मराठवाड्यातील ८ हजार, तर विदर्भातील ९ हजार गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असून, आज विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लक्षात आले की मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ नसून केवळ शेतीचा दुष्काळ आहे.
दुष्काळग्रस्तांना ठेंगा!
↧
↧
आमची पुष्पनगरी
चंद्र, सूर्य, ग्रह, तारे निर्माण करून देवानं एक दीर्घ उसासा टाकला. नद्या-नाले, वृक्ष-वेली, पशू-पक्षी व खळाळत्या झाऱ्यांनी या निसर्गचित्रात आणखी बहार आणली. तरीसुद्धा देवाला अजून कुठंतरी, काहितरी राहून गेल्याचं वाटलं असावं!
↧
औरंगाबादच्या तरुणाने जोडले जगभराच्या रसिकांना
पंचेचाळीसावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सध्या गोव्यात सुरू आहे. हा महोत्सव अधिकाधिक चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक अभिनव संकल्पना राबविली आहे.
↧
शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला फटका
बीड जिल्ह्यात या वर्षी साडेतीन लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला होता. त्यादृष्टीने कापसाचे विक्रमी उत्पादन निघणे अपेक्षित होते. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले असून आतापर्यंत केवळ एक लाख तेरा हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
↧
पैठणकरांच्या पोटात गोळा
आक्षेपांवर सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर शेकडो पैठणकरांना शुक्रवारी शहर विकास आराखड्याची माहिती झाली आहे. मालमत्ता बाधित होणार असल्याने शेकडो नागरिक धास्तावले असून आता आक्षेपही नोंदवता येणार नाही.
↧
↧
समित्यांवर प्रशासक ‘जैसे थे’
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अहमदनगर, जळगाव, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील चौदा बाजार समितींच्या संचालक मंडळाने प्रशासक नियुक्तीविरोधात धाव घेतली होती.
↧
दहा दिवसांत तिढा सोडवा
समाजकल्याण विभागांतर्गत दलित वस्ती सुधार योजना, वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी निवडण्यात आले. पण गेल्या अडीच वर्षांत एकालाही लाभ दिला गेला नाही. २१ कोटी रुपये थकले आहेत.
↧
राजकीय नेत्यांची वरकमाई
वीज बिल, पाणीपट्टीच्या वसुलीतून काही राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वरकमाई सुरू केली आहे. गुंडागर्दी करून वसूली करण्याकडे या नेते, कार्यकर्त्यांचा कल आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
↧
जनता उपाशी; बिल्डर तुपाशी!
‘विकास कामांच्या फाइली तुंबल्या आहेत. आयुक्तही भेटत नाहीत. त्यांचा फोन नेहमीच बंद असतो. अशा परिस्थितीत वॉर्डांची कामे होणार कशी?’ असा सवाल करत नगरसेवकांनी महापालिकेच्या पायऱ्यांवरच शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) ठिय्या आंदोलन केले.
↧
↧
गायरान जमिनींना विळखा
जमिनींचे भाव गगनाला भिडलेले असताना जिल्ह्यामध्ये कोट्यवधींची गायरान जमिनींना प्रशासनाच्या आशीर्वादामुळे अतिक्रमणांचा विळखा पडला आहे.
↧
आमदारांची झोळी रिकामी
निवडून आलेल्या नव्या आमदारांना सरकारने हक्काचा आमदार निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे ऐन दुष्काळात मतदारांना सामोरे जाताना आमदारांची अडचण होऊ लागली आहे.
↧
औरंगाबादचे पाणी सर्वांत महाग
राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत औरंगाबाद शहरातील पाणी सर्वात महाग पाणी ठरले आहे. पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयामुळे पाण्याच्या वाढीव दराचे चटके नेहमीच नागरिकांना सहन करावे लागणार आहेत.
↧
पीएसआयचे घर फोडण्याचा प्रयत्न
भर दुपारची वेळ. सातारा परिसरातील छत्रपतीनगरात वर्दळ जवळपास नाहीच. कॉलनीत सामसूम. त्यावेळी दोन महिला या भागात फिरत होत्या. आसपास कुणीही नाही पाहून त्यांनी कुलूप असलेले एक घर हेरले. जवळ असलेल्या पान्याच्या सहाय्याने त्या घराचा कडीकोयंडा तोडला.
↧
↧
IIMसाठी आता तिसरा पर्याय?
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) कोणत्या शहरात स्थापन करायचे यावर राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. औरंगाबाद व नागपूर विभागांकडून प्रस्ताव आल्यामुळे निर्णयाला उशीर होत असल्याची चर्चा आहे.
↧
आयुक्त, नगरसेवकांत हमरी-तुमरी
विकास कामांच्या तुंबलेल्या फाइल निकाली काढण्याच्या मागणीसाठी महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांना भेटण्यासाठी गेलेल्या नगरसेवकाची आयुक्तांबरोबर हमरी-तुमरी झाली. प्रकरण बाचाबाचीपर्यंत गेले. त्यामुळे पोलिसांना महापालिकेत पाचारण करण्यात आले.
↧
दुष्काळ जीवावर उठला
दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यांमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. विभागात शनिवारी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे शेतकरी औरंगाबाद, जालना, लातूर व नांदेड जिल्ह्यांतील आहेत. सरत्या आठवड्यात उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली.
↧
औरंगाबादचे पाणी सर्वांत महाग
राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत औरंगाबाद शहरातील पाणी सर्वात महाग पाणी ठरले आहे. पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयामुळे पाण्याच्या वाढीव दराचे चटके नेहमीच नागरिकांना सहन करावे लागणार आहेत.
↧
↧
पशुधनात घट
उस्मानाबाद जिल्ह्यात चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या समस्येने पशुपालक व बळीराजाला ग्रासले आहे. दुष्काळाचे तीव्र सावट पशुधनावर आक्रमण करीत आहे. यंदाचा दुष्काळ हा प्रचंड प्रमाणात पशुधन घटवणार असेच काहीसे चित्र सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात अनुभवयास मिळत आहे.
↧
पाण्यासाठी भटकंती
बीड जिल्ह्याची ओळख दुष्काळी जिल्हा म्हणून झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
↧
नांदेडवर पाणीसंकट
नांदेड शहरासह गोदावरी नदीवरून पाणीपुरवठा योजना असलेल्या अनेक गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणीटंचाईच्या संकटात प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दररोज विष्णुपुरी धरणातून पाणी उपसा सुरू आहे.
↧
More Pages to Explore .....