‘शब्दजंजाळ व शब्दवैभव म्हणजे साहित्य नाही. वाचकाला अस्वस्थ करते ते खरे साहित्य. साहित्य संमेलन बनचुके होण्याचे माध्यम नसून संमेलन व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम आहे. साहित्यिकांनी गांभीर्याने व्यक्त होण्यावर संमेलनाचे यश अवलंबून असते. त्यामुळे साहित्यिकांनी आत्मशोध घेण्याची गरज आहे’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले.
↧