मोफत अंत्यसंस्कार योजना राबवण्यासाठी महानगर पालिकेने पुढाकार घेतला. वर्षभरात या योजनेवर ९० लाख रुपये खर्च केले. नागरिकांनीही या योजनेला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. पण, मदतीसाठी नागरिकांनी हात आखडता घेतला असून वर्षभरात ६४ हजार रुपयांचीच देणगी मिळाली, अशी माहिती या योजनेचे प्रणेते पालिकेचे उपमहापौर संजय जोशी यांनी गुरुवारी दिली.
↧