Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नोकरीच्या आमिषाने एक लाखाची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँकेत लिपिकाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला एक लाख रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यत जेसन रॉय नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरिहंतनगर येथील दिप्तीमनी डेका (वय २७) यांची २६ जानेवारी रोजी नेटवर जेसन रॉय नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. त्याने दिप्तीमनी यांना इंड्स बँकेत लिपिकाच्या जागा भरायच्या आहेत, बँकेत ओळख असल्याची माहिती दिली. दिप्तीमनीने नोकरीसाठी तयारी दाखविल्यानंतर त्याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात १ लाख १ हजार ७८० रुपये भरण्यास सांग‌ितले. ही रक्कम वेगवेगळ्या टप्प्यात भरण्यास सांगितली होती. रॉय याने २० फेब्रुवारीनंतर दिप्तीमनीशी यांच्याशी संपर्क कमी केला. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने फसवणूक लक्षात आलय़. त्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


MIDC तील सहायकास ३ वर्षांची सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रादेशिक कार्यालयातील सहायक मधुकर बोगाने याला लाच घेतल्याप्रकरणी तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना १८ ऑक्टोंबर २००५ रोजी घडली होती.

मधुकर बोगाने याला प्लॉटचे ताबा प्रमाणपत्र देण्यासाठी १६०० रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी अटक करून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती गायकवाड यांनी कोर्टात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याचा गुरुवारी निकाल देण्यात आला. आरोपी मधुकर बोगाने याला कलम ७ नुसार तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद; कलम १३ (१) (ड) सह कलम १३ (२) नुसार तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस जमादार रवी शिरसाठ, अनिल भावसार यांनी मदत केली. सहायक सरकारी वकील एस. एम. रझवी यांनी पोलिसांची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका निवडणुकीत समाज पक्ष रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष रवी वैद्य यांनी दिली. वैद्य म्हणाले, 'वॉर्डनिहाय माहिती आढावा घेण्यात येत असून प्रबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी झालेली आहे. त्यासाठी योग्य उमेदवार रिंगणात उतरविणार आहोत.' निवडणूक तयारीसाठी जिजाऊ भवनात कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रा. भास्कर टेकाळे, प्रल्हाद राठोड, संतोष कोल्हे, डॉ. देवांग जोशी, दिलीप रिठ्ठे, योगेद्र निकुंभ, मंजुश्री धडे, पांडुरंग काळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यानगरातील उमेदवारीसाठी महापौरांची शिफारस महत्त्वाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यानगर वॉर्डातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी महापौर कला ओझा यांची शिफारस महत्त्वाची ठरणार आहे. महापौर सध्या या वॉर्डाच्या नगरसेविका आहेत. त्यामुळे त्या ज्यांच्या नावची शिफारस करतील, त्याच व्यक्तीला उमेदवारी देण्याचा विचार सेनेतील काही नेते करीत आहेत.

विद्यानगर वॉर्ड महापालिका निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे. त्यामुळे या वॉर्डावर अनेकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. विविध पदांवर काम करणारे शिवसेनेतील पदाधिकारी देखील या वॉर्डातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु या सर्वांना महापौर कला ओझा यांच्या शिफारशी शिवाय तिकीट मिळणार नाही असे बोलले जात आहे. तसा अलिखीत फतवाच एका स्थानिक नेत्याने काढला आहे. कला ओझा देखील याच वॉर्डातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना विजयनगर-बाळकृष्णनगर हा वॉर्ड देखील आहे. हा वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.

विद्यानगर वॉर्ड जसा ओझा यांच्यासाठी सुरक्षित आहे, तसाच विजयनगर-बाळकृष्णनगर वॉर्ड देखील त्यांच्यासाठी सुरक्षित मानला जात आहे. त्यामुळे त्यांनी या वॉर्डातून निवडणूक लढवावी आणि विद्यानगर वॉर्डातून शिवसेनेच्या सक्षम पदाधिकाऱ्याने किल्ला लढवावा असे बोलले जात असताना ओझा यांच्या शिफारशीची अट घातली जात आहे. ही अट पक्षासाठी फायदेशीर ठरेल का, या बद्दलही शिवसेनेत उलटसुलट चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या पथकावर बेगमपुऱ्यात दगडफेक

$
0
0

औरंगाबाद : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर बेगमपुरा येथे जमावाने शुक्रवारी (२० मार्च) दगडफेक केली. या दगडफेकीत पथकातील एका कर्मचाऱ्याच्या डोक्याला मार लागला, तर काही नागरिक जखमी झाले. बेगमपुरा भागातील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली टपऱ्यांची अतिक्रमणे काढण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पालिकेचे पथक पोचले. या पथकाने एक रसवंती आणि काही टपऱ्या काढल्या. पानटपरीचे अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचे पथक काम करून लागले तेव्हा तेथे जमलेल्या नागरिकांनी अचानक दगडफेक सुरू केली. यात पालिकेच्या पथकातील एक कर्मचारी जखमी झाला, त्याच्या डोक्याला मार लागला. प्रशासकीय अधिकारी महावीर पाटणी यांनी त्यास घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहागंज, गुलमंडीत ४५ हातगाड्यांवर कारवाई

$
0
0

औरंगाबाद : शहागंज व गुलमंडीवरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी (२० मार्च) कारवाईचा बडगा उगारला. शहागंज व गुलमंडी भागातील ४५ हातगाड्यांवर कारवाई करीत हातगाडीधारकांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली.

गुलमंडी व शहागंज परिसरात हातगाडीधारकांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहनधारक व नागरिकांना याबद्दल सिटीचौक पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. पोलिसांनी सूचना देऊनही दाद देत नसल्याने कारवाई करण्यात आली. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या शहागंजमधील २९ व गुलमंडीवरील १६ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. हातगाडीधारकांवर रस्त्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आली असून कोर्टात दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ‘पत्रांदोलन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकरी विरोधी भूसंपादन कायद्यात बदल करण्यात यावा, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ५०० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (२० मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले. लोकसभा निवडणुकीत तरुणांनी नरेंद्र मोदी यांना प्रतिसाद देत भाजपच्या हाती सत्ता दिली. मात्र या भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याऐवजी उद्योगपतींच्या हितासाठी भूसंपादन कायद्यात बदल करून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची भावना विद्यार्थ्यांनी पत्रामध्ये व्यक्त केली आहे. काही विद्यार्थ्यांनी पत्रात शेतकऱ्यांच्या गरिबीचे भीषण वास्तव मांडले आहे.

विद्यार्थ्यांसोबतच काही प्राध्यापकांनीही पंतप्रधानांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांनी सामुहिकपणे विद्यापीठातील पोस्ट कार्यालयाजवळ बसून पत्रे लिहून पोस्टाच्या पेटीत टाकली. या अभिनव उपक्रमासाठी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता. पत्र पाठविणाऱ्यांमध्ये विविध विधागातील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ प्रा. डॉ. राम माने, डॉ. राम चव्हाण, 'रासेयो' समन्वयक डॉ. राजेश करपे, डॉ. बापु शिंगोटे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, भाविसेचे तुकाराम सराफ, एसएफआयचे सुनील राठोड, डॉ. जेधे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठ्यपुस्तक मंडळाचे सहा दिवस व्यवहार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय कार्यालयांमधील आवक-जावक, विक्रीचे व्यवहार २६ ते ३१ दरम्यान बंद असणार आहेत. या दरम्यान पुस्तके, कागद, छापील साहित्याची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार आहे. त्यामुळे हे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांनी याची नोंद घेण्याचे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पगार रखडल्याने शिक्षकाची आत्महत्या

$
0
0

आंदोलकाने घेतला बीडच्या हॉस्पिटलमध्ये गळफास

म. टा. प्रतिनिधी, बीड

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला बीड जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे वर्षभरापासून पगार न झाल्याने आंदोलक जिल्हा परिषद शिक्षकाने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

हिरामण साहेबराव भंडाने (वय ३२ रा. मांडवजाळी) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून तो बीड तालुक्यातील चौसळ्याजवळील कोकणे वस्ती येथे कार्यरत होते. जिल्ह्यात शिक्षकांची संख्या पुरेशी असताना. तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांच्या काळात शेकडो आंतरजिल्हा बदली करून शिक्षक बीड जिल्ह्यात आणण्यात आले. जावळेकर यांच्या नियमबाह्य कामांमुळे राज्य सरकारने त्यांना गेल्या आठवड्यात निलंबित केले. जिल्ह्यात हजार शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एक वर्षांपेक्षा अधिककाळ उलटून गेला तरी अतिरिक्त शिक्षकांना पगार मिळत नव्हता.

याविरोधात जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून भारतीय बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात हिरामण भंडाने हे मांडवजाळी येथील रहिवासी असलेले व बीड तालुक्यातील कोकणे वस्ती येथे ते अतिरिक्त शिक्षक ठरले होते. आंदोलन सुरू असताना पोटात दुखू लागल्याने त्यांना जालना रोडवरील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनी शनिवारी पहाटे म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी हॉस्पिटलमधील गॅलरीला शालीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूने गर्भवतीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) स्वाइन फ्लूने चिकलठाणा येथील नऊ महिन्यांच्या एका गरोदर महिलेचा शुक्रवारी (२० मार्च) मृत्यू झाला. आतापर्यंत घाटीमध्ये स्वाइन फ्लूमुळे १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७ झाली आहे.

चिकलठाणा येथील शिवाजी चौक परिसरातील रहिवासी राधिका बंडू म्हस्के (२३) यांना १४ मार्च रोजी घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात ४ रुग्ण असून त्यापैकी १ रुग्ण पॉझिटिव्ह, तर ३ रुग्ण संशयित आहेत. यातील एका रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच तीन महिन्यांच्या गरोदर महिलेवरही याच वॉर्डात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी दिली. या संदर्भात, संबंधित मृत गरोदर महिला किमान चार ते पाच दिवस उशिरा घाटीच्या वॉर्डात दाखल झाली. या महिलेला दाखल करतानाच तिची प्रकृती गंभीर होती. तसेच तिच्यावर उशिरा औषधोपचार सुरू झाल्याचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी सांगितले. संबंधित मृत महिलेला चार वर्षांची मुलगी असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीची थाप : १० लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रयत ‌शिक्षण संस्थेत लिपिकाच्या नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाला दहा लाख रुपयांना गडवण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली. संजय आडे (रा. कासलीवाल तारांगण, मिटमिटा) यांची तीन वर्षांपूर्वी विश्वनाथ उपलवाड याच्यासोबत ओळख झाली होती. पुणे येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांची ओळख असून संस्थेत लिपिकाच्या जागा भरायच्या असल्याची थाप उपलवाडने मारली. नोकरीची गरज असल्याने संजय यांनी तयारी दाखविल्यानंतर त्यासाठी दहा लाख रुपये लागणर असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला पाच लाख व नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर पाच लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आडे यांनी ९ मे २०१३ रोजी उपलवाड याला पाच लाख रुपये दिले. त्यानंतर १६ सप्टेंबर २०१३ रोजी उपलवाड याने आडे यांना एक नियुक्तीपत्र दिले; त्यावेळी पाच लाख रुपये दिले. आडे यांना १ ऑक्टोबर २०१३ रोजी नोकरीवर रुजू होण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आडे रुजू होण्यासाठी गेले असता नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उपलवाड याच्याकडे वारंवार मागणी करूनही रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात आली. रक्कम मिळत नसल्याने याप्रकरणी गुरुवारी (१९ मार्च) छावणी पोलिस ठाण्यात विश्वनाथ उपलवाड, त्याला सहकार्य करणारे सविता उपलवाड, हरीश उपलवाड व धनश्री उपलवाड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विश्वनाथ उपलवाड याला अटक केली आहे.

आडेची अडवणूक

नियुक्तीपत्र दिल्यानंतर विश्वनाथ उपलवाड वेगवेगळी कारणे सांगून आडेला अडवित होता. एकदा नोकरीला रुजू होण्यासाठी जाताना फोन करून शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाला आपला मेल मिळाला नसून तुम्ही परत या, असे एकदा सांगितले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष व सचिव बदलले असून नियुक्तीपत्र मिळण्यास अडचण येत असल्याची थापही त्याने मारली होती. पुणे येथे जाऊन खात्री केल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त तलाठी सानप निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साहित्यिक बाबा भांड यांची चितेगाव येथील जमीन खोट्या कागदपत्राद्वारे बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी आमदार प्रशांत बंब यांनी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. हा प्रश्न सभागृहात प्रचंड गाजल्यानंतर तलाठी तुकाराम सानप याला निलंबित करण्याचे आदेश दिले असून तहसीलदार राजीव शिंदे यांना नोटीस बजावली असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केले.

प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड आणि किरण देशमुख यांची चितेगाव (ता. पैठण) येथील शेतजमीन पैठणचे तत्कालीन तहसीलदार राजीव शिंदे व तलाठी तुकाराम सानप यांनी खोटी कागदपत्रे बनवून बळकावण्याचा प्रयत्न केला. फेरफार करुन स्वतःच मंजूर करणे, अर्जदारासाठी स्वतः अर्ज लिहून त्याची सही करुन खोटा पंचनामा करणे, पंचनाम्याच्या आधारे तहसीलदार राजीव शिंदे यांनी महसूल नियमांचे उल्लंघन करुन निर्णय दिल्याबद्दल दोघांविरुद्ध पैठण येथे फौजदारी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. या दोघांना निलंबित करण्याची मागणी बंब यांनी केली होती. तलाठी सानप याला निलंबित केले असून तहसीलदार शिंदे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्यक्षात सानप कामावर असल्याचा खुलासा आमदार संदिपान भुमरे यांनी केला. यावर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले. 'आज सकाळी आपण जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली असून सानपला निलंबित करण्याचे आदेश दिले. लक्षवेधी सूचना आल्यानंतर तातडीने निलंबनाची कारवाई केली' असे खडसे म्हणाले. महसूल खात्याच्या अनागोंदीबाबत बाबा भांड यांनी महसूलमंत्री, जिल्हाधिकारी व आयुक्त यांना भेटून तक्रारी केल्या होत्या. माहितीच्या अधिकारात तलाठी सानप याच्या महसूल नोंदीतील गैरप्रकाराबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करुनही कार्यवाही झाली नव्हती. याबाबत 'मटा'ने 'तलाठ्याची हेराफेरी' या वृत्तमालिकेअंतर्गत पाठपुरावा केला होता.

इतर शेतकऱ्यांचे काय ?

तलाठी व तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी जमीन नोंदी आणि खोटी कागदपत्रे करुन अनेक शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. तालुक्यातील पाच अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यास मला अधिक आनंद होईल, असे साहित्यिक बाबा भांड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

BJP तालुका उपाध्यक्षांचा खून

$
0
0

म .टा. प्रतिनिधी, वाळूज

अहमदनगर रस्त्यावरील लिंबेजळगाव परिसरातील गोकूळ ढाबा येथे भारतीय जनता पक्षाचे गंगापूर तालुका उपाध्यक्ष प्रकाश आलोने यांचा तलवारीचे वार करून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (१९ मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेतील मुख्य आरोपी फरार असून पोलिसांनी त्याच्या साथीदारास अटक केली आहे.

लिंबेजळगाव येथील शिवसेना कार्यकर्ते व स्वस्त धान्य दुकानदार अंजा बापू शिंदे यांचे हरेश अकबर पटेल यांच्या सोबत काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. हा वाद न्यायालयात गेला असून त्यासाठी साक्षीदार म्हणून प्रकाश आलोने (रा. लिंबेजळगाव) यांचे नाव टाकण्यात आले होते. आलोने आपल्या बाजुने साक्ष देणार नाहीत याची खात्री शिंदे यांना झाली होती. त्याने गुरुवारी नगर रोडवरील गोकुळ ढाबा येथे अलोने यांना दारू व जेवणासाठी बोलविले होते. तेथे वाद पेटल्यानंतर शिंदेने तलवार काढून आलोने यांच्या छाती व मानेवर वार केले. या हल्ल्यात अलोने यांचा जागीची मृत्यू झाला. या घटनेनंतर शिंदेचा साथीदार दिलिपसिंग राजपूत याने तलवार लंपास करून पुरवा नष्ट केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त रामराव हाके, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, पोलिस निरीक्षक वसीम हाशमी यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आलोने यांना घाटी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी भरत लक्ष्मण आलोने यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्यात अंजा शिंदे व दिलीपसिंग राजपूत (रा. मलकापूर-शिरोडी ता. गंगापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राजपूत यास अटक असून अंजा बापू शिंदेचा पोलिस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक वसीम हाशमी करीत आहेत.

परिसरात बंद

भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश आलोने परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यामुळे खुनानंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने नागरिकांनी बंद पाळला. अलोने यांच्या पार्थिवावर पोलिस बंदोबस्तात लिंबेजळगाव येथील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मारेकऱ्यासह सूत्रधारास अटक करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. या हत्याकांडामागील खरे कारण शोधण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीचे नमन घोळाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीची सुरुवातच घोळाने झाली आहे. वॉर्डनिहाय आरक्षणाची याचिका निकाली लागायच्या अगोदरच प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये मोठी गडबड समोर आली आहे. काही वॉर्डांत दहा हजार, तर काही वॉर्डांत साडेतीन ते चार हजार मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालिकेने शुक्रवारी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली. या यादीनुसार महापालिकेच्या क्षेत्रात एकूण मतदारांची संख्या आता ८ लाख १२ हजार झाली आहे. २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदारांमध्ये सुमारे सव्वालाखांची भर पडली आहे. १० फेब्रुवारी २०१५ पर्यंत ज्या व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदवले आहे, त्या सर्वांची नावे प्रारुप मतदार यादीत घेण्यात आली असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. विधानसभा मतदार संघनिहाय असलेल्या मतदार याद्यांचे विभाजन वॉर्ड निहाय करण्यात आले आहे. पालिकेच्या मुख्यालयात आणि वॉर्ड कार्यालयात मतदार याद्या मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वॉर्डाची एकच मतदार यादी ठेवण्यात आली आहे. मतदार यादी पाहू इच्छिणाऱ्याने आपले मतदार ओळखपत्र सुरक्षा रक्षकाला दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक नोंदवून घेऊन त्यांना मतदार यादी पाहण्यासाठी दिली जात होती. यातही घोळ झाले.

काही जणांनी मतदार यादी पळवून नेण्याचा प्रयत्न केला, त्यांना सुरक्षारक्षकांनी थांबवून त्यांच्या जवळची मतदार यादी काढून घेतली. त्यामुळे वादाचे प्रसंगही ओढावले. काही जणांनी मतदार यादी ताब्यात घेतली आणि अर्धा-पाऊणतास सोडलीच नाही, त्यावरूनही वाद झाले.

प्रारुप मतदार यादी सकाळी सात वाजता इंटरनेटवर अपलोड करण्यात येणार होती, पण सायंकाळपर्यंत यादी अपलोड करण्याचे काम झालेच नाही. त्यामुळे ऑनलाइन यादी कुणालाही पहायला मिळाली नाही. दरम्यान काही वॉर्डांच्या मतदारांमध्ये मोठी तफावत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. काही मतदारसंघात मतदारांची संख्या दहा हजारांच्या घरात तर काही वॉर्डात मतदारांची संख्या साडेतीन - चार हजारांच्या घरात आहे. एवढी तफावत कशी याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४.५ हजार शेतक-यांना मदत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चार जिल्ह्यांच्या तब्बल १८२० हेक्टरवर पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान नोंदवले गेले असून, या ४ हजार ५१ शेतकऱ्यांना सरकारकडून ‌मदत मिळणार आहे.

२८ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे हिंगोली, नांदेड, बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये पीक व फळबागांचे मोठे नुकसान झाले. पंचनाम्याचे अहवालानुसार मराठवाड्यातील चार जिल्ह्यांच्या काही भागात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. १ व २ मार्च तसेच ८ व १० मार्च रोजी विभागातील अनेक ठिकाणी गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे आंबा, द्राक्ष, चिकू, मोसंबी, डाळींब या फळबागांचे यामध्ये अतोनात नुकसान झाले. अवकाळीच्या या संकटाचा मोठा फटका ‌फळपिकांसह रब्बीच्या पिकांनाही बसला आहे.

दुष्काळी मदतीचा फटका

बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात दिला. मात्र, मदतीसाठी आलेल्या रकमेमधील केवळ १२१ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वाटप केले. मात्र, १८८ गावातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांची बँकेत खातेच नाहीत. त्यामुळे हे शेतकरी सध्या तरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. प्रशासनाने खाते न उघडलेल्या शेतकऱ्यांची यादी लावली आहे.

बीड जिल्ह्यातील सर्वच म्हणजे १ हजार ४०३ गावांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे. यावरून दुष्काळाची तीव्रता लक्षात येते. राज्य सरकारने या दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३४५ कोटी रक्कम मंजूर केली. यापैकी २८६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. हा निधी तालुक्याकडे वर्गही करण्यात आला आहे.

आतापर्यंत चार लाख ९३ हजार १६६ शेतकऱ्यांना १२१ कोटी रुपये मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याचे काम काही काळ जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी यांच्या संपामुळे लांबले. त्यानंतर शेतकऱ्यांचे खाते कुठे आहेत याच्या याद्या करण्यात वेळ गेला. अनेक शेतकऱ्यांचे खाते नसल्याने त्यांचे मदतीचे घोडे अडले आहे. जिल्ह्यातील १८८गावातील तब्बल दोन लाख नऊ हजार ५९४ शेतकऱ्यांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे उपलब्ध निधी पूर्णपणे जिल्हा प्रशासन खर्च करू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे अनेक ठिकाणी काम अपूर्ण राहिले आहे. खाते नसल्याने रक्कम अखर्चित रहिल्याने हा निधी आकस्मिक खर्च निधीतून मिळाला असल्याने अखर्चित निधी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार असल्याने परत करण्याचे आदेश आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दुष्काळी मदतीसाठी आलेले तब्बल साठ कोटी रुपये सरेंडर केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकाची आत्महत्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला बीड जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे वर्षभरापासून पगार न झाल्याने आंदोलनकर्त्या जिल्हा परिषद शिक्षकाने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

हिरामण साहेबराव भंडाने (वय ३२ रा. मांडवजाळी) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून तो बीड तालुक्यातील चौसळ्याजवळील कोकणे वस्ती येथे कार्यरत होते. गेल्या काही वर्षांत बीड जिल्हा परिषदेचे गैरकारभाराचे अनेक उदाहरणे समोर आली होती. जिल्ह्यात शिक्षकांची संख्या पुरेशी असताना. तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांच्या काळात शेकडो आंतरजिल्हा बदली करून शिक्षक बीड जिल्ह्यात आणण्यात आले. जावळेकर यांच्या नियमबाह्य कामांमुळे राज्य सरकारने त्यांना गेल्या आठवड्यात निलंबित केले. जिल्ह्यात हजार शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एक वर्षांपेक्षा अधिककाळ उलटून गेला तरी अतिरिक्त शिक्षकांना पगार मिळत नव्हता. याविरोधात जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून भारतीय बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात हिरामण भंडाने हे मांडवजाळी येथील रहिवासी असलेले व बीड तालुक्यातील कोकणे वस्ती येथे ते अतिरिक्त शिक्षक ठरले होते. आंदोलन सुरू असताना पोटात दुखू लागल्याने त्यांना जालना रोडवरील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनी शनिवारी पहाटे म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी हॉस्पिटलमधील गॅलरीला शालीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना समजल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

शिक्षकाचा मृतदेह ठेवला जिल्हा परिषदेसमोर

या घटनेची माहिती कळाल्यानंतर शिक्षक संघटना संतप्त झाल्या. त्यांनी या शिक्षकाच्या मृत्यूस जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग जबाबदार असल्याचे सांगत संबधितावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिक्षकाचा मृतदेह जिल्हापरिषदे समोर ठेवण्यात आला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद परिसरात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट दिली. रविवारी संध्याकाळपर्यंत दोषीविरुद्ध कारवाई करण्याचा अहवाल पाठविणार असल्याचे त्यांनी आंदोलकाना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूसह तीन ट्रॅक्टर पकडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

कायगाव (ता. सिल्लोड) परिसररात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर वाळूसह पकडले. वडोदबाजार पोलिसांनी शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना ही कारवाई केली. कारवाईची माहिती मिळताच इतर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पसार झाले.

फुलंब्री तालुक्यातील गावांना लागून गिरजा नदी तर सिल्लोड तालुक्याच्या गावांना लागून पूर्णा नदी वाहते. वडोदबाजार पोलीस ठाणे हद्दीत बोरगाव कासारी, चिंचखेडा भवन, तांडाबाजार, परिसरात पूर्णा नदीतून तर पाल, पाथ्री, वडोदबाजार, भालगाव, कविटखेडा, बोरगाव अर्ज, शेवता, पेंडगाव, पाडळी, निमखेडा, टाकळी या गावालगत गिरजा नदी वाहते. परंतु, यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे या भागात अनेक दिवसांपासून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होऊ लागली आहे.

शनिवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या दरम्यान पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर वाळूसह वडोदबाजार पोलिसांनी पकडले. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप सागर, यांच्यासह पोलिस कर्मचारी खंडागळे, एन. आर. नागझरे, मुरकुटे, वाघुळे, यांच्या पथकाने गस्त घालत असताना कायगाव शिवारात आरोपी एकनाथ देवमाण रोठे (वय २१ रा. जैनपूर कोठारा ता. भोकरदन), रामदास शेषराव आठावने (रा. तांदुळवाडी ता. भोकरदन) कारभारी त्रिंबक रोठे (रा. जैनपूर कोठारा ता. भोकरदन) यांना वाळू वाहतूक करताना रंगेहाथ पकडले.

.........

जालना जिल्ह्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उभारण्यात आला. या दोन्ही वाळू वाहतूकदारांवर पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. पहिल्या घटनेत सदर बाजार पोलिसांनी रामनगर परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. एमएच २१-६०४७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. पोलिसांनी सापळा रचून हे ट्रॅक्टर पकडले. याप्रकरणी पोलिस शिपाई संदीप आंबटकर यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिसांनी अनिल जोशी आणि भाऊसाहेब मगरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या ताब्यातून वाळू आणि ट्रॅक्टर असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलिस जमादार डी. डी. दिवटे हे करीत आहे. दुसरया घटनेत आष्टी पोलिसांनी देखील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे. एमएच २०- क्रमांकाच्या या ट्रॅक्टरमधून बेकायदा वाळू तस्करी सुरू होती. पोलिस जमादार एकनाथ पडूळ यांच्या तक्रारीवरुन या ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुमानःगोरोबा काकांची दिंडी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

संतश्रेष्ठ म्हणून ख्याती असलेल्या गोरोबा काकांची दिंडी घुमान (पंजाब) मध्ये रंगणार आहे. घुमानमध्ये ३ ते ५ एप्रिल दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या गोरोबाकाकांच्या दिंडीत जिल्ह्यातील १९० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. गोरोबा काकांचे अभंग, वारकरी पताका, टाळ, मृदंग आणि गोरोबाकाका आणि नामदेवांच्या भेटीचा देखावा या दिंडीतून पंजाब वासीयांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने जय्यत तयारी सुरू केलीआहे.

घुमान येथे होणाऱ्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठवाड्यातील भूमीत जन्मलेले आणि पंढरीच्या विठ्ठलाचा कृपाशिर्वाद घेऊन देशात वारकरी सांप्रदायाची पताका घेऊन जाणारे संत नामदेव यांची परीक्षा घेणाऱ्या संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पावन भूमीत १२ व्या शतकात पहिला मराठी सारस्वतांचा मेळा झाला होता. त्याला संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, विसोबा खेचर, संत नामदेव यांच्यासह तत्कालिन संत मंडळी जमली होती. याच ठिकाणी चिमुकल्या मुक्ताईने नामदेवांच्या ठायी असलेला अहंकार गोरोबा काकांच्या निदर्शनास आणून दिला होता. गोरोबा काकांनी नामदेवांचे मडके अजून कच्चे आहे, असे सांगत 'गोरा म्हणे कोरा, राहिला गं बाई शुन्यभर नाही ‌भाजिला कोठे' या अभंग ओळी लिहून ठेवल्या आहेत.

त्यानंतर संत नामदेवांनी आत्मपरीक्षण करीत मूळ बार्शीच असलेले आणि औंढा नागनाथ येथे वास्तव्यास असलेल्या विसोबा खेचरांचा अनुग्रह प्राप्त केला. त्यांना गुरुस्थानी मानून पुढील कामाची दिशा ठरविली. आणि सबंध हिंदुस्थानात वारकरी सांप्रदायाची पत्रका पोहोचविण्याचे अलौकिक कार्य केले.

तेरे येथे बाराव्या शतकात झालेली संत मंडळींची सभा खऱ्या अर्थाने पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असल्याची श्रद्धा उस्मानाबादकर आजही बाळगताहेत. संत नामदेव गोरोबा काकांच्या भेटीसाठी तेर येथे मोठ्या श्रद्धेने येवून गेले. तीच श्रद्धा मनात ठेवून उस्मानाबाद मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने यंदा धुमानमध्ये गोरोबाकाका आणि नामदेव महाराजांची अलौकिक भेट घडविण्यासाठीचा दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने जय्यत तयारी सुरू केलीअसल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली.

दिंडी ३१ मार्चला होणार रवाना

घुमानमध्ये ३ ते ५ एप्रिल दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्त काढण्यात येणारी गोरोबाकाकांच्या दिंडी ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ना‌शिक येथून घुमानकडे रवाना होणार आहे. गोरोबा काकांचे अभंग, वारकरी पताका, टाळ, मृदंग आणि गोरोबाकाका आणि नामदेवांच्या भेटीचा देखावा या दिंडीतून पंजाब वासीयांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीप्ती सांगवीकर यांचे निधन

$
0
0


औरंगाबाद : जिंतूरजवळ शनिवारी सकाळी झालेल्या एका कार अपघातात उद्योजक मिलिंद सांगवीकर यांच्या पत्नी दीप्ती सांगवीकर (वय ५१) यांचे निधन झाले. झाडावर गाडी धडकल्याने कारचा जागीच चुराडा झाला. त्यांच्या मागे पती मिलिंद सांगवीकर, मुलगा शेखर सांगवीकर आणि मुलगी पूजा मराठे आहेत. उस्मानपुरा भागातील त्यांच्या राहत्या जानकी निवासस्थानापासून रविवारी सकाळी साडेआठ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपातील जागांवरुन युतीत तिढा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विधानसभा निवडणुकीत आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत मागच्या वेळेपेक्षा जागा द्या,' अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेसोबत झालेल्या युती संदर्भातल्या बैठकीत केली आहे. आता उद्या, रविवारी पुन्हा शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. शुक्रवारी रात्री सुभेदारी विश्रामगृहात यासंदर्भात बैठक झाली. बैठकीला शिवसेनेतर्फे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, सुहास दाशरथे उपस्थित होते. भाजपतर्फे आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी आमदार किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष भगवान घडमोडे उपस्थित होते. २०१० च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपने जेवढ्या जागा लढवल्या तेवढ्या जागांचाच विचार करावा, जे १४ वॉर्ड वाढलेले आहेत ते समप्रमाणात वाटून घ्यावेत असा प्रस्ताव शिवसेने या बैठकीत ठेवला. भाजपच्या नेत्यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीत औरंगाबादच्या तिन्हीही मतदार संघात शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद वाढली आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारात पाच हजारांचा फरक होता. पूर्व मतदारसंघात शिवसेनेला भाजपपेक्षा तब्बल पन्नास हजार मते कमी पडली. मध्य विधानसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये फक्त एक हजारांचा फरक होता. त्यामुळे या तिन्हीही मतदार संघांचा विचार केला, तर भाजपची ताकद वाढली आहे. या वाढलेल्या ताकदीचा विचार करून महापालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपाचा निर्णय झाला पाहिजे, अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी मांडली. पण त्यांच्या भूमिकेशी शिवसेनेच्या नेत्यांनी सहमती दर्शवली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images