शिवेसना वगळता सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी एकजुटीचे दर्शन घडवीत जायकवाडी धरणात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडावे या मागणीचा आवाज बुधवारी बुलंद केला.
हक्काच्या पाण्यासाठी बुलंद आवाज
↧
↧
शेतमजूर युनियनचे अंबाजोगाईत अधिवेशन
वाढत्या महागाईच्या काळामध्ये शेतमजूरांना किमान वेतन मिळावे, शेतमजूरांची ही चळवळ सर्व स्तरांमध्ये पोहोचावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) यांच्या वतीने शनिवार व रविवारी अंबाजोगाईमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन भरविण्यात आले आहे.
↧
खच्चून गर्दीचा तिसरा दिवस
औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आलेल्या सायन्स एक्सप्रेसच्या तिसऱ्या दिवशी तुफान गर्दी होती. तिसऱ्या दिवशी सुमारे पंधरा हजारांच्या आसपास विद्यार्थी आणि पालकांनी भेट दिल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.
↧
तृतीयपंथीयांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी प्रयत्न
तृतीयपंथियांच्या विकासासाठी आणि सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या व्यक्तींसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड व मतदान ओळखपत्रांचेही वाटप करण्यात येणार आहे.
↧
शिवाजीनगर, औरंगपु-यात निर्माल्य संकलन मोहीम
गणपतीच्या निर्माल्य संकलनासाठी निसर्ग मित्र मंडळ व कचरा वेचक संघटनेतर्फे औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदान व शिवाजीनगर येथील विसर्जन विहिरीजवळ व्यवस्था करण्यात आली आहे.
↧
↧
नाथसागरात विसर्जन, पैठणमध्ये मागणी
गोदावरी नदी कोरडी पडल्याने व शिल्लक पाणी दूषित झाल्याने, गणेश विसर्जनासाठी धरणातून पाणी सोडावे किंवा अथवा नाथसागर जलाशयात गणेशमूर्ती विसर्जन करण्याची परवानगी द्या, अशी मागणी पैठण गणेश महासंघ व गणेशभक्तांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
↧
न्याय्य वाटपाबद्दल लवकरच ठोस निर्णय
पाण्याच्या न्यायवाटपाबद्दल निश्चितच ठोस निर्णय घेऊ, असे छापील आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हैदराबाद मुक्ती दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मंगळवारी (१७ सप्टेंबर) येथे दिले.
↧
मिरवणुकीवर कॅमे-यांची नजर
जिल्ह्यातील सर्व २१ पोलिस स्टेशन हद्दीत गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सिल्लोड, वैजापूरसह अन्य महत्वाच्या शहरातील मिरवणुक मार्गावर नेट ऑपरेटेड सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.
↧
रस्त्यांसाठी पैसे देऊ, पण काम नाही
शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी पैसे देऊ, पण ही कामे पालिकेला करू देणार नाही. त्यासाठी वेगळी एजन्सी नियुक्त केली जाईल असे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकेच्या शिष्टमंडळाला दिले.
↧
↧
यंदाच्या खरिपात दुप्पट उत्पादन
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. समाधानकारक पावसामुळे खरीप पिके तरारली आहेत. खरीप हंगामामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुप्पट उत्पादन होणार असून, रब्बी हंगामातही अधिक उत्पादन निघणार असल्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
↧
स्वाइन फ्लू पेशंटच्या प्रकृतीत सुधारणा
औरंगाबादेत गेल्या आठ महिन्यात काही पॉझिटिव्ह पेशंटची नोंदविली गेली, पण त्यातही बरे होऊन जाणाऱ्या पेशंटची संख्या वाढत आहे. एकूणच तत्काळ उपचार आणि योग्य ते लक्ष दिल्याने घाटीत एका रुग्णांची प्रकृती सुधारत आहे.
↧
बेकायदा बांधकामे : लवकरच धोरण
राज्यातील शहरांलगत बेकायदा बांधकामांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या संदर्भात नेमलेल्या समितीने अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला आहे.
↧
नळदुर्गमधील ‘नर-मादी’ धबधबा सुरू
नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथील ऐतहासिक किल्ल्यातील स्थापत्य शास्त्रातील अदभूत चमत्कार समजला जाणारा ‘नर-मादी’ धबधबा तब्बल तीन वर्षानंतर शुक्रवारी सकाळपासून सुरु झाला.
↧
↧
‘बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा कमी व्हावी’
महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणातील बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा कमी करण्यात यावी आणि बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात यावी.
↧
अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब
हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसाने झालेल्या खरीपातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. उर्वरित पिकाच्या उत्पन्नातून तरी खर्च निघेल या आशेत असताना, सोयाबीनच्या शेंगातून चक्क कोंब बाहेर येत असल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.
↧
मंदिराला लिलावातून मिळाले १ कोटी
तुळजापूर येथील तुळजाभवानी देवस्थान समितीला मंदिरातील विविध लिलावाच्या माध्यमातून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती देवस्थान समितीचे विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली.
↧
पालिकेकडे नाही वर्किंग प्लॅन
महापालिकेकडे वर्किंग प्लॅन नाही. त्यामुळे बैठकांचा काहीच उपयोग होत नाही. अॅक्शन घेणार असला तरच बैठका आणि कॅम्पचा उपयोग आहे, अशा शब्दांत श्वानप्रेमींनी आपल्या तक्रारी मांडल्या.
↧
↧
५० कर्मचारी लेट, कारणे दाखवा नोटीस
झेडपीचे कर्मचारी कार्यालयात उशिरा येणे आणि वेळेपूर्वी घरी जाणे हे चित्र नेहमीचे आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शुक्रवारी सकाळी अचानक तपासणी केली.
↧
झेडपीची तहकूब सभा २६ सप्टेंबरला
जिल्हा परिषदेची वैजापूर येथे १६ सप्टेंबर रोजी झालेली सर्वसाधारण सभा गोंधळानंतर तहकूब झाली होती. ही सभा २६ सप्टेंबरला जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होत आहे.
↧
हज यात्रेकरुंना सुविधा देण्याच्या सूचना
औरंगाबाद येथून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना आवश्यकत्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी येथे एका बैठकीत दिली.
↧
More Pages to Explore .....