Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बंधारे कोरडेठाक

$
0
0
कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी. तसेच त्यांची शेती ओलिताखाली यावी, या उदात्त हेतूने राज्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांची संकल्पना राबवीत अनेक नदी व नाल्यांवर कोल्हापुरी बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली.

‘नई रेल की जरूरत नही’

$
0
0
गर्दीच्या हंगामात अनेक रेल्वेचे डबे वाढविण्यात आले नाहीत. शिवाय विशेष रेल्वेही जाहीर करण्यात आल्या नाहीत. नांदेड-बिकानेर रेल्वे राजकीय दबाव वापरून पळविण्यात आली.

गोदावरीवरील पूल खचला!

$
0
0
गेवराई व शेवगाव तालुक्यातील जवळपास ४० गावांना पैठणशी जोडणारा गोदावरी नदीवरील पूल शनिवारी (८ नोव्हेंबर) अवैध वाळू उत्खननामुळे पूर्णपणे खचला. विशेष म्हणजे, आपेगावच्या संत ज्ञानेश्वरांची पालखी याच मार्गावरून जाते. पूल तुटल्याने पालखीमार्गाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

‘आयआयएम’साठी हालचाली सुरू

$
0
0
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मान्य करून चार महिने झाले, मात्र कोणत्या शहरात आयआयएम असावे? या संभम्रावस्थेतून राज्यसरकारच बाहेर आलेले नाही.

एलबीटीचा शॉक १७ महिने

$
0
0
शहरातील नागरिकांना तब्बल १७ महिन्यांपर्यंत विजेवरील एलबीटीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. महापालिकेने जीटीएलकडून एलबीटी वसुलीचा निर्णय घेतला. त्यानंतर जीटीएलने ही रक्कम वीज ग्राहकांच्या खिशातून काढण्याचे ठरविले.

युतीबद्दल सगळे चांगले होईल

$
0
0
शिवसेना-भाजप युतीबद्दल सगळे चांगले होईल. काळजीचे कारण नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (८ नोव्हेंबर) येथे व्यक्त केला.

खुलताबादमध्ये आता आठवड्यात एकदा पाणी

$
0
0
गिरिजा मध्यम प्रकल्प पुरता कोरडा झाल्यानंतरही पाण्याची टंचाई न जाणवलेल्या खुलताबादकरांना यंदा पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. सध्या चार दिवस पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता आठवड्यातून एक दिवस पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२,५०० ग्राहकांना वीज जोडणी नाही

$
0
0
जीटीएलच्या बेबंद आणि मोकाट कारभारामुळे ग्राहक वेठीस धरला जातो आहे. तब्बल नवीन अडीच हजार ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील दोन हजार ग्राहकांना विविध कारणासाठी वीज जोडणी नाकारली आहे. उर्वरित पाचशे जणांना अजूनही वीज जोडणी देण्याचा निर्णय जीटीएलने घेतला नाही.

चमकोगिरीत स्वच्छतेचे सोपस्कार

$
0
0
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी (९ नोव्हेंबर) झालेल्या भाजपच्या स्वच्छता अभियानात कार्यकर्त्यांची चमकोगिरी, फोटो सेशन, नियोजनाच्या अभावामुळे गोंधळ आणि रस्त्यावर तसाच पडून राहिलेला कचरा दिसून आला.

राजकीय पाठबळाशिवाय जवखेडे हत्याकांड अशक्य

$
0
0
‘तालिबानीवृत्तीच्या विकृत्तीतून झालेले नगर जिल्ह्यातील जवखेडे हत्याकांड राजकीय पाठबळाशिवाय अशक्य आहे,’ असा आरोप पिपल्स् रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला. ते रविवारी (९ नोव्हेंबर) औरंगाबादमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

परीक्षांचा रविवार; पण गैरहजेरीही मोठी

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टाफ सिलेक्शन, जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी रविवारी ( ९ नोव्हेंबर) झालेल्या परीक्षांसाठी विविध केंद्रावर गर्दी झाली होती. या परीक्षांसाठी परीक्षार्थींची मोठी गैरहजेरी होती.

पक्षाविरोधात काम केलेल्यांची नावे वरिष्ठांना कळविणार

$
0
0
विधानसभा निवडणुकीत मला काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र पक्षाच्या अनेक नेते, कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात काम केले. पक्षाविरोधात काम केलेल्यांची नावे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे कळविणार आहे, असा गौप्यस्फोट डॉ. जितेंद्र देहाडे यांनी केला.

सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

$
0
0
राज्याचा कारभार हाकण्यास पाठिंबा द्यायचा की नाही, यासाठी शिवसेनेने भाजपला दोन दिवसांचा अल्टिमेटम अटीसह दिला आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर असणार आहे. यामुळे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे.

अति झाले अन् हसू आले

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार ‘अति झाले अन् हसू आले’ ही म्हण चटकन आठवते. विद्यार्थ्यांवर बदलेल्या अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्याची वेळ येत आहे तर, प्रश्नपत्रिका वेळेवर न पोहोचल्याने परीक्षा केंद्रांची धावपळ उडताना दिसते.

पुलाच्या दर्जाचीही शंका

$
0
0
आपेगाव येथील गोदावरी नदीवरील पूल खचण्यासाठी वाळू उत्खनन हे कारण असल्याचे सांगितले जात असले तरी, हे एकमेव कारण नसावे, असे बांधकाम खात्यातील अभियंत्यांचे मत आहे. पुलाचा पाया खडकावर घेण्यात येतो, त्यामुळे दर्जेदार बांधकाम झाले नसावे, अशी शंका घेतली जात आहे.

सुरक्षारक्षकांचा केला खानसामा?

$
0
0
महापालिकेतील सुरक्षारक्षकांना अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतले काम दिल्यामुळे हे सुरक्षारक्षक आहेत की खानसामा असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक सुरक्षारक्षकांना त्यांचे मुळ काम दिले नाही. त्यामुळे पालिकेच्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या मालमत्तांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

RTOमध्ये बाहेरच्यांचे काय काम?

$
0
0
‘आरटीओ कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असली तरी, बाहेरच्या लोकांची मदत मुळीच घेऊ नका,’ असे खडेबोल परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी परिवहन अधिकाऱ्यांना सुनावले. मार्ग परिवहन खात्याच्या झालेल्या बैठकीत हा प्रकार घडला, तशी माहिती या विभागाच्या सूत्रांनी दिली.

‘जे देतील त्यांचा पाठिंबा स्वीकारू!’

$
0
0
‘आमचे सरकार अल्पमतात नाही. १२ तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईलच. जे पाठिंबा देतील त्यांचा पाठिंबा स्वीकारूच,’ अशी भूमिका राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी (९ नोव्हेंबर) स्पष्ट केली.

दुष्काळ जाहीर करा

$
0
0
सिल्लोड- सोयगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काँग्रेसने सोमवारी (१० नोव्हेंबर) उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

क्रीडा संकुलासाठी ६२ लाखांचा निधी

$
0
0
येथील तालुका क्रीडा संकुलासाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी ६२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे खुलताबाद तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तहसीलदार बालाजी शेवाळे दिली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images