बीड जिल्ह्यातून दरवर्षी लाखो मजूर ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. त्यांच्या बरोबर त्यांचे कुटुंब ही सहा महिन्यासाठी गाव सोडून जातात. या स्थलांतरामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शिक्षण खंडीत होऊ नये म्हणून या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी दरवर्षी जिल्ह्यात वसतिगृह चालवले जातात. यावर्षी वीस हजारहून अधिक ऊसतोड मजुरांची मुलांचे स्थलांतर रोखण्यात आले आहे.
↧