शासकीय तंत्रनिकेतन, बीड येथील ‘मुद्रण निदेशकांना’ शासकीय तंत्र निकेतन मुंबई मधील मुद्रण निदेशका प्रमाणे सहाव्यावेतन आयोगासह समान वेतन (वाढीव वेतन) लागु करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद खंडपीठाचे उपाध्यक्ष राजीव अग्रवाल व सदस्य जे. डी. कुलकर्णी यांनी दिले.
बीडच्या मुद्रण निदेशकांना सहावा वेतन आयोग लागू
↧
↧
दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
तुळजापुर तालुक्यातील यमगरवाडी शिवारातील जोगदंड यांच्या वस्तीवर शनिवारी रात्री चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर तीनजण जखमी झाले.
↧
महावितरणचा शेतकऱ्यांना शॉक
फेब्रुवारी- मार्चमधील गारपीट व अवकाळी पावसानंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या वीज बिलातील सवलतींचा तालुक्यातील १३ हजार ४४२ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. महावितरणने दिलेल्या या शॉकमुळे यामुळे ४० गावांमधील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
↧
रोहयोसाठी बनकर पॅटर्न उपयोगी
मराठवाडा यंदा मोठ्या दुष्काळातून जाणार आहे. पुढचे सात महिने पाणीटंचाई, धान्यटंचाई जाणवणार आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रतिष्ठा जपत विविध कामांचे पॅकेज केले तर, योजनासाठी फलदायी ठरेल आणि गरजूंना फायदा होईल.
↧
चार शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शिवसेनेतर्फे आर्थिक मदत
गंगापूर आणि कन्नड तालुक्यात गेल्या आठवड्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची खासदार चंद्रकांत खैरे शनिवारी (१३ डिसेंबर) भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी शिवसेनेतर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली.
↧
↧
महावितरणकडे कर्मचाऱ्यांचा दुष्काळ
उद्योगनगरी वाळूजमध्ये महावितरणकडे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दुष्काळामुळे, उद्योजकांचा जीव टांगणीला लागला आहे. दहा हजार ग्राहकांमागे केवळ २६ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे तीन युनिटचे काम देण्यात आले आहे.
↧
शिक्षक सेनेचा आज ‘घंटानाद’
आदिवासी भागात १५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक प्रमाण कायम ठेवावे, २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेतर्फे सोमवारी (१५ डिसेंबर) घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
↧
पाणीपुरवठ्यातही गुजरातचा पॅटर्न
‘गुजरात राज्यात पाणी पुरवठा या विषयासाठी स्वंतत्र खाते असून तेथील योजना सुरळीत चालतात. त्यांच धर्तीवर राज्यात विशेष खाते तयार शक्य आहे का, यांचा विचार सुरू असून त्यासाठी आमदार आणि तज्ज्ञ व्यक्तींची मिती स्थापन करणार आहे,’ अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
↧
४१ गावांचा सुकला गळा
अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असली तरी टँकरची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ४१ गावांचा घसा पाण्याअभावी कोरडा पडला आहे. या गावांतील १ लाख २,४५३ नागरिकांची तहान टँकरवर अवलंबून आहे.
↧
↧
मुख्यमंत्र्यांच्या पत्रामुळे बोगस पाल्यांना अभय
स्वातंत्र्यसैनिकांच्या बोगस पाल्यांना अभय देणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पत्राला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. खंडपीठाने राज्य शासन, मुख्यमंत्र्यांचे कक्ष अधिकारी, मुख्य सचिव, औरंगाबाद व जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने बजावले आहे.
↧
भावी गुरुजींची वाट बिकट
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्यात रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कसे करायचे? याचा गुंता सोडण्यात शिक्षण विभागाची कसरत सुरू असताना, दुसरीकडे आपण शिक्षक होवू या अपेक्षेने लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
↧
‘मनोविकृती’च्या प्रमाणपत्रासाठी ड्रायव्हरचा टाहो
वैद्यकीय कारणासाठी रजेवर गेलेल्या एसटीच्या चालकाची केस काही महिन्यांपासून मेडिकल बोर्डावर असून, मनोविकृती विभागाच्या प्रमाणपत्रासाठी तब्बल महिन्यापासून ताटकळली आहे.
↧
निळवंडेचे पाणी जायकवाडीत
मुळा धरणातून सोडण्यात आलेले पाणी जायकवाडीमध्ये पोचल्यानंतर आता निलवंडे धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी रविवारी (१४ डिसेंबर) रात्री उशिरा धरणात येण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले. सोमवारी (१५ डिसेंबर) मध्यरात्रीपासून भंडारदरा येथील पाणी जायकवाडीत येणार आहे.
↧
↧
१८ हजार जणांनी दिली टीईटी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (१४ डिसेंबर) शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. नोंदणी केलेल्या १९ हजार ७६९ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ६३९ जणांनी परीक्षा दिली. दोन सत्रात झालेल्या परीक्षेला १ हजार १३० विद्यार्थ्यांची गैरहजेरी होती.
↧
...तर मग महाराष्ट्रात राहायचेच कशासाठी?
विकासाची भूमिका घेऊन राज्यातील सर्व भागांना समतोल माप दिले गेले पाहिजे. पाण्यासाठी, शिक्षणासाठी, हक्कासाठी चांगल्या संस्थांसाठी कायम आंदोलन करावे लागत असेल, तर मराठवाड्याने महाराष्ट्रात राहायचे कशासाठी? असा संतप्त सवाल उद्योजकांनी उपस्थित केला.
↧
रंगात रंगुनी साऱ्या, रंग माझा वेगळा
फॅशनच्या जमान्यात प्रत्येकाला आपला लूक वेगळा असावा वाटतो. अंगावर परिधान करण्यात येणारे कपडे यास अनन्यसाधारण महत्त्व असते. रंगांच्या हजारो छटांनी मन प्रफुल्लित होते.
↧
५३ चेहरे मिडास स्पर्शाने फुलले!
त्या ५३ चेहऱ्यांवरचा आनंद रविवारी (१४ डिसेंबर) पहातच रहावा असा होता. त्यांना त्या शस्त्रक्रियेने गगन ठेंगणे झाले. मनमोराचा पिसारा फुलला. पुन्हा-पुन्हा आरशात पाहण्याचा मोह त्यांना झाला. हे सारे शक्य झाले केवळ डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू असलेल्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरामुळे.
↧
↧
ATMची सुरक्षा वाऱ्यावर
बॅँकांनी शहरातील एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे. एटीएममधील पैशांबाबत काळजी घ्या, अशी सूचना केंद्र सरकारने बॅँकाना दिली. पोलिस प्रशासनाने याबाबत पाठपुरावा करत बॅँकांनी दक्षता घ्यावी अशी सूचना केली. बॅँकांनी पोलिस तर सोडाच केंद्र सरकारच्या सूचनाही जुमानल्या आहेत.
↧
अखेर केंद्राचे पथक आले...
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक रविवारी (१४ डिसेंबर) औरंगाबादमध्ये दाखल झाले. सोमवारपासून दोन दिवस हे पथक दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहे.
↧
पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गेल्या चोवीस तासांत जालना, नांदेड, परभणी जिल्ह्यामध्ये पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
↧