म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल सोमवारी (२५ मे) जाहीर झाला. औरंगाबादमधील सीबीएसई बोर्डाच्या विविध ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. नाथ व्हॅलीचा अक्षत बाकलीवाल सर्वाधिक ९७ टक्के गुण मिळवित अव्वल ठरला. अक्षत वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे.
नाथ व्हॅली
नाथ व्हॅलीचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दहा विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले, सतरा विद्यार्थी ९० पेक्षा अधिक तर २३ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. विज्ञानपेक्षा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत चमकदार कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य रणजित दास यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अक्षत बाकलीवाल याला सर्वाधिक ९७ टक्के गुण मिळाले. दर्शन गट्टाणी (९५.४), रजत मालू ९५.४), अभिनव शर्मा(९४.८), अनुष संकलेचा(९४.४), अनुपम कारवा(९४), अंजली देशमुख(९३), पायल रामनानी (९२.४), रोषनी दयालनी (९१.८), सत्यजित कैनवसरा (९१.८), यश मलारा (९१.८), ईशा ठोले (९१.६१).
रिव्हरडेल हायस्कूल
रिव्हरडेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत चांगले गुण मिळवित यश मिळविले. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून राधिका शेलार या विद्यार्थिनीने ९३ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला. यासह किर्ती दास, अभिनंदन गुप्ता यांना अनुक्रमे ९२ टक्के गुण मिळाले असून त्यांनी द्वितीय क्रमांक तर श्रृती कल्याणीकर हिने ९१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेचे ७६ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी, संजीव शेलार, सी.पी. त्रिपाठी, नरेंद्र चपळगावकर, जयंतराव देशपांडे, प्रताप बोराडे, पी.व्ही. सोळुंके, प्राचार्य जयश्री गुजर, आशिष गट्टाणी यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये राधिका शेलार, किर्ती दास, अभिनंदन गुप्ता, संदीप दुवडा, श्रृती कल्याणीकर, वरूण रघुकुमार, ऋषभ भरद्वाज, आयुश खंडेलवाल, आदित्य बाबरा, साहिबप्रित कौर, प्रसाद जंगम, सचिन पचार, संकेत भाले, अनुज बोरगावकर, श्रद्धा कोहली, श्र्वेता गाडेकर, संचय व्यास, हरिदय आनंद, हिमलेखा रेड्डी, प्रिया सिंग, कार्तिक पालिवाल, सैफीया नूर, वैष्णवी विश्वकर्मा, समिक्षा सेठी, फरिया खान, माला निलेश, स्नेहा सोनी, अभिषेक रावत, विराज माथूर, सौफियन शेख, कौशिक शहा, प्रियंका दांडेकर यांचा समावेश आहे.
केंद्रीय विद्यालयाचे यश
केंद्रीय विद्यालयाचे ३७ विद्यार्थी बारावी परीक्षेत यश मिळविले. विद्यालयाचा निशांत कदम याने ९१.४ टक्के गुण मिळविले. शाळेतून तो अव्वल ठरला. शाळेतून ५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेत वाणिज्य शाखेचे १७ तर विज्ञानचे २० विद्यार्थी यशस्वी ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य एन. एस. वाठोरे यांनी अभिनंदन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट