औरंगाबाद जिल्ह्यासह बीड, लातूरच्या परिसरात सोमवारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी पहाटेपर्यंत कमी-अधिक स्वरूपात सुरूच होता. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील सहा महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून या अवकाळी पावसाने भाजीपाला आणि कापूस, ज्वारीसारख्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.
↧