ऐतिहासिक नहर-ए-अंबरीच्या संवर्धनासाठी पावणेअकरा कोटी रुपये लागणार आहेत. हा पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न पालिकेच्या प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. निधीशिवाय नहर-ए-अंबरीचे संवर्धन करणे शक्यच नाही आणि महापालिका एवढा निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे.
नहर-ए-अंबरीचे पर्यटकांच्या दृष्टीने संवर्धन झाले पाहिजे, यासाठी विभागीय आयुक्त उमाकांत दांगड यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया देखील उपस्थित होते. नहरीच्या संवर्धनाची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली. त्याचे काय नियोजन आहे, असे पत्रकारांनी बकोरिया यांना विचारले असता ते म्हणाले, 'नहर ही त्या काळातील अभियांत्रिकी आणि स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. आता या नहरींपासून जास्त पाणी मिळणे शक्य नाही, परंतु औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांना नहर म्हणजे काय, नहरींची निर्मिती कशी झाली होती, कोणते तंत्रज्ञान वापरले गेले, याची माहिती व्हावी यासाठी नहरीचे संवर्धन करण्याचे ठरले आहे, पण त्यासाठी १० कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. एवढा निधी महापालिका उपलब्ध करून देऊ शकत नाही. हा निधी कोण देणार, असा प्रश्न आहे.'राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाला या संदर्भात प्रस्ताव पाठवून निधी साठी मागणी करण्याचा पालिकेचा विचार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट