Quantcast
Channel: Maharashtra Times

चार रुग्णांचा मृत्यू; ८४ नवे रुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड येथील नऊ वर्षांच्या मुलीसह औरंगाबाद जिल्ह्यातील तीन करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोना बळींची संख्या एक हजार १५३ झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात गुरुवारी (तीन डिसेंबर) ८४ नवे बाधित आढळून आल्याने एकूण करोनाबाधितांची संख्या ४३ हजार ६५६ झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी ८४ बाधित (शहर ६९, ग्रामीण १५) करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ४१ हजार ५०८ झाली आहे. सध्या ९९५ बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

शहरात ६९ नवे रुग्ण


शहरातील नव्या बाधितांमध्ये दर्गा चौक येथील १, पुंडलिक नगर, गारखेडा २, आलोक नगर १, प्रताप नगर १, सातारा परिसर २, पोलिस लाइन १, चिकलठाणा १, मिलिट्री हॉस्पिटल १, माळीवाडा १, आकाशवाणी परिसर ६, एसआरपीएफ कॅम्प २, एन-नऊ, रायगड नगर १, एन-आठ ६, एन-सात, सिडको ३, हर्सूल १, चेतना नगर २, गवळीपुरा १, समर्थ नगर १, एन-नऊ, श्रीकृष्ण नगर १, अमृतसाई सारा, कांचनवाडी १, गजानन कॉलनी १, कांचनवाडी, कल्याण गेट १, बीड बायपास १, दशमेश नगर १, ज्योती नगर १, मुकुंदवाडी १, हनुमान नगर २, कामगार चौक १, पडेगाव १, बिल्डर सोसायटी, नंदनवन कॉलनी १ व इतर ठिकाणच्या २२ व्यक्तींचा समावेश आहे. ग्रामीण भागात १५ बाधित ग्रामीण भागातील नव्या बाधितांमध्ये तिसगाव महानगर १, गांधेली १, चौका, फुलंब्री २, रांजणगाव २, पळसखेडा १, कुक्कडगाव १, बिडकीन १ व इतर ठिकाणच्या ६ व्यक्तींचा समावेश आहे.

गंभीर गुंतागुंतीमुळे मुलीचा मृत्यू

शिवना येथील ५९ वर्षांचा पुरूष, काझीवाडा येथील ५८ वर्षांची महिला व चिकलठाणा येथील हनुमान चौक येथील ७० वर्षांचा पुरुष बाधितांसह बीड येथील नऊ वर्षांच्या बाधित मुलीचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. संबंधित बाधित मुलीला १७ नोव्हेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले होते व संबंधित मुलगी ही करोनाबाधित असल्याचे चाचण्यांवरून स्पष्ट झाले होते, मात्र विविध गंभीर व्याधींसह गुंतागुंतीमुळे बालरुग्णाचा उपचारादरम्यान बुधवारी (दोन डिसेंबर) मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट खरेदीखताच्या आधारे जमीन विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जमीनधारकाच्या जागी दुसरी महिला उभी करून बनावट खरेदीखत व आधार कार्डच्या आधारे जमिनीची विक्री केल्याप्रकरणात साक्षीदार असलेल्या आरोपीला सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी रात्री बेड्या ठोकल्या. ईश्वर संतोष जाधव (वय ४६, रा. मयूरपार्क) असे साक्षीदार आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात सय्यद अब्दुल्‍ला (मुश्तया) सय्यद महमंद (वय ६४, रा. नॅशनल कॉलनी, एन-१३, हडको कॉर्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सय्यद अब्दुल्‍ला यांनी १६ सप्टेंबर १९८७मध्ये मिटमिटा गट नंबर ३२मधील प्लाट क्रमांक ११५, ११६, ११७ व ११८ असे चार प्लॉट दीड हजार रुपयात खरेदी केले होते. त्या प्लॉटची रजिस्टी अब्दुल्‍ला यांनी पत्नी असमा यांच्या नावावर केली होती. त्यानंतर या चारही प्लॉटचा फेर केल्यानंतर १२ जानेवारी २०११ रोजी जमिनीचा सातबारा आसमा यांच्या नावे झाला. मात्र, ४ ऑगस्ट २०१८ रोजी अब्दुल्‍ला यांनी प्लाटचा सातबारा काढला असता त्यावर विशाल मधुकर कापकर यांचे नाव असल्याचे समोर आले. त्यामुळे अब्दुल्‍ला यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे चौकशी केली. तेव्हा हे प्लॉट अब्दुल्‍ला यांच्या पत्नीने विशाल कापकर यांना विकल्याचे निदर्शनास आले. खरेदीखताची पाहणी केली असता अब्दुल्‍ला यांच्या पत्नी ऐवजी त्याठिकाणी दुसऱ्या महिलेचा फोटो व त्यांच्या नावे बनावट आधारकार्ड असल्याचे समोर आले.

तसेच रजिस्ट्रीवर साक्षीदार म्हणून ईश्वर जाधव व सय्यद अकबर सय्यद अब्दुल्‍ला (२७, रा. चेलीपुरा) यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली. तसेच आरोपी ईश्वर जाधव याने तीन लाख रुपये किमतीत सदरील प्लॉट कापकर यांना विक्री करून फसवणूक केल्याचे देखील चौकशीत उघड झाले. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सिटीचौक पोलिसांनी आरोपी साक्षीदार ईश्वर संतोष जाधव याला गुरुवारी रात्री अटक केली.

पाच डिसेंबरपर्यंत कोठडी

आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी आरोपीने १९८७चे मूळ दस्ताऐवज कोणाकडून प्राप्‍त केले, याचा तसेच प्लॉटची रजिस्ट्री करताना फिर्यादीच्या पत्नीच्या जागी उभ्या करण्यात आलेली महिला व दुसऱ्या साक्षीदाराला अटक करणे आहे. आरोपींनी बनावट आधारकार्ड कोठे? व कसे बनवले? याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानुसार शनिवारपर्यंत (५ डिसेंबर)पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जी. दुबे यांनी गुरुवारी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेम प्रकरणातून तुंबळ हाणामारी

$
0
0

औरंगाबाद : प्रेम प्रकरणातून जालाननगर उद्यानात तरुणांच्या दोन गटांत लाठ्या, काठ्या आणि दगडांनी तुंबळ हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार उद्यानात एक जोडपे बसलेले असताना त्यांना पाच, सहा तरुणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणीसोबत असलेल्या तरुणाने कॉल करून त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. त्यांनी या तरुणांवर हल्ला चढविला. त्यानंतर दुसऱ्या गटातील तरुणांनी देखील आपल्या साथीदारांना बोलावून घेत राडा केला. जवळपास २० ते २५ तरुण एकमेकांवर तुटून पडल्याचे अनेकांनी मोबाइलमध्ये शूट केले. नागरिकांनीच पोलिसांना ही माहिती दिली. घटनास्थळावर पोलिसांचे वाहन येताच तरुणांनी उद्यानातून दिसेल त्या मार्गाने धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करत तिघांना ताब्यात घेतले असता प्रेम प्रकरणातून राडा झाल्याची कबुली त्यांनी दिली. तुंबळ हाणामारीचा व्हीडिओ पोलिस आयुक्तांपर्यंत पोहचला. त्यांनीही आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या. त्यानतंर सांयकाळी उशिरापर्यंत इतर तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना शेतात जायची भीती

$
0
0

पैठण : आपेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पितापुत्राचा झालेला मृत्यू. त्यांनतर शेजारील तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी मारले जात असलेल्या बातम्या व अद्याप बिबट्या जेरबंद न होणे. यामुळे दहशतीत असलेला तालुक्यातील शेतकरी शेतात जायला घाबरत आहे. परिणामी, शेतीची कामे पूर्णपणे बंद पडली आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील आपेगाव येथे अशोक सखाहरी औटे व त्याचा मुलगा कृष्णा औटे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या वीस ते पंचवीस गावामध्ये दहशत निर्माण झाली होती. ही घटना घडल्यानंतर, हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाची चार पथके आपेगाव परिसरात तैनात करण्यात आली. मात्र, जवळपास पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी लोटल्यावरही अद्याप बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेले नाही. सध्या, रब्बी हंगामातील पिकांची लागवड, लागवड करण्यात आलेल्या पिकांना तसेच फळबागा व उसाला पाणी द्यायचे काम शेतकरी करत आहे. मात्र, सध्या तालुक्यात सगळीकडे बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने, तालुक्यातील सर्वच गावातील शेतकरी त्यांच्या शेतात जायला घाबरत आहेत.

माझ्या सहा एकर शेतात हरभरा व उसाची लागवड केली आहे. सध्या या पिकांना पाणी द्यायचे काम सुरू आहे. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी आपेगाव येथे बिबट्याने दोन शेतकऱ्यांना ठार मारले. त्यानंतर, शेजारील आष्टी तालुक्यातही बिबट्याने तीन जणांची हत्या केली. या घटनांमुळे आम्ही सर्व शेतकरी घाबरलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे, आपेगाव येथे दोन शेतकऱ्यांना ठार मारणारा बिबट्या अजूनही जेरबंद करण्यात आलेला नाही. त्यातच मागच्या आठवड्यापासून तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे, आम्ही दहशतीत असून शेतात जायला आम्ही घाबरत आहोत, अशी माहिती आखतवाडा येथे शेती असलेले पैठण येथील शेतकरी जमशेद अजीम शेख यांनी दिली.

सहा पिंजरे, पाच कॅमेरे

तालुक्यातील आपेगाव येथे दोन शेतकऱ्यांना ठार मारणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने आपेगाव परिसरात सहा पिंजरे व पाच कमरे लावले आहेत. मागच्या दोन दिवसांपासून तालुक्यातील पाचोड व ढोरकीन या गावात बिबट्या निदर्शनास आल्याने या गावात वन विभागाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील गरीब शेतकरी बिबट्याच्या धाकाने शेतात जायला घाबरत आहे. तर, तालुक्यातील काही सधन शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात बिबट्याचा वावर आहे का नाही, याची खात्री करण्यासाठी त्यांच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. हे शेतकरी त्यांच्या मोबाइलमध्ये शेतात लावलेल्या सीसीटीव्हीचे लाइव्ह प्रेक्षपण बघत आहेत.

माझ्या सहा एकर शेतात हरभरा व उसाची लागवड आम्ही केली आहे. सध्या या पिकांना पाणी द्यायचे काम सुरू आहे. अन्य कामे सुरू आहेत. मात्र, बिबट्याच्या भीतीने आम्ही शेतात जात नसल्याने सर्व कामे खोळंबली आहेत. - जमशेद अजीम शेख, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आधी आभार माना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशभरातून, तसेच उत्तर प्रदेशातून लाखोंच्या संख्येने लोक महाराष्ट्रात आलेले आहेत. महाराष्ट्रात ते स्वत:चे पोट भरत आहेत. त्यांना आश्रय दिल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटू घेऊन त्यांचे आभार मानावेत, असा सल्ला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. मुंबई येथील चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत बोलताना खासदार जलील म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांनी मुंबई येऊन काही उद्योगपती आणि काही चित्रपट अभिनेत्यांना भेटून चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मुंबईतील परिस्थिती आणि येथे मिळणाऱ्या सोयी सुविधामुळे हा प्रयत्न निष्फळ ठरणार आहे, असे ते म्हणाले. भाजपचे सर्व स्तरावरील पदाधिकारी मुंबईला वारंवार लक्ष्य करीत असल्याचे सांगत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील लाखो लोकांना महाराष्ट्राने आश्रय दिला आहे. त्यामुळे त्याबद्दल उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत, असा सल्ला दिला.

दुसऱ्यांना समर्थन

खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे दुसऱ्यांदा समर्थन केले आहेत. यापूर्वी कंगना राणावतने मुख्यमंत्र्यांबाबत अनुद्गार काढले होते. त्यावेळी ते माझे मुख्यमंत्री असल्याचे सांगत अपशब्द वापरणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला होता. आताही त्यांनी चित्रपट उद्योगाच्या वादावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे समर्थन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादसाठीच्या पाणीपुरवठा योजनेचे विघ्न सरले!

$
0
0

औरंगाबाद: औरंगाबादसाठी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचा 'जीआर' राज्य शासनाच्या वित्त विभागाने मंगळवारी काढला. त्यामुळे येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा योजनेच्या कामाची वर्कऑर्डर संबंधित कंत्राटदार कंपनीला दिली जाणार असून, महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.

समांतर जलवाहिनीचा 'एसपीएमएल' कंपनीबरोबरचा करार महापालिकेने रद्द केल्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पुढाकार घेऊन औरंगाबादसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळावी यासाठी माजी मंत्री अतुल सावे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला आणि ५३ दिवसांत १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळवली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा शासन दरबारी असलेला प्रवास खोळंबला. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विकास कामांना थोपवून धरले होते. आता विविध विकास कामांना गती देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेला पन्नास कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी पाणीपुरवठा योजनेच्या निधी उपलब्धतेचा 'जीआर' काढण्यात आला. पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे या प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली. प्राधिकरणाच्या निविदा कमिटीने त्याला मंजुरी देखील दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सलीम अली सरोवराचे होणार पुनरुज्जीवन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पर्यटन राजधानी औरंगाबादचे वैभव अशी ओळख असलेल्या डॉ. सलीम अली सरोवराचे पुनरुज्जीवन करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. यासाठी स्मार्ट सिटी योजनेची मदत घेतली जाणार आहे. पुनरुज्जीवनाचे काम सुरू व्हावे यासाठी महापालिका प्रशासन याचिकाकर्त्यांशी चर्चा करणार आहे.

दिल्ली गेट व मजनू हिल परिसरात नैसर्गिकरित्या तयार झालेले हे सरोवर आहे. या सरोवराला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षी मित्र डॉ. सलीम अली यांचे नाव देण्यात आले आहे. या सरोवराचा विकास होऊन पर्यटकांची संख्या वाढावी याकरिता पालिकेने काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले. सरोवर विकास योजनेला शासनाने मदतीचा हात पुढे करत निधी दिला. सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून सरोवराच्या परिसरात सुशोभीकरण व संवर्धनाचे काम करण्यात आले. परंतु, हे सरोवर पक्ष्यांसाठी असल्याने सरोवराच्या परिसरात माणसांच्या वावराला पक्षी मित्रांनी आक्षेप घेतला. सरोवर फक्त पक्ष्यांसाठीच असले पाहिजे, अशी भूमिका घेत त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यानच्या काळात पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सरोवराच्या पुनरुज्जीवनासाठी अधिकाऱ्यांसह सरोवर परिसराची पाहणी केली. सरोवर आणि सरोवराच्या आतील परिसराला धक्का न लावता पुनरुज्जीवन करण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे.शिवाय या पुनरुज्जीवन प्रकल्पाकरिता पर्यावरणीय परिणाम मुल्यांकन केले जाणार आहे. शिवाय याचिका करणाऱ्या पक्षी मित्रांसोबत चर्चा केली जाईल, प्रशासक पांडेय यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने नेमलेल्या 'अमॅकस क्युरीं'नी देखील सरोवर परिसराची पाहणी केली आहे. पक्षी मित्रांशी चर्चा व पर्यावरणीय परिणाम मुल्यांकनानंतर महापालिका न्यायालयात आपली बाजू मांडेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरोवराभोवती दोन लोखंडी जाळ्या

सरोवराभोवती बाहेरून गोलाकार पद्धतीने एका समोर एक अशा दोन लोखंडी जाळ्या बसविण्याचे त्यांनी सूचवले आहे. दोन्ही जाळींतील अंतर सुमारे तीन फुटाचे असेल. या जागेचा वापर नागरिक वॉकिंग ट्रॅक म्हणून करू शकतील. जाळीची उंची दहा ते पंधरा फूट राहणार असल्याने कोणालाही सरोवरात कचरा किंवा कोणतेही साहित्य टाकता येणार नाही. परिणामी, सरोवर पक्ष्यांसाठी सुरक्षित राहील आणि नागरिकांना सुद्धा बाहेरच्या बाजूने वापर करता येईल, अशी संकल्पना आहे. हैदराबादेतील हुसेनसागर, रायपूर येथील सरोवरांप्रमाणे ही पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याची प्रशासकांची कल्पना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंचांचे आरक्षण पैठणमध्ये जाहीर

$
0
0

पैठण: २०२० ते २०२५ या वर्षासाठी तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी (आठ डिसेंबर) तहसील कार्यलयात काढण्यात आले. तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला.

तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थितीत मंगळवारी तहसील कार्यलयात तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

सरपंच पद आरक्षित झालेल्या गावांची नावे पुढील प्रमाणे; अनुसूचित जाती : हर्षी, पैठणखेडा, आडूळ खुर्द नांदर, तारू पिंपळवाडी, एकतुनी, कृष्णापूर, रांजणगाव खुरी. अनुसूचित जाती महिला : नांदलगाव, मुलांनी वाडगाव, पाडली गाजीपूर, टाकळी अंबड, खादगाव, पाचोड खुर्द, मुधलवाडी, सालवडगाव, हिरडपुरी. अनुसूचित जमाती : ढाकेफळ, दादेगाव जहांगीर, चिंचाळा. अनुसूचित जमाती महिला : ढाकेफळ, चिंचाळा. ओबीसी : पारुंडी, शेवंता, तोंडोळी, हिरापूर, लिंबगाव, बिडकीन, धुपखेडा, नवगाव, वरवंडी खुर्द, दाभरूळ, आडगाव जावळे, लोहगाव, सोनवाडी बुद्रुक, आवडे उचेंगाव, ओबीसी महिला : कडेठाण बुद्रुक, दिन्नपूर, कौडगाव, घारेगाव, सोलनापूर, इसारवाडी, गेवराई बुद्रुक, हर्षी बुद्रुक, नारायणगाव, पांगरा, बाभूळगाव, गेवराई बाशी, विहामांडवा, रजापूर, तांदूळवाडी. दरम्यान, तालुक्यातील नांदर, विहामांडवा, लोहगाव, बिडकीन, इसारवाडी, ढाकेफळ आदी मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. त्यामुळे या गावांतील अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादचा नियोजनबद्ध विकास करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी शहर हद्द, वाढीव हद्द व सातारा - देवळाई या तीन विकास योजनांचे नियोजन पुणे नगररचना विभागाच्या प्राधिकरण संचालकांकडे सोपवावे, अशी मागणी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

जैस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की औरंगाबाद शहर विकासाच्या दृष्टीने विचार करता औद्योगिक क्षेत्र असल्याने शहराचा विकास झाला. नागरिकांचे स्थलांतर झाले. निवासी वापर वाढला. वाणिज्य व शैक्षणिक वापर वाढला आहे. सध्या शहरात सिडको, एमआयडीसी आणि महापालिका ही नियोजन प्राधिकरणे आहेत. सिडको, एमआयडीसी, चिकलठाणा हे त्या प्राधिकरणाच्या संदर्भाने विकसित झालेले क्षेत्र आहेत. पालिका क्षेत्रांतर्गत शहर व वाढीव हद्द या दोन विकास योजना कार्यान्वित होत्या. शहरहद्दीची विकास योजना २०२० पर्यंतच मुदतीची होती. वाढीव हद्दीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने वाढीस न्याय मिळावा या दृष्टीने एक लोकाभिमुख चांगला निर्णय दिला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयात नमूद बाबीनुसार प्रलंबित असलेला शहर वाढीव हद्दीचा प्रस्तावित विकास योजना नकाशा आणि जुने शहर हद्दीत नव्याने करावयाची विकास योजना या दोन्ही एकत्रित करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. वरील दोन्ही विकास योजनांसाठी नियोजन प्राधिकरण संचालक, नगररचना, पुणे यांच्या अधिकारांतर्गत येतात. त्यामुळे या विकास योजनेची सर्व स्तरावरील कामे या कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत पूर्ण केली जातील. शहराच्या विकासात सिडको झालर क्षेत्रातून वगळून नव्याने शहर हद्द वाढीव असलेले शहराच्या दक्षिण बाजूचे सातारा, देवळाई ही गावे विसरता कामा नये, कारण दोन्ही गावांचे क्षेत्रफळ पाहता या भागात नव्याने विकास योजना होण्यास वाव आहे. भविष्यात शहर वाढ होऊ शकते. या भागाची विकास योजना अद्याप पूर्णत्वास आलेली नाही, असे पत्रात म्हटले आहे.

'नियोजन' पुणे नगररचना विभागाकडे सोपवा

शहराचा आतापर्यंत वाढता विकास पाहता वरीलप्रमाणे शहर हद्द, वाढीव हद्द व सातारा - देवळाई या तीनही विकास योजनांचे नियोजन प्राधिकरण पुणे नगररचना विभागाकडे सोपवावे. ज्यामुळे योजना तयार करताना आवश्यक आरक्षणे, शैक्षणिक, व्यावसायिक, उद्याने, भाजी मार्केट आदी नागरी सुविधा यांचा एकाच वेळी विचार करता येईल. शहराची संपूर्ण विकास योजना तयार होईल. वरील बाबींचा विचार करुन औरंगाबाद शहराचा नियोजनबद्ध विकास करावा अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आयटी' उद्योगातील बलाढ्य 'टीसीएस' औरंगाबादेत येणार?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

'आयटी' उद्योगातील आघाडीची टाटा कन्स्लटंसी सर्व्हिसेस (टीसीएस) औरंगाबादेतील दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) च्या शेंद्रा औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) टप्प्यात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. कंपनी व्यवस्थापनाने याबाबत राज्य सरकारकडे विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेंद्रा ऑरिकच्या मार्केटिंगसाठी ऑरिक व्यवस्थापनाने दोन वर्षांपूर्वी देशातील चार प्रमुख शहरांमध्ये रोड शो करून येथील गुंतवणुकीचे महत्त्व पटवून दिले. बेंगलुरु, चेन्नई येथील रोडशोमध्ये आघाडीच्या आयटी कंपन्यांसमोर सादरीकरणत्रून ऑरिक व्यवस्थापनाने शेंद्रा टप्प्यात गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी 'टीसीएस' व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मागील दीड वर्षापासून 'टीसीएस'कडून चाचपणी सुरू असल्याचे संकेत सूत्रांनी दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'टीसीएस'च्या टीमने शेंद्रा ऑरिकचा पाहणी दौराही केला. यासंदर्भात राज्य सरकारसोबत बोलणी सुरू असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. ही बोलणी प्राथमिक स्तरावर सुरू असली तरी 'टीसीएस' शेंद्रा ऑरिकमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ४००० जणांना रोजगार याठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. कोट्यवधींच्या गुंतवणुकीतून अप्रत्यक्ष रोजगाराच्याही मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक उद्योजक संघटनांनीही ऑरिक व्यवस्थापनाच्या मार्केटिंग ड्राइव्हमध्ये सहभाग नोंदविला होता. 'टीसीएस'ने औरंगाबादेत गुंतवणुकीचा निर्णय घेतला, तर औरंगाबादसाठी भविष्यात मोठी उपलब्धी होऊ शकते, असे सूत्रांनी नमूद केले.

काय आहेत बलस्थाने?

औरंगाबादेत सद्यस्थितीत २५ ते ३० आयटी उद्योग सुरू आहेत. काही कंपन्यांच्या परदेशात शाखा आहेत. 'आयटी'साठी पूरक वातावरण आहे. औरंगाबादेत विमान, रेल्वेसेवा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. शहराच्या चारही बाजूंनी राष्ट्रीय महामार्गांचे जाळे पसरले आहे. समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बहुराष्ट्रीय उद्योगांसाठी दळणवळणासाठी पोषक वातावरण आहे. औरंगाबादेतील वर्क कल्चर, कुशल मनुष्यबळाची उपलब्धतता या पण जमेच्या बाजू आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कंपन्या विस्तारीकरणासाठी टियर टू शहरांकडे वळत आहेत. ऑरिक यासाठी योग्य पर्याय असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्तदानासाठी ६० किलोमीटरवरून शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोना सुरू झाला आणि रक्तटंचाईचा विळखा पडला तो आजही सुटलेला नाही. त्यामुळेच संपूर्ण राज्यात कमालीची रक्तटंचाई जाणवत आहे, तर दुसरीकडे मात्र ही टंचाई दूर करण्यासाठी काही दाते चक्क ४० किलोमीटर, तर काहीजण ६० किलोमीटरहून शहरात केवळ रक्तदानासाठी येत आहेत. अगदी दिवसभर वेळ मिळत नाही म्हणून स्वखर्चाने आणि अर्थातच स्वयंस्फूर्तपणे रात्री-बेरात्री येऊन रक्तदान करून जात आहेत, हे विशेष.

करोना सुरू झाला आणि रक्तदानाचा मुख्य स्त्रोत असलेले बहुतेक रक्तदान शिबिरे बंद झाली. लॉकडाऊनच्या काळात तर शहरातील शिबिरे जवळजवळ शंभर टक्के बंद होती आणि नंतर हळूहळू शिबिरे सुरू झाली, तरी दात्यांची संख्या नेहमीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त रोडावली. पुन्हा सुरक्षित वावर ठेवण्याच्या हेतुने नकळतच रक्तदानावर चोहोबाजुंनी मर्यादा आल्या. अनलॉकच्या काळात शिबिरे वाढली; पण खंडित झालेल्या उपचार प्रक्रिया व शस्त्रक्रियाही सुरू झाल्याने रक्ताची गरज खूप जास्त प्रमाणात वाढली. साहजिकच पुरवठ्यापेक्षा मागणी वाढली आणि रक्तपेढ्यांची कसरत कमालीची वाढली. अजूनही रक्तटंचाई व रक्तपेढ्यांची कसरत सुरू असतानाच, काही दाते आपण समाजाचे काही देणे लागतो, या सद्हेतुने रक्तदानासाठी कायम पुढे असतात. अशांपैकी एक म्हणजे लासूर स्टेशन येथील डॉ. गणेश जाधव. डॉ. जाधव हे मामांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी आठ ऑगस्टला रक्तदान करतात आणि यंदाही त्यांनी रक्तदान केले होते. मात्र, अलीकडे रक्तटंचाई वाढल्याचे समजताच डॉ. जाधव यांनी पुन्हा एकदा रक्तदान करण्याचा निश्चय केला आणि दिवसभरातील रुग्णसेवेमुळे वेळ मिळत नाही म्हणून रात्री आठ वाजता ४० किलोमीटर स्वतःच्या वाहनात येऊन रक्तदान केले. असेच निराळे उदाहरण म्हणजे डॉ. पंकज थावरे. वैजापूर तालुक्यातील महालगावात स्वतःचे रुग्णालय चालवणारे डॉ. थावरे हे आपल्या काकांच्या स्मरणार्थ २५ मे रोजी दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि यंदाच्या करोनाच्या सावटामध्येही त्यांनी शिबिर घेतले होते व त्यावेळी सुमारे शंभर दात्यांनी रक्तदान करून मोठे योगदान दिले होते. मात्र रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या वाढदिवशी म्हणजेच रविवारी शहरापासून ६० किलोमीटर दूर असलेल्या आपल्या गावातून शहरात केवळ रक्तदानासाठी आले होते.

ग्रामीण दात्यांचा मोठा आधार

शहर परिसरात मार्चपासूनच करोनाचे रुग्ण आढळून येत होते आणि त्याचा शहरातील रक्तदानावर व शिबिरांवर मोठा परिणाम झाला होता. मात्र सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण आढळून आले नव्हते आणि त्यामुळेच मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत ग्रामीण भागातील दात्यांनी सर्वाधिक प्रमाणात रक्तदान केले होते आणि तो मोठा आधार ठरला होता, असे दत्ताजी भाले रक्तपेढीचे जनसंपर्क प्रमुख अप्पासाहेब सोमासे यांनी सांगितले.

''आता करोनाचे संकट संपले नसले तरी दिवसभरात किमान दहा दाते हे स्वयंस्फूर्तपणे रक्तपेढीमध्ये रक्तदानासाठी येतात, तर रक्तघटकांच्या गरजेनुसार रक्तदानासाठी येणाऱयांची संख्या ही तेवढीच किंवा त्यापेक्षा काहीशी जास्त असते.'' - अप्पासाहेब सोमासे, दत्ताजी भाले रक्तपेढी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वारांना एसटीने चिरडले

$
0
0

औरंगाबाद : सिडको चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला पाठीमागून आलेल्या एसटीने मंगळवारी सकाळी धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा जागेवरच मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. मृत युवकाचे नाव रात्री उशिरापर्यंत कळाले नव्हते. जखमी युवकाचे नाव शुभम अंकुश शिंदे (वय १९, रा. वटसावित्रीनगर, परळी) आहे. या प्रकरणात पोलिसांनी बसचालक एस. डी. चाटे याला बेड्या ठोकल्या आहेत.

सिडको बसस्थानकातून मंगळवारी सकाळी ११.५०च्या दरम्यान एम. एच. २० बी. यू. २९०६ क्रमांकाची औरंगाबाद-जालना ही विनावाहक बस प्रवासी घेऊन जालन्याकडे निघाली. वसंतराव नाईक चौकात लाल सिग्नल लागल्याने तिथे एक दुचाकी (एम. एच. ४४ व्ही. ४४१२) उभी होती. या दुचाकीपुढे औरंगाबादहून अंबाजोगाईला जाणारी बस (एम. एच. २० बी. यू. २२१८) उभी होती. जालन्याला जाणारी विनावाहक बस पाठीमागून वेगात आली. बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागूनच जोराची धडक दिली. या धडकेने दुचाकी दोन्ही बसमध्ये चेंगरली. दुचाकी मागून आलेल्या बसच्या दर्शनी भागात नंबर प्लेटच्या जागेवरील पत्र्यात घुसली. अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण समोर बसलेल्या तरुणावर आदळला. या धडकेमुळे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. एसटीचा पत्रा कापून तरुणांना एसटीच्या दर्शनी भागातून काढण्यात आले. मोटारसायकल काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, दुसरा दुचाकीस्वार शुभम शिंदे यांच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी बसचालक एस. डी. चाटे याला ताब्यात घेतले आहे. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्यासह पोलिसांनी भेट दिली. या प्रकरणाची चौकशी ‘आरटीओ’कडून करण्यात येणार असल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे. ……सिडको चौकात घडलेला हा तिसरा अपघात असून, या पूर्वी येथे दोघांचा मृत्यू झाला आहे.

जमावाने बसच्या काचा फोडल्या

अपघात भीषण होता. त्यामुळे जमलेले नागरिक संतप्त झाले. त्यांनी एसटीवर दगडफेक केली. या घटनेत बस काचा फुटल्या. या नागरिकांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी बसचालकाने सिडको बसस्थानकात सुरक्षित आश्रय घेतला. पोलिसांनी त्याला तेथे जात बेड्या ठोकल्या. दरम्यान, अचानक ब्रेक मारल्याने बसमधील दहा प्रवासी जखमी झाले. यात तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमी प्रवाशांमध्ये वैशाली सुनील खुंटे (रा. हडको, औरंगाबाद), शोभा टेटवार (रा. संघर्षनगर, औरंगाबाद), ज्योतीराम बाळू चव्हाण (रा. तपोवन तांडा, जालना), किशोर लाचुरे (रा. केदार खेडा, जालना), कांचनबाई सांडू गारदे, सांडू गारदे (दोन्ही रा. रोहिदासनगर, पैठण), श्वेता चौंडिये, सुनीता सुनील बसैये, नेहा सुनील बसैय्ये ( तिन्ही, रा. नवामोंढा, औरंगाबाद), सुशील मधुकर जायभाय (रा. कायगाव, बुलढाणा) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीपीई किट घालून भाजप रस्त्यावर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजलगाव शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीसाठी मंगळ‌वारी सिडको येथील 'एसबीआय'च्या क्षेत्रीय कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पीपीई किट घालून आंदोलन केले.

भाजपचे माजलगाव तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले. माजलगाव येथील 'एसबीआय' शाखेत गैरव्यवहार झाला आहे. कर्जमाफी मिळालेल्या सुमारे बाराशे लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारले आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पीक कर्ज कोणत्या कारणाने नाकारले याची माहिती दिली नाही. हे विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना करोनाचे कारण सांगून भेटण्यास टाळाटाळ करण्यात येते. बँकेच्या गेटसमोर शेतकऱ्यांना ताटकळत उभे रहावे लागते, शेतकऱ्यांबरोबरच पेन्शन धारक वयोवृद्धांची हेळसांड बँकेतील अधिकारी, कर्मचारी करतात, कर्जाची कामे दलालांमार्फत केल्यास त्यांची फाइल त्वरित मान्य करण्यात येते. बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना यासंदर्भात भेट घेण्याचा प्रयत्न केल्यास करोनाचे कारण पुढे करून ते भेट घेण्यास चार- पाच महिन्यांपासून टाळाटाळ केली जाते, असे असा आरोप राऊत यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी केले. यावेळी बबन सोळुंके, ज्ञानेश्वर मेंढके, डॉ. भागवत सरवदे, बबनराव सिरसाट, कल्याणराव शेप, राधाकिशन सरवदे, नामदेव मुळे, अनंतराव जगताप, डॉ. अशोक तिडके आदी उपस्थित होते.

चौकशीचे दिले आश्वासन

माजलगाव बँक शाखेच्या कारभारांची चौकशी करावी, 'एसबीआय'ने माजलगाव तालुक्यात नवीन स्वतंत्र कृषी शाखा सुरू करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, माजी महापौर भगवान घडामोडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन मागण्यांच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे भाजपने पत्रकात नमूद केले आहे.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद: सरपंचपद सोडत निर्णयाला हायकोर्टात आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद: निवडणुकीनंतर सरपंच पदाची सोडत काढण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली आहे.

येत्या १५ जानेवारी रोजी राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी आवश्यक त्या प्रवर्गांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातल्या अनेक ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण काढणाऱ्या सोडती देखील घेण्यात आल्या होत्या. मात्र, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १५ डिसेंबर रोजी कोल्हापुरात यापूर्वीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणाऱ्या सर्व सोडती रद्द करत सर्वच ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाची सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय जाहीर केला. सदरच्या निर्णयासाठी त्यांनी जातींच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी कारणांमुळे निवडणूक रद्द करून पुनश्च निवडणूक घ्यावी लागते, असे कारण दिले आहे. १६ डिसेंबर रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने या स्वरुपाचा आदेशही जारी केला आहे.

गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथील अ‍ॅड. विक्रम गोकुळराव परभणे यांनी या निर्णयाच्या घटनात्मकतेला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेत निवडणुकीनंतर सोडत काढल्याने संबंधित गावातील संपूर्ण संबधित मागास समुदायाऐवजी केवळ निवडून आलेल्या उमेदवारासाठीच सदरचे पद आरक्षित होईल आणि त्यामुळे घटनेच्या अनुच्छेद १४चा भंग होत असून एकूण आरक्षण धोरणाचा हेतूच मोडीत निघत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच यामुळे अनुच्छेद २४३ (ड) चा देखील भंग होत असल्याचे म्हटले आहे. सात जानेवारी रोजी या याचिकेची सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने देविदास शेळके बाजू मांडत आहे.

निर्णय अतार्किक असल्याचा दावा

सदस्यपदांसाठी तर अगोदरच आरक्षण जाहीर झाले आहे. सदस्यपदासाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना देखील अगोदरच जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यामुळे सरपंच पदाची सोडत निवडणुकीनंतर घेण्यासाठी दिलेल्या सर्व सबबी सदस्यपदासाठीच्या आरक्षणासाठी देखील लागू पडतात. त्यामुळे सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतर घेण्याचा निर्णय पूर्णपणे अतार्किक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे सदरचा निर्णय घटनाबाह्य म्हणून घोषित करावा व १० डिसेंबरपूर्वी घेतलेल्या सोडतीमधील आरक्षण कायम करून उर्वरित ग्रामपंचायतींसाठीची सोडत देखील निवडणुकांपूर्वीच घ्यावी, अशा विनंती याचिकेत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक चालकाला मारहाण करून लुटले, पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: ट्रकचा पहारा देणाऱ्या दोघांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या रिक्षा चालकासह तिघांना चिकलठाणा पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. ही घटना शनिवारी पहाटे जालना रोडवरील हिरापूर शिवारातील हॉटेल साईकृपा समोर घडली. विशेष म्हणजे पोलिसांना घटनेची माहिती देताच, त्यांनी अवघ्या पाच ते सहा मिनिटांत घटनास्थळ गाठले होते.

शेख गफ्फार शेख सत्‍तार (वय ३१, रा. रहेमानिया कॉलनी, ह. मु. नारेगाव), शेख तौसीम शेख रफीक (वय ३१, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) आणि नासिर पठाण युनूस पठाण (वय २९, रा. आशियापार्क, नारेगाव) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून चोरीच्या ऐवजासह रिक्षा असा सुमारे एक लाख ७४ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे. आरोपींना रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी दिले. या प्रकरणात ट्रकचालक शेरसिंग दीपूराम राजपूत (वय ५२, रा. बिर्डाना, ता. जि. फतियाबाद हरियाना) यांनी फिर्याद दिली. राजपूत हे आर. आर. रोडवेज ट्रान्सपोर्ट येथे ट्रक चालक म्हणून पाच वर्षांपासून काम करतात. दोन जानेवारी रोजी ट्रकमध्ये ट्रान्सफार्मर लोडकरून कोलकाता येथे जाण्यासाठी राजपूत हे सहकारी राम अधीन रामदेव चौधरी, अवधेश बालकीश चौधरी यांच्या सोबत निघाले.

80198449


८ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता औरंगाबाद जालना रोडवरील हिरापूर शिवारातील हॉटेल साईकृपा येथे ट्रक उभा करून रामआधीन आणि अवधेश हे दोघे ट्रकवर पहारा देत होते, तर उर्वरित लोक ट्रक मध्ये झोपी गेले होते. मध्यरात्रीनंतर तिघे आरोपी रिक्षा घेवून तेथे आले त्यांनी रामआधीन व अवधेश यांना चाकूचा धाक दाखवत मारहाण करून मोबाइल, रोख रक्‍कम असा सुमारे ११ हजार ३०० रुपयांचा ऐवज बळजबरी हिसकावून घेतला. आरडा-ओरड ऐकून राजपूत यांना जाग आली, त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. विशेष म्हणजे माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या पाच ते सहा मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून आरोपींनी रिक्षा पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केली. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने कोठडीचे आदेश दिले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Aurangabad: उच्च शिक्षणासाठी शहरात आला, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

$
0
0

औरंगाबाद: उच्च शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाने नागेश्वरवाडी भागात राहत्या खोलीतील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सागर पोपटराव पोळ (वय - २२, रा. पोळशंकरपूर, गंगापूर, ह. मु नागेश्वरवाडी, औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. कौटुंबिक वादानंतर नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी सागर हा शहरात आला होता. नागेश्वरवाडी भागात सागर हा एका खोलीत राहत होता. काही दिवसांपासून पोळ कुटुंबात वाद सुरू होते. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते. कुटुंबीयांनी त्याची समजूत देखील काढली होती. परंतु, गुरुवारी सकाळी त्याने टोकाचे पाऊल उचलले. गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार डी. जे. शिंदे हे तपास करीत आहेत.

80380789

80380278


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड हादरले! ५ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर केली हत्या

$
0
0

नांदेड: बलात्काराच्या घटनेने नांदेड हादरला. पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. नांदेडमधील एका गावात नदीजवळ ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नदीजवळ पाच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. गुरुवारी पोलिसांनी ही माहिती दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मजुरी करतो. मुलीच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या शेतावर तो काम करत होता.

80402194


आरोपीने बुधवारी दुपारी मुलीला नदीजवळच्या परिसरात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून, मुलीचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पित्याने तिला दुपारी दोन वाजताच्या सुमारास आरोपीसोबत बघितले होते. त्यानंतर पाच वाजता मुलगी कुठेही दिसली नाही. तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर पित्याने आणि कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

80401659

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलगी एकटीच होती, तरुणाने घरात घुसून केला बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: अल्पवीयन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आकाश संजय गांवडे (वय १९) याला वडोदबाजार पोलिसांनी मंगळवारी (२६ जानेवारी) रात्री अटक केली. त्याला गुरुवारपर्यंत (२८ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी बुधवारी दिले.

पीडित १५ वर्षांच्या मुलीच्या फिर्यादीनुसार, ती नववीची विद्यार्थिनी आहे. संशयित आरोपी आकाश गांवडे हा फिर्यादीच्या परिसरातच राहतो. तीन महिन्यांपूर्वी तो पीडितेला शाळेसमोर भेटला व तू मला खूप आवडते, असे म्हणाला. त्यावर, तू मला आवडत नाही, असे सांगून पीडिता निघून गेली होती. त्यानंतर आरोपीने तिच्या मोबाइलवर मॅसेज करून, तू बोललीस नाहीस, तर तुला मारून टाकीन, गावात बदनामी करीन, अशी धमकी देत होता.

80494374


कधी कधी तो पीडितेच्या आईच्या मोबाइलही मॅसेज करत होता. पीडिता धमकीला घाबरून मेसेजला प्रतिसाद देत होती. २५ जानेवारी रोजी आई सिल्‍लोड येथे गेल्याने पीडिता घरी एकटी होती. ही संधी साधून दुपारी तीनच्या सुमारास आरोपी घरात घुसला. त्याने पीडितेच्या तोंडात कापडी गोळा कोंबून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. घरी आलेल्या आई व इतर नातेवाईकांनी आरोपीला घरातून पळतांना पाहिले. या प्रकरणात वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

80493912


कोणाचे सहकार्य?

आरोपीची वैद्यकीय तपासणी, गुन्ह्यात आरोपीला कोणी सहकार्य केले याच्या तपासासाठी सहायक लोकाभियोक्‍ता मधुकर आहेर यांनी पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Aurangabad crime : मोठ्या भावाच्या तोंडावर फेकले अॅसिड, डोळा निकामी

$
0
0

औरंगाबाद : पेन्शन आलेल्या रकमेतून घरखर्चास पैसे देण्याचा कारणावरून दोन भावात तुंबळ हाणामारी झाली. मोठ्या भावाने लहान भावाच्या पत्नी व सासूवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर, लहान भावाने मोठ्यास मारहाण करत अ‍ॅसिडसारखे द्रव्य तोंडावर मारल्याने मोठ्या भावाचा डोळा निकामी झाला. या प्रकरणी छावणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून लहान भावास अटक केली.

मिटमिटा शादाब कॉलनीतील फकीर मोहमद पठाण हे जळगाव येथील महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांना दोन मुले आहेत. रिजवान संगणक दुरूस्ती करतो. त्याला दारूची सवय आहे. फकीर पठाण यांना ७० हजार रूपये पेन्शन मिळते. यातील ते दरमहा रिजवान यास दहा हजार रूपये देत होते. मात्र पैसे देण्यास लहान भाउ मुझ्झम्मिल हा विरोध करत होता. नेहमीप्रमाणे रिजवान वडिलांकडे पैसे घेण्यासाठी गेला असता दोघा भावात कडाक्याचे भांडण झाले. भांडणात रिजवान याने हातात चाकू घेऊन भावजयीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता भावाचा सासरा निसार शेख यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता मुझ्झम्मिल सासरा निसार, बिलाल शेख, फर्दापुर येथील युसुफ शेख यांनी रिजवान यास बेदम मारहाण करत फरशी धुण्याचा अ‍ॅसिडसारखा द्रव्याने तोंडावर मारले. यात रिजवान याचा डोळा निकामी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

81189404


या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून मुझ्झम्मिल शेखसह निसार शेख, बिलाल शेख आणि दोन महिला तर दुसऱ्या गटाचे निसार शेख यांच्या तक्रारीवरून रिजवान फकीर पठाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग भागिले यांनी शेख मुझ्झमिल यास अटक केली असता न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

81188573


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Nanded: ४ पानी ‘जबाब’ लिहून कंडक्टरने एसटी बसमध्येच केली आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: खराब ई-तिकीट वेडींग मशीनमुळे माझ्या प्रामाणिक नोकरीवर अप्रामणिकतेचा ठपका लागणार आहे. खराब ई-तिकीट मशीनमुळे झालेल्या तांत्रिक चुकांचा दोष हे माझ्यावर टाकला जाणार आहे. माझ्या आत्महत्येला कुटुंबाचे कोणीही दोषी नाही. खराब ई-तिकीट मशीन देणारे एसटी प्रशासन दोषी असल्याचे चार पानी पत्र लिहून एका कंडक्टरने एसटी बसमध्येच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एस. एस. जानकर असे आत्महत्या करणाऱ्या कंडक्टरचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील माहुर आगारातील एका बसमध्ये त्यांनी आत्महत्या केली.

माहुर आगारात असलेल्या बसची स्वच्छता करण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी आगारात आलेल्या सफाई कर्मचाऱ्याने जानकर यांनी बसच्या लोखंडी रेलिंगला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहिले. त्यांनी ही माहिती आगारातील अन्य कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना दिली. या प्रकरणी माहुर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. कंडक्टर जानकर यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या ठिकाणी जानकर यांना तपासून मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळाहून एका वहीमध्ये आत्महत्येपूर्वी चार पानी मृत्यूपूर्वीचा जबाब लिहिलेला पोलिसांना आढळून आला.

माहुर बस स्थानकाचे आगार प्रमुख व्ही.टी. धुतमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारीला पहाटे चार वाजताच्या दरम्यान एस. एस. जानकर यांनी आगारातील एका बसमध्ये गळफास लावून घेतला होता. त्यांच्या जवळील वहीत चार पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या प्रकरणी माहुर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. एस. एस. जानकर यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. जानकर हे नांदेड शहरात सिडको भागात राहात होते, अशी माहिती धुतमल यांनी दिली.


81227303


'मला दोषी ठरवतील..'

संजय संभाजी जानकर (एस. एस. जानकर) यांनी चार पानी लिहिलेल्या चिठ्ठीत २४ फेब्रुवारी रोजी माहुर ते महागाव या रूटवर प्रवासी घेऊन जात असताना, तिकीट तपासणी पथकाने धनोडा गावाजवळ बस तपासून तिकीट अपहाराचा आरोप लावला. या आरोपावर जानकर यांनी ‘चार पानी जबाब’ असा उल्लेख असलेली सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. आपण प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे. तिकीट मशीन नादुरूस्त असल्याने ३ फुल एक हाफ असे लिहून दिले. सदर मशीन खराब होण्याची प्रिंट न येण्याची तक्रार वारंवार कंडक्टर करत असतात. मी कितीही सांगितले तरी मलाच दोषी ठरवण्यात येणार आहे. मात्र तांत्रिक दोष असलेल्या एसटी प्रशासनाला आपल्या आत्महत्येप्रकरणी दोषी ठरवावे असे त्यांनी जबाबात लिहून ठेवले आहे.

चार वर्षांपूर्वीच कर्तव्यावर रूजू

एस.एस. जानकर यांच्यावर यापूर्वी अपहाराचे आरोप लावण्यात आले होते. अंदाजे १० वर्षे ते निलंबित होते. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राबवलेल्या कुटुंब कल्याण योजनेतून जानकर पुन्हा एसटीच्या सेवेत आले होते. बस तपासणी करताना, तिकीट अपहारप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती, अशीही माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

ईटीआय मशीनचा गोंधळ

एसटीमध्ये ईटीआय मशीनद्वारे तिकीट देण्यात येत असते. अनेक वेळा या मशीनबाबत संबंधित वाहकांकडून तक्रारी करण्यात येत असतात. कधी कधी प्रिंट न निघणे, हँग होणे यासह अन्य तक्रारीही समोर आलेल्या आहेत. याबाबत महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे अनेक वाहकांवर तिकीट अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद: कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टरने महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: पदमपुरा येथील महापालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये डॉक्टरने एका महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना खळबळजनक घडल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले असून, उद्या गुरुवारी (४ मार्च) दुपारपर्यंत चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे.

सूत्रांनी सांगितले, की संबंधित करोनाबाधित महिला दोन दिवसांपूर्वी उपचारांसाठी कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल झाली. मंगळवारी रात्री सेंटरमध्ये ड्युटीवर असलेल्या एका डॉक्टरने त्या महिलेला तपासण्यासाठी बोलावून तिच्याशी लगट केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे ती महिला घाबरली आणि तिने आरडाओरडा केली. त्यामुळे सेंटरमध्ये गोंधळ उडाला.

81325259


सेंटरमधील अन्य कर्मचाऱ्यांनी धावाधाव करून डॉक्टरला बाजूला केले, त्या महिलेला वॉर्डमध्ये पोहोचवले. बुधवारी या घटनेची माहिती आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना देण्यात आली. पांडेय यांनी ह प्रकरण गांभीर्याने घेऊन तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. गुरुवारी दुपारपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

81324308


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आम्हीही तयार; भविष्यातही उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील'

$
0
0

जालना: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचं भाष्य केल्यापासून महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी बाहू सरसावले आहेत. आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी पटोले यांच्या वक्तव्यावर सावध आणि संयमी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी दुसऱ्या फळीतील नेते रोखठोक मतं मांडत आहेत. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अशीच प्रतिक्रिया दिली आहे. (Shiv Sena Leader Abdul Sattar on CM Post)

'काँग्रेसनं निवडणूक कशी लढायची हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील त्यांच्या नेत्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. आम्हीही जालना जिल्ह्यातील स्थानिक निवडणुका स्वबळावर लढायची तयारी सुरू केली आहे. येथील प्रत्येक निवडणुकीनंतर भगवा फडकलेला दिसेल,' असा दावा सत्तार यांनी व्यक्त केला.

वाचा: नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हायचंय; अजित पवार म्हणाले...

'मुख्यमंत्रिपदाविषयी म्हणाल तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुढची पाच वर्षे उद्धवजी ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यानंतर ज्याला कोणाला मुख्यमंत्रिपद हवं असेल त्या पक्षाला सर्वाधिक जागा निवडून आणाव्या लागतील. काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या तर त्यांनाही निश्चित संधी मिळेल,' असं सत्तार म्हणाले. 'सध्या महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमानुसार पुढची साडेतीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यानंतरही शिवसेनाच हाच महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असेल आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वाचा: संभाजीराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्याच्या हालचाली

शिवसेनेचा वर्धापन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जालना येथे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कपाशी बियाणे व प्रत्येक सात हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली. राज्यमंत्री सत्तार यांच्या हस्ते मदतीचं वाटप करण्यात आलं. यावेळी जालना जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना नेते लक्ष्मण वडले, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

वाचा: 'सुशांतनं आत्महत्या केली नव्हती तर मग त्याचा खुनी कोण?'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची बेकायदा झाडाझडती; सहा पोलीस निलंबित

$
0
0

जालना: कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता न करता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतल्या प्रकरणी जाफ्राबाद (Jafrabad) पोलीस ठाण्याच्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांनी सोमवारी याबाबतच्या कारवाईचे आदेश दिले. (Illegal search operation at Raosaheb Danve Office in Jalna)

शुक्रवार, ११ जून रोजी हा प्रकार घडला होता. जाफ्राबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे, हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग रायसिंग सोळंके, सचिन उत्तमराव तिडके, शाबान जलाल तडवी हे दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेले आणि झाडाझडती सुरू केली. दानवे यांचे कार्यालयप्रमुख उद्धव दुनगहू यांनी झाडाझडती घेण्यासाठी आपल्याकडं रितसर आदेश आहेत काय? अशी विचारणा पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे यांच्याकडं केली. त्यावर त्यांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप दुनगहू यांनी केला होता. इतकंच नव्हे, नागरिकांनी दिलेली निवेदने व विकासकामांबाबतचा महत्त्वाचा डेटा हे पोलीस घेऊन गेले.

वाचा: मराठा आंदोलन अखेर राजकारण्यांच्या ताब्यात, पुढं काय होणार?

रावसाहेब दानवे यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडं तक्रार केली होती. कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता एका संसद सदस्याच्या व केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेणे, कार्यायलयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे ही बाब संसदीय लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळं माझी बदनामी झाली आहे. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच पोलिसांनी ही कारवाई केली, असा आरोप दानवे यांनी तक्रारीत केला होता. पोलिसांच्या या कारवाईतून काय निष्पन्न झाले याचा खुलासा पोलीस खात्यानं करावा, अशी मागणी दानवे यांनी केली होती.

पोलीस अधीक्षकांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. बेशिस्त वर्तन व पोलीस खात्याची प्रतिमा जनसामान्यांमध्ये मलीन होण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

वाचा: शिवसेनेनं राम मंदिरासाठी दिलेले एक कोटी परत घ्यावेत; भाजप भडकला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'अनिल देशमुख यांच्याकडं काहीच सापडत नसल्यामुळं आता...'

$
0
0

उस्मानाबाद: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर होत असलेल्या ईडीच्या कारवाईमुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. या कारवाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर तोफ डागली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'सर्व तपास यंत्रणांचा वापर करूनही अनिल देशमुख यांच्याकडं काही सापडलेलं नाही. त्यामुळं आता त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. दहा वर्षापूर्वी काही झालं असेल तर त्या संदर्भात गुन्हा दाखल करायचा आणि छापे टाकायचे हे आता सगळ्यांनाच कळून चुकलं आहे,' असं जयंत पाटील म्हणाले.

वाचा: मोठी घडामोड! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर झालेल्या आरोपावर बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर शरसंधान केले. 'ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि जो तुरुंगात आहे, तो माणूस आरोप करतो. NIA नं ताब्यात घेतल्यावर किंवा चौकशी सुरू केल्यानंतर हे आरोप केले जातात. हा घटनाक्रम लक्षात घ्यायला हवा. कुठल्यातरी दबावाला बळी पडून त्यानं हे आरोप केले आहेत किंवा त्याला 'आरोप करा' म्हणून सांगण्यात आलेलं आहे हे स्पष्ट दिसत आहे,' असं पाटील म्हणाले.

वाचा: चुकीच्या वेळेस चुकीच्या गोष्टी केल्या जाताहेत: वळसे-पाटील

'भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ठराव करून सीबीआय चौकशीची मागणी करणं म्हणजे आरोपीनं केलेल्या मागणीला पाठिंबा देण्यासारखं आहे. भाजपचं हे वर्तन अनाकलनीय आहे. भाजपला आता कुठलं कामच उरलेलं नाही. भाजपनं करोनाबाबत, विकासाबाबत चर्चा केली पाहिजे, परंतु एका गुन्हेगारानं केलेल्या कथित आरोपाची चौकशी करण्याची मागणी भाजप करत आहे. देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर करण्याची सवयच भाजपला लागलेली दिसते, असा टोलाही जयंत पाटील यांनी हाणला.

वाचा: भाजपनं आता हे थांबवावं; अंधारात चाचपडू नये; शिवसेनेचा टोला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या पाठवणीनंतर नवऱ्याची हत्या, भाऊ-भावजयीच्या साथीने काटा काढला

$
0
0

औरंगाबाद : दारु पिऊन पती नेहमी त्रास देत असल्याने अखेर पत्नीनेच भावाच्या मदतीने पतीची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह निर्जनस्थळी नेऊन जाळला. या 'ब्लाइंड मर्डर' प्रकरणाचा उलगडा गुन्हे शाखेच्या मोपेड वाहनवरुन केला. या प्रकरणी मयत तरुणाची पत्नी, मेव्हणा, मेव्हण्याची बायको आणि मेहुण्याचा मुलगा अशा चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे मुलीच्या लग्नाला जेमतेम १५ दिवस झाले असताना तिच्या आईने वडिलांचा काटा काढला.

सुधाकर नारायण चिकटे (वय ४३ वर्ष, रा. हमू सांगळे कॉलनी, हनुमान मंदिर जवळ, हिमायत बाग परिसर, मूळ सिंदखेडा मतला ता. चिखली, जि. बुलडाणा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आशा चिकटे (पत्नी - वय ४० वर्षे ), राजेश संतोष मोळवळे (मेव्हणा - वय ४७ वर्ष), अलका राजेश मोळवळे (मेव्हण्याची पत्नी), युवराज मोळवळे (मेव्हण्याचा मुलगा - वय १९ वर्षे) (तिन्ही रा. गोधरी, ता. चिखली, जि. बुलडाणा) अशी चौघा आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत सुधाकर हा ट्रॅव्हल चालक होता. मात्र गेल्या सात महिन्यापासून काम नसल्याने तो बेरोजगार होता. त्याचे हिमायत बाग येथील सांगळे कॉलोनी येथे दुमजली घर आहे. तर खाली किराणा आणि पिठाची गिरणी आहे. दोन्ही दुकाने सुधाकरची पत्नी आशा चालवते. गेल्या सात महिन्यापासून मेव्हण्याचा परिवार सुधाकरच्या वरच्या मजल्यावर राहत होता. सुधाकरच्या मोठ्या मुलीचं लग्न १५ दिवसांपूर्वीच पार पडले.

सुधाकरला दारुचे प्रचंड व्यसन होते. गेल्या सात महिन्यापासून तो सकाळपासूनच दारू प्यायचा व पत्नीला या ना त्या कारणाने मारहाण करायचा, असा दावा केला जातो.

अशी झाली हत्या

शनिवारी (दि. ४ जून) संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सुधाकर दारुच्या नशेत घरी आला. दारू पिण्यासाठी रिक्षाने जायचे असल्याने त्याने पत्नीकडे पैशांचा तगादा सुरू केला. १५ दिवसांपूर्वी लग्न झालेली मुलगी घरी येणार असल्याने पत्नीने देखील वाद न घालता पैसे दिले. मात्र तरीही सुधाकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

दरम्यान पत्नी आशाचा भाऊ राजेश कामावरून आला. व त्याने भाऊजींना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघेही बाहेर गेले. दोघांनी सोबत दारू प्राशन केले व परत घरी आले. घरी आल्यावर पुन्हा सुधाकरने शिवीगाळ करीत पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. नेहमीच्या त्रासाला कंटाळून पत्नी आशाने तिचा भाऊ राजेशसोबत पती सुधाकरच्या हत्येचा कट रचला आणि हत्येसाठी लागणारा लोखंडी रॉड आणण्यासाठी भावाला पैसे दिले.

राजेशने दुकानातून रॉड आणला. रात्री जेवणानंतर सुधाकर सोफ्यावर बसला होता. दरम्यान राजेशने पाठीमागून सुधाकरच्या डोक्यात दोन वेळा हल्ला केला. या हल्ल्यात सुधाकर जागीच गतप्राण झाला. आवाज झाल्याने राजेशची पत्नी अलका व मुलगा युवराज दोघेही खाली आले. त्यांनी खाली घडलेला प्रकार पहिला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अल्काने किराणा दुकानातून गोणी आणली. त्यात मृतदेह बांधून युवराज आणि राजेश दोघांनी मोपेडवरून तो मृतदेह हिमायतबाग परिसरातील निर्जनस्थळी नेला. तिथे मोपेडमधील पेट्रोल नळीच्या साहाय्याने काढून सुधाकरचा मृतदेह जाळला आणि दोघेही घरी परत आले. दरम्यान अलका आणि आशा या दोघींनी घरातील रक्ताची साफसफाई केली.

असा झाला उलगडा

अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना हिमायतबाग परिसरात मृतदेह आढळला होता. मात्र कुठलेही धागदोरे पोलिसांच्या हाती नव्हते. आज सकाळी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी गुन्हे शाखेच्या पथकांची बैठक बोलावत. नकाशाद्वारे परिसराची माहिती घेतली. हत्या झालेल्या परिसराजवळील वसाहतीमध्ये पथके रवाना केली. सांगळे कॉलनी भागात पथक गेल्यावर पांढऱ्या रंगांची मोपेड पोलिसांना आढळून आली. तशीच हुबेहूब दिसणारी मोपेड एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. पोलिसांनी त्या मोपेडवरून शेजाऱ्याकडून मोपेड उभी असलेल्या घरातील लोकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले असता पोलिसांना सुधाकर बेपत्ता असल्याचे कळाले.

पोलिसांनी घरातील सदस्यांना विचारपूस केली असता, सुरुवातीला सर्वांनीच उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सुधाकरच्या १५ वर्षीय मुलाला विश्वासात घेताच त्याने मामाने हत्या झाल्याची कबुली दिली. पोलिसांनी राजेशला ताब्यात घेत विचारपूस केली असता बहिणीला नेहमी त्रास देत आल्याने हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट





Latest Images