जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागमार्फत मंगळवारी आंतर जिल्हा बदलीने आलेल्या १५९ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या. समपुदेश पद्धतीने दिलेल्या समायोजनानंतर दुसऱ्या दिवशी शिक्षक रूजू होण्यासाठी गेले तेव्हा अनेक महिला शिक्षकांना अडचणीच्या शाळेवर पदस्थापना मिळाल्याचे दिसून आले. उदाहरणार्थ जालना जिल्ह्यातून एका महिला शिक्षकाची बदली औरंगाबादेत झाली. त्यांना सोयगाव तालुक्यात पदस्थापना मिळाली. त्यांचे पती पैठण तालुक्यात कार्यरत आहेत. पती-पत्नी एकत्रिकरणाचा नियम औरंगाबाद जिल्हा वगळता अन्यत्र राबविला गेला, असे या शिक्षकांनी सांगितले. शिक्षक पती-पत्नीच्या पदस्थापनेतील अंतर १२५ किलोमीटरहून अधिक आहे. अशीच स्थिती नगर जिल्ह्यातून आलेल्या एका शिक्षकाची आहे. वर्षानुवर्षे जिल्ह्यात बदलीसाठी हे शिक्षक मंडळी वाट पाहून होते. गेल्या वर्षी बदली प्रक्रिया राबविली गेली नव्हती.
नियमानुसार प्रक्रिया
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार; पदस्थापना देण्यापूर्वी सभागृहात सर्व शिक्षकांना याची कल्पना दिली गेली होती. त्यानंतर स्क्रिनवर गावे दाखवूनच पदे भरली गेली. असे असताना नियम पाळला नाही, असे म्हणणे योग्य होणार नाही. एकूणच एकमेकांच्या त्रुटी दाखविण्यात विद्यार्थ्यांची मात्र फरफट होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट