‘वापरलेल्या निधीचा योग्य उपयोग झाला नसेल तर, त्या कामावर नवीन निधी का द्यायचा,’ असा सवाल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे बागडे यांनी केला आहे. ‘आजपर्यंत पैसा खर्च झाला, मात्र समस्या जैसे थे आहोत.
'तसे कामकाज चालणार नाही'
↧
↧
विद्यार्थ्यांना मिळणार ३० लाख
तालुक्यात आम आदमी शिष्यवृत्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्यातील ३५९ तहसीलदारांना खुलताबाद तालुक्यातील अंमलबजावणीचा अभ्यास करून त्यानुसार कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
↧
खडतर प्रवासाचा मार्ग
औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे दिव्य पार करण्यासारखे झाले आहे. आलापूर ते कन्नड या अंतरातील रस्त्याची पार दुरावस्था झाली असून टापरगाव येथील पुलावरील खड्ड्यांमुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे.
↧
चिखलामुळे संपर्क तुटला
नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने सातारा-देवळाईतील अनेक भागात चिखल आणि दलदल पसरली आहे. त्यामुळे या भागाचा मुख्य रस्त्यांशी आणि शहरांशी असलेला संपर्क तुटला आहे.
↧
शेळ्या चारण्यावरून गोळीबार
बकऱ्या चारण्याच्या किरकोळ कारणावरून शेंदूरवादा येथे रविवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी झालेल्या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे. यानंतर संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात गोळीबार करणारा व त्याचा साथीदार जखमी झाले आहेत.
↧
↧
कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला अटक
गारखेड्यातील स्वप्ननगरी भागातील एका कुंटणखान्यावर छापा मारून पोलिसांनी कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीला अटक केली आहे. यावेळी देहव्यापारासाठी आणण्यात आलेल्या एका तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे.
↧
कोणती संस्कृती जोपासली जातेय...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे चळवळीचे केंद्र मानले जाते. विद्यापीठांमधील चळवळीतून राज्याला, देशाला नेतृत्व मिळाले. पण आज बदललेल्या प्रश्नांसोबत ते मांडण्याचे स्वरूपही पूर्णपणे बदललेले आहे.
↧
...भांडणे मिटू दे देवा!
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी (१५ नोव्हेंबर) इव्हेंट मॅनेजमेंट केले. निमित्त होते दौलताबाद घाटातील दक्षिणमुखी हनुमानाच्या दर्शनाचे. यावेळी भांडणे मिटू दे देवा, असे साकडे त्यांनी संकटमोचकाच्या पायाशी घातले.
↧
एका पुरुषाची नाजूक घुसमट
पुरुष म्हणून जन्माला आल्यानंतरही साद घालणारे स्वतःतील स्त्रीत्व आणि समाजाचा पारंपरिक दृष्टीकोन या द्वंद्वात अडकलेल्या तरुणाची कथा मांडणारे ‘तिरुनानगाई तो.
↧
↧
आकाशवाणीचे औरंगाबाद केंद्र आहे!
‘श्रोतेहो नमस्कार, ऐकूया भक्तिगीतांचा कार्यक्रम...स्वरांजली’. सकाळी ठिक सव्वासहा वाजता आकाशवाणीवर उद्घोषिकेचा हा ठेवणीतला आवाज ऐकून अनेकांची सकाळ उजाडते.
↧
येणारे युग आयुर्वेदाचे
‘येणारे युग आयुर्वेदाचे आहे. त्याकरिता सर्व आयुर्वेद महाविद्यालयातून प्रत्येकी एक संघ राज्यस्तरीय आयुर्वेद प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये उपस्थित राहावा,’ असे आवाहन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशीनाथ गर्कल यांनी केले.
↧
विजेचे पुन्हा खासगीकरण?
आगामी तीन महिन्यांत वीज बिल वसुली, वीज गळती रोखा. अन्यथा वीज पुरवठ्याचे काम पुन्हा एकदा खासगी कंपनीकडे देण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रकाशगडावरून महावितरणला देण्यात आला आहे.
↧
पूल बांधले, आम्ही नाही मोजले!
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने बांधलेल्या तब्बल १००० पुलांची अजून अधिकृत नोंदणी झालेली नाही. तरीही या पुलांवरून वाहतूक बिनधास्त सुरू आहे. झेडपी बांधकाम विभागाकडे पुलांची एकूण संख्या किती आहे, हे सुद्धा बांधकाम विभागाकडे नोंदविलेले नाही.
↧
↧
‘आयआयएम’साठी आमदार सरसावले
आयआयएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) औरंगाबादलाच स्थापन व्हावे, यासाठी राजकीय पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप, शिवसेना आणि एमआयएमचे आमदार यासाठी सरसावले आहेत.
↧
दुष्काळग्रस्तांचे सेनेकडे लक्ष
मराठवाड्यामध्ये दुष्काळाचे सावट कायम असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
↧
मुलीच्या शोधासाठी वडिलांची याचिका
गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीच्या शोधासाठी वडिलांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. पोलिस तीन महिन्यांपासून शोध घेत आहेत, परंतु यश मिळत नाही, असे प्रतिज्ञापत्र तपास अधिकाऱ्यांनी खंडपीठात दाखल केले आहे.
↧
पावसाचा तडाखा
पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, मका व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेला कापूस खराब झाला आहे. सोंगणीसाठी शेतात काढून ठेवलेला मका भिजला असून त्याला कोंब फुटण्याची शक्यता आहे
↧
↧
सहकारी संस्थांचा निवडणुका
विधानसभा निवडणुकीनंतर आता संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जवळपास एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. चार टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ‘ड’ प्रवर्गातील संस्थांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.
↧
दुचाकीधारकांची विम्याकडे पाठ
गाडीचा इन्शुरन्स भरला नाही तर काय होणार, पाहून घेऊ..., अशी वाहनधारकांची मानसिकता झाली आहे. त्यामुळेच किमान ५०० रुपयांचा थर्ड पार्टी इन्शुरन्सचा हप्ता भरणे टाळले जात असल्याचा अनुभव आहे. त्याचा परिणाम मात्र अपघात झाल्यानंतर भोगावा लागतो.
↧
आयआयएमसाठी वाल्मीत तयारी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्था (आयआयएम) उभारणीसाठीच्या प्रक्रियेला वेग आला असून, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. आयआयएम औरंगाबादलाच उभारले जावे यासाठी उद्योजक, राजकारणांच्या पातळीवर हालचाली सुरू अाहेत.
↧
More Pages to Explore .....