सोळा वर्षाच्या मुलीला अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत बलात्कार करणाऱ्या आरोपी व कुटुंबाविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने उस्मानपुरा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. या मुलीला लग्नाचे अमिष देत नंतर आरोपीने नकार दिला होता. या मुलीला सध्या एक वर्षाचा मुलगा आहे.
ब्लॅकमेल करून तरुणीवर अत्याचार
↧
↧
एकदा पास झाला की कायमचा पात्र!
पेट परीक्षेत एकदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला पुन्हा पेट देण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सोमवारी (२२ डिसेंबर) घेतला.
↧
महापौरांची कृती बेकायदेशीर
नोव्हेंबरमधील महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर झालेले दोन विषय सोमवारच्या सभेत महापौर कला ओझा यांनी सभागृहातच कुठलीही चर्चा न होता रद्द केले होते. ही कृती कायद्याला धरून नाही, असे मत विधीज्ञांनी व्यक्त केले.
↧
‘मटा’तर्फे ‘सिक्रेट सांता’ उपक्रम
ख्रिसमसच्या सकाळी उशीजवळ सांताक्लॉजने काय गिफ्ट ठेवले असेल याची उत्सुकता चिमुकल्यांना असते. पण गरीब कुटुंबातील गरजू आणि निराधार मुलांसाठी, असा कोणताच सांताक्लॉज गिफ्ट देत नाही. एकीकडे सुखवस्तू कुटुंबातील मुले सांताक्लॉजच्या गिफ्टमुळे आनंदी झाली असताना वंचित मुले त्याची वाट पाहतात.
↧
घातक ‘एक्सडीआर-टीबी’ चे ८ पेशंट
फुफ्फुसाचा ‘टीबी’च नव्हे तर गंभीर अशा ‘एमडीआर-टीबी’पेक्षाही अतिगंभीर व देशासाठी एक मोठे आव्हान ठरलेल्या ‘एक्सडीआर-टीबी’चे आठ रुग्ण घाटीच्या आणि कदाचित औरंगाबादच्या इतिसाहात पहिल्यांदाच रेकॉर्डवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
↧
↧
प्रवास आजही धकाधकीचाच
गेल्या वर्षभरात रेनिगुंटा रेल्वे सुरू झाली, स्टेशनवर लिफ्ट बसविण्यात आली, औरंगाबाद-चाळीसगाव लोहमार्ग मंजूर करण्यात आला, असे काहीसा दिलासा देणारे निर्णय झाले, एवढेच...
↧
कंत्राट संपले, कुत्रे मोकाट
शहराच्या हद्दीतील मोकाट कुत्री पकडण्यासाठी महापालिकेकडून खासगी संस्थेला दिले जाणारे कंत्राट १२ डिसेंबर रोजी संपले आहे. नवीन कंत्राटदाराची नेमणूक होईपर्यंत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा कसा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. दरम्यान, पुढचे तीन महिने यावर तोडगा निघणार नसल्याची चिन्हे आहेत.
↧
‘आयआयएम’ची शिफारस
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एमआयटी), भारतीय तंत्रशास्त्र संस्था (आयआयटी) या संस्था मराठवाड्यात स्थापन कराव्यात, अशी महत्त्वाची शिफारस डॉ. विजय केळकर समितीने केली आहे.
↧
पाण्यासाठी शहरवासीयांचा टाहो
फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी रात्री जलवाहिनी व व्हॉल्व्ह फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. दोन दिवस उलटून गेले तरीही दुरुस्ती न झाल्याने शहरवासीयांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागले. सिडको हडकोत मात्र सलग पाचव्या दिवशी पाण्याचा ठणठणाट होता.
↧
↧
‘एमडीआर-टीबी’च्या ५२ रुग्णांचा मृत्यू
मागच्या तीन ते साडेतीन वर्षांत ३७३पैकी तब्बल ५२ ‘एमडीआर-टीबी’च्या रुग्णांचा घाटीत मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये एचआयव्हीबाधित ‘एमडीआर-टीबी’च्या पाच रुग्णांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ३७३पैकी तब्बल ३६९ रुग्णांना पूर्वी ‘टीबी’ होता आणि विविध कारणांमुळे त्याचे रुपांतर ‘एमडीआर-टीबी’मध्ये झाल्याचे दिसून आले आहे.
↧
१४ अतिक्रमणे जमीनदोस्त
महापालिकेच्या वतीने बुधवारी (२४ डिसेंबर) अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. कटकटगेट परिसरातील १४ अतिक्रमणे, टिनशेड तर ४२ चारचाकी हातगाड्या हटविण्यात आला. मात्र ही मोहीम केवळ काही वेळापुरतीच राबविण्यात आली. हातगाड्यांचे अतिक्रमण हटविण्यात पालिका प्रशासनाला सातत्याने अपयश येत आहे.
↧
१५ एकरात साकारले विपश्यना केंद्र
शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर नाशिकरोड मार्गावर १५ एकरात भव्य असे धम्म अजंता विपश्यना केंद्र साकारले आहे. आचार्य पद्मश्री सत्यनारायण गोएंका यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सध्या येथे १० दिवसांचे अभ्यासक्रम राबवण्याचा मानस असल्याची माहिती, आचार्य चंपालाल खिवंसरा यांनी दिली.
↧
सिडकोच्या परवानगीची चौकशी
झटपट पैसा कमावण्यासाठी सातारा-देवळाई पसिरात तुंबड्या भरणाऱ्या बिल्डरांनी नियम धाब्यावर बसवून इमारती उभ्या केल्या. आता ज्या बिल्डरांनी सिडकोकडून बांधकाम परवानगी घेतली आहे, आता अशा इमारतींचीही चौकशी करण्यात येणार आहे.
↧
↧
राजकीय श्रेयाची पाणीदार लढाई
दुष्काळी फेऱ्यात अडकलेल्या जालनेकरांना जायकवाडी धरणातून थेट पाणी पुरवठा सुरू झाला आणि अत्यल्प प्रमाणात का होईना नागरिक समाधानी झाले. आता या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी नेत्यांची लढाई सुरू आहे. एकीकडे या योजनेतून अबंडला पाणी मिळावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून आमदार नारायण कुचे यांनी मिळवले आहेत, तर कॉँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांनी या योजनेतून अंबडला पाणी द्यायला विरोध केला आहे.
↧
वधुपित्यांच्या जीवाला दुष्काळी घोर
वधुपित्यांच्या जीवाला आता दुष्काळाने घोर लावला आहे. त्यामुळे त्याच्यावर चक्क उपवर मुला-मुलींची लग्ने पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी होरपळतो आहे. याचा परिणाम तालुक्याच्या मार्केटवर झाला आहे.
↧
वेरूळ लेणीच्या सुरक्षेत वाढ
नाताळच्या सुट्यांमध्ये होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन वेरूळ लेणीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या परिसरात रॅपिड अॅक्शन फोर्सची तुकडी तैनात करण्यात आली असून, मंगळवारी (२३ डिसेंबर) खासगी सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
↧
शिस्तबद्ध सहकारयात्री
नियोजनपूर्वक काम. त्याला मेहनत, चिकाटी आणि स्वयंशिस्तीची जोड असल्यास हमखास यश मिळते. हे आपल्या कृतीतून साध्य केले आहे, सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले हरिभाऊ बागडे उर्फ नाना यांनी.
↧
↧
ग्राहक तक्रार मंचाचा दणका; विमा कंपनीला लाखाचा दंड
मुखेड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या पत्नीला १ लाख ४ हजार रुपये नुकसान भरपाई ३० दिवसात द्यावी असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी आणि सदस्य आर. एच. बिलोलीकर यांनी फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.
↧
कर्ज न घेता बोजा टाकणाऱ्या बँकांवर कारवाई करणार
एक लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावर कुठल्याही बँकेने कर्ज बोजा टाकू नये. कर्जाचा बोजा टाकला असल्यास सात-बारा तात्काळ कोरा करुन द्यावा, अन्यथा संबंधित बँक विरोधात कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राष्ट्रीयीकृत, प्रादेशिक, खासगी व सहकारी बँकांना दिला.
↧
पॅकेज नको; हमीभाव द्यावा
सरकारने दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेज, अनुदानाच्या कुबड्या देण्यापेक्षा, त्याच्या धान्य उत्पादनाला, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा असे आवाहन राज्य शासनाच्या आदर्श ग्रामयोजना समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.
↧
More Pages to Explore .....