Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भाजपचा ‘उमेदवार कौन?’

0
0
केंद्रात भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे तालुक्यातील विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या भाजप नेत्यांच्या आशा पल्लविलत झाल्या आहेत. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या पराभव करू शकतो, असे तब्बल चौदा जणांना वाटत असून, त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

अन् महापौरांना रडू कोसळले!

0
0
सिडको एन ८ येथील बॉटेनिकल गार्डनला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमात महापौर कला ओझा खूप उशिरा आल्या. त्यामुळे संतापलेल्या खैरेंनी त्यांची भर कार्यक्रमात कानउघाडणी केली. अनपेक्षितपणे झालेल्या कानउघाडणीमुळे महापौरांना रडू कोसळले.

ठाणेकर हत्या; घातपाताचा संशय

0
0
शिवसेनेचे मुखेडचे तालुकाप्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांची हत्या दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये झाली, यावर विश्वास बसत नाही, अशी शंका उपस्थित करत या प्रकरणात घातपात असण्याचा संशय व्यक्त होत आहे.

मोदींच्या वर्गासाठी शाळा सज्ज

0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) होणारी व्हर्च्युअल क्लासरुम अटेंड करण्यासाठी औरंगाबाद विभागातील १२ हजार ५५२ शाळा सज्ज झाल्या आहेत.

मुक्त विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत एकसूत्रीपणा आणणार

0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल करून तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल. परदेशापर्यंत ऑनलाइन मुक्त विद्यापीठाचे शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न आहे.

आदर्श शिक्षकांचा गौरव

0
0
जिल्हा परिषदेच्यावतीने २० शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

आघाडी सरकारला जनतेने धडा शिकवावा

0
0
आदर्श घोटाळ्यापेक्षाही भयावह घोटाळे नांदेडच्या गुरु-ता-गद्दी सोहळ्यापासून ते आजपर्यंत या शहरात सुरुच आहेत. अर्धवट बांधकामे करुन उदघाटने करायची, जनतेची फसवणूक करायची याबाबतीत नांदेड जिल्ह्यातील जनतेने आता काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा शिकविलाच पाहिजे, असे मत नांदेड जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी व्यक्त केले.

‘प्रत्येकाने माणुसकी जपण्याची गरज’

0
0
चांगले कर्म असतील तर, फळेही चांगलेच मिळतात, एकमेकांना सहकार्याची भावना ठेवून प्रत्येकांनी माणुसकी जोपासल्यास दुःखामध्ये सुखाचा क्षण अनुभवता येईल, असे प्रतिपादन प्रख्यात समाजसेविका सुरेखा पाटणी यांनी केले.

काटेकोरपणे निवडणुकीचे सनियंत्रण करा

0
0
आगामी विधानसभा निवडणुका जितक्या चुरशीने होतील. तितक्याच काटेकोरपणे या निवडणुकींचे सनियंत्रण करा. यामध्ये उमेदवार, प्रचार यंत्रणा आणि सामान्य जनतेला त्रास न होण्याची दक्षताही घ्या, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शुक्रवारी दिले.

परळी केंद्रातून वीजनिर्मिती सुरू

0
0
बीड जिल्ह्यातील परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र पाण्याअभावी गेल्या महिन्यात बंद करावे लागले होते. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे या विद्युत निर्मिती केंद्रापुढचे पाण्याचे संकट तूर्तास टळले आहे.

राजकीय लवलेश जाणवला नाही

0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या निमित्ताने मागास मराठवाड्यातील सर्वाधिक विकसित जिल्हा असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. परंतु या अडचणींवर मात करून बहुतेक शाळांमध्ये टीव्हीची व्यवस्था करण्यात आली.

हशा, टाळ्या आणि मोदींचे गारूड

0
0
शुक्रवारी (५ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षक दिनाचे औचित्य साधत देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांचे भाषण आणि विद्यार्थ्यांशी रंगलेल्या गप्पांचा, औरंगाबादमधील शाळांनी भरभरून आनंद घेतला.

अनिवासी भारतीयांना इंटरनेटवरून मराठीचे धडे

0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली असून आगामी काळात परदे‌शातील भारतीयांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टूर ऑपरेटरमुळे देवदर्शनात वैताग

0
0
वयाची साठी ओलांडल्यानंतर देवधर्मासाठी निघालेल्या यात्रेकरूंना टूर ऑपरेटरमुळे मोठा त्रास सहन करावा लागला. या चमुतील यात्रेकरुंनी आरटीओ व पोलिसांकडे कारवाईसाठी धाव घेतली आहे.

सलीम अली सरोवर झाले नागरिक, पर्यटकांसाठी बंद

0
0
शहरातील सलीम अली सरोवराबाबत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला दिलेल्या आदेशाचे पालन न झाल्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना अवमान नोटीस बजावली होती.

...आणि वर्धमान रेसिडेन्सी झाली टँकरमुक्त!

0
0
दोन वर्षांपूर्वी २०१२-१३मध्ये पाऊस कमी झाला. उल्कानगरीतील १०० घरांचा प्रकल्प असलेल्या वर्धमान रेसिडेन्सीमधील बोअरचे पाणी आटले. नळाला पाणी येणेही बंद झाले. त्यामुळे टँकरशिवाय पर्याय नव्हता.

राज्य सरकारला १७ तारखेपर्यंत मुदत

0
0
अंशकालीन कला निदेशकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ ऑगस्टपासून सुरू केलेले उपोषण शिक्षक दिनी शुक्रवारी (५ सप्टेंबर) मागे घेतले. त्याआधी शिक्षकांनी काळ्या फिती लावून क्रांतीचौकातून विभागीय आयुक्तालायवर मोर्चा काढला.

गोदामात सापडला बारा लाखांचा गुटखा

0
0
जुना मोंढा भागातील एका गोदामावर छापा टाकून बारा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (५ सप्टेंबर) अन्न व औषध प्रशासन आणि गुन्हे शाखेने केली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर व परिसरात पावसाची हजेरी

0
0
सकाळी रिमझिम बरसल्यानंतर शहराच्या जवळपास सर्वच भागांमध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने अर्धा तास हजेरी लावली. दिवसभरात शहरात ४.०८ मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

‘त्यांना’ वाटले हे परीक्षकच आहेत...

0
0
उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचा सोहळा. कुटुंबीयांसह जि. प. शिक्षक मंडळी शुक्रवारी (५ सप्टेंबर) संत तुकाराम नाट्यगृहात पोचलेली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंडळी सभागृहाबाहेर पडलेली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images