पाणी टंचाईच्या नावाखाली नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपयांची उधळण केली आहे. पुढील दोन महिन्यांसाठी (जून-जुलै) पावणे दोन कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देत तशी तरतूद करण्याचे आदेश पालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिले.
↧