Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शहराचे कारभारी रस्त्यावर

0
0
महापालिका आणि कंत्राटदाराच्या वादात बंद पडलेल्या क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम संदर्भात ‘पेमेंट लकव्या’मुळे रखडले आहे. या संदर्भात ‘मटा’ने गुरुवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेला खडबडून जागी झाली.

गुरुजींना शाळेत यावेच लागेल

0
0
दांडीबहाद्दर शिक्षकांना चाप लावण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागाने हजेरी नोंदणीचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याद्वारे शिक्षक, मुख्याध्यापकांचा हजेरीपटच सर्वांना पाहता येणार आहे. या आदर्श प्रणालीमुळे शिक्षकांना नियमित शाळेत उपस्थित रहावे लागेल.

स्टेशन रोडसाठी चौथी डेडलाइन

0
0
शहरासाठी प्रतिष्ठेचा असलेल्या क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आता चौथी डेडलाइन देण्यात आली आहे. येत्या १ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या आशा पैसेवारीवर

0
0
बीड जिल्ह्यासह मराठवाडा यंदा पुन्हा एकदा कमी पावसामुळे अडचणीत आला आहे. मराठवाड्यात यंदा वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस झाला. त्यामुळे खरीप आले नाही आणि रब्बीची पेरणी अनेक ठिकाणी झाली नाही.

सफारी पार्क मार्गी लागणार

0
0
महापालिकेच्या मिटमिटा येथील सुमारे १०० एकरावरील प्रस्तावित प्राण‌िसंग्रहालयाची (सफारी पार्क) फाइल आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी १५ दिवसांपूर्वी ही फाइल मुंबईत जाऊन मंत्रालयातील महसूल विभागाच्या कक्ष अधिकाऱ्याला सापडून दिली.

२० वर्षांत भरा दीड लाख

0
0
समांतर जलवाहिनीचे काम करणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी २० वर्षांत शहरातील एका नळ ग्राहकाकडून पाणीपट्टीच्या नावाखाली सुमारे १ लाख ६० हजार रुपये वसूल करणार आहे. महापालिकेने ठरवून दिल्यानुसार पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ केली जाणार आहे.

रेखाच्या मदतीने पोलिसांची लुटमार

0
0
मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी तरुणीच्या मदतीने तरुणाला मारहाण करून लुबाडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बुधवारी (७ नोव्हेंबर) रात्री आठ वाजता एन चार भागातील पारिजातनगर येथील गार्डनमध्ये हा प्रकार घडला.

ड्रायलँड पोर्टसाठी ५०० एकर जागा

0
0
जालना एमआयडीसीलगत असलेल्या दरेगाव, दिनेगाव या परिसरात ड्रायलँड पोर्ट उभारणीसाठी शुक्रवारी (७ नोव्हेंबर) जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे जनरल मॅनेजर ए. के बोस आणि प्रकल्प समन्वयक श्रीमती कल्पा बैद यांनी जागेची पाहाणी केली. त्याचबरोबर त्यांनी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या सोबत त्यानी चर्चा केली.

‘आम्हाला माहीतच नाही, आजपासून शाळा आहे!’

0
0
दिवाळीच्या सुटीनंतर शुक्रवारी शाळा उघडल्यावर शाळांमधून किलबिलाट सुरू झाला असेल या कल्पनेने शाळा तपासण्यासाठी गेलेल्या शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना आडगाव सरक (ता. औरंगाबाद) येथील शाळा पाहिल्यावर धक्काच बसला.

महापालिका आयुक्त एक महिन्याच्या रजेवर

0
0
महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन सोमवारपासून (१० नोव्हेंबर) एक महिन्याच्या दीर्घ रजेवर जाणार आहेत. महाजन यांची तीन महिन्यांपूर्वीच आयुक्तपदी नेमणूक झाली.

पेपरफुटीच्या तपासात सापडले सुपर पॉवरचे आरोपी

0
0
पेपरफुटीच्या तपासादरम्यान यवतमाळहून येत असताना सुपर पॉवर घोटाळ्यातील आरोपी त्यांच्या गावाकडे आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार औरंगाबादचे एक पथक बोलावून बुधवारी रात्री लोणार, परभणी व घनसावंगी येथे सर्च मोहीम राबवली. त्यात सुपर पॉवरमधील कोअर कमिटीच्या चार आरोपींना अटक करण्यात आली.

खासदार खैरेंच्या झापाझापीने पालिका अधिकारी अस्वस्थ

0
0
क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्याची पाहणी करताना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या झापाझापीमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. यापुढे खैरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला किंवा पाहणी दौऱ्याला जायचे की नाही, असा विचार अधिकारी करू लागले आहेत.

ऊस दराचा गोंधळ कायम

0
0
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या स्थितीवर उसाचे दर अवलंबून आहेत. बाजारपेठेत साखरेचे दर उतरल्यामुळे उसाच्या भावाबाबत संभ्रम कायम आहे. सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात उसाचे सर्वाधिक क्षेत्र असून, पाच साखर कारखाने लवकरच गाळप सुरू करणार आहेत. केंद्र सरकारने उसाला २२०० रूपये प्रतिमेट्रीक ‘एफआरपी’ दर जाहीर केला आहे.

जायकवाडीतून हिरडपुरी, आपेगाव बंधाऱ्याकडे झेपावले पाणी

0
0
दुष्काळाची तीव्र चाहूल पुन्हा एकदा लागलीय. पैठण, शेवगाव व गेवराई तालुक्यातील जवळपास चाळीस गावांत पाणीप्रश्न तीव्र झाला आहे. या गावांचा सुकलेला घसा ओला करण्यासाठी शुक्रवारी (७ नोव्हेंबर) जायकवाडी धरणाच्या दहा गेटमधून पाणी सोडले.

बांबू, दर्भापासून पाच मजली मांडव

0
0
वेरूळ येथे ९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१४ दरम्यान होणाऱ्या विश्वशांती धाम धर्म संस्कार सोहळ्यासाठी पाच मजली २५ कुंडात्मक महायज्ञ मंडप उभारण्यात आला आहे. हा आकर्षक मंडप बांबू आणि दर्भापासून तयार करण्यात आला आहे. सत्तर राजस्थानी कारागिरांनी दहा दिवसात या मांडवाची उभारणी केली आहे.

विहिरीत सापडल्या जुन्या मतपेट्या

0
0
शहरातील जिल्हा परिषद क्वार्टरच्या मागील बाजूच्या गायरान परिसरात एका विहिरीत जुन्या मतपेट्या सापडल्या. त्यासोबतच एक दुचाकीची चेसी सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलिस व महसूल विभागाच्या अधिकारी व युवकांच्या मदतीने विहीरीतील हे सामान बाहेर काढण्यात आले.

पालिकेच्या कंत्राटदारांना आता ऑनलाइन पेमेंट

0
0
महापालिकेच्या कंत्राटदारांना आता ऑनलाइन पेमेंट मिळणार आहे. पेमेंटची ही पद्धत शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. त्यामुळे चेकसाठीची धावपळ आणि चेक लांबवण्याचे प्रकार महापालिकेत यापुढे होणार नाहीत, असे मानले जात आहे.

मुख्यमंत्र्यांचा दहा मिनिटांचा दौरा

0
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त वधु-वराला शुभेच्छा दिल्या. रहाटकर कुटुंबीयांशी संवाद साधला. अवघ्या दहा मिनिटांत दौरा आटोपून ते मुंबईकडे परतले.

एलबीटीतील सवलतीचा फटका तब्बल ७१ कोटींचा

0
0
विविध वस्तुंवरील स्थानिक स्वराज्य संस्था करात (एलबीटी) सवलती दिल्या जात असल्यामुळे महापालिकेला वर्षाकाठी तब्बल ७१ कोटी ६० लाख रुपयांचा फटका बसणार आहे. यामुळे शहरातील विकास कामांवर परिणाम होईल, असे मानले जात आहे.

उस्मानाबादेत डेंगी, चिकन गुनियाचा शिरकाव

0
0
राज्यभर थैमान घातलेल्या डेंगीने आता उस्मानाबाद जिल्ह्यातही शिरकाव केला आहे. याशिवाय चिकन गुनियानेसुद्धा ग्रासले आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत डेंगीसदृष्य आजाराने तीन जणांना जीव गमवावा लागला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images