राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पैठण विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून ही जागा पूर्ण ताकतीने लढण्याची तयारी केल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या गुरुवारी (२८ ऑगस्ट) झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
पैठण मतदारसंघावर ‘रासप’चा दावा
↧
↧
मोदी गुरूजींची सक्तीची शाळा
शिक्षण दिनी (५ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण राज्यातील प्रत्येक शाळेत केले जाणार असून तशा प्रकारचे आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काढले आहेत. पंतप्रधानांचे हे थेट भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे यासाठी टीव्हीपासून ते आसन व्यवस्थेची जबाबदारी मुख्याध्यापकाची असणार आहे.
↧
राम गोपाल वर्मांवर गुन्हा दाखल
सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असतानाच, गणपती बाप्पाबद्दल वादग्रस्त टि्वट केल्यामुळे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अडचणीत सापडले आहेत.
↧
आरक्षणासाठी विमुक्त भटक्यांचा मोर्चा
मूळ विमुक्त व भटक्या जाती जमातींना कलम ३४१ व ३४२ नुसार एसटी व एससीप्रमाणे स्वतंत्र घटनात्मक आरक्षण व हक्क द्यावा.
↧
सिंचन विभागाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागात कोल्हापुरी बंधारे वाटपात झालेल्या गैरप्रकाराची कडक चौकशी सुरू झाली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी शनिवारी (३० ऑगस्ट) सकाळी सिंचन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझाडती घेतली.
↧
↧
संवेदना जागृत करणारी कविता
‘सध्या ग्रामीण आणि भटक्यांची कविता गुळगुळीत प्रतिमांमुळे वाचकांचे लक्ष वेधत नाही. या परिस्थितीत ‘सेनं सायी वेस’ कवितासंग्रहातील कविता आत्मभान जपल्यामुळे वेगळी ठरते.
↧
विभागीय क्रीडा संकुलात स्विमींग पूल
राज्यात क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत शासनाने औरंगाबादमधील ९३ लाखांच्या तीन प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या उभारणीसाठी ६० लाख मंजूर केल्यामुळे वर्षभरात ही सुविधा खेळाडू; तसेच नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
↧
मराठवाड्यात पावसाची संततधार
शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची शनिवारी संततधार सुरू होती. शुक्रवारी सांयकाळपासून मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून हा पाऊस रब्बी पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त मानला जात आहे.
↧
‘पीएम’च्या भाषणासाठी पळापळ
शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या भाषणाचे थेट प्रक्षेपण राज्यातील प्रत्येक शाळेत केले जाणार आहे. त्यासाठीची टीव्हीपासून ते आसन व्यवस्थेपर्यंत आणि वीज नसेल तर, जनरेटरचीही सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे.
↧
↧
‘समांतर’पुढे आता कामगारांचे विघ्न
समांतर पाणी योजनेसाठी वर्ग होण्यापूर्वी पदोन्नती द्यावी, अन्यथा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करू असा इशारा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कामगारांनी शनिवारी दिला.
↧
गंडवणारे दोन भोंदूबाबा गजाआड
घराची शांती करण्याची थाप मारून अमरावती जिल्ह्यातील व्यापाऱ्याकडून पस्तीस हजार रुपये उकळणाऱ्या नारेगावमधील दोन भोंदुबाबाला गुन्हे शाखेने रविवारी (३१ ऑगस्ट) अटक केली आहे. ही घटना ९ जुलै रोजी घडली होती.
↧
शिक्षकांचा शिक्षणमंत्र्यांकडून ‘अवमान’
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षकदिनी दिले जाणारे जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार गेल्या चार वर्षांपासून रखडले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पदाधिकाऱ्यांची संमती घेऊन तीन वर्षे यादीही तयार केली होती.
↧
म्हैसमाळचा मुक्काम, आता ‘एसी’ तंबूत
म्हैसमाळ परिसरात वन विभागाने साहसी पर्यटनस्थळ विकासाचे काम हाती घेतले आहे. पाणीपुरवठा, तंबू उभारणी आणि इतर सुविधांसाठी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती उपवनसंरक्षक अजित भोसले यांनी दिली.
↧
↧
भाषणासाठी चार हजारांवर टीव्ही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) होणाऱ्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी शिक्षण विभागानुसार विभागातील सर्व शाळा सज्ज झाल्या आहेत. औरंगाबाद विभागात १२ हजार ५५२ शाळांमधील २४ लाख ८५ हजार ७९५ विद्यार्थी पंतप्रधानांचे भाषण थेट ऐकणार आहेत.
↧
एकदा होऊनच जाऊ द्या
विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करत राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेत्यांना जागे करण्यासाठी एकदा होऊनच जाऊ द्या, आता तरी स्वबळावर लढा अशी मागणी केली आहे.
↧
पावसाच्या पावलांनी आली लक्ष्मी!
‘लक्ष्मी कशानं आली? सोन्या-चांदीच्या पावलानं आली. लक्ष्मी कशानं आली? लेकराबाळानं आली. लक्ष्मी कशानं आली? सुख-समृद्धीनं आली.’ या गजराचे आणि महालक्ष्मीच्या आगमनाचे आता औरंगाबादकरांना वेध लागलेत.
↧
मराठवाड्यात दमदार; नद्यांना पूर
गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील नदी, नाल्याना पूर आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे.
↧
↧
मराठवाड्याला ‘बाप्पा पावला’
गणरायाच्या आगमनानंतर मराठवाड्यावर वरुणराजाने कृपादृष्टी केली असून, दोन दिवसांपासून विभागात दमदार पाऊस होत आहे. विभागातील ७६ पैकी ७३ तालुक्यांमध्ये शनिवारपासून समाधानकारक पाऊस झाल्याने मराठवाडा सुखावला आहे.
↧
एलआयसीला ११७५ कोटींचे उत्पन्न
गेल्या आर्थिक वर्षात औरंगाबाद विभागात एलआयसीच्या (लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया) २ लाख ५९ हजार पॉलिसींचे वाटप करण्यात आले. त्यातून ११७५ कोटींचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक प्रशांत नायक यांनी सोमवारी (१ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत दिली.
↧
लातूर शहराचा पाणी प्रश्न मिटला
बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत पडलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले वाहण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पात पाणीसाठा ही वाढतो आहे. मांजरा आणि माजलगाव या दोन सिंचन प्रकल्पात पाणी वाढायला सुरुवात झाली आहे.
↧
More Pages to Explore .....