स्वातंत्र्यसैनिक धाबेकर यांनी सरंक्षण देण्याची मागणी २ मे २०१४ रोजी उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. यानंतर हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी उस्मानाबाद पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात आला होता. याप्रकरणात कोणाकडून धोका आहे याची माहिती पोलिस स्टेशनला कळवा त्यानंतर संरक्षणाची गरज आहे किंवा नाही याची पडताळणी करून संरक्षण देण्याबाबत विचार केला जाईल, असे पोलिस प्रशासनाकडून त्यांना कळविण्यात आले. त्यानंतर संरक्षणासाठी मागणी केलेला विनंती अर्ज निकाली काढण्यात आल्याचे अंमलदारांनी ३१ जानेवारी २०१५ रोजी त्यांना कळविले होते.
धोका कोणाकडून आहे त्यांची नावे द्या, अशा प्रकारची लेखी मागणी करून पोलिस आपली जबाबदारी टाळत आहेत. त्यांना नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरेंसारखी हत्या हवी आहे.
- विष्णूपंत धाबेकर, स्वातंत्र्य सैनिक, उस्मानाबाद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट