दुष्काळ निवारणावर जिल्ह्यात सुमारे शंभर कोटी रुपये सरकारला खर्च करावे लागले आहेत. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे जिल्ह्यात जनावरांसाठी सुरू केलेल्या निम्म्या छावण्या बंद करण्यात आल्या आहेत, मात्र भूजलाची पातळी अद्यापही वाढली नसल्याने पाणी पुरवठ्यासाठीचे टँकर अद्यापही सुरू ठेवावे लागत आहेत.
↧