रामाच्या नावावर सत्ता मिळविणारा भारतीय जनता पक्ष ढोंगी पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलतात. मुंबई गुजरातला न मिळाल्याने आता ते महत्त्वाचे प्रकल्प मुंबईतून हलवून बदला घेत आहेत.
गुजरातींनी व्यापारच करावा
↧
↧
झिडकारला विकासाचा अजेंडा
नियोजित स्मार्ट सिटी आणि ‘डीएमआयसी’ प्रकल्पामुळे झपाट्याने विस्तारत असलेल्या औरंगाबाद शहराचा सुनियोजित विकास होण्याऐवजी बकालपणाकडे वाटचाल सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या मुद्द्याला सर्वपक्षीय उमेदवारांनी दुय्यम स्थान दिले आहे.
↧
टोपेंना खिळवून ठेवणारी लढाई
घनसावंगी (जि. जालना) मतदारसंघातून १९९९पासून सातत्याने विजय मिळविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, पक्षाचे मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातच खिळवून ठेवले आहे.
↧
कुठंय औरंगाबाद माझं !
साहेब दिवसभरच्या प्रचारानं दमलेले. रात्रीचा एक वाजलेला. आता पाठ टेकावी, असा विचार सुरू. तितक्यात मोबाइल थरथरला. व्हॉटस् अॅपवर मेसेज होता. हा सर्वपक्षीय नेत्यांचा ग्रुप. यात औरंगाबाद मध्य, पूर्व आणि पश्चिम मतदार संघातले उमेदवार सहभागी होते.
↧
आघाडी, युती, मनसेला केवळ सत्तेची लालसा
विधानसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर न होता, केवळ राज्याची धुरा कोणाकडे असावी या मुद्द्यावरुन सुरू आहे. आघाडी, युती आणि मनसे या उजव्या पक्षांपैकी एकाकडेही विकासाचा मुद्दा नाही.
↧
↧
‘भाजपमुळेच एमआयएमची हिंमत वाढली’
‘भारतीय जनता पक्षाच्या कुटील नीतीमुळे युती तुटली. त्यामुळे एमआयएमची हिंमत वाढली,’ असा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
↧
खोटारडे आरोप केल्यास कोर्टात खेचू
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करत आहेत. त्यांनी जबाबदारीने बोलावे. कुटुंबियांवर, पक्षाबाबत खोटे आरोप केल्यास त्यांना कोर्टात खेचू,’ असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (६ आॅक्टोबर) येथे पत्रकार परिषदेत दिला.
↧
वेगळ्या राज्याची भाषा करू नका
महाराष्ट्रात शिवसेनेला विकासाचे पर्व सुरू करायचे आहे. स्वतंत्र राज्याची भाषा शिवसेना सहन करणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा करणाऱ्यांना साफ करून टाका असा हल्लाबोल करीत शिवसेनेची सत्ता आल्यास तुळजापूर तीर्थक्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकू, मात्र, यासाठी सेनेला ‘एकहाती सत्ता द्या’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
↧
भाजपला निवडणुकीपुरता बहुजन चेहरा लागतो
‘भारतीय जनता पक्षाला बहुजनाचा चेहरा फक्त मते मिळवण्यासाठी लागतो. निवडणुकीच्या तोंडावर प्रेम दाखवणारे पंतप्रधान मोदी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडला का आले नाहीत,’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.
↧
↧
कोजागरीसाठी लाखो भाविक तुळजापूरकडे
तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वार्धाची सांगता झाल्यानंतर महोत्सवाच्या उत्तरार्धाची सुरूवात कोजागरी पौर्णिमेपासून होत आहे. या कालावधीत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी ‘आई राजा उदे… उदे’चा जयघोष करत राज्यातून तसेच आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून हजारो भाविकांचा प्रवाह पायी तुळजापूरच्या दिशेने निघाला आहे.
↧
विकासकामांत सरकारला अपयश
राज्यातील आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने पंधरा वर्ष सलग सत्ता उपभोगली आहे. मात्र, जनतेला अपेक्षित असलेल्या विकासाची कामे केली नाहीत. उलट विकास कामे केली असा गवगवा ही मंडळी सध्या करू लागली आहे.
↧
आम्ही भ्रष्ट असू तर, केंद्राने चौकशी करावी
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वाधिक भ्रष्ट आहे, असे तुमचे म्हणणे असेल तर, केंद्रात तुमची सत्ता आहे. सीबीआय किंवा कोणत्याही संस्थेमार्फत चौकशी करा,’ असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
↧
कार्यकर्त्यांना सोसेना ऑक्टोबर हिटचा दणका
या विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे विविध पक्षांकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत. अर्थातच ऑक्टोबर हिटमु्ळे कार्यकर्त्यांकडून प्रचारासाठी वातानुकूलित मोटारींची मागणी होत आहे.
↧
↧
राज्यातील अनेक प्रश्न पृथ्वीराजांमुळे प्रलंबित
राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदार धरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या असहकार्यामुळे एल.बी.टी. आणि टोलचा प्रश्न प्रलंबित राहिल्याचे ते म्हणाले.
↧
वसुंधराराजे गेल्या थेट महिलांमध्ये
साधारणपणे कोणताही नेता सभेसाठी आल्यानंतर आधी व्यासपीठावर जातो. परंतु राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया या आधी सभेसाठी आलेल्या महिलांमध्ये मिसळल्या. त्यांच्याशी हितगूज केले, त्यानंतर मुलांमध्ये रमल्या व नंतर व्यासपीठावर आल्या.
↧
पशुधन विकास अधिकाऱ्याचा झटापटीत मुलाकडून खून
वडिलांसोबत झालेल्या झटापटीत मुलाकडून जबर मार लागल्यामुळे कन्नड येथील पशुधन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजीनिअर मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
↧
बॅग लिफ्टिंग करणारी गँग शहरात दाखल
टायर पंक्चर झाले आहे, तुमचे पैसे खाली पडले. अंगावर घाण पडली आहे, असे सांगून कुणी विनाकरण लक्ष विचलित करीत असेल तर, नागरिकांनी सावध राहावे. लक्ष विचलित करून बॅगा पळविणारी गँग शहरात दाखल झाली आहे, असे पोलिसांनी कळविले आहे.
↧
↧
पाखरांच्या गर्दीत डोळे पाऊल चुकले!
वाढत्या शहरीकरणात पशू-पक्ष्यांसाठी मोजकीच सुरक्षित जागा उरली आहे. सध्या वन्यजीवांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे शहरात पशू-पक्षी दिसत नाहीत. या परिस्थितीत हिमायतबाग संशोधन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शेकडो पक्ष्यांचे संरक्षण करून आदर्श पायंडा पाडला आहे.
↧
‘त्यांच्या’ जगण्याला अर्थ देणारं ‘नवजीवन’
सर्वसामान्य मुलांना वाढवणे, किमान शिक्षण देणे, स्वतःच्या पायावर उभे करणे आणि आयुष्यात घडवणे दिवसेंदिवस किती अवघड होत आहे, हा जवळजवळ प्रत्येकाचाच अनुभव. सर्व काही असतानाही ज्या वेळी ज्या गोष्टी आयुष्यात व्हायला हव्यात, त्याही होत नसल्याचे सर्रास पहायला मिळते.
↧
वरून कला केंद्र आतून कुंटणखाना
वरून कला केंद्र आतून कुंटणखाना केंद्र मालकासह सात अटक, दहा महिला ताब्यात म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकुंभेफळ येथील कला केंद्राच्या आडून सुरू कुंटणखान्यातून पोलिसांनी रविवारी ( ५ ऑक्टोबर)रात्री चार मुलींसह दहा महिलांची सुटका केली. या महिलांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. कला केंद्र मालकासह सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिसकोठडी सुनावण्यात आली आहे.जालना रस्त्यावरील कुंभेफळ परिसरात गेल्या सहा वर्षांपासून साई कला केंद्र चालविले जाते. या कला केंद्रात लावणी, बैठी लावणी सादर करतो, असा दावा केंद्रचालकांकडून केला जात होता, परंतु याच येथे देहविक्री केली जात होती. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले होते. विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांच्यासह ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडेही स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन अमितेशकुमार यांनी ग्रामीणपोलिसांना कारवाईचे आदेश दिले.कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींना पकडण्यासाठी दोन पंटरची मदत घेतली. दोन्ही पंटरकडे प्रत्येकी अडीच हजार रुपये देऊन रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना कला केंद्रावर पाठविण्यात आले. त्यांनी बोलणी केल्यानंतर ठरल्याप्रमाणे पोलिसांना इशारा केला आणि पथकाने केंद्रावर छापा टाकला. त्यावेळी कांही खोल्यांमध्ये महिलासह आक्षेपार्ह स्थितीत सापडलेल्या ग्राहकांना अटक करण्यात आली.प्रमुखासह पाच मुली व पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले. या महिलांनी चौकशीत देहव्यापाराची कबुली दिली आहे. त्यांच्यापैकी चार जणी अल्पवयीन असाव्यात, अशी पोलिसांना शंका आहे. या मुलींची दंत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिस उपाधीक्षक बारवकर यांनी सांगितले.या कारवाईत प्रशिक्षणार्थी डीवायएसपी अण्णासाहेब जाधव, सहायक पोलिस निरीक्षक प्रिया थोरात, कल्पना राठोड, सहायक पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, पोलिस कर्मचारी भारत शिंदे, दिलीप राजपूत आदींनी भाग घेतला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक यशवंत जाधव करीत आहेत. अटकेतील व्यक्तीकलाकेंद्राचा मालक बाबासाहेब किसनराव गोजे (वय ५४,रा. कुंभेफळ), उद्दलसिंग रावणसिंग ठाकूर (वय ५०,रा.रामनगर), विजय गिरीराज जंजाळे (वय ५१, रा. डोंगरगाव,ता. फुलंब्री), शेख रईस शेख रसूल (सातारा गाव), मदनसिंग रतनसिंग जोनवाल (वय ४७, रा. वेरूळ), उमरसिंग शिवसिंग जोनवाल (रा. खुलताबाद), अक्षय उत्तम गिरनारे (हडको) यांना अटक करण्यात आली आहे. बाबासाहेब गोजे याच्याकडून २२ हजार ५०० रुपये पोलिासांनी ताब्यात घेतले.२५ खोल्या, सीसीटीव्ही कॅमेरेकुंभेफळ येथील हे दोन मजली कला केंद्र पाच ते सहा गुंठ्यावर पसरलेले आहे. या केंद्रात २५ ते ३० स्वंतत्र खोल्या असून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याची सोय आहे. एवढेच नव्हे तर, पोलिसांची चाहूल लागावी, यासाठी केंद्राच्या बाहेर, प्रवेशद्वार, कॅश कांऊटर आदी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. इमारतीतून बाहेर पडण्यासाठीही दोन्ही बाजूने एकूण सहा दरवाजे आहेत. या परिसरात दुस-या एका इमारतीचे बांधकाम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
↧
More Pages to Explore .....