Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एलबीटी समितीची बैठक नावापुरती

0
0
‘स्थानिक संस्था कर समन्वय(एलबीटी) समितीची बैठक केवळ नावापुरती घेण्यात येते, त्यात कोणताही ठोस निर्णय व कार्यवाही होत नाही,’ असा आरोप समितीचे सदस्य तथा जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अजय शाह यांनी केला आहे.

टँकर बंद करू नका

0
0
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले, तरीही जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जुलैअखेर २०० टँकर सुरू असून पुरेसा पाऊस पडेपर्यंत ऑगस्ट अखेरपर्यंत टँकरना मुदतवाढ द्यावी

झेडपीच्या शिक्षकांकडे ८५ लाखांची थकबाकी

0
0
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था (ग्रामीण) औरंगाबादचे सदस्य असलेल्या गुरुजींकडे ८५ लाख रुपयांचे कर्ज येणे अजून बाकी आहे. त्यामुळे नफ्यावर परिणाम होत असल्याचे माजी चेअरमन दिलीप ढाकणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

रमजाननिमित्त बाजार फुलला

0
0
रमजान सणानिमित्त विविध वस्तूंनी बाजारपेठ सज्ज झाली असून कपडे खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. साड्यांचे असंख्य प्रकार बाजारात दाखल झाले असून यात स्टोन वर्क, मोगल वर्क साड्यांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

महिला पोलिसांमुळे बालिका सुरक्षित

0
0
खरेदीसाठी आईबरोबर आलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीची हुकाचूक झाल्याने मातेपासून ही मुलगी दुरावली. येथील दोन महिला कर्मचाऱ्यांनी या मुलीला चार तास सांभाळले.

काँग्रेसचा घोळ सुरूच

0
0
औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता अजूनही ताणली गेलेली आहे. गटातटाकडून उमेदवारीसाठी जोरदार मोर्चबांधणी सुरू असली, तरी सगळे काही दिल्लीतूनच फायनल होईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

शंभरांवर गाइडवर कारवाई?

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नियुक्त केलेल्या डॉ. खैरनार ‌समितीच्या अहवालातील २६ बनावट विद्यापीठांमधून पीएचडी, एमफील करणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी या विद्यापीठांमध्ये पीएचडी, एमफील मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या गाइडची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.

झेडपीत बैठकांचा मंगळवार

0
0
जिल्हा परिषदेत मंगळवारी बैठकांचे सत्र सुरू होते. प्रभारी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे बैठका झाल्या.

पन्नास वर्षांची साथ फियाटची!

0
0
गेल्या ५० वर्षांपासून किशोर मा. जोशी यांच्या परिवारातील एक सदस्य म्हणून तिला मान आहे. तिच्या सोबतचा प्रवास हा आनंददायी असतो. जीवनातील प्रत्येक घटनेची ती साक्षीदार राहिली आहे.

संतांच्या भूमीत भाविकांचा ओघ

0
0
औरंगाबाद जिल्ह्यात धार्मिक पर्यटन वाढत आहे. देशभरातून सर्व धर्मांतील भाविक दर्शनासाठी जिल्ह्यात येत असतात. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत कामे सुरू असल्याने पुढील पाच वर्षांत धार्मिक पर्यटन तब्बल २० टक्के वाढणार आहे. भाविकांनी भेट दिलेल्या तीर्थक्षेत्रांत घृष्णेश्वर मंदिर अव्वल ठरले आहे.

दहशतवादी पोलिसांच्या 'खिशात'

0
0
बॉम्बस्फोटांसह देशातील वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या खतरनाक दहशतवादी आणि सराईत गुन्हेगारांची माहिती असणारी पॉकेट डायरी उस्मानाबाद जिल्हा पोलिसांच्या वतीने तयार करण्यात आली आहे.

पाण्यावर उर्ध्व गोदावरीत डल्ला

0
0
पैठण येथील जायकवाडी धरणाच्या वरील बाजूला, उर्ध्व गोदावरी खोऱ्यात ११५.५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वापरण्याची परवानगी आहे. प्रत्यक्षात सध्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात १४६.५ टीएमसी पाणी वापर सुरू आहे.

पाणीपुरवठ्यात अडथळा

0
0
जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याचे समाधान संपूर्ण मराठवाड्याला असले तरी, यामुळे औरंगाबादचा पाणीपुरवठा गायब होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्यामुळे भर पावसाळ्यात नागरिक त्रस्त झाले आहेत.

देवयानी पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद

0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज केलेल्यांपैकी देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी छाननीत बाद ठरला.

पैनगंगा नदीला तिस-यांदा पूर

0
0
दोन दिवसांच्या उसंतीनंतर सुरू झालेल्या पावसाने पैनगंगा नदीला पुन्हा पूर आला आहे. पैनगंगेचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पसरल्यामुळे काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.

सतरा गावांना पुराचा धोका

0
0
नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणांतून १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे.

‘झालर’वर २,२२७ हरकती

0
0
झालर क्षेत्र विकास प्रारुप आराखड्यावर आक्षेप नोंदवण्याची मुदत शुक्रवारी संपली असून २२२७ आक्षेप व हरकती दाखल झाल्या आहेत.

‘जायकवाडी’ आठ टक्क्यांपर्यंत

0
0
जलसंकटाचा सामना केलेल्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा शुक्रवारी रात्री ७.९६ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. जोरदार पावसानंतर नाशिकपाठोपाठ नगर जिल्ह्यातील धरणांतूनही पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये ४ हजारांवर खड्डे

0
0
शहरातील रस्त्यांवर किमान चार हजारांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याची माहिती पालिकेच्या दप्तरी आहे.

खड्डयांमुळे सिटीबस-ट्रक अपघात

0
0
छावणी लोखंडी पुलाजवळ ट्रकवर सिटीबस आदळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घडली. या अपघातात १६ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी घाटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images