दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे एकंबा गावात पुराचे पाणी शिरले होते. दोन दिवसांपासून पूर ओसरला असला तरी ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत आहे.
पूर ओसरला...साथीच्या रोगाची भीती
↧
↧
असमान पाणी वाटपाने दैना
जलवाहिनीवर ठिकठिकाणी असलेली गळती, असमान पाणी वाटप यामुळे नागरिकांची दैना होऊ लागली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेतर्फे केली जाणारी जुजबी मलमपट्टी, समस्या सोडविण्यापेक्षा समस्या जटील करू लागली आहे.
↧
उस्मानाबादेत रस्त्यांची चाळण
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे उस्मानाबाद जिल्हा हद्दीतून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग तसेच जिल्हा अंतर्गत रस्ते खड्ड्याच्या विळख्यात सापडले आहेत.
↧
‘आयएसओ’ची लगबग सुरू
जिल्हाधिकारी कार्यालयातील आयएसओ मानांकनाचे फेरमूल्यांकन आणि विभागीय आयुक्त कार्यालयाची आयएसओसाठी परीक्षा यामुळे दोन्ही कार्यालयात चौथ्या शनिवारच्या सुटीच्या दिवशीही अधिकारी, कर्मचारी कामावर हजर होते.
↧
हल्लेखोर ३ वर्षानंतर जेरबंद
रॉकेल व्यवसायिक सरफराज खान यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणातील संशयित आरोपी करिम युपीवाला यास तब्बल तीन वर्षानंतर जेरबंद करण्यास क्रांती चौक पोलिसांना यश आले आहे.
↧
↧
कुत्र्यांच्या हल्ल्यात युवक जखमी
मोकाट कुत्र्यांचा संपूर्ण शहरात सुळसुळाट झाला आहे. कुत्र्यांच्या टोळ्याच्या टोळ्या गल्लोगल्ली फिरत असल्यामुळे त्यांची दहशत निर्माण झाली आहे.
↧
आयुक्तांना दुचाकीवरून फिरवणार
रस्त्यांवरील खड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास पालिका आयुक्तांच्या लक्षात यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळात, आयुक्तांना शहरातील रस्त्यावर दुचाकीवरून फिरवणार आहे.
↧
शहर अभियंता कोण?
महापालिकेचा शहर अभियंता कोण? या संबंधीचा अहवाल पालिकेचे प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांच्या टेबलवर पोचला आहे. शहर अभियंत्यांच्या नियुक्तीचा निर्णय मवारे घेणार की पालिकेचे नियमीत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे घेणार या बद्दल पालिका वर्तुळात उत्सुकता आहे.
↧
१२ लाखांची बॅग भामट्यांनी पळवली
शहरातील गजबजलेल्या बरारा टॉवर्स डॉक्टर लेन येथील एका बँकेसमोरून १२ लाख १० हजार रुपये रक्कम असलेली बॅग मुनिमाकडून दोघा भामट्यांनी पळवली. ही घटना शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली.
↧
↧
काँग्रेसमधील इच्छुक मंडळी गॅसवर
औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. सर्वच गटाच्या तीनपेक्षा जास्त इच्छुकांनी मोर्चेबांधणी केल्याने मुंबईकरही हैराण झाले आहेत.
↧
उपयुक्त साठा ४ दशलक्ष घनमीटरवर
नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसानंतर गोदावरी नदीत सोडलेल्या पाण्यामुळे नाथसागरातील पाणीपातळीत वाढ होऊ लागली असून, गेल्या तीन दिवसांत मृतसाठा भरून काढून पाणी जोत्याच्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.
↧
१२ रुपयांत जेवण देण्याची मागणी
काँग्रेसने गरीब जनतेची कुचेष्ठा चालवली आहे, असा आरोप करुन करीत लातुरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक ते काँग्रेस भवन थाळी मोर्चा काढला.
↧
बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे
रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संदर्भात ओरड झाल्यावर पालिकेने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले, पण जे खड्डे बुजवण्यात आले ते पुन्हा उघडे पडू लागल्याचे चित्र अदालत रोडवर पाहण्यास मिळते.
↧
↧
नांदेड, पुण्यातील तरुणांनाही फसवले
सीआरपीएफमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखो रुपयांना फसवणाऱ्या आरोपी धम्मपालने नांदेड व पुणे येथील तरुणांनादेखील फसवल्याचे समोर आले आहे.
↧
दुचाकी चोर गजाआड
सराईत दुचाकी चोरास गजाआड करण्यात गुन्हे शाखाला यश आले आहे.
↧
जिल्हा हॉस्पिटलमध्ये ‘लो कॉस्ट सेंटर’ सुरू
डॉ. वाय. एस. खेडकर मेमोरिअल ट्रस्ट व जिल्ला हॉस्पिटल यांच्यावतीने ‘लो कॉस्ट सेंटर’चा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
↧
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केंद्र स्थापणार
‘क्रीडा विभाग व खेळाडूंचा विकास करावयाचा असेल, तर केवळ भाषण करून चालणार नाही, तर त्याला कृतीची जोड द्यावी लागेल,’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी शुक्रवारी येथे केले.
↧
↧
अवघे पाऊणशे वयोमान...
फॅशन शो, धमाल डान्स आणि बहारदार गाण्यांच्या सादरीकरणाने ‘क्लब, क्या जमाना था’ या उपक्रमाचा वर्षपूर्ती कार्यक्रम विशेष रंगला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी या कार्यक्रमात शेकडो ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
↧
प्राणिसंग्रहालयात आता विद्युत दाहिनी
महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील आजारी प्राण्यांसाठी जास्तीचे स्वतंत्र पिंजरे असावेत, यासाठी उपमहापौर संजय जोशी यांनी पुढाकार घेतला आहे.
↧
लोडशेडिंगमुक्तीसाठी नवा फंडा
सर्व त-हेचे प्रयत्न करूनही महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त होत नसल्याने महावितरणने ग्राहकांचे मन परिवर्तन करण्याचे ठरवले आहे.
↧
More Pages to Explore .....