पक्षांतर्गत निवडप्रक्रियेतील शेवटचा टप्पा शहराध्यक्ष निवडीचा होता. निरीक्षक आमदार सुभाष देशमुख यांच्यासमोर इच्छुकांच्या मुलाखती होणार होत्या. गुरुवारी निवड अपेक्षित होती, पण दावेदारांची संख्या वाढल्याने श्रेष्ठींची पंचाईत झाली. शनिवारी रात्री उशिरा तनवाणींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रविवारी सकाळी भाजप कार्यालयात देशमुखांसमोर सर्व इच्छुकांनी हजेरी लावली. बंद खोलीतील चर्चेनंतर सर्व नेतेमंडळी कार्यकर्त्यांसमोर जमली आणि देशमुख यांनी तनवाणी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. त्यापूर्वी माजी शहराध्यक्ष भगवान घडमोडे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, भाजप कामगार आघाडीचे संजय केणेकर यांची भाषणे झाली.
शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तनवाणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले,'पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. नवीन आणि जुना असा वाद भाजपमध्ये नाही. पक्षवाढीचे आव्हान आहे. त्यामुळे यापुढेही नवीन लोकांना घेऊन पक्ष वाढीवर भर दिला जाईल.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट