Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठी भाषा जिवंत ठेवा

$
0
0
मराठवाडा हे मराठी भाषेचे माहेरघर आहे. परंतु, याच मराठवाड्यात मराठी भाषा सातशे वर्षे वनवासात होती. ही भाषा जिवंत ठेवण्याची गरज आहे. जागतिकीकरणाच्या त्सुनामीत बोलीभाषा लुप्त होत आहे. त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे, असे मत माजी कुलगुरू तथा माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केले.

‘महिलेमुळे खुर्ची मिळाली हे विसरू नका’

$
0
0
काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात महिलांना बोलण्याची संधी न दिल्याबद्दल खासदार रजनी पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना खडे बोल सुनावले. ‘तुम्हाला एका महिलेच्या आशिर्वादाने खुर्ची मिळाली आहे, हे विसरू नका,’ असे पाटील यांनी सांगताच व्यासपीठावरच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली.

‘बारामती’तही झाले असते पान‌िपत

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची १४४ जागांची मागणी असली तरी, त्यांना एकही जागा वाढवून दिली जाणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी (२६ जुलै) येथे स्पष्ट केले.

ईदसाठी कर्मचाऱ्यांना ५ हजारांचा अॅडव्हान्स

$
0
0
रमजान ईदच्या निमित्ताने महापालिकेच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांचा अॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला आहे. या सणासाठी कंत्राटदारांना एक कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आले.

कर वसुलीची उद्यापासून मोहीम

$
0
0
महापालिका मालमत्ता कर वसुलीसाठी सोमवारपासून (२८ जुलै) धडक मोहीम सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक मालमत्तांकडून कर वसूल केला जाणार आहे. त्यासाठी ४२ पथकांची स्थापना करण्यात आली असून, मंगल कार्यालये, लॉजिंग, सिनेमागृहे, हॉस्पिटल यांना टार्गेट केले जाणार आहे.

‘IIM’साठी शिफारसपत्र द्या

$
0
0
‘आयआयएम’च्या सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था औरंगाबादेत यावी, यासाठी राज्य सरकारच्या निर्णयाची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला फक्त एक शिफारसपत्र द्यावे. पुढील पाठपुरावा आम्ही करू, अशी खणखणीत मागणी राज्यातील काँग्रेसचे दोन्ही खासदार अशोक चव्हाण, राजीव सातव यांनी काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात केली.

आणखी एक ‘केबीसी’

$
0
0
राज्यात ‘केबीसी’ फसवणूक प्रकरण गाजत असतानाच शहरात सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या कंपनीचे नऊ हजार हजार सदस्य असून, संचालक दाम्पत्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे.

आरोपीचा गुरू ‘केबीसी’ एजन्ट

$
0
0
अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया कंपनीच्या मुख्य सूत्रधारांना गजाआड करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम केले.

लढणार नाही; लढविणार!: राखी

$
0
0
‘मी विधानसभा निवडणूक लढणार नाही तर लढविणार आहे,’ असे रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष राखी सावंत यांनी शनिवारी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांनी रामदास आठवले यांना लवकरात लवकर केंद्रात मंत्री करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

हॉस्पिटलसाठी आता स्वस्तात वीज

$
0
0
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरवाढ निश्चित करताना शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, निमसरकारी संस्था यांना आता घरगुती वापराच्या दराने विजेचे बील भरावे लागणार आहे. पू्र्वी व्यवसायिक दराप्रमाणे वीज बिल आकारण्याचा निर्णय बदलण्यात आला आहे.

महापालिकेच्या इतिहासातील पहिलाच ‘किमती’ रस्ता

$
0
0
क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन हा महापालिकेच्या ३२ वर्षांच्या इतिहासातील पहिलाच सर्वांत किमती रस्ता ठरणार आहे. या अडीच किलोमीटरच्या रस्त्यावर तब्बल २३ कोटी रुपये खर्च होणार असून, ऑगस्टअखेर हा रस्ता पूर्ण होणार आहे.

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट गडद

$
0
0
औरंगाबादसह मराठवाड्यामध्ये पावसाने अद्यापही पाठ फिरवली असल्यामुळे दुष्काळाचे सावट गडद होऊ लागले आहे. विभागातील मोठे पाणीसाठे कोरडे पडू लागले असून, पावसाची हीच परिस्थिती राहिल्यास डिसेंबर-जानेवारीमध्ये विभागामध्ये भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

‘सुपर पॉवर’च्या कार्यालयाची झडती

$
0
0
मराठवाड्यातील हजारो जणांना गंडा घालणाऱ्या ‘सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट’ कंपनीच्या जालना रोडवरील कार्यालयाची रविवारी दुपारी झडती घेण्यात आली. सिंधी कॉलनी येथील मुख्य कार्यालयाची सोमवारी झडती घेण्यात येणार आहे. दरम्यान, या योजनेत फसवणूक झालेल्या तक्रारदारांपैकी अन्य कोणत्याही गुंतवणूकदाराने आर्थिक गुन्हे शाखेशी रविवारी संपर्क साधला नव्हता.

कागजीपुऱ्यात वाहन परीक्षण केंद्र

$
0
0
अखेर येत्या ऑगस्ट महिन्यात मोटार वाहन परीक्षण केंद्र कागजीपुऱ्यात सुरू होणार आहे. एसटीच्या वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) विभागाने, चार राज्याची प्रशिक्षण संस्था कागजीपुऱ्यातल्या ११२ एकर जागेवर तयार केली. मात्र मागील चाळीस वर्षांपासून ही जागा वापराविना पडून होती.

टंचाईग्रस्त गावांसाठी नवा आराखडा

$
0
0
जायकवाडी धरण असूनही पैठण तालुक्यातील शेकडो गावांना पाणी टंचाईची झळ बसते. या गावांना किमान पिण्याचे पाणी पुरवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जायकवाडी प्रकल्प ते हिरडपुरी आणि जायकवाडी प्रकल्प ते आडूळ या दोन मार्गाने पाणी पुरवठा योजना केल्यास पाणी टंचाई दूर होईल, अशी मागणी विहामांडवा गटाचे जिल्हा परिषद सदस्य विनोद तांबे यांनी केली आहे.

थकबाकीसाठी जीटीएलची वीज का तोडत नाही ?

$
0
0
थकबाकी असल्यामुळे शहरामधील ९०० नागरिकांना जीटीएलने वीज कनेक्शन दिले नाही. मग जीटीएलकडे २८० कोटी रुपयांची थकबाकी असताना महावितरण कारवाई का करीत नाही, असा प्रश्न खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीत उपस्थित केला. जीटीएलने कारभारात सुधारणा करावी, अशा सूचना यावेळी खासदारांनी केल्या.

घाटीत मनोरुग्णांची भरती बंद

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) मनोविकृती विभागाच्या वॉर्डात मागच्या आठ ते दहा दिवसांपासून मनोरुग्णांची भरती पूर्णपणे बंद केली आहे. सध्याच्या वॉर्डाचा ‘फॉल सिलिंग’चा काही भाग दोन आठवड्यांपूर्वी कोसळला. याचे निमित्त करून घाटीमधून मनोरुग्ण पिटाळण्याचा उद्योग सुरू केल्यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून, खासगीत उपचार घेण्यासाठी भुर्दंड सहन करावा लागत आहे.

सोयाबीन आता ‘रामभरोसे’

$
0
0
बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत सोयाबीन पेरा केला. मात्र केज, परळी, अंबाजोगाई, धारूर तालुका वगळता इतर तालुक्यांत सोयाबीन पिकास विमा संरक्षण नाही. जिल्ह्यातील माजलगाव, पाटोदा, बीड, गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरण्यात आले आहे. मात्र, या पिकास विमा संरक्षण नसल्याने या तालुक्यातील सोयाबीन उत्पादक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

लहू गटकाळला अटक

$
0
0
बडतर्फ पोलिस कर्मचारी लहू गटकाळला रविवारी (२७ जुलै) पहाटे नाथनगर येथील घरातून अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध १८ जून रोजी बीडबायपासवर चिकलठाणा पोलिसांच्या अंगावर स्कॉर्पियो घालून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

काँग्रेस आमदारांचे ऑडिट होणार

$
0
0
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध काम केलेल्या काँग्रेसच्या विद्यमान आमदारांचे आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकिट कापले जाणार आहे. केंद्रीय निरीक्षक आणि ए. के. अँटोनी समितीने सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्रातील अनेक आमदारांच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images