राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती कायमची दूर करण्यासाठी राज्य शासन प्रभावीपणे योजना राबविणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पावसाचे पाणी समुद्राकडे न जावू देता ते मराठवाड्याकडे वळविण्याचा शासनाचा मानस आहे, असे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
कोकणातील पाणी मराठवाड्यात
↧
↧
वृक्षतोड्यांविरुद्ध जागेवर कारवाई
अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी जागेवरच कारवाई करण्याचे आदेश औरंगाबाद परिक्षेत्रातील वनरक्षक व वनपालांना शनिवारी (२२ नोव्हेंबर) देण्यात आले. जिल्ह्यातील वनक्षेत्र टिकवणे आणि लाकडाची चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी वन विभागाने तातडीने हा निर्णय घेतला आहे.
↧
आयुष्याला द्या ‘सोनो-मॅमो’ची भेट
प्रत्येक स्त्रीने निदान स्वतःच्या वाढदिवशी तरी आपल्या आयुष्याला सोनोग्राफी-मॅमोग्राफीची भेट द्यावी. तिच स्वतःला आणि कुटुंबाला खरी अमूल्य भेट असेल... २४-४८ तासही हातातून वाया जाऊ देणे धोक्याचे... लज्जा, संकोच व अपराधीपणाच्या भावनेमुळेच उपचारांना उशीर होतो.
↧
सर्पालय बनले धोकादायक
सिद्धार्थ उद्यानातील महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील सर्पालय धोकादायक बनले आहे. सापांसाठी तयार करण्यात आलेल्या पिंजऱ्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे साप पिंजऱ्यातून बाहेर येण्याची भिती आहे.
↧
‘बेटी बचाव, बेटी पढाव’
केंद्र शासनाच्या बेटी ‘बचाव, बेटी पढाव’ (बीबीबीपी) या महत्वाकांक्षी अभियानासाठी महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यात मराठवाड्यातील चार जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत.
↧
↧
महापालिकेचे क्रेडिट ‘क’ दर्जाचे
‘क्रेडिट रेटिंग’मध्ये औरंगाबाद महापालिकेला ‘क’ दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे पत वाढवल्याशिवाय महापालिकेला शासकीय योजनांसाठी कर्ज मिळणे येत्या काळात अशक्य होऊन बसणार आहे. त्यासाठी पत मूल्यांकन करण्याची सक्ती शासनाने महापालिकेवर केली आहे.
↧
आयआयएम औरंगाबादेतच?
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबादलाच मंजूर करण्याची तयारी सुरू झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून आयआयएमचे वर्ग तात्पुरत्या स्वरुपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भरविण्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
↧
खासदार गायकवाड यांना धक्काबुक्की
उस्मानाबादमध्ये भाजप, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या समोरच शनिवारी (२२ नोव्हेंबर) राडा केला. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांनी कुरापत काढून धक्काबुकी केली.
↧
३०३ ट्रान्सफाॅर्मर आजारी
महावितरणच्या औरंगाबाद ग्रामीण व कन्नड विभागात ३०३ ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त आहेत. ट्रान्सफाॅर्मरची दुरुस्ती व नवीन ट्रान्सफाॅर्मरची किंमत जवळपास एकच असल्याने ही दुरुस्ती म्हणजे नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था झाली आहे.
↧
↧
‘गाळपासाठी ठिबक आवश्यक’
‘ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन वापरले जाईल. त्याच कारखान्यांना पुढील काळात गळीत हंगामासाठी परवाना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
↧
महिनाभरात औरंगाबादच्या तक्रारी ऑनलाइन
औरंगाबाद शहरात कुठेही वीजेबाबत तक्रार असेल तर फ्यूज कॉल सेंटरला फोन करण्याची गरज नाही. महिनाभरात सर्व तक्रारी ऑनलाइन नोंदविण्यात येतील. उत्तम दर्जाची पारदर्शी सेवा पुरविण्यावर आमचा भर असेल, अशी ग्वाही महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी दिली.
↧
सांडपाण्याचे तळे; पालिकेला ना कळे
सातारा-देवळाईत अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या विल्हेवाटसंदर्भातील प्रश्न गंभीर आहे. अनेक कॉलनी, नगर, बिल्डिंगचे साडपाणी हे उघड्यावरच सोडल्यामुळे आसपासच्या रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे.
↧
मतिमंदत्व प्रमाणपत्रावर गंडांतर
दोन आठवड्यांपूर्वी घाटीतील मनोविकृती विभागाचे डॉक्टर व मनोरुग्णाच्या नातेवाईकामध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर, एक दिवस येऊन डॉक्टर रजेवर गेले आहेत.
↧
↧
क्रीडा संस्कृतीचा गौरव
अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला येथील लक्ष्मी- श्रीनिवास पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंडळाच्या वतीने संस्थेचे सदस्य विकास कोळेश्वर यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रोख दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ, असे आहे.
↧
भौतिक सुविधांबद्दल अनास्था
विद्यार्थ्यांबद्दल शाळांची अनास्था वेळोवेळी समोर येते. मोफत प्रवेशाचा प्रश्न असो की, भौतिक सुविधांचा प्रश्न असो. स्वच्छतागृहांबद्दलही कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर शाळा व्यवस्थापन, शिक्षण विभागाला जाग आली.
↧
कुख्यात गुन्हेगार सादिक शेख सापडला
दोन महिन्यापूर्वी दरोडा टाकण्याच्या इराद्याने शहरात घुसलेल्या एका टोळीला पोलिसांनी पकडले होते. परंतु टोळीचा म्होरक्या सादिक शेख पोलिसांच्या हाती तुरी देऊन पसार झाला होता.
↧
प्लास्टिकमुक्त शहराचा करा निश्चय
‘प्लास्टिक समस्येचे निर्मूलन करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. कारण ‘थिंक ग्लोबली अॅक्ट लोकली’ अशी ही समस्या आहे. प्रत्येकाच्या निश्चयानंतर प्रत्येक शहर प्लास्टिकमुक्त करणे सहजशक्य आहे’ असे प्रतिपादन केज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनी केले.
↧
↧
ऑन ड्युटी चोवीस तास
‘हॅलो...फायर ब्रिगेड...मोठी आग लागली आहे...’ आलेल्या फोनला कन्फर्म करून तात्काळ कामाला सुरुवात होते. कमीत कमी नुकसान कसे होईल, मनुष्यबळाची हानी कशी होणार नाही, यावर कार्यरत असणाऱ्या या सिस्टीमचा हा धांडोळा.
↧
मकबरा परिसर झाला चकाचक
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त रविवारी (२३ नोव्हेंबर) औरंगाबाद फोटोग्राफी लव्हर्स ग्रुप आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाने ‘स्वच्छ स्मारक स्वच्छ भारत’ अभियान राबवले.
↧
बेवारस रुग्ण दुर्लक्षित
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरातील बेवारस रुग्णांचा वाढता प्रश्न गंभीर बनला असून, सद्यस्थितीत किमान डझनभर अत्यवस्थ रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.
↧
More Pages to Explore .....