरू आहे. ही बाब स्थानिकच्या तलाठी व मंडळ
अधिकाऱ्यांना माहित असताना देखील त्याच्याकडे डोळेझाक केली जात आहे.
↧
More Pages to Explore .....