Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठवाड्यातील ‘एनजीओ’ भंपक

$
0
0
जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी मराठवाड्यातील ‘एनजीओ’ काम न करता, त्या फक्त कागदोपत्री काम करतात. चकचकीत ऑफिस आणि इंग्रजी बोलणारे कर्मचारी हीच त्यांची ओळख. अशा भंपक ‘एनजीओ’ला कामाबाबत जाब विचारल्याशिवाय गैरप्रकार थांबणार नाहीत...

बिबट्याचे आजारामुळे निधन

$
0
0
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान येथील प्राणिसंग्रहालयात असलेल्या दारा बिबट्याचे आजारपणामुळे शुक्रवारी (११ जुलै) दुपारी पावणेचार वाजता निधन झाले. प्राणिसंग्रहालयात आता एकच मादी उरली आहे.

स्वबळाची तलवार म्यान

$
0
0
कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गेल्या काही दिवसांपासून स्वबळावर लढण्याच्या वल्गना करीत होते. मात्र, विधानसभेच्या लढती काहीच दिवस बाकी असताना, आता राजकीय आखाड्यात महायुती आणि आघाडीमध्येच सामना रंगणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

‘आयआयएम’साठी औरंगाबादच योग्य

$
0
0
उद्योगांचा विकास, डीएमआयसी प्रकल्प, राज्यातील मध्यवर्ती ठिकाण पाहता केंद्राने राज्यासाठी मान्य केलेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबादमध्येच उभे राहावे, अशी मागणी मराठवाड्यातून जोर धरू लागली आहे.

गोदावरी पाणीप्रश्न पेटला

$
0
0
कायद्यानुसारच पाणीवाटप केले जावे, असा अहवाल उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील न्याय्य पाणीवाटपासंबंधी नेमण्यात आलेल्या एच. टी. मेंढेगिरी समितीने दिल्यामुळे नगर आणि नाशिक जिल्ह्यात अस्वस्थता पसरली आहे.

धानोऱ्यात पीके उगवलीच नाहीत

$
0
0
धानोरा (म.) येथे शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांचा वापर करून सोयाबीनची केलेली पेरणी पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे. कमी पाऊस झाला असताना पेरणी केल्याने हा प्रसंग उद्भवला असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

शिकाऱ्यांचा हरणांवर डोळा

$
0
0
हिमायतनगरजवळ नांदेड-किनवट राज्य रस्त्यावर कातडी आणि मांस काढून घेतलेला हरणाचा सांगाडा आढळून आला आहे. वन विभागाने हरणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच विल्हेवाट लावल्याने प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सूर्याचे खळे पाहून आनंद, अस्वस्थता

$
0
0
नांदेडमध्ये सूर्याने खळे केल्याचे मनोहारी दृश्य शनिवारी आकाशात दिसले. निसर्गाचा हा आविष्कार पाहून निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, चंद्राने किंवा सूर्याने खळे केले, तर महागाई वाढते, दुष्काळ पडतो असा पूर्वापार चालत आलेला समज असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता जाणवली.

‘आयआयएम’साठी औरंगाबादच आदर्श

$
0
0
शैक्षणिक दर्जात सुधारणा आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसाठी (आयआयएम) औरंगाबाद हेच आदर्श ठिकाण आहे.

‘मटा’ची हेल्पलाइन महापालिकेच्या सभेत

$
0
0
आर्थिकदृष्ट्या गरीब, पण शिकण्याची प्रबळ इच्छा असलेल्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘मटा’ ने हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनची चर्चा गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाली.

सिद्धार्थ उद्यानात प्रथमच हालला मगरीचा पाळणा

$
0
0
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात यंदा प्रथमच मगरीचा पाळणा हालला. मगरीने सहा पिलांना जन्म दिला आहे. आता ही पिल्ले पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

विकासकामे थांबली; भाजप नगरसेवक होणार आक्रमक

$
0
0
शहरातील व प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या वॉर्डातील विकास कामे बंद झाल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय शनिवारी (१२ जुलै) भाजपच्या विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

४० हजार एलईडी दिव्यांनी उजळणार शहर

$
0
0
येत्या काही महिन्यांत चाळीस हजार एलईडी पथदिव्यांनी औरंगाबाद शहर उजळून निघणार आहे. बीओटी पद्धतीने लावण्यात येणाऱ्या या दिव्यांच्या बद्दलचा ठराव मे महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत गुपचूप मंजूर करण्यात आला.

मोबाईल उद्यापासून नॉट रिचेबल

$
0
0
सोमवारपासून (१४ जुलै) शहरातील लाखो मोबाईल नॉट रिचेबल होण्याची शक्यता आहे. मोबाईल टॉवर्सकडे मालमत्ता कराची सुमारे नऊ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे जप्तीच्या कारवाईची तयारी केली आहे.

पावसाळ्यात कालवे बंद करा!

$
0
0
पावसाळ्यात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाणी येऊ न देता कालव्यांतून वळविण्यात येते. या माध्यमातून नगर, नाशिक जिल्ह्यांतील प्रकल्पांत क्षमतेपेक्षा जास्त जलसाठा करण्यात येतो.

पंतप्रधान विद्यापीठात येणार?

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा ऑगस्ट रोजी औरंगाबादमध्ये येत असून, या दौऱ्यामध्ये ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालामधील ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर’चे भूमीपूजनही करण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या ६३ भूखंडांवर अतिक्रमण

$
0
0
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या तब्बल ६३ आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण काढण्यासाठीची आयुक्तांच्या स्तरावरील बैठकही निष्फळ ठरली असून, आगामी निवडणुका लक्षात घेता कारवाई होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.

मनसे सर्व जागा लढणार

$
0
0
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून सर्वच्या सर्व २८८ ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे,’ अशी माहिती मनसेचे नेते आमदार बाळा नांदगावकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाऊस नसतानाही पेरणी

$
0
0
पावसाची चातकासारखी वाट पाहून थकलेला बळीराजा आता धोका पत्करून पेरणी करण्यास सरसावला आहे. येत्या दोन ते चार दिवसांत पाऊस पडेल, या केवळ आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत.

चार पालिकांत नगराध्यक्ष बिनविरोध

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी तुळजापूर, कळंब, परांडा आणि मुरम या चार पालिकांच्या अध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आला. त्यामुळे येथील नगराध्यक्षपदाच्या अधिकृत घोषणेची आता केवळ औपचारिकता बाकी असून, त्याची अधिकृत घोषणा येत्या बुधवारी होईल.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images