औरंगाबाद शहरात गुरुवारी आलेली रोकड काही बँकांना वाटप करण्यात आली असली तरी नागरिकांची ‘नोटाकुटी’ संपलेली नाही. बँका व एटीएमसमोर शुक्रवारी रांगा कायम होत्या. बँकांमध्येही सातत्याने नोटा व धनादेश वटण्याविषयी विचारणा करण्यात येत आहे.
रिझर्व्ह बँकेकडून गुरुवारी सुमारे २०० कोटीपेक्षा जास्त रक्कम आल्याचे बोलले जात होते. ही रक्कम संबंधित बँकांना गुरुवारीच वितरण करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी अनेक नागरिकांना दिलासा मिळाला. यापुढील तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम एटीएमवर जाणवणार आहे. सलग सुट्या आल्याने शुक्रवारी दिवसभर बँकांमध्ये गर्दी होती. मिळालेली रोकड बहुतांश ठिकाणी संपल्याचे बँक अधिकारी आणि रोकपालांनी सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद या तीन बँकांच्या चलन भांडारातून विविध शाखा व एटीएमला रोकड वितरण करण्यात आली. शहरात या तीन बँकांच्या १८० शाखा आहेत. रोकड पुरवल्यानुसार वितरणही होत असल्याचे स्टेट बँक ऑफ हैदराबादचे रवी धामणगावकर आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले.
एसबीएचमध्ये माझे खाते आहे. एटीएमवर फक्त २ हजार रुपयांची एकच नोट मिळत आहे. त्यामुळे सुट्या पैशांचा प्रश्न येतो. सुटे पैसे कोठून आणायचे ही समस्या आहे.
- अब्दुल अजीज, लक्ष्मणचावडी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट