गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी-मांडवा गट ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या रोजगार हमी योजनत १३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार झाली आहे.
तांदुळवाडी-मांडवात ‘रोहयो’त गैरव्यवहार
↧
↧
डांबरीकरणाच्या कामाला लागला मुहूर्त
गेल्या आठ दिवसांत शहरातील खड्डे किती बुजवले, याचा तपशील पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे नाही; मात्र बॉयलर पेटवून काही रस्त्यांवर डांबरीकरणाचे काम पालिकेने सुरू केले आहे.
↧
पाकिस्तानी कलाकारांना परत पाठवा
भारतीय जवानांवर गोळीबार करणा-या पाकिस्तानला सरकारने चोख प्रत्युत्तर द्यावे तसेच सर्व पाकिस्तानी कलाकारांना त्वरीत हाकलून लावा, अशी मागणी हिंदू जनजागरण समितीने केली आहे.
↧
पाकविरोधात संताप
शिवसेनेने उग्र निदर्शने करून पाकिस्तानचा तीव्र निषेध केला. क्रांती चौकात जमलेल्या शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून पाकिस्तानला नेस्तनाबूत करा, असा इशारा देण्यासाठी नकाशावर गोळ्या झाडल्या. बोटचेपी भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारविरोधातही या वेळी संताप व्यक्त झाला.
↧
मराठवाड्याच्या विकासासाठी देवगिरी राज्य हवे
वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन सुरू झालेले असतानाच आम आदमी पार्टीने मराठवाड्यासह शेजारी अन्य चार जिल्ह्याचा समावेश करून वेगळ्या देवगिरी राज्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
↧
↧
‘बहिःस्थ शिक्षण’ महागले, विद्यार्थी एकवटले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बहिःस्थ शिक्षण अभ्यासक्रमांच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. ही शुल्कवाढ परवडणारी नसून त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याचे सांगत ही शुल्कवाढ कमी करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
↧
सोने-चांदीच्या उलाढालीचा ताळमेळच नाही
पालिका क्षेत्रातील सोने - चांदीच्या व्यापाऱ्यांनी केलेली उलाढाल व त्यांनी भरलेला स्थानिक संस्थाकर याचा ताळमेळच लागत नाही. त्यामुळे स्थानिक संस्थाकर विभागात (एलबीटी) काम करणारे अधिकारी - कर्मचारी अकार्यक्षम आहेत असे कडक ताशेरे लेखापरिक्षण अहवालात मारण्यात आले आहेत.
↧
ट्रकच्या धडकेत दोन ठार
भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता बीड बायपास भागात घडली.
↧
जागतिक पोलिस शरीरसौष्ठव स्पर्धा
बेलफास्ट (उत्तर आयर्लंड) येथे नुकत्याच झालेल्या जागतिक पोलिस आणि फायर गेम्समध्ये जालन्याच्या पोलिस शिपाई किशोर डांगेने सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळाले आहे.
↧
↧
‘रोजे के लिए उठो’
वेळ पहाटे तीन ते साडेतीनची, हातात काठी, डोक्यावर रुमालासह टोपी घालून परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिकांच्या घरासमोर जाऊन ओळखीच्या माणसाला आवाज देऊन, रोजा इफ्तारीसाठी जागे करण्याचे काम रऊफभाई करतात.
↧
प्रत्येक मतासाठी शिवसेनेची शिकस्त
एकास एक लढत होत असल्याने विद्यमान आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासाठी विधान परिषदेची निवडणूक सोपी राहिलेली नाही. तिसरा उमेदवार नसल्याने गेल्या एक एक मत मिळवण्यासाठी शिवसेनेला शिकस्त करावी लागत आहे.
↧
उंट अडकला जाळीत
शहरातील बच्चे कंपनीला आपल्या पाठीवरून फिरविणाऱ्या एका उंटाचा पाय रस्त्यावरील नालीच्या जाळीत अडकला आणि तो कोसळला. अथक पयत्नांनंतर जाळी तोडून त्याची सुटका करण्यात आली.
↧
‘मस्कट’ला पुन्हा पेमेंट कशाचे?
‘पेमेंट द्या नाही तर कोर्टात खेचतो’, असा इशारा देणारी नोटीस बजावणाऱ्या मस्कट कन्स्ट्रक्शन कंपनीला पालिकेच्या लेखा विभागानेही मुहतोड जबाब दिला आहे.
↧
↧
यंदाही तीन दिवसांआड पाणी
जायकवाडी धरणात अद्याप पुरेसा साठा नसल्याने औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याच्या स्थितीत कोणताही बदल होणार नाही. जायकवाडी धरण किमान सत्तर टक्के भरेपर्यंत शहरवासियांना तीन दिवसांआडच पाणी मिळणार आहे.
↧
लॉटरी चालकाला लुबाडणारा जेरबंद
लॉटरीचालकाच्या दुकानात गोंधळ घालून दोन हजार रुपये लुबाडणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला सिडको पोलिसांनी अटक केली. सनी सेंटर भागात गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला.दीपक विभूतराव खडके (वय २१, रा. एन ६, बजरंग चौक) या तरुणाचे सनी सेंटर भागात लॉटरीचे दुकान आहे.
↧
दोन आरोग्य केंद्रात पथदर्शी उपक्रम सुरू
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील रुग्णांची सर्व माहिती ऑनलाइन नोंदविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची स्थिती नेमकी कशी आहे, हेही लगेचच कळणार आहे.
↧
पालिकेच्या नर्सरीतून फक्त ३२३ जणांनीच नेली रोपे
‘देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ या प्रत्यय पालिकेच्या नर्सरीतून वाटप केल्या जाणाऱ्या रोपांच्या बाबतीत येऊ लागला आहे. तेरा लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात आतापर्यंत फक्त ३२३ जणांनीच पालिकेच्या नर्सरीतून वृक्षारोपणासाठी रोपे नेली आहेत.
↧
↧
‘त्या प्राध्यापकांसाठी अध्यादेश काढा’
वरीष्ठ महाविद्यालयातील १९९१ ते २००० या नियुक्ती काळातील बिगर नेट-सेट प्राध्यापकांच्या सेवेचा कालावधी पदोन्नतीसाठी गृहीत धरावा, असे अध्यादेश काढावा, अशी मागणी पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.
↧
ज्ञानअंकुर विद्यालयाचा दुष्काळावर प्रयोग
जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या इन्स्पायर अॅवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ज्ञानअंकुर विद्यालय संघाने दुष्काळावर मात करण्याचा प्रयोग सादर करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
↧
लोकसहभागातून विद्यार्थ्यांना वॉटरबॅगचे वाटप
आसेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीच्या ४५५ विद्यार्थ्यांना लोकसहभागातून पंधरा हजार रुपयांच्या वॉटर बॅग वाटप करण्यात आल्या.
↧
More Pages to Explore .....