समतानगरमधील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे चालणे मुश्किल झाले असून, छोटेमोठे अपघात नित्याचे झाले आहेत. हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
↧