Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एफएसआय, टीडीआरप्रकरणी गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सराफा रोडवरील एकाच मालमत्तेच्या भूसंपादनासाठी एफएसआय व टीडीआर असा दुहेरी मोबदला मागितल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार सिटीचौक पोलिसांनी बुधवारी अखेर मालमत्तेचे जीपीएधारक अब्दुल सिकंदर अब्दुल साजेद यांच्याविरुद्ध कलम ४२०नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ‘मटा’ने १८ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.
सराफा रोडवरील सीटीएस क्रमांक ६२१२ येथील मालमत्ताधारक अब्दुल समीर अब्दुल साजेद यांनी १५ मीटर रस्त्यासाठी जागा दिली. त्या मोबदल्यात एफएसआय देण्याची मागणी केली. मालमत्तेची रस्त्यात बाधित झालेली जागा महापालिकेला हस्तांतरित करावी, असे पत्र नगररचना विभागाच्या उपअभियंत्यांनी १७ जुलै २००८ रोजी अर्जदाराला दिले. त्यानुसार मालमत्ताधारकाने तेवढी जागा रस्ता रुंदीकरणासाठी दिली. त्या आधारे नगररचना विभागाने मालमत्ताधारकाला १९ जुलै २००८ रोजी बांधकाम परवानगी व एफएसआय दिला. त्यानंतर मालमत्ताधारकाने २०१३-१४मध्ये त्याच जागेसाठी टीडीआरची मागणी केली. अब्दुल समीर अब्दुल साजेद यांनी अब्दुल सिकंदर अब्दुल साजेद यांना मुख्त्यारनामा दिला. नगररचना विभागाने अब्दुल सिकंदर अब्दुल साजेद यांना टीडीआर देखील मंजूर केला. त्याबाबत १७ मे २०१४ रोजी जाहीर प्रगटन देऊन आक्षेप मागवण्यात आले. आक्षेपाची मुदत संपल्यावर अब्दुल सिकंदर यांना २७ मे रोजी त्याच जागेचा टीडीआर देण्यात आला.
एकाच मालमत्तेसाठी एफएसआय व टीडीआरच्या स्वरुपात दुहेरी मोबदला देण्याचा हा प्रकार गंभीर असून, त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर राजपूत यांनी केली होती, त्याची दखल घेऊन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या आदेशाने अब्दुल सिकंदर यांच्याविरुद्ध १८ नोव्हेंबर रोजी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न?
याप्रकरण तक्रार दाखल होऊन दहा दिवस उलटले तरी गुन्हा मात्र दाखल केला जात नव्हता. याच संदर्भात ‘मटा’ने बुधवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्यावर बकोरिया यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर गुन्हा दाखल करत आला. पोलिसांनी अब्दुल सिकंदर यांच्याविरुद्ध कलम ४२०नुसार गुन्हा दाखल केला. मालमत्ताधारक, जीपीएधारक, महापालिकेचे अधिकारी यांनी संगनमताने एकाच मालमत्तेला दुहेरी पद्धतीने मोबदला दिल्याप्रकरणी कलमांची नोंद एफआयआरमध्ये करण्यात आली नाही. त्यामुळे मोबदला प्रकरणातील अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न पोलिस व पालिका अधिकारी करीत असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुपे, राठोड यांचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेना व भारतीय जनता पक्ष युतीमध्ये झालेल्या करारानुसार बुधवारी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांनी महापौरपदाचा, तर भारतीय जनता पक्षाचे प्रमोद राठोड यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे आता नवीन महापौर-उपमहापौर निवडीबद्दलची उत्सुकता आहे.
युतीमध्ये झालेल्या करारानुसार अडीच वर्षे महापौरपद दोन भागात विभागले आहे. पहिले दीड वर्ष महापौरपद शिवसेनेकडे व नंतरचे एक वर्ष भाजपकडे ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार दीड वर्षाचा कार्यकाळ संपल्यावर तुपे यांनी बुधवारी महापौरपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेसमोरची विषयपत्रिका संपल्यावर प्रमोद राठोड यांनी तुपे यांच्याकडे उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तुपे यांनी सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवक बन्सी जाधव यांना पीठासन अधिकारीपद स्वीकारण्याची विनंती केली. जाधव यांनी ही विनंती मान्य केली व ते महापौरांच्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. तुपे यांनी जाधव यांच्याकडे महापौरपदाचा राजीनामा दिला. तुपे व राठोड यांनी आपण वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत आहोत, असे पत्रात नमूद केले. राजीनामा दिल्यावर नगरसेवकांनी तुपे व राठोड यांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

आठ-दहा दिवसांत नवे महापौर
नवीन महापौर, उपमहापौरांच्या निवडीसाठी येत्या आठ ते दहा दिवसांत विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार सर्वसाधारण सभा आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे आता भाजपचा महापौरपदाचा उमेदवार कोण या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फायर एनओसी’विरुद्ध उद्या पेट्रोल पंप बंद

$
0
0

औरंगाबाद ः फायर एनओसी नसल्यामुळे महापालिकेने पेट्रोल पंपांवर कारवाई सुरू केल्यानंतर शहरातील पेट्रोल पंपधारकांनी शुक्रवारी बंद आंदोलन जाहीर केले आहे.
महापालिकेने फायर एनओसी नसल्यामुळे अंबरवाडीकर्स पेट्रोल पंपाला सील लावले. त्यानंतर शहागंद भागातील दोन, दिल्ली गेट येथील एक पंप ४८ तासांत बंद करण्याचे आदेश दिले. सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (फायर एनओसी) घेणे आवश्यक आहे. महापालिकेने या प्रमाणपत्रासाठी पंपांवर कारवाईला औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन विरोध दर्शविला आहे. या कारवाईच्या विरोधात येत्या शुक्रवारी पेट्रोलपंप साप्ताहिक सुटी आंदोलन करणार असल्याचे असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पेट्रोल पंपांचे परवाने इंधन कंपनीच्या नावावर असतात. यामुळे पेट्रोल पंपांवर ना हरकत प्रमाणपत्राच्या नावाखाली सुरू असलेली कारवाई अयोग्य आहे. सर्व पंपाना केंद्र शासनाच्या स्फोटके विभागाकडून कंपनीच्या नावाने परवाने घ्यावे लागतात. संबंधित विभागासह, कंपनीकडून पेट्रोल पंपावरील सुरक्षा यंत्रणेची तपासणी त्रयस्थ समितीकडून तपासणी केले जाते. त्यात फायर ऑडिट, सेफ्टी ऑडिटचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

अर्ज स्वीकारला नाही
हर्सूल टी पॉइंटजवळील एचपीसीएल कंपनीचा पेट्रोल पंप आहे. या पंपाला महापालिकेकडून ‘ना हरकत’ मिळावे. यासाठी २०१४पासून अर्ज करणे सुरू आहे. अग्निशमन अधिकारी भेटत नाही; तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज स्वीकारत नाहीत, असा आरोप कंपनीच्या प्रतिनिधींनीही केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगारदार गोंधळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीनंतर पहिलाच पगार घेणारे बुधवारी (३० नोव्हेंबर) भलतेच हादरून गेले. पगारदार ग्राहकांचा दिवसभर पैसे काढण्यावरून बुधवारी घोळ चालला. नोकरदारांना बुधवारी पगार झाल्यावर किती पैसे काढायचे याचा गोंधळ सुरू होता.
स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक, आयडीबीआय बँक व काही शेड्युल्ड बँकांमध्ये ३० ते ७ तारखेपर्यंत पगारदारांचे पगार जमा होत असतात. शहरातील बहुतांश कंपन्या, कार्पोरेट ऑफिसेस, लघु उद्योजकांसह इतर व्यावसायिक त्यांच्या पगारदार नोकरांचे पगार ३० तारखेलाच जमा करत असतात. नोटबंदीनंतरचा हा पहिलाच पगार आहे, किती पैसे निघतील, एटीएममधून तर दोन हजारच निघत आहेत, चेकद्वारे पगार काढला जाऊ शकतो का, यांसह अनेक प्रश्न समोर असलेले पगारदार बुधवारी विविध बँकांमध्ये हुज्जत घालताना दिसले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना बँकांच्या अधिकाऱ्यांच्याही नाकी नऊ आले.
बहुतांश पगारदारांनी दोन हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत रक्कम एटीएमद्वारे काढणेच पसंत केले. स्टेट बँकेच्या अधिकारीवर्गाने दिलेल्या माहितीनुसार; शहरातील पाच हजारांहून अधिक कर्मचारीवर्गाचे पगार हे ३० ते १ तारीख, ८ ते १० हजारापर्यंत कामगारांचे पगार २ ते ५ तारीख आणि एमआयडीसीतील बहुतांश कंपन्यांचे पगार ७ तारखेला मिळत असतात. बहुतांश कामगार हे कंत्राटीपद्धतीतच काम करत आहेत. त्यांना ‘व्हाउचर्स पेमेंट’ करताना मालकांना किंवा ततस्सम कंपन्यांच्या व्यवस्थापकांना मात्र त्रास झाला आहे.

सात तारखेपर्यंत गोंधळाची स्थिती
शहरातील नोकरदारांचे पगार सात तारखेपर्यंत होतात. हा गोंधळ किमान सात तारखेपर्यंत सुरू राहील, असे स्टेट बँक ऑफ हैदाराबादचे रवी धामणगावकर आणि एचडीएफसीचे प्रमोद शेळके यांनी सांगितले, परंतु नोकरदारांनी बैचेन होऊ नये, २४ हजारांपर्यंत पगार काढण्याची मुभा त्यांना आहे. तो पगार त्यांनी चेकद्वारे किंवा टप्प्याटप्प्यांने एटीएमने काढून घ्यावा, असेही त्यांनी सुचवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचशेच्या नोटांना मुहूर्त मिळेना

$
0
0

औरंगाबाद ः केंद्र सरकारने नोटबंदीच्या निर्णयानंतर मुख्य सचिवांनी सोमवारी (२१ नोव्हेंबर) सर्व विभागीय आयुक्त; तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला हा आढावा घेऊन नऊ-दहा दिवस उलटले, तरीही औरंगाबाद शहरात अजून पाचशे रुपयांच्या नोटा आलेल्या नाहीत. नागरिकांसह बँकांनाही पाचशे रुपयांच्या नोटांची प्रतीक्षा आहे.
पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याऐवजी दोन हजारांची नवी नोट आणि पाचशे रुपयांची नोट नव्या स्वरुपात चलनात आणण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली, मात्र पाचशे रुपयांच्या नोटेची नागरिकांना प्रतीक्षा कायम आहे. पाचशे रुपयांच्या नोटा राज्यात मंगळवारपासून उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांना दिली होती, परंतु पाचशे रुपयांच्या नोटा औरंगाबादला पोचल्या नाहीत.
मराठवाड्यात पाच-सहा दिवसांपूर्वीच पाचशे रुपयांच्या नवीन नोटा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र अजून आलेल्या नाहीत. या अनुषंगाने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ हैदराबादतर्फे रिझर्व्ह बँकेला रितसर मागणी पत्रही पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण ‌निर्माण झाले होते. औरंगाबाद शहरासह बहुतांश तालुक्यांतील सर्वच बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या आहेत.

पाचशे रुपयांच्या नोटा अजून आलेल्या नाहीत. नाशिक, पुणे मुंबई येथून काही नागरिकांनी पाचशे रुपयांच्या नोटा आणल्या असतील, पण अधिकृतरित्या शहरासाठी असलेल्या या नोटा अजून रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या नाहीत. नागरिकच काय बँकांनाही या नोटांची प्रतीक्षा आहे.
- सुनील शिंदे, वरिष्ठ व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगला होमसेंटर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे इंजिनीअरिंग (अभियांत्रिकी) अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. या अभ्यासक्रमासाठी सगळेच कॉलेज परीक्षा सेंटर आहेत. पारंपारिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना वर्णमालेनुसार परीक्षा सेंटर, तर अभियांत्रिकीला मात्र वेगळा न्याय आहे. कॉलेजांच्या दबावामुळे होमसेंटर निर्णय कायम ठेवल्याची चर्चा आहे.
परीक्षेत सुसूत्रते असावी, कॉपी प्रकरणांना आळा बसावा म्हणून विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी होमसेंटर संकल्पना मोडीत काढली. हे बदल केवळ पारंपारिक अभ्यासक्रमासाठी करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी कॉलेजांना मात्र वेगळा न्याय आहे. या परीक्षा संबंधित कॉलेजांतच घेतल्या जात आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २८ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या असून, २१ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. २६ परीक्षा केंद्रांवर या परीक्षात होत आहेत. विद्यार्थी होमसेंटरवरून परीक्षा देत आहेत. पारंपारिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वर्णमालेनुसार परीक्षा केंद्र, तर अभियांत्रिकीला का नाही, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.
विद्यापीठ प्रशासनाने पारंपारिक अभ्यासक्रमांना एक व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबत वेगळा न्याय केला आहे. कॉलेजांच्या दबावामुळे या निर्णयात बदल करण्यात येत नसल्याची चर्चा विद्यापीठात आहे.

दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी होमसेंटर देण्यामागे कॉलेजांचा दबाव असल्यसाचे मानले जात आहे. पारंपारिक अभ्यासक्रमाप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा वर्णमालेनुसारच घेण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. अभियांत्रिकीला होमसेंटर देण्यात आल्याने या अभ्यासक्रमाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अभियांत्रिकीला होमसेंटर न देण्याबाबत विद्यापीठही आग्रही आहे. काही शहरात एकच अभियांत्रिकी कॉलेज असल्याने तेथे दुसरे सेंटर द्यायचे कोठे, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे हा निर्णय घेण्याबाबत यंदा एकमत होऊ शकले नाही.
- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा नियंत्रक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समायोजन न केल्याने १८८ शिक्षक संकटात

$
0
0

औरंगाबाद : अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करण्यास शैक्षणिक संस्थांची नकारघंटा कायम आहे. औरंगाबाद विभागात २२२पैकी केवळ ३४ शिक्षकांचेच समायोजन झाले आहे. त्यामुळे १८८ शिक्षक अधांतरीच आहेत.
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याने मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचा प्रश्न अद्याप निकाली काढण्यात शिक्षण विभागाला यश आलेले नाही. रिक्त असलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु शैक्षणिक संस्थां त्यांना रुजू करून घेत नाहीत. शिक्षण विभागाच्या कारभार, संस्था चालकांच्या मनमानीमुळे हा प्रश्न सुटलेला नाही. या शिक्षकांना संबंधित शाळा समायोजित करून घेण्यास तयार नाहीत. विभागातील पाच जिल्ह्यांत प्राथमिक व माध्यमिकस्तरावर २२२ शिक्षक अतिरिक्त ठरले. प्राथमिकस्तरावर ७४, तर माध्यमिकस्तरावर १४८ शिक्षकांचा समावेश आहे. त्यातील १६ प्राथमिक व १८ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाले आहे.

शिक्षण विभाग सुस्तच..
शैक्षणिक संस्था समायोजन करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. शिक्षण विभागाच्या कारभारामुळे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न रखडलेला आहे. समायोजन न करणाऱ्या संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांचे वेतन थांबविण्याचा निर्णय शासनस्तरावरून घेण्यात आला आहे. त्यानंतरही हा प्रश्न निकाली निघालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्राय पोर्टचा पहिला टप्पा वर्षभरात पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘औरंगाबाद, जालना; तसेच मराठवाड्यातील उद्योगांना निर्यातीस चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने जालना येथे उभारण्यात येणाऱ्या ड्राय पोर्टचा पहिला टप्पा वर्षभरात पूर्ण होईल. ८० हेक्टरवरील या पोर्टमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जातील,’ अशी माहिती जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी जालना येथील साइट व्हिजिट केली. यावेळी संचालक राम भोगले यांची उपस्थिती होती. त्यानंतर डिग्गीकर, उन्नीकृष्णन नायर, सीएमआयएचे अध्यक्ष गुरप्रीतसिंग बग्गा, सचिव दुष्यंत पाटील यांच्या उपस्थितीत उद्योजकांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डिग्गीकर म्हणाले,‘जालना ड्राय पोर्टसाठी ४०० एकर जागा संपादित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ८० हेक्टरवर निर्यातीच्या सुविधा दिल्या जातील. या परिसरात लोखंड, कॉटन, अॅग्रो, अॅटोमोबाइल उद्योगांचे मोठे जाळे आहे. त्या अनुषंगाने या टप्प्यात वेअर हाउस, कोल्ड स्टोरेज, लिक्विड स्टोरेज, रेल्वे ट्रांजिट यार्ड, वजन काटे, प्रोसेसिंग युनिट उभारले जातील. त्यासाठी ५०० कोटी रुपये लागतील. ड्राय पोर्टपासून एक मोठा रस्ता आणि रेल्वे उड्डाणपूलही या टप्प्यात उभारला जाईल.’
‘गेल्या वर्षी जागा संपादित केल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यात आला. पुढचे काम लवकर व्हावे, या दृष्टीने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेखात्याशी संपर्क साधून ड्रायपोर्ट ते रेल्वेलाइन किंबहुना औरंगाबादपर्यंत फ्रेड कॉरिडॉर उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. इंडियन पोर्ट रेल कार्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) या कंपनीच्या मदतीने रेल्वे कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध केली जाईल. रेल्वे आणि जलवाहतूक मंत्रालयाने एकत्र येऊन ही कंपनी स्थापलेली आहे. या कंपनीच्या माध्यमातून इंदूर ते मनमाड या मार्गावरही विशेष प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामुळे माल वाहतुकीचे अंतर २०० किलोमीटरने कमी होणार आहे. प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. या कंपनीकडून जालना ते औरंगाबाद स्वतंत्र लाइन टाकण्यासंदर्भात तपासणी सुरू आहे,’ असे डिग्गीकर यांनी स्पष्ट केले.
ड्राय पोर्टच्या पहिल्या टप्प्यात कस्टमसाठी ऑफिस, अॅग्रो प्रॉडक्टसच्या निर्यातीसाठी सुविधा तसेच गरज भासल्यास पुलिंग चेनही उपलब्ध करून दिले जाईल. ड्रायपोर्टमध्ये पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. याठिकाणी आणखी काय सुविधा हव्यात यासंदर्भात सीएमआयए तसेच उद्योजकांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईल, असे त्यांनी सांगितले.

टप्पेनिहाय खर्च
पहिला टप्पा : ५०० कोटी
दुसरा टप्पा : १८२ कोटी
तिसरा टप्पा : २०४ कोटी
एकूण : ८९४ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मी कारभारीण : अन् व्यवसायात घेतली भरारी

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com
Tweet : @rtaksalMT
रेखा पटेल याचे माहेर पुणे. वडिलांचा सॉ मिल व्यवसाय, तर आई गृहिणी. घरात पालकांसह रेखा आणि चार बहिणी व एक भाऊ असा परिवार. सकाळी लवकर उठणे, देवपूजा, अभ्यास यासह सर्व कामे वेळेवर करणे, अशी शिस्त त्यांना लहानपणापासून लागली. स्वावलंबनाचे धडे आणि व्यवहार ज्ञानही त्यांना घरी मिळत गेले. शिक्षण सुरू असतानाच त्यांना विविध खाद्यपदार्थ तयार करण्याची आवड लागली ती आईमुळे.
अभ्यास, घरकाम, खेळणे यातून काहीसा वेळ मिळाला की त्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जात. हिशेब कसा ठेवला जातो, वस्तूची कशी विक्री केली जाते, यांसह व्यवसायिक कौशल्यबाबत त्यांचे निरीक्षण सुरू असे. दहावीनंतर त्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. अकाउंट विषयात हुशार असल्याने स्वाभाविकपणे पुढील शिक्षण घेतानाच रेखा यांनी दुकानातील हिशेबाच्या कामात वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला, असा निश्चिय त्यांनी केला. १९९३मध्ये वाणिज्य शाखेतून त्यांनी पदवी घेतली आणि काही महिन्यातच त्यांचे औरंगाबादेतील रहिवासी व व्यापारी हरिषकुमार पटेल यांच्याशी विवाह झाला.
पुण्याहून त्या औरंगाबादेत राहण्यास आल्या. घरात पतीसह, सासू, सासरे, दीर, जाऊ असा मोठा परिवार. या एकत्रित कुटुंबात त्यांना माहेरप्रमाणेच पूर्णपणे निर्णय स्वातंत्र मिळाले. घरातील सर्व जबाबदारी पेलत मिळालेल्या मोकळ्या वेळेत त्या पतीला व्यवसायात मदत व्हावी, यासाठी प्रयत्न करत. छोटे-मोठ्या व्यवहाराचे हिशेबांची पडताळणी करून देत. पुढे मुलांचे संगोपन, शिक्षण, घराची जबाबदारी यांची सांगड घालण्यातच त्यांचा सर्व वेळ जात. स्वतःची ओळख म्हणून आपणही गृहोद्योग उभारावा, अशी त्यांची इच्छा त्यांना मात्र शांत बसू देत नव्हती. त्यासाठी विविध पुस्तकातून; तसेच मार्केटचा फेरफटका मारून माहिती गोळा करण्याचे काम त्यांचे सुरूच होते.
सर्व काही सुरळीत सुरू असतानाच पती हरिषकुमार यांचे निधन झाले. अश्रू आवरणे कठीण होते पण, त्या डगमगल्या नाही. मुलांचे भविष्य चांगले घडले पाहिजे, आपणच खचून गेलो तर पुढे काय होणार, याचा विचार त्यांनी केला आणि आलेल्या या संकटाचा मोठ्या धैर्याने सामना केला.
सासरी व्यवसाय असला तरी स्वतःचा असा एखादा व्यवसाय असावा. मुलांनाही काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मिळावी, हे समोर ठेवत त्यांनी गृहोद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. सासरच्या लोकांनी प्रोत्साहन दिले. पुण्यात राहणाऱ्या व साड्या, ड्रेस विक्रीचा व्यवसायात असलेल्या हितिशा पटेल यांनी त्यासाठी सहकार्य केले. साड्या ठोक भावात खरेदी करणे, विक्री कौशल्य त्यांनी काही महिन्यांतच आत्मसात केले आणि विवेकानंद कॉलनी, टिळकनगर येथील राहत्या घरीच त्यांनी साड्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आर. एच. कलेक्शन नावाने गृहोद्योग. पुणे; तसेच सुरुवातील ओळखीच्या लोकांना त्यांनी साड्या, ड्रेस दाखविण्यास सुरुवात केली. दुकानातील किंमतीपेक्षा दर्जेदार व फॅशनबेल कपडे तेही माफक दरात मिळत असल्याने त्यांना प्रतिसाद दिला.
ड्रेस मटेरिअल, विविध प्रकारच्या डिझायनर साड्या वाजवी किंमतीत मिळतात, अशी माउथ पब्लिसिटी परिसरात झाल्याने सुरुवातीपासूनच त्यांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे दुसऱ्याच महिन्यात त्यांना अधिक गुंतवणूक करावी लागली.
पुणे, जयपूर येथून त्या ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन ठोक भावात माल खरेदी करतात. खरेदीपासून ते मार्केटिंग, सर्व हिशेब ठेवणे ही सर्व कामे त्या एकट्याच करतात. मुलांचे संगोपन, घरातील सर्व जबाबदारी यांची सांगड घालत त्यांनी व्यवसाय नेटाने पुढे नेला. याच काळात त्यांना महिला बचत गट; तसेच अन्य प्रदर्शनात सहभाग होण्याची संधी मिळाली. त्यात ग्राहकाकडून प्रतिसाद मिळत गेला. ग्राहक जोडल्या गेले आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. व्यवसायानिमित्त अनेक महिला, तरुणींशी त्यांची चांगली मैत्री झाली.
नवीन काय स्टॉक आला आहे, हे ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी व्हॅट्स अॅपसह अन्य सोशल मीडियाचाही त्या प्रभावी वापर करतात. शिस्त, चिकाटी, प्रभावी मार्केटिंग आणि कौशल्य या गुणांच्या जोरावर त्यांनी आर. एच. कलेक्शनला एका उंचीवर नेऊन ठेवले.
थोडे कष्ट घेतल्यास, प्रयत्न केल्यास निश्चितच चांगले यश मिळू शकते. यशाचा मार्ग मिळू शकतो, असे त्या मानतात. आणि याच बळावर त्यांनी घेतलेली भरारी निश्चितच प्रेरणादायी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलांमुळे खोळंबा; प्रवासी वैतागले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कन्नड-सिल्लोड मोढा फाटा रस्त्यावरील पूल यंदाच्या पावसाळ्यात कोसळला. त्यानंतर टापरगाव (ता. कन्नड) येथील पुलासही तडे गेले. महाड दुर्घटनेनंतर राज्यात अन्यत्र खबरदारी घेण्यात आल्याने टापरगाव पुलाची दुरुस्ती करण्यासाठी पुढील तीन महिने हा रस्ता जड वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मोढा फाट्याजवळ पर्यायी रस्ता नसल्याने सिल्लोड-कन्नड वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून कधी सुटका होणार, असा प्रश्न कायम आहे. टापरगाव पुलाची दुरुस्ती सुरू झाली असून, मोढा फाटा पुलाची निविदा अंतिम टप्प्यात आहे.
सिल्लोड-कन्नड रस्त्यावर भराडी जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत मोढा फाटा येथील पूल पाच सप्टेंबर रोजी दुपारी अचानक कोसळला. ४० वर्षे जुना हा पूल पडून चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर झाला होता. दरम्यान, दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल बांधण्यासाठी विभागातर्फे हालचाली करण्यात आल्या. सर्वेक्षणानंतर नवीन पूल बांधण्याचा निर्णय झाला. त्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या. ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच पुलाचे काम सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्य अभियंता एम. एम. सुरकुटवार यांनी सांगितले, की हा पूल लवकरात लवकर उभा राहावा, या दृष्टीने बांधकाम तातडीने सुरू करावे, अशा सूचना दिल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुलाशेजारून पर्यायी रस्ता करण्यासंदर्भातही सुचविण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग २११ सोलापूर-धुळे रस्त्यावर टापरगाव (ता.कन्नड) येथील निजामकालीन पुलासही तडे गेल्याचे तपासणीतून उघड झाले होते. संभाव्य अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याचे जाहीर केले. तीन महिने हे काम चालणार आहे. तोपर्यंत या रस्त्यावरून धुळ्याकडे जाणारी जड वाहतूक मालेगावमार्गे वळविण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. बसही या मार्गे वळविल्याने १७ किलोमीटरचा फेरा वाढला असून नागरिकांचा वेळ वाया जात आहे.

पाण्यामुळे पर्यायी मार्ग अशक्य
नदीला पाणी असल्याने पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता तयार करणे शक्य नाही. आणखी महिनाभर तरी हे पाणी हलणार नाही तोवर एसटी तसेच जड वाहतूक मालेगाव मार्गेच राहील, असे एनएचएआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीला रोज साडेचार लाखांचा तोटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टापरगावचा पूल दुरुस्त करण्यासाठी तेथून जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचा एसटीला सर्वाधिक फटका बसत आहे. एसटी महामंडळाचे दररोज सुमारे साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न कमी झाल्याची माहिती एसटी सूत्रांनी दिली.
धुळे, चाळीसगाव, कन्नड येथे या पुलावरून बस जातात. याशिवाय औरंगाबाद-बऱ्हाणपूर आणि अन्य मार्गावरील बसही तेथून जातात. औरंगाबाद-कन्नड मार्गावरून रोज सुमारे ३०० प्रवासी जातात. याशिवाय औरंगाबादहून चाळीसगावला जाऊन आणि तेथून पुढे रेल्वेने उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे. या मार्गावर रोज ३५० बस धावतात. सुमारे आठ हजार प्रवासी या मार्गावरून रोज प्रवास करतात.
औरंगाबाद विभागाला चाळीसगाव आणि जळगाव या मार्गावर जास्त प्रवासी मिळतात. टापरगावचा पूल बंद केल्याने औरंगाबाद टापरगाव आणि टापरगाव ते कन्नड अशी बस चालविण्यात येत आहे. थेट कन्नडपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना टापरगाव पुलाच्या अलीकडे उतरावे लागते. पायी पूल ओलांडून दुसऱ्या बाजूला असलेल्या एसटीतून कन्नडकडे जावे लागते. याशिवाय धुळ्याला जाण्यासाठी नांदगावहून फेरा होत असल्याने, प्रवाशांना ३४ रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. टापरगावच्या पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे, एसटीला साडेचार लाख रुपयाचा दररोज तोटा होत असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण विभागाचे काम बंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका महिला शिक्षकाच्या अडथळ्यावर नेमका कुणी तोडगा काढावा, या टोलवाटोलवीत बुधवारी शिक्षण विभागाचे कामकाज चक्क बंद होते. कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सीईओ मधुकर अर्दड यांच्याकडे जाऊन दाद मागण्याचा प्रयत्न केला, पण एक तातडीची बैठक सुरू झाल्यामुळे कर्मचारी सायंकाळी वाट पाहत उभे होते.
जिल्हा परिषद सेवेतील एक महिला शिक्षक गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभागात येऊन दाद मागत आहे. काहींच्या म्हणण्यानुसार ही महिला मनोरुग्ण आहे. शिक्षण विभागाने या महिलेवर कारवाई प्रस्तावित केली होती. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी हे प्रकरण वैद्यकीय मंडळाकडे पाठवावे, असे पत्रही दिले होते, पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नव्हती. दोन दिवसांपासून ही महिला दिवसभर शिक्षण विभागात येऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारत आहे, पण तिला कुणी प्रतिसाद देत नाही. बुधवारी सकाळी अकरा वाजताच ही महिला शिक्षण विभागात आली. शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल व कर्मचारी उपस्थित होते. मंगळवारीही असाच प्रकार घडला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; याबाबत शिक्षणाधिकारी स्तरावर पोलिसात तक्रार करा, असे सीईओंनी सांगितले. बुधवारी शिक्षण विभागाने प्रशासनाकडे ही माहिती कळविली. सीईओ बैठकीसाठी बाहेर गेले होते. दिवसभर ही महिला कार्यालयात बसून असल्याने कर्मचारी बाहेर उभे होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी एक निवेदन तयार करून या महिला शिक्षकास शिक्षण विभागात येण्यापासून रोखावे, अशी मागणी सीईओंकडे करण्यासाठी गेले, पण सीईओंकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी बैठकीसाठी आल्याने कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळास वाट पाहात थांबावे लागले. या प्रकरणात प्रशासनाकडून एकमेकांकडे टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ सिने-नाट्य निर्माते श्रीराम गोजमगुंडे यांचं निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

'बंदिनी', 'तिसरा डोळा' या टीव्ही मालिका व 'राजा शिवछत्रपती' चित्रपटातील भूमिकेमुळं घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ सिने-नाट्य निर्माते, अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांचं बुधवारी सायंकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. बाभळगाव येथे आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या गोजमगुंडे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 'रसबहार' या संस्थेच्या माध्यमातून गोजमगुंडे यांनी अनेक नाटकं रंगमंचावर आणली. निर्माते अशी त्यांची प्रमुख ओळख असली तरी त्यांचं व्यक्तिमत्व चतुरस्र होतं. अभिनेता, दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. 'राजा शिवछत्रपती' या चित्रपटातील त्यांची भूमिका अजरामर ठरली. ८०च्या दशकात त्यांनी 'झटपट करू दे खटपट' या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती.

नाट्य व चित्रपटातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. नटवर्य छोटू पाटील पुरस्कारासह विभागीय व राज्य पातळीवर आठ सुवर्णपदकं त्यांनी पटकावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजाजनगरमध्ये लोकनृत्य स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
बजाज ऑटो वाळूज पुरस्कृत व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था संचलित समाज सेवा केंद्रातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी बजाज विहार येथे लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत परिसरातील १२ शाळांमधील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी लावणी, गोंधळ, राजस्थानी, पंजाबी, आदिवासी, शेतकरी गीत, मंगळागौर आदी लोकनृत्य सादर करून धमाल उडवून दिली. लोककलेचे अभ्यासक दिलीप खंडेराय व भरतनाट्यमचे प्रशिक्षक विक्रांत वायकोस यांनी परीक्षण केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केंद्र संचालिका सुनीता तगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता बोर्डे यांनी केले. पूजा जाधव, शुभांगी बोरोले, मनीषा काळे, ऐश्वर्या मोहिते व कल्पना बेद्रे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक व अनेक पालक उपस्थित होते.
या स्पर्धेत तनवाणी विद्यालय, ज्ञानभवन शाळा, रयत इंग्रजी शाळा, राजा शिवाजी विद्यालय, न्यू शहीद भगतसिंग शाळा, जिजामाता विद्यालय, रवीसूत विद्यालय, भगवान महावीर स्कूल, राजे शिवाजी मराठी विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंढरपूर, रयत मराठी विद्यालय, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पंढरपूर या शाळा सहभागी झाल्या.

पारितोषिकप्राप्त शाळा
प्रथम- तारफा आदिवासी नृत्य- रयत इंग्लिश स्कूल
द्वितीय-पंजाबी भांगडा नृत्य- तनवाणी स्कूल
तृतीय- शेतकरी गीत-न्यू शहीद भगतसिंग शाळा
उत्तेजनार्थ पारितोषिक
ज्ञानभवन शाळा-राजस्थानी नृत्य
राजा शिवाजी इंग्रजी शाळा -लावणी नृत्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन ट्रक आदळून विचित्र अपघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूजकडून औरंगाबाद शहराकडे जाणाऱ्या तीन ट्रकपैकी समोरील ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने झालेल्या अपघातात तीन वाहने एकमेकांवर आदळली. हा अपघात कामगार चौकात गुरुवारी झाला. या अपघातात दोन्ही ट्रक एकमेकात अडकल्याने दोन क्रेनद्वारेते बाजुला करावे लागले. यामुळे वाहतुकीचा सुमारे अर्धातास खोळंबा झाला. सर्वात मागील ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
औरंगाबाद-नगर महामार्गावरील कामगार चौकातून धावणाऱ्या तीन ट्रकपैकी समोर असलेल्या अज्ञात ट्रकने एकदम ब्रेक लावले. त्यामुळे त्याच्या मागील ट्रकचालकाने (एम एच १७, ए जी ९५१७) ब्रेक लावले. त्यामुळे त्यावर मागून येणारा ट्रक (एम एच १७, ए जी ६९९९) आदळला. ट्रकचा वेग जास्त असल्याने हा ट्रक पुढच्या ट्रकमध्ये घुसला. दोन्ही ट्रक जागेवर उभे राहिल्याची संधी साधून समोरील ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला.
अडकलेल्या ट्रकला काढण्यासाठी दोन क्रेन मागवून प्रयत्न करण्यात आले. ट्रक बाजुला केल्यानंतर जखमी ट्रकचालक जगदीश देशराज राजपूत (वय २२, रा. नागपूर) याला पोलिसांनी शासकीय रुग्णवाहिकेतून घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवले. दरम्यान, अपघातास कारणीभूत असलेला समोरील ट्रक पसार झाला. अपघातस्थळी बघ्याची मोठी गर्दी झाल्याने मदत कार्यात अडथळे आले.

वाहनांच्या रांगा
क्रेन आणल्यानंतर जखमी चालकास बाहेर काढून दोन्ही वाहने वेगळी करण्यात आली. तोपर्यंत अपघातस्थळापासून जवळपास एक किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अपघातग्रस्त ट्रक बाजुला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लातुरात नगरपालिकेसाठी बहुरंगी लढत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर जिल्ह्यातील चार नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात चार ही ठिकाणी बहुरंगी लढती होणार हे निश्चीत झाले. औसा शहरात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असल्यामुळे येथील लढत ही चुरशीची होणार आहे. एमआयएमने चार ही ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले आहेत.
औसा नगराध्यक्षपदासाठी एकूण १३ उमेदवार रिंगणात असून नगरसेवकांच्या २० जागेसाठी १०१ उमेदवार लढत देणार आहेत. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुनील मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यांनी काँग्रेसने दिलेली नगरसेवकपदाची उमेदवारी नाकारली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रमुख उमेदवारामध्ये इम्रान पटेल (काँग्रेस), सुरेश भुरे (शिवसेना), किरण उटगे (भाजप), अफसर शेख (राष्ट्रवादी काँग्रेस), एमआयएमचे सय्यद फुरखान, मनसेचे सय्यद आजीम आहेत. याठिकाणी अपक्ष उमेदवाराची संख्या मोठी आहे.
निलंगा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यातील प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार गोविंद शिंगाडे (काँग्रेस), श्रीकंत शिंगाडे (भाजप), सुभाष शिंदे (शिवसेना), इस्माइल नदाफ (राष्ट्रवादी काँग्रेस), अजित निंबाळकर (महाराष्ट्र विकास आघाडी), तुराब बागवान ( एमआयएम), झटिंगराव म्हेत्रे (अपक्ष) यांच्याशिवाय २० नगरसेवकपदासाठी तब्बल शंभर उमेदवार नशीब अजमावत आहेत.
उदगीर नगराध्यक्षपदासाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवारांमध्ये विद्यमान नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे (काँग्रेस), नगरसेवक बस्वराज बागबंदे (भाजप), कैलाश पाटील (शिवसेना), शेख समिरोद्दीन अजीमोद्दीन (राष्ट्रवादी काँग्रेस), सय्यद ताहेर हुसेन मैनोद्दीन ( एमआयएम), यांचा समावेश आहे. नगरसेवकपदाच्या ३८ जागेसाठी ११५ उमेदवार रिंगणात आहेत.
अहमदपूर नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठीचे प्रमुख उमेदवारात रजनी रेड्डी (भाजप), अश्विनी कासनाळे (बहुजन विकास आघाडी), रब्बाजाबेगम शेख (काँग्रेस), कल्पना रेड्डी (शिवसेना), शहनाजबी बागवान (राष्ट्रवादी काँग्रेस) यास्मीन सय्यद ( एमआयएम). त्याशिवाय नगरसेवकपदाच्या २३ जागेसाठी ११५ उमेदवार रिंगणात आहेत. १४ डिसेंबर रोजी मतदान होत असून याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात आघाडी अन् जालन्यात माघारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
‘राज्यात आघाडी अन् जालन्यात माघारी’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जालना शहरात पालिका निवडणुकीच्या निकालानंतर व्यक्त केल्या जात आहेत. संपूर्ण राज्यात सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक विजयी करणाऱ्या भाजपच्या आणि शिवसेनेच्या जालना शहराच्या गोटात मात्र निशब्द शांतता आहे. जिल्ह्यात अंबड पालिकेत भाजपच्या संगीता कुचे यांच्या विजयाने आणि परतूरमधील संघर्षामुळे झालेल्या प्रगतीत भाजपचे अस्तित्व वाढले असे काहीतरी समाधान मानले जात आहे. मात्र, शिवसैनिकांना तर बोलायलाच शब्द उरलेले नाहीत. जालन्यात भाजपपेक्षा कमी नगरसेवक निवडून आले आहेत. भोकरदन, अंबड आणि परतूरात फार काहीच हाती लागले नाही.
जिल्ह्यातील काँग्रेसच्या गोटात मात्र दिवाळी साजरी केली जाते आहे. लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवातून उसळलेली गटबाजी आणि राजकीय हेवेदावे यांच्या सदैव फेऱ्यात अडकलेल्या काँगेसला जालना जिल्ह्यात नगर पंचायत आणि विद्यमान नगर पालिकेत खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले आहेत. जालना, परतूर आणि भोकरदन पालिकेतील पूर्ण स्वबळावरील बहुमताच्या विजयाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला आहे.
जालना हा भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. पंचवीस वर्षाच्या वजनदार राजकीय वाटचालीत आता राज्यात आणि केंद्रात सत्ता आली. विशेषता भाजपचे राज्य पातळीवरील सर्वोच्च नेतृत्व जालन्याच्या वाट्याला आले. कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे लढाऊ राज्यमंत्री असलेल्या जालन्यातील भोकरदन, परतूर, जालना आणि त्यानंतर अंबड या सर्व ठिकाणी सातत्याने अतिशय वजनदार असलेल्या या नेत्यांच्या वर्चस्वाला या पालिकेच्या निवडणुकीत जबरदस्त हादरा बसला. अर्थात हा धक्का या संबंधित नेत्यांच्या व्यक्तीगत पातळीवर ते ज्या पदावर कार्यरत आहेत. त्या पदाला अजिबात बसलेला नाही तर आज तरी या सर्व परिस्थितीत वर्तमान कार्यकर्त्यांची त्यांच्या भोवती जी फळी आहे ती निश्चितच डिस्टर्ब झालेल्या अवस्थेत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर नवा गडी नवा राज हा जुनाच फॉम्युला वापरला जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे.
जालना पालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिवसेनेच्यावतीने दावे प्रतिदावे केले गेले. राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून जालन्यात विकासासाठी काही विशेष निधी खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी मंजूर करून आणला. यातील रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन न करता कामाला सुरुवात झाली कारण अंतर्गत श्रेय आणि अन्य सर्व काही खासगी मुद्दे मोठ्या प्रमाणात गाजले. याच काळात विधिमंडळ अंदाज समितीच्यावतीने जालना पालिकेच्या कामांची चौकशी झाली. अंतर्गत जलवाहिनीचे काम असेच थांबले आहे. गोरंट्याल यांना पालिकेत घेरण्याचा मोठा प्रयत्न झाला, ही खरोखरच राजकीय कुस्ती होती की नुराकुस्ती याची चर्चा होत आहे.
जालना शहराच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना व अलीकडच्या काळात भाजपच्या बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या राजकारणाची परतफेड करण्यासाठी नगर परिषदेच्या निवडणुकीत डावपेच आखतील असे बोलले जात होते, ही वस्तुस्थिती आहे.
जालना पालिकेच्या नगरसेवक पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आघाडी आणि त्यानंतर भाजप-शिवसेनेच्या जागा वाटप सुरळीत झाले. नगराध्यक्षपदासाठी सेना व भाजप दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी घेतलेल्या यु टर्नमुळे या सर्व विषयाच्या चर्चेला अनेक पुरावे जोडले गेले. गोरंट्याल यांनी परिस्थिती समजून अतिशय समंजसपणे निवडणुकीत प्रचार केला. आता रेकॉर्डब्रेक विजयानंतरही त्यांच्या राजकीय मित्रांच्या भावना ते जपण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या न निघालेल्या विजयी मिरवणुकीसंदर्भात अशी एक चर्चा जालन्यात केली जात आहे.

जालन्यातील आकडेवारी
शिवसेनेने ३९ जागांपैकी ११ जागा जिंकल्या
भाजपने २४ जागांपैकी ११ जागी जिंकल्या
शिवसेना उमेदवाराला पडलेली मते ३७ हजार ७१९
भाजप उमेदवारांना पडलेली मते ३६ हजार १८४

भाजपला जालना पालिका निवडणुकीत विधानसभेला पडलेल्या मतांच्या तुलनेत सात हजार मते अधिक मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीत शहरात २९ हजार ५०० मते मिळाली होती.
सिद्धीविनायक मुळे,
शहराध्यक्ष, भाजपा जालना.

काँग्रेसच्या विजयाची जालन्यातील परंपरा संगीता गोरंट्याल यांच्या विजयाने नवीन उंचीवर गेली आहे. भोकरदन आणि परतूरमधील विजय हा काँग्रेसच्या विचारसरणीचा मजबूत पाया सिद्ध करणारा आहे.
अब्दुल हफीज, शहराध्यक्ष काँग्रेस, जालना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इलेक्ट्रॉनिक क्लस्टरला केंद्र सरकारची मंजुरी

$
0
0

औरंगाबाद ः इलेक्ट्रॉनिक उद्योगांना नवीन तंत्रज्ञान विकसित करून देण्यासाठी औरंगाबादेतील देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टरला गुरुवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) पुढाकाराने या क्लस्टरचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सुमारे ५० कोटी रुपये खर्चून पुढील वर्षभरात दोन एकर जागेवर हे क्लस्टर उभे राहणार आहे.
दिल्लीत गुरुवारी इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या सचिव अरुणा सुंदरराजन, अतिरिक्त सचिव डॉ. अजय कुमार, संचालक पी. के. बन्सल यांच्यासमवेत देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे समन्वयक सुरेश तोडकर, सीएमआयए सचिव प्रसाद कोकिळ, विनायक देवळाणकर, चंद्रशेखर गंपावार, विकास भांबुर्डेकर, शिरीष कुलकर्णी यांची बैठक झाली. तीत क्लस्टरला मंजुरी देण्यात आली.
सीएमआयएच्या पुढाकाराने औरंगाबादेतील इलेक्ट्रॉनिक उद्योगांना चालना मिळावी, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या धर्तीवर देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. १८ उद्योजकांनी एकत्र येऊन या क्लस्टरची नोंदणी केली. उभारणीसाठी ५० कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल केंद्राकडे सादर करण्यात आला होता.
वर्षभरापूर्वी शेंद्रा एमआयडीसीमध्ये दोन एकर जागा या क्लस्टरसाठी देण्यात आली होती, पण उभारणीसाठी लागणारा निधी केंद्र, राज्य सरकारकडून मिळवा, अशी मागणी करण्यात आली होती. आजच्या बैठकीत या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. केंद्राच्या अधिकाऱ्यांनी क्लस्टरला मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ५० कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजूरी मिळाल्याने केंद्राकडून ७५ टक्के, राज्य सरकारकडून दहा टक्के रक्कम मिळणार आहे. क्लस्टर नोंदणीच्या वेळी १८ उद्योजकांनी एकत्र येऊन १५ टक्के शेअर दिलेला आहे. शेंद्रा एमआयडीसीत मिळालेल्या जागेवर जानेवारी २०१७ मध्ये क्लस्टरच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.

क्लस्टरमध्ये काय होणार?
- मध्यवर्ति सुविधा केंद्र
- इनोव्हेशन सेंटर
- ट्रेनिंग सेंटर
- इलेक्ट्रॉनिक्स लॅब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बार्टी’चे औरंगाबाद सेंटर बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) औरंगाबादमध्ये सुरू केलेले यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेंटर बंद केले आहे. हे निवासी केंद्र बंद करून अनिवासी पद्धत आणली जाणार आहे. त्यात विद्यार्थी प्रवेक्ष क्षमता १२५वरून ३०पर्यंत कमी करण्यात आली आहे. बार्टीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत असलेल्या बार्टीतर्फे औरंगाबाद, नागपूर येथे निवासी प्रशिक्षण सेंटर चालविले जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षा देणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या सेंटरमध्ये मार्गदर्शन करण्यात येते. २०१५मध्ये हे सेंटर औरंगाबादेत सुरू करण्यात आले होते. एका वर्षातच ते बंद करण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये कॅनॉटा परिसरात भाडेपट्ट्यावर घेतलेल्या जागेत हे सेंटर चालविले जात होते. ही जागा संबंधित मालकाकडे सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सेंटरमधील असुविधांबाबतही विद्यार्थ्यांनी मागील काही महिन्यांत तक्रारी केल्या होत्या. लाखो रुपये खर्च करून चालविण्यात येणाऱ्या सेंटरमध्ये मूलभूत सुविधाही पुरविण्यात येत नव्हत्या.

आता अनिवासी सेंटर
निवासी सेंटर बंद करून अनिवासी पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या निर्णयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. प्रशिक्षणासाठी खाजगी संस्थेसोबत करार करण्यात येणार आहे. त्यात केवळ ३० विद्यार्थ्यांनाच संधी मिळणार आहे. यापूर्वी १२५ विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय होती. आता ही संख्या कमी २५ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. निवासी सेंटरमध्ये निवासासह कम्प्युटर, ग्रंथालय, तज्ज्ञांचे मार्गदर्शन इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ ही झाला.

नागपूर, औरंगाबाद येथील सेंटरमध्ये मूलभूत सुविधांबाबत काही अडचणी होत्या. विद्यार्थ्यांच्या तशा तक्रारीही होत्या, परंतु सेंटर बंद करण्याचा निर्णय झाला आहे की नाही, याबाबत मी माहिती घेतो. सेंटरमध्ये आवश्यकत त्या सोयीसुविधा असाव्यात याकडे विशेष लक्ष असून, सेंटर बंद होणार नाही.
- राजकुमार बडोले, समाजकल्याण मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांसाठी तारांबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदी निर्णयानंतर प्रथमच बुधवारी (३० नोव्हेंबर) पगार जमा झाल्याने गुरुवारी बँकांमध्ये नोकरदारांच्या रांगा होत्या. पगार जमा झाला, परंतु बँकांनी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यास नकार दिल्याने, खात्यातून पगार काढायचा कसा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिला. दरम्यान, गुरुवारी बँकांमध्ये पगार काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.
पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर बँका, पोस्ट ऑफिसबाहेर नोटा बदलण्यासाठी, खात्यावर जुन्या नोटा भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. गेल्या २० दिवसांत ही परिस्थिती हळुहळु नियंत्रणात येत होती. त्यातच बुधवारी बहुतांश सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांचे पगार जमा झाल्याने पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये पुन्हा गर्दी झाली. गुरुवारी बॅँकांकडे पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे पगार काढण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पैसे देण्यास अत्यंत अडचणी आल्या.

कुठे आल्या अडचणी
कॅनाट , स‌िडको, टीव्ही सेंटर, वाळूज एमअायडीसी, चिकलठाणा एमअायडीसीतील स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, एचडीएफसी या बँकांच्या शहरातील बहुतेक सर्वच शाखांमध्ये गुरुवारी गर्दी दिसली. एसबीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार; सध्या बँकांना खूपच कमी प्रमाणात रोख रक्कम प्राप्त होत आहे. बँकांना मिळणाऱ्या पैशांचा पुरवठा हा पूर्ववत होण्यासाठी निदान आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यातच बँकांमध्ये खात्यादारांकडून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा वगळता चलनातील इतर रक्कमेच्या नोटा भरण्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे सध्या बँका चलनटंचाईला सामोरे जात असून, खातेदारांना पैसे देण्यास अडचणी येत आहेत. शक्य तेवढ्या खातेदारांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापेक्षा जास्त रक्कम कोणत्याही खातेदारांना देण्यात येत नाही. दरम्यान, बँकांमधील चलनटंचाईची समस्या सुटेपर्यंत खातेदारांनी जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करावेत, असे आवाहनही बँकांच्या वतीने करण्यात आले आहे.

पगारदारांना सर्वच बँकांमध्ये दहा हजार रुपये मर्यादेपर्यंत पैसे दिले जात होते. पगारदारांना २४ हजार रुपयांपर्यंत काढण्याची मुभा आहे.
- रवी धामणगावकर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, कॅनॉट प्लेस शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images