कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचा भीमा-निरा स्थिरीकरण प्रकल्पाशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे तो रद्द झाला तरी कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचे काम चालूच राहावे. आमच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केली.
↧