वेरूळ येथील श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्या जैन गुरुकुलमध्ये सिद्धचक्र महामंडल विधानाचे उद्घाटन १०८ नियमसागरजी महाराज, सुपार्श्वसागरजी महाराज, अभिनंदनजी महाराज, ऋषभसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत मंगळवारी (१७ नोव्हेंबर) करण्यात आले. यानिमित्त ८१ कळसधारी श्राविकांच्या उपस्थितीत वेरूळमधून मिरवणूक काढण्यात आली. श्रावक-श्राविकांनी 'अहिंसा परमो धर्म की जय,जय कारा गुरुदेव का' अशा घोषणा देत परिसर भक्तिमय करून टाकला.
मिवणुकीचा समारोप गुरुकुलात झाला. भगवान पार्श्वनाथच्या अभिषेकाचा मान मंडप उद्घाटक व ध्वजारोहक म्हणून प्रकाशचंद कासलीवाल व कुंजीलाल पांडे यांना मिळाला होता. या कार्यक्रमासाठी सौधर्म इंद्रपदाचा मान दिनेशकुमार गंगवाल, कुबेर इंद्राचा मान रमणलाल सुरेशकुमार, डॉ. प्रेमचंद पाटणी यांना मिळाला. ब्रह्मइंद्राचा मान सिद्धार्थ टोग्या (इंदूर) ब्रह्मपदाचा मान सुरेखा प्रशांत सदावर्ते, कचरू खुले, राजेंद्रकुमार अंबेकर यांना मिळाला. २२ नोव्हेंबर रोजी पिचिका परिवर्तन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचा श्रावक-श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन पन्नालाल गंगवाल, वर्धमान पांडे, डॉ. प्रेमचंद पाटणी, दिनेश गंगवाल, हर्षवर्धन जैन, निर्मलकुमार ठोळे, जयचंद पाटणी, गौतमचंद ठोळे, महावीर कासलीवाल, महेंद्र दगडफोडे यांनी केले. २६ नोव्हेंबरपर्यंत सिद्धचक्र महामंडल विधान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यादरम्यान दररोज दुपारी १२ ते ३दरम्यान १०८ नियमसागरजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट