Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भारनियमानाचा तपास; अधिकारी रस्त्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घोषित केल्यानुसार भारनियमन केले जात आहे की नाही, याची बुधवारी महावितरणचे सहव्यवस्‍थापकीय संचालक, मुख्य अभियंता व इतर अभियंत्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून तपासणी केली. सहव्यवस्‍थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांना गारज येथे भारनियमनात त्रुटी आढळली, त्यांनी त्याबद्दल तपासणीचे आदेश दिले आहेत.
कोळशाचा पुरवठा कमी झाल्याने वीज निर्मितीत घट झाल्याने राज्यात भारनियमन केले जात आहे. पण, राज्यात अनेक ठिकाणी वेळापत्रकानुसार भारनियमन केले जात नसल्याच्या तक्रारी व्यवस्‍थापकीय संचालक संजीव कुमार यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. याशिवाय भारनियमन लागू केल्यानंतरही अपेक्षित निकाल मिळत नसल्याने संजीव कुमार यांनी प्रादेशिक कार्यालयांच्या सहव्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंत्यांना भारनियमन काळात विविध ठिकाणी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले.
या आदेशानुसार, सहव्यवस्‍थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी देवगाव रंगारी आणि गारज येथे जाऊन तपासणी केली. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी जालना येथे तीन फिडरवरील भारनियम तपासले. अधीक्षक अभियंता शहर, ग्रामीण तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही विविध ठिकाणी जाऊन भारनियमन तपासून अहवाल मुख्यालयाला पाठविला आहे.

देवगाव रंगारी आणि गारज येथे भारनियमनाची तपासणी केली. धुळे जिल्ह्यातील काही गावांत गुरुवारी तपासणी करण्यात येणार आहे.
-ओम प्रकाश बकोरिया, सहव्यवस्‍थापकीय संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तक्रार नोंदवण्यासाठी तीन ठाण्यातून नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
एटीएम कार्डचा नंबर विचारून तालुक्यातील वांजरगाव येथील अलीम नुरुद्दीन शेख यांच्या स्टेट बँक ऑफ हैद्राबाद व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यातून एक लाख ३० हजार रुपये काढल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. पण, तक्रार देण्यासाठी शेख यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात भटकंती करावी लागत आहे.
वांजरगाव येथील रहिवासी अलीम नुरुद्दिन शेख हे शनिवारी काही कामानिमित्त श्रीरामपूर येथे गेले होते. त्यावेळी त्यांना फोन आला, बँकेतून बोलत असल्याची थाप मारून एटीएम कार्ड बंद होणार आहे, ते सुरू ठेवण्यासाठी त्यामागील नंबर विचारला. शेख यांनी त्याला नंबर सांगितला. ते मंगळवारी वैजापूर येथे पैसे काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ हैद्राबादमध्ये गेले असता खात्यात रक्कम नसल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या खात्यातून ७० हजार लंपास करण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यातूनही ६० हजार रुपये उडवले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानतंर त्यांनी वीरगाव पोलिस ठाणे गाठले. त्यांनी पासबुक अपडेट केले असता आठ हजार, नऊ हजार व ४९ हजार अशा रकमा काढल्याचे दिसून आले. त्यांनी पासबुकची झेरॉक्स व तक्रार वीरगाव पोलिसांना दिला. मात्र, श्रीरामपूर येथे कॉल आल्याने तेथे तक्रार दाखल करा असे सांगून तक्रार घेण्यास नकार देण्यात आला. शेख हे श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता वांजरगाव येथील रहिवासी व बँक खाते वैजापूर येथे असल्याने तेथेच तक्रार देण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर शेख यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण तेथेही पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला नाही व वीरगावला तक्रार द्या, असा सल्ला दिला.

वरिष्ठांकडे धाव

श्रीरामपूर, वीरगाव व वैजापूर येथे तक्रार घेतली नसल्याने अलीम शेख यांनी अखेर वैजापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गाठले. मात्र, तेथेही अधिकारी नसल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागले.

हा गुन्हा श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दाखल व्हावा लागेल. तेथे दाखल होणार नसेल, तर त्यांनी तसे तक्रारदाराला लेखी द्यावे किंवा तेथे झिरोने दाखल करून तक्रार इकडे पाठवून द्यावी.
-अनिरुद्ध नांदेडकर, पोलिस निरीक्षक, वैजापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तब्बल तीन आठवड्याच्या खंडानंतर बुधवारी सायंकळी औरंगाबाद शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या तासात तब्बल ५० मिलीमीटर पाऊस पडला. या पावसाने शहराच्या सखल भागात पाणी साचले. शहरातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले, तर काही ठिकाणी झाड उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

गेल्या आठवड्याभरपासून शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली. बुधवारी सकाळपासून वातावरणात उकाडा होता. दुपारी चारनंतर ढग जमा होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पावणसातच्या सुमारास वाजता दमदार पावसाला सुरुवात झाली. शहराच्या जवळपास सर्वच भागात या दमदार पावसाने हजेरी लावली. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली.

अनेक घरात शिरले पाणी
औरंगाबाद शहर व परिसरात सायंकाळी सुमारे एक तास झालेल्या पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडाली. नाल्याच्या काठी असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. घरात पाणी शिरल्यामुळे अग्नीशामक दलाच्या कार्यालयातील फोन मदतीसाठी खणखणत होते. एक तासात सुमारे ३०पेक्षा जास्त कॉल अग्निशामक दलाच्या कार्यालयात आले.

सायंकाळी सात ते आठदरम्यान शहरात धुवांधार पाऊस झाला. त्यामुळे काही मिनिटांतच अनेक घरांमध्ये पाणी शिरले. तळघरात पाणीच पाणी झाल्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिडको एन ४मधील अनेक घरे व व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरले. अजयदीप कॉम्प्लेक्सच्या समोरील घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जयभवानीनगरमधील नाल्याच्या काठी असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. नाल्याला मोठा पूर आला होता. त्यामुळे काही दुकानांमध्ये देखील पाणी शिरले. गारखेडा भागातील विविध वसाहतीमध्ये देखील पाणी शिरल्यामुळे हाहाकार उडाला. घरे, अपार्टमेंटचे पार्किंग आणि तळघरात पाणी शिरल्यामुळे अनेक ठिकाणचे व्यवहार बंद झाले होते. एमजीएम रुग्णालयापासून सिडको एन ५च्या जलकुंभाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यास बराच वेळ लागल्यामुळे वाहनचालक देखील त्रस्त झाले होते. पद्‍‍मपुरा व सिडको येथील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले होते.

आजही पावसाचा अंदाज
शहरासह मराठवाड्यात येणाऱ्या २४ तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, गुरुवारी शहरात ढगाळ वातावरणासोबतच मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही १४ व १५ सप्टेंबर रोजी विजांचा कडकडाट वादळी, वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यातही पावसाचा जोर
मंगळवारी, बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत औरंगाबाद जिल्हा, मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली. सकाळी साडेआठपर्यंत मराठवाड्यात १२.३४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील तळणी, बीड जिल्ह्यातील नागापूर, लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, भूम, मानकेश्वर व जवळा बुद्रुक येथे अतिवृष्टी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोडशेडिंगच्या वेळेव्यतिरिक्तही विद्युत पुरवठा खंडित

$
0
0

लोडशेडिंगच्या वेळेव्यतिरिक्तही विद्युत पुरवठा खंडित
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहरात लोडशेडिंगचा त्रास सुरू झाला आहे. यासंबंधी असलेले लोडशेडिंगचे वेळापत्रकही महावितरणने जाहीर केले आहे, परंतु रेल्वेस्टेशन उड्डाणपुलापलिकडील सर्वच भागात लोडशेडिंग व्यतिरिक्त वेळेतही विद्युतपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत असून महावितरणचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
ईटखेडा, मोदीनगर, सातारा परिसर, कांचनवाडी, नाथ व्हॅली परिसर, नक्षत्रवाडी, वाल्मी ‌परिसर, पैठण रोड, सादात कॉलनी, आरेफ कॉलनी, जालान नगर, दिशा संकुल, बिरदीचंद नगर, मनपा शाळा परिसर ईटेखडा, अभिनंदन सोसायटी यासह पैठण रोडवरील वसाहतींत सध्या त्रास होत आहे.
१२ तास वीजपुरवठा खंडित
रेल्वेस्टेशन उडडाणपुलच्या पलिकडे महानुभाव आश्रम चौकापासून ते पैठणरोडवरील वाल्मीपुढील भागापर्यंत सातत्याने विद्युतपुरवठा खंडित होत आहे. ईटखेडा ते महानुभाव आश्रम या परिसरात ३ ते ४ मोठ्या डीपी आहेत. याशिवाय गोलवाडी चौक ते वाल्मीपर्यंतही मोठ्या डीपी आहेत. या डीपींवरून या भागात विद्युतपुरवठा होतो. पावसामुळे, वादळामुळे या डीपींजवळील मोठ्या तारा तुटतात, झाडे पडतात, फांद्या पडतात. यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे. रविवार (१० सप्टेंबर)पासून हा खंडित पुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिक, व्यावसायिक, शाळा, कॉलेजेस, उद्योजक यांना याचा फटका बसला आहे.
दुर्लक्षाने ‌अधिक संताप
या भागातील अर्ध्या परिसरात छावणी सबस्टेशन आणि अर्ध्या परिसरात सातारा सबस्टेशन मधून विद्युतपुरवठा होत असतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास दोन्ही सबस्टेशनला फोन केले तर फोन उचलले जात नाहीत. कस्टमर केअर सेंटरवर यासंबंधी तक्रार केल्यानंतरही तक्रारींचे निराकरण होत नाही, त्या समस्या तशाच राहतात.
औरंगाबादेत लोडशेडिंग सुरू झाले आहे. या भागांमध्ये आठ ‌तासांव्यतिरिक्त ब्रेकडाऊन झाले असेल तर दुसऱ्या दिवशीच्या भारनियमनाचा वेळ कमी करण्यात येईल. तशा सूचनाही आम्ही छावणी सबस्टेशनला देऊ. छावणीतील सबस्टेशनला नागरिक फोन करतात, तेव्हा फोन रिसिव्ह होत नाही अशा तक्रारी आहेत, यापुढे असे होणार नाही. नागरिकांच्या तक्रारी नोंदवल्या जातील.
- दिनेश अग्रवाल, अधिक्षक अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाला मिळाली पाच लाखाची बॅग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देवगिरी एक्स्प्रेसने ठाणे येथून औरंगाबादला आलेल्या एका प्रवाशाची बॅग रेल्वेतच विसरली. काही वेळानंतर त्याला हे लक्षात आले. ही बॅग रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला परत मिळवून दिली. या बॅगेत पाच लाख रुपयाची बॅटरी असल्याचे प्रवाशांने सांगितले.
भारत अंबाती हे देवगिरी एक्स्प्रेसच्या एस ६ कोचमधून प्रवास करून मंगळवारी पहाटे सव्वा चार वाजता औरंगाबाद स्टेशनवर उतलले. त्यांनी सामान घेतले पण, ते वाहनात ठेवताना एक बॅग नसल्याचे लक्षात आले. तोपर्यंत देवगिरी एक्सप्रेस जालन्याकडे रवाना झाली होती. त्यामुळे अंबाती यांनी त्वरित सीसीटीव्ही कक्षातील सुरक्षा दल कर्मचारी सचिन नलावडे यांना रेल्वेत बॅग राहिल्याची माहिती दिली. नलावडे यांनी सुरक्षा दलाच्या कंट्रोल रुमला ही माहिती कळवली. देवगिरी एक्स्प्रेसमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांना बॅगची माहिती देण्यात आली. रेल्वेतील सुरक्षा दलाने एस सहाच्या २७ क्रमांकाच्या सिटवर बॅग असल्याचे सांगितले. ही बॅग सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जालना येथील आरपीएफ कर्मचारी बी. आर. मुंडे यांच्याकडे दिली. जालना येथून ही बॅग आरपीएफ कर्मचाऱ्यांनी औरंगाबादला पाठविली. रेल्वे सुरक्षा निरीक्षक शर्मा यांच्या उपस्थितीत ती भारत अंबाती यांना देण्यात आली. या बॅगेत परदेशातून आयात केलेली पाच लाख रुपये किंमतीची बॅटरी होती. आरपीएफ कार्यालयाचे मुख्यालय औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या फलाटापासून दूर आहे. प्रवाशांना तेथे जाण्यास वेळ लागतो. त्यामुळे हे कार्यालय फलाटावरच असावे, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुंबकीय क्षेत्राचे ‘कॅलिब्रेशन’ शक्य

$
0
0

चुंबकीय क्षेत्राचे ‘कॅलिब्रेशन’ शक्य

‘एनएबीएल’ लॅबमध्ये संशोधनाअंती पहिल्यांदाच सुविधा; गुणात्मक उत्पादनासाठी होणार उपयोग

औरंगाबाद - आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील उद्योगांमध्ये चुंबकाचा फार मोठा वापर होतो आणि वेगवेगळ्या उत्तमोत्तम प्रोडक्टसच्या निर्मितीसाठी चुंबकाचा विविधांगी वापर हा दिवसेंदिवस वाढतच आहे. या निर्मितीच्या साखळीमध्ये वापरण्यात येणाऱ्या चुंबकाचे ‘चुंबकीय क्षेत्र’ अपेक्षेच्या प्रमाणात नसेल तर त्याचा प्रतिकुल परिणाम उत्पादनावर व त्याच्या दर्जावर होतो. मात्र, संबंधित ‘चुंबकीय क्षेत्र’ हे अपेक्षेच्या प्रमाणात आहे किंवा नाही हे मोजण्याची सोय संशोधनाअंती उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे अशी सुविधा देशभरात जवळपासच कुठेही नाही, ती ती प्रथमच उपलब्ध होत आहे आपल्या शहरात.

आजमितीस चुंबकाच्या वापर हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अनिवार्य ठरला आहे. ‘एमआरआय’सारख्या विविध वैद्यकीय उपकरणांमध्येही चुंबकाचा वापर महत्वाचा ठरत आहे. चुंबकीय उपचार ही पुन्हा वेगळी उपचारपद्धती ठरू पाहात आहे. त्यामुळे गरजेनुसार चुंबकांची निर्मिती वाढली आहे. अर्थातच, चुंबकाची व चुंबकीय क्षेत्राची क्षमता कालांतराने कमी होऊ शकते व तशी क्षमता कमी झाल्यानंतर त्याची उपयोगीता कमी होऊन त्याआधारे निर्मिती केल्या जाणाऱ्या उत्पादनावरही त्याचा प्रतिकुल परिणाम होऊ शकतो. विशेषतः दर्जात्मक-गुणात्मक प्रतिकुल परिणाम उत्पादनावर होतो व जागतिक स्पर्धेच्या युगात असा प्रतिकुल परिणाम कोणालाही परवडणारा नाही. मात्र त्यावर मात करण्यासाठी चुंबकाची, चुंबकीय क्षेत्राची क्षमता मोजण्याची (ज्याला कॅलिब्रेशन म्हटले जाते) कुठलीही सोय यापूर्वी नव्हती. अर्थात, केवळ चुंबकाची क्षमता मोजण्याची सुविधा दिल्लीच्या ‘एनसीएल’ प्रयोगशाळेमध्ये आहे. मात्र, चुंबकीय क्षेत्राची म्हणजेच ‘मॅग्नेटिक फिल्ड’ मोजण्याची क्षमता देशात जवळजवळ कुठेच नव्हती. ही मोठी अडचण मूळचे औरंगाबादचे संशोधक इंजिनिअर व ‘एसीई टेक्नो सर्व्हिसेस’चे संचालक सुशील संवत्सर यांनी आपल्या अभ्यासातून दूर केली आहे. सलग काही वर्षांच्या अभ्यास-प्रयोगानंतर चुंबकासह चुंबकीय क्षेत्राचेही कॅलिब्रेशन संवत्सर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. विशेष म्हणजे सुशील संवत्सर यांना त्यांचे संशोधक चिरंजीव व ‘एसीई’चे सीईओ मंदार संवत्सर यांनीही मोलाचा हातभार लावला आहे.

२० पेक्षा जास्त उद्योगांना लाभ

चुंबकासंबंधी सर्व प्रकारच्या क्षमता मोजण्याचे काम संवत्सर यांच्या सिडकोतील ‘एनएबीएल’ प्रयोगशाळेमध्ये होत आहे. आतापर्यंत फूड इंडस्ट्रितील किमान १२ उद्योगांना संवत्सर यांनी ‘कॅलिब्रेशन’च्या सुविधा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सात ते आठ प्लास्टिक उद्योगांनाही अशी सेवा देण्यात आली आहे. आता कॅलिब्रेशन करून घेण्यासाठी त्यांच्याकडे देशभरातून काम येत आहे. संबंधित उपकरणांचे कॅलिब्रेशन करून तंतोतंत स्थिती उद्योजकांपर्यंत पोहोचवणे, सूचना करणे व सुधारणा सुचविण्याचे काम संवत्सर यांच्याकडून होते. त्यामुळेच उत्पादनाच्या दर्जा-गुणवत्ता वाढीसाठी उद्योजकांना तातडीने पावले उचलणे शक्त होते.

‘मॅग्नेटिक जनरेटर’ देशात प्रथमच

ज्या आधारे चुंबक व चुंबकीय क्षेत्राचे कॅलिब्रेशन केले जाते, त्या ‘स्टँडर्ड मॅग्नेटिक फिल्ड जनरेटर’ची निर्मिती संवत्सर यांनी देशात पहिल्यांदाच केली आहे. निसर्ग तत्वांवर चालणारे ‘जनरेटर’ ही संवत्सर यांची अनेक वर्षांची तपश्चर्याच आहे. मुळात संवत्सर यांची लॅब ही वेगवेगळ्या उपकरणांच्या ‘कॅलिब्रेशन‘ व ‘इव्हॅल्युएशन’ला वाहिलेली आहे आणि संशोधक पिता-पुत्राने आपल्या कठोर अभ्यासातून ही निराळी लॅब समर्थपणे उभी केली आहे. सुशील संवत्सर यांना ‘मल्टी फेसेटेड ऑईल बाथ फॉर मेटेरॉलॉजी’साठी पेटंटही मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या वेळापत्रकाचे नियोजन तुम्हीच करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लोडशेडिंगमुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठ्याची वेळ बदलावी. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, असे पत्र महावितरणने महापालिकेला दिले आहे.

शहरात लोडशेडिंगमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. आधीच चार ते पाच दिवसानंतर शहरवासीयांना पाणी मिळत आहे. यामुळे लोडशेडिंगची वेळ बदलावी, अशी मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी केली होती. याशिवाय ‌खासदार चंद्रकांत खैरे यांनी महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीतही पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आठवड्यातून एकदा नळाला पाण्याचे पाणी येत आहे. वीज नसल्यामुळे अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही. यामुळे नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. याबाबत महावितरण कार्यालयाने लोडशेडिंगचे फेरनियोजन करावे, अशीही सूचनाही खासदारांनी केली होती.

याबाबत मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी महावितरण आणि महापालिकेची बैठक घेऊन पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते, मात्र मंगळवारी ही बैठक घेण्यात आली नाही. बुधवारी महावितरणने महापालिकेला पत्र पाठविले आहे.

सध्या विजेचा तुटवडा असल्यामुळे महावितरणला शहरात लोडशेडिंग करावी लागत आहे. लोडशेडिंग केल्यामुळे पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. नागरिकांना पाण्याचा योग्य पुरवठा करण्यासाठी महापालिकेने त्यांच्या पाण्याच्या वेळेत बदल करावा, असे पत्र महाविरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी महापालिकेला दिल्याची माहिती महावितरणाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.

काही पंप भारनियमनमुक्त
ज्युबली पार्क, क्रांतीचौक, जिन्सी, एन सात पंप हाउस येथे लोडशेडिंग नाही, तर एन ५च्या पंप हाउसच्या दोन पंपामधून एक पंप भारनियमनामुळे बंद असतो. याशिवाय दिल्ली गेट, शिवाजीनगर, पुंडलिकनगर आणि जयविश्वभारती कॉलनीतील टाकी येथे लोडशेडिंग करण्या येत असल्याने तेथील नागरिकांना बसत आहे.

पावसामुळे वीज गायब
औरंगाबाद शहरात संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. काही रोशन गेटसह सिटीचौक, दिल्ली गेटसह अन्य भागांत दोन ते तीन तास अतिरिक्त भारनियमन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉँसेंट्रिक्स बंद होणार ?, कर्मचारी धास्तावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चिकलठाणा औद्योगिक परिसरात असलेल्या कॉँसेंट्रिक्स कंपनीमधील संतप्त कर्मचाऱ्यांनी बुधवारी कंपनी व्यवस्थापनेविरोधात जोरदार आंदोलन केले. त्यांनी निदर्शने करत सुमारे आठ तास ठिय्या आंदोलन केले. कंपनी बंद होणार असल्याचे तोंडी सांगितले जात असून इतर राज्यात बदली करू किंवा राजीनामा द्या, असे सांगून त्रास दिला जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
चिकलठाणा एमआयडीसीमध्ये मार्च २००९ मध्ये सुरू झालेल्या कॉँसेंट्रिक्स कंपनीमध्ये (कॉल सेंटर) एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. पूर्व सूचना न देता कॉल सेंटर बंद करण्यात येणार असल्याचे तोंडी सांगितले जात आहे, काही कर्मचाऱ्यांना ३० टक्‍के पगारवाढ देऊन गुडगाव, चंदीगढसह इतर राज्यात बदली केली जाईल, असे सांगितले जात असल्याचे कामगारांनी सांगितले.
कंपनी बंद होणार असल्याची लेखी माहिती दिली जात नसल्याने कामगारांत संभ्रम आहे. नोकरी जाणार असल्याने ते धास्तावले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी, कामगार उपायुक्त यांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले. पण, प्रश्न न सुटल्याने बुधवारी सकाळी साडे सहापासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. कंपनी गेटसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. शेकडो कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. विविध माध्यमातून मानसिक त्रास दिला जात असून रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले. सुमारे आठ तासाहून अधिक वेळ ठिय्या आंदोलन केल्यानंतरही व्यवस्थापनाकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही, अशी माहिती आंदोलकांनी दिली.

कामगारांच्या मागण्या
- कंपनी बंद होणार किंवा नाही, लेखी द्यावे
- राजीनामा व इतर राज्यात बदलीसाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकू नये
- पीएफ संदर्भातील दोष, चुका दुरुस्त करा

कंपनी बंद होणार किंवा नाही याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. तोंडी सांगण्यात आल्यामुळे कर्मचारी धास्तावले आहे. मानसिक त्रास होत आहे. नाईलाजाने आंदोलन करावे लागत आहे. न्याय मिळाला पाहिजे. पीएफ मधील दोष, चुका तातडीने दूर करण्यात याव्यात.
- संजय त्रिभुवन, आंदोलक

या कंपनीत गेल्या दोन वर्षापासून काम करते. कंपनी व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारची लेखी माहिती दिली नाही. त्यामुळे कर्मचारी अधिकच संभ्रमात आहे. शेवटी प्रश्न रोजीरोटीचा आहे. सर्वजण धास्तावले आहेत.
- योगिता शहाणे, आंदोलक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ शनिवार-रविवार नृत्याविष्काराची पर्वणी

$
0
0

शनिवार-रविवार नृत्याविष्काराची पर्वणी

अक्षता कुलकर्णी दहाव्या स्मृतिदिनानिमित्त नृत्यमहोत्सव व स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंध्रनाट्यममध्ये पारंगत अक्षता प्रकाश कुलकर्णी हिच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रम होत आहेत. शनिवार (१६ सप्टेंबर) आणि रविवारी (१७ सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सन्मित्र कॉलनी येथे ही नृत्याविष्यकाराची पर्वणी पाहायला मिळेल, अशी माहिती कै.सौ. तेजस्विनी मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पी.एस.कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

शनिवारी संध्याकाळी ४ वाजता भारतीय शास्त्रीय नृत्य स्पर्धा होईल. यात ४० जणांनी सहभाग घेतला आहे. रविवारी १७ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नामांकित कलाकारांचे नृत्याविष्कार होतील. झेलम परांजपे (मुंबई), डॉ. स्वाती दैठणकर (पुणे), कला कृ्ष्ण, (हैदराबाद), व्ही.सौम्याश्री (औरंगाबाद), निकिता बानावलीकर (वडोदरा) आदी कलाकार नृत्य सादर करतील. हा संपूर्ण कार्यक्रम कै.सौ. तेजस्विनी मेमोरियल ट्रस्ट आणि जे.जे. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस (औरंगाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे दहावे वर्ष आहे. या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस ट्रस्टचे एम. डी.जहागीरदार, विजय न्यायाधीश, डॉ. जयंत शेवतेकर, स्वाती जोशी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालगृहातून अपहरण; चौघांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील अल्पवयीन व वडील वारलेल्या मुलीचे बालगृहातून अपहरण करणाऱ्या चौघांना सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी चार हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी ठोठावली.
या प्रकरणी १४ वर्षीय मुलीने फिर्याद दिली होती. त्यानुसार, ४ जुलै २०१२ रोजी पहाटे तीन वाजता या मुलीला बालगृहात राहणाऱ्या मैत्रिणीने शौचाला सोबत नेले. तिच्यासोबत गेली असता तिथे तीन मुले दिसली, त्यावेळी मुलगी तिथून निघण्याच्या तयारीत असताना एका मुलाने तिचे तोंड दाबले, तर इतरांनी जबरदस्ती बाहेर काढले व कारमधून पळवून नेले. कारमध्ये काही जण बसलेले होते. त्यांनी मुलीचे तोंड दाबून एका घरामध्ये नेले व धमक्या देत आळीपाळीने बलात्कार केला होता. या प्रकरणी नंदू पंढरीनाथ शिरसाठ (वय १९, रा. उत्तमनगर, जवाहरनगर, औरंगाबाद), किशोर आनंदराव जाधव (वय १९, रा. अजिंक्यनगर, गारखेडा, औरंगाबाद), जयश्री श्रीनिवास शर्मा (वय ५०, रा. अजिंक्यनगर), किरण वामन चाबुकस्वार (वय २०, रा. हनुमाननगर, औरंगाबाद) व प्रवीण साहेबराव राठोड (वय २०, रा. अजिंक्यनगर) यांच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक डी. एन. मुंडे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सहाय्यक सरकारी वकील अजित अंकुश यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले व अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा आरोपींविरुद्ध सिद्ध झाला. नंदू शिरशाठ, किशोर जाधव, जयश्री शर्मा व किरण चाबुकस्वार यांना कलम ३६३ अंतर्गत सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, तर कलम ३६६ (अ) अंतर्गत सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्याचवेळी सबळ पुराव्याअभावी आरोपी प्रवीण राठोड यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मुलगी फितूर

कोर्टातील सुनावणीदरम्यान, फिर्यादी मुलगी तिच्या जबाबावरुन फितूर झाली. त्यामुळे आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. मात्र अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचे सिद्ध झाले व त्याआधारे शिक्षा ठोठावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसी हॉटेलात बसून फायलींवर सह्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयुक्तांसह अधिकारी हॉटेलमध्ये जाऊन, एसी रूममध्ये बसून फाइलींवर स्वाक्षरी करतात, असा गंभीर आरोप बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केला. त्याच्या पुराव्यासाठी सीडी देण्याची तयारी देखील दाखवण्यात आली. सभापतींनी हस्तक्षेप करून हे प्रकरण थांबवले.

सातारा, देवळाई भागातील कर्मचाऱ्यांचा विषय स्थायी समितीच्या सभागृहात सुरू होता. या कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले, असा आरोप नगरसेवकांचा होता. यासंदर्भात शिवसेनेचे रेणुकादास वैद्य म्हणाले, या कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार कार्यवाही झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने कार्यवाही झाली, तर त्याचा फटका महापालिकेला बसणार आहे. लेखा परीक्षणात हा मुद्दा निघेल. महापालिकेच्या व शहराच्या बदनामीला आपणच कारणीभूत ठरत आहोत. कोणता तरी नगरसेवक हॉटेलमधील एसी रूममध्ये आयुक्त, अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फाइलींवर स्वाक्षरी करायला लावतात. आयुक्त, अधिकारी देखील तेथे जाऊन स्वाक्षऱ्या करतात. अशी वाईट प्रथा महापालिकेत सुरू झाली आहे.

चर्चेच्या ओघात एमआयएमच्या नगरसेविका संगीता वाघुळे यांनी वैद्य यांनी मांडलेला मुद्दा उपस्थित केला. कोणत्या नगरसेवकांसाठी कोणते अधिकारी हॉटेलमध्ये जाऊन फाइलींवर स्वाक्षरी करतात याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. असे असेल तर सर्वसामान्य नगरसेवकांची कामेच होणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. या सर्व प्रकरणांचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. वैद्य यांनी यासंदर्भात बोलताना, या प्रकाराची सीडी देण्याची तयारी दर्शवली. तुम्हाला मी पुराव्यासाठी सीडी देतो, त्यानंतर तुम्ही काय ते ठरवा, असे ते म्हणाले. त्यामुळे संपूर्ण सभागृह अवाक् झाले. शेवटी सभापती गजानन बारवाल यांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण थांबवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कर्मचारी रजेवर, काम वाऱ्यावर

$
0
0

कर्मचारी रजेवर, काम वाऱ्यावर

सिडको पोस्ट कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांना त्रास

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लाखोंच्या वसाहतीसाठी असलेल्या सिडको पोस्ट कार्यालयात दैनंदिन कामकाजाचा प्रशासकीय भार सहा कर्मचाऱ्यांवर आहे. त्यापैकी दोन कर्मचारी नसल्याने त्यांच्याकडे असलेली कामे अक्षरशः वाऱ्यावर आहेत. स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर सारख्या महत्त्वाच्या सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना फटका बसत आहे.

केंद्र सरकारने टपाल खात्याला बळकटी देण्यासाठी गेल्या दोन वर्षांत अनेक योजना टपाल खात्याशी जोडल्या. अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. सोशल मीडियाचा प्रभाव असूनही टपाल खात्यात आजही विविध योजनांसाठी चांगली गर्दी होते. विद्यार्थ्यांना नोकरी तसेच अन्य महत्वाच्या कामासाठीचे टपाल स्पीड पोस्टने पाठविणे अधिक सुरक्षित असते. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अनेक योजना पोस्टात सुरू आहेत. सिडको पोस्ट कार्यालयात बुधवारी सेवा पुरविणाऱ्या डेस्क असणाऱ्या सहापैकी दोन जण उपस्थित नव्हते. एक जण रजेवर असून एक कर्मचारी ट्रेनिंगसाठी गेले आहेत. ठेवी, भरणा तसेच अन्य सुविधांच्या दोन्ही खिडक्यांमध्ये कर्मचारी होते, पण मनी ऑर्डर, स्पीड पोस्ट व अन्य काही सेवांच्या खिडक्या बंद होत्या. एक कर्मचारी प्रशासकीय कामकाजाच व्यस्त होते. मनी ऑर्डर, स्पीड पोस्टसाठी आलेले अनेक जण कर्मचारी नसल्याचे पाहून परतले. ज्येष्ठ नागरिकांना माहिती देण्यासाठीही कुणी नव्हते. असुविधेबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, यासंदर्भात प्रवर अधीक्षक ए.एच. शेख यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक मॅनेजरची आत्महत्या; तिघांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्ज मंजूर करण्यासाठी ‘एसबीआय’च्या व्यवस्थापकाचा छळ करून त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या तिघांना सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी बुधवारी ठोठावली. खटल्यावेळी, पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात आलेली ‘सुसाईड नोट’, व्यवस्थापकावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची कागदपत्रे व हस्ताक्षरतज्ज्ञाचा अहवाल शिक्षा ठोठावताना महत्त्वाचा ठरला.
या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रताप बन्सी कोलते यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, आरोपी अनिता दगडुजी गायकवाड (वय ४२, रा. यशोधरा कॉलनी, सिडको, औरंगाबाद), किशोर बाबुराव म्हस्के (वय ४७, रा. पंचकुआँ, किलेअर्क, औरंगाबाद) व सुनील मच्छिंद्र टोणगिरे (वय ४४, रा. कोमटी गल्ली, पदमपुरा, औरंगाबाद) यांनी कापड दुकानासाठी दोन लाखांचे कर्ज मिळावे म्हणून महात्मा फुले विकास महामंडळामध्ये प्रस्ताव दाखल केला होता. ते कर्ज मंजूर करावे म्हणून आरोपी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जाधववाडी शाखेचे व्यवस्थापक किशोर आनंद यांच्यावर दबाव टाकत होते. त्यामुळे २२ मार्च २०१० रोजी किशोर आनंद यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. घटनास्थळी ‘सुसाईड नोट’ मिळाली होती. यामध्ये ‘आरोपींनी मला खूप त्रास दिला व ते जिवे मारू शकतील म्हणून आत्महत्या करीत आहे’ असे म्हटले होते. सहाय्यक सरकारी वकील उदय प्रल्हादराव पांडे यांनी १३ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तसेच पुरावा म्हणून मृत किशोर आनंद यांच्याविरुद्ध आरोपींनी दाखल केलेल्या चार खोट्या गुन्ह्यांची कागदपत्रे कोर्टात सादर केली. ते गुन्हे खोटे असल्याचे कोर्टात सिद्ध करण्यात आले. कर्ज मिळण्यासाठी पात्र नसतानाही आरोपी मृत व्यवस्थापकावर दबाव टाकून छळ करीत असल्याचे कोर्टात सिद्ध करण्यात आले. या संदर्भात पुरावा म्हणून मृताने विष प्राशन केलेली बाटली, सुसाईड नोट, हस्ताक्षरतज्ज्ञ संतोष कान्हेरे यांचा अहवाल, बँक कर्मचाऱ्यांचे जबाब महत्त्वाचे ठरले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादावरून व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवून कलम ३०६ अन्वये सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास ठोठावला. या प्रकरणात पांडे यांना आकाश सोनकांबळे यांनी सहकार्य केले.

‘त्या’ प्रश्नांवर आरोपी निरुत्तर

सुनावणीवेळी, कर्ज प्रकरण दाखल केले नव्हते व बँकेत खाते नव्हते आणि बँकेशी काहीही संबंध नव्हता, असा युक्तिवाद आरोपीतर्फे कोर्टात करण्यात आला. मात्र मृताविरुद्ध आरोपींनी दाखल केलेले चार खोटे गुन्हे व वारंवार बँकेत जाण्याचे नेमके कारण आरोपी कोर्टात देऊ शकले नाहीत. याचीही नोंद कोर्टाने शिक्षा सुनावताना घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पन्नास हजार रुपये केले परत

$
0
0

पन्नास हजार रुपये केले परत

बस चालक नामदेव गायकवाड यांचा प्रामाणिकपणा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद-बीड मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये चालकाला ५० हजार रुपये मंगळवारी आढळले. मनोहर गायकवाड या चालकाने आपल्या प्रामाणिकपणाची साक्ष देत हे पैसे बसस्थानकात आगारप्रमुखांकडे जमा केले.

औरंगाबादहून सकाळी ९ वाजता बीडकडे एमएच २० बीएल ३२११ ही सेमी एशीयाड बस घेऊन चालक मनोहर नामदेव गायकवाड निघाले. दुपारी १२.३० च्या सुमारास बीड बसस्थानकावर गाडी पोहचली. सर्व प्रवासी उतरल्यानंतर चालक मनोहर गायकवाड यांनी नेहमीप्रमाणे गाडीत तपासणी केली. यावेळी एका कोपऱ्यात कागदामध्ये काहीतरी गुंडाळलेले असे दिसले. त्यांनी ते उचलले तर त्यामध्ये पैसे होते. सर्व प्रवासी निघून गेलेले असल्याने हे पैसे कोणाचे आहेत हे कळेना. त्यांनी तात्काळ या पैशाबाबत बसस्थानकातील उपस्थितांना अधिकाऱ्यांना माहिती दिली. पैसे काढून मोजले असता ते ५० हजार रुपये असल्याचे लक्षात आले. गायकवाड यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत तेथील अधिकाऱ्यांनी ही रक्कम औरंगाबाद सिडको बसस्थानकाकडे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर ही गाडी दुपारी साडेतीनच्या सुमारास सिडको बसस्थानकावर आली. त्यांनी सर्व घटना आगारप्रमुखांना सांगितली आणि रक्कम परत केली.

एकीकडे पैसा हा सर्वस्व मानला जात असताना सहजपणे मिळालेले ५० हजार रुपये नामदेव गायकवाड यांनी परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सहकारी, आगारप्रमुख, अधिकाऱ्यांनी कौतुक केले. उपस्थितांनीही त्यांना कौतुकाची थाप देत त्यांचा प्रामाणिकपणाला दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शरद’च्या निवडणुकीत ४० जणांत लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
तालुक्यातील शरद सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी २० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. कारखान्याच्या २० संचालकाच्या निवडणुकीसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. संत एकनाथ साखर कारखाना निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत आमदार संदीपान भुमरेच्या पॅनेल विरोधात सर्वपक्षीय पॅनेलचे आव्हान राहणार आहे.
शरद सहकारी साखर कारखाना स्थापन झाल्यापासून या कारखान्यावर माजी आमदार चंद्रकांत घोडके यांचेच वर्चस्व आहे. मात्र, यावेळी आमदार संदीपान भुमरे यानी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा देवून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संत एकनाथ साखर कारखाना निवडणुकीप्रमाणे आमदार भुमरे यांचे तालुक्यातील सर्व विरोधक या निवडणुकीत एकत्र आल्याने शरद साखर कारखान्याच्या निवडणूकीत चुरस निर्माण झाली आहे.
कारखान्याची निवडणूक २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

भुमरे पॅनलचे उमेदवार

नवगांव गट- डॉ. सुरेश चौधरी, सुरेश दुबाले, विष्णू नवथर, टाकळी अंबड गट- रावसाहेब घावट, दत्तात्रेय वाकडे, संपत गांधले. विहामांडवा गट- लहू डुकरे, महावीर काला, ज्ञानोबा बोडखे, चौढाळा गट- माणिकराव थोरे, सुभाष गोजरे, नंदू पठाडे, कडेठाण गट- संदीपान भुमरे, सुभाष चावरे, भरत तवार, महिला राखीव- सुमनबाई जाधव, द्वारकाबाई भाऊसाहेब, अनुसुचित जाती- कल्याण धायकर,
इतर मागासवर्गीय- सोमनाथ परदेशी, विमक्त जाती भटक्या जमाती- मेहबूब शेख.

सर्वपक्षीय पॅनेलचे उमेदवार

नवगांव गट- लाला सोनावणे, विष्णू साबळे, गुलदाद पठाण, टाकळी अंबड गट- दिलीप लांडगे, श्रीकृष्ण तांबे, शिवदास नरके, विहामांडवा गट- चंद्रकांत घोडके, मुकेश भताणे, भगवान पन्हाळकर, चौढाळा गट- डॉ. रमेश बडे, नारायण पठाडे, राजेन्द्र भांड, कडेठाण गट- उदयसिंग तवार, विठ्ठल गोरे, बाबुराव तवार, महिला राखीव- कौशल्या नांदरे, वर्षा थोटे, अनुसूचित जाती- छबू गंगावणे, इतर मागासवर्गीय- दामोदर वैद्य, विमक्त जाती भटक्या जमाती- अनिल घोडके.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ‘भूमिगत’चा भार सिद्दिकींच्या खांद्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेच्या कामाची जबाबदारी नुकत्याच रुजू झालेल्या डॉ. डी.पी.कुलकर्णी यांच्या खांद्यावर टाकण्याचा प्रयत्न बुधवारी स्थायी समितीने हाणून पाडला. या योजनेचे काम आतापर्यंत अफसर सिद्दिकी यांनी केले. काम पूर्ण होईपर्यंत ते त्यांनीच पहावे. योजनेच्या यशापयशाची जबाबदारी त्यांच्यावरच असेल, असे सभापती गजानन बारवाल यांनी बजावले.

भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून झालेल्या निकृष्ट कामांचा पंचनामा भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे गेल्या काही महिन्यांपासून करीत आहेत. आजच्या बैठकीतही त्यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले, या योजनेच्या संदर्भात आतापर्यंत आम्ही अनेक त्रुटी मांडल्या, पण प्रशासन कोणतीच ठोस कृती करण्यास तयार नाही. आम्ही काढलेल्या त्रुटी मान्य आहेत की नाही याचा खुलासा आयुक्तांनी करावा. योग्य प्रकारे काम झाले, भ्रष्टाचार झाला नाही, असे लिहून द्या असे ते म्हणाले. सभापतींनी याबद्दल खुलासा करण्यास सांगितले. खुलासा कोण करणार असा मुद्दा निर्माण झाला. निलंबन रद्द झाल्यामुळे पालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या डॉ. डी. पी. कुलकर्णी यांच्याकडे ड्रेनेज विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचा कार्यभार देण्यात आला आहे. कुलकर्णी खुलासा करतील असे निर्देश यावेळी करण्यात आले. त्याला रेणुकादास वैद्य यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, भूमिगत गटार योजनेचे काम आतापर्यंत अफसर सिद्दिकी यांनी केले आहे. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी सिद्दिकी यांच्यावर आहे. योजनेचे जे काही जे काही बरे वाईट होणार आहे त्याची जबाबदारी अफसर सिद्दिकी यांच्यावरच असेल, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही.

अहवाल दिला नाही
या संदर्भात सभापतींनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना प्रशासनाची भूमिका स्पष्ट करण्याचे सांगितले. ते म्हणाले, ज्यांनी आतापर्यंत काम पाहिले त्यांनीच योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत काम पाहणे संयुक्तिक असेल. त्यामुळे नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना अफसर सिद्दिकी यांनीच उत्तरे द्यावीत. अफसर सिद्दिकी यांच्याकडून अनुपालन अहवाल मागवला आहे, पण त्यांनी तो दिला नाही असा उल्लेख ही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे स्टेशन समोरील पेट्रोल पंप प्रकरणात काहीच कारवाई होत नसल्याबद्दल प्रशासनाचा निषेध करून शिवसेनेचे नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी स्थायी समितीतून बुधवारी सभात्याग केला. स्थायी समितीने आदेश दिल्यावरही अधिकारी काम करणार नसतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा सभापती गजानन बारवाल यांनी दिला.

स्थायी समितीच्या बैठकीत सिद्धांत शिरसाट सातत्याने रेल्वे स्टेशनसमोरील पेट्रोलपंपाचा मुद्दा मांडत आहेत. या पंपाची जागा महापालिकेने संपादीत केली आहे. मोबदला देखील दिला आहे. त्यामुळे पेट्रोल पंप हटवून जागा ताब्यात घ्या, अशी त्यांची मागणी आहे. पेट्रोल पंप मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, असे त्यांनी स्पष्ट केले होते. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या ‘स्थायी’च्या बैठकीत शिरसाट यांनी हाच मुद्दा मांडला. तेव्हा तीन दिवसांत कारवाई करण्यात येईल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यानुसार सभापतींनी देखील आदेश दिले. तीन दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. या संदर्भात ‘मटा’ ने बुधवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताचा संदर्भ देत शिरसाट यांनी स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा पेट्रोल पंपाचा मुद्दा मांडला. सभापतींनी दिलेले आदेश पाळले जात नाहीत, ही दुर्देवी बाब आहे असे ते म्हणाले. सभापतींनी उपायुक्त रवींद्र निकम यांना खुलासा करण्यास सांगितले. निकम यांनी वेगळाच खुलासा केला. त्यामुळे नगरसेवक संतापले.

कोर्टात जाणार
अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख एम. बी. काजी व विधीसल्लागार अपर्णा थेटे यांनाही सभापतींनी खुलासा करण्यास सांगितले. खुलासा करताना या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे सभापतींनी त्या पेट्रोलपंपावर त्वरित कारवाई करा, असे आदेश दिले. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला. सिद्धांत शिरसाट यांनी याच संदर्भात उद्या आपण कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे सांगत सभात्याग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ टँकर ऑडिटप्रकरणी आठ दिवसांत कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टँकर ऑडिट प्रकरणात आठ दिवसात स्थायी समितीची विशेष बैठक घेवून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही सभापती गजानन बारवाल यांनी दिली. पाणी पुरवठा विभागातर्फे विशेषाधिकारात करण्यात आलेल्या एकूणच खर्चाची चौकशी करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

‘कंत्राटदारासाठी अटी बदलल्या, विशेषाधिकारात टँकर केले मंजूर’ या मथळ्याखाली ‘मटा’ ने बुधवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. पाणी पुरवठा विभागातर्फे विशेषाधिकारात टँकर्सला व कंत्राटदाराला मंजुरी देण्यात आली. या प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्यावर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने चौकशी करून एक महिन्यापूर्वी आपला अहवाल आयुक्त व स्थायी समितीच्या सभापतींना सादर केला. हा अहवाल ‘मटा’ला मिळाला. त्याच्या आधारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. चौकशी अहवालावरील कारवाईच्या संदर्भात ‘मटा’ प्रतिनिधीने स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘टँकर ऑडिटच्या चौकशी अहवालावर मागच्या आठवड्यातच स्थायी समितीची बैठक घ्यायची होती, पण ते शक्य झाले नाही. येत्या आठ दिवसात बैठक घेवून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल. टँकरच्या कंत्राटामध्ये अनियमितता आहे हे चौकशी अहवालाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. विशेषाधिकारात झालेल्या सर्व कामांची तपासणी करायची आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला न्याय देण्याचीच आपली भूमिका आहे,’ असे बारवाल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मालमत्ता कर भरणाऱ्यांना दंड कशासाठी ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नियमित मालमत्ता कर भरणाऱ्यांना व्याजाचा दंड कशासाठी, असा सवाल स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला केला. स्थायीच्या बैठकीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली.

नियमित मालमत्ता कर भरणाऱ्यांना दोन टक्के व्याज लावून दंडाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याबद्दल सध्या उद्रेक होत आहे. हाच मुद्दा पकडून शिवसेनेचे रेणुकादास (राजू) वैद्य यांनी स्वतःच्या घराच्या मालमत्ता कराची डिमांडनोट स्थायी समितीच्या सभागृहात सादर केली. ते म्हणाले, ‘मी नियमित कर भरणारा माणूस आहे. मालमत्ता कराची डिमांडनोट मला आज मिळाली. त्यावर ३० सप्टेंबर ही कर भरण्याची तारीख देण्यात आली आहे, असे असताना त्यात दोन टक्के व्याज आकारल्याचा उल्लेख देखील केला आहे. दोन टक्के व्याजासह १४९ रुपये जास्तीचे भरावे लागणार आहेत. मालमत्ता कराची थकबाकी नसताना, नियमित कर भरत असताना व कर भरण्याची मुदत शिल्लक असताना डिमांड नोटमध्ये दोन टक्के व्याजाचा उल्लेख कसा काय केला,’ असा सवाल त्यांनी केला. ‘३० सप्टेंबरनंतर कर भरला तर दोन टक्के व्याज आकारले जाणे आवश्यक होते. ३० सप्टेंबरपर्यंत आम्ही कर भरणार नाही, असे गृहीत धरून प्रशासनाने डिमांडनोट बजावली आहे का ? अशा प्रकारामुळे नियमित कर भरणाऱ्यांवर अन्याय होत आहे. नियमित कर भरणाऱ्यांसाठी दोन टक्के व्याज आकारण्याची अट रद्द करा,’ अशी मागणी त्यांनी केली.
करमूल्य निर्धारक व संकलक वसंत निकम यांनी कायद्यातील तरतुदी स्थायी समितीच्या सभागृहात मांडल्या. ‘मालमत्ताधारकांना बजावलेल्या डिमांडनोट कायद्यातील तरतुदीनुसार योग्य आहेत. मालमत्ता कराच्या संदर्भात जाहीर प्रकटन दिले आहे. कर भरण्याची ऑनलाइन व्यवस्था केली आहे.’ निकम यांनी केलेल्या खुलाशामुळे वैद्य यांच्यासह सभागृहाचे समाधान झाले नाही. ‘नियमित कर भरणाऱ्यांसाठी दोन टक्के व्याजदंडाची तरतूद डिमांडनोटमधून काढून टाका,’ अशी मागणी वैद्य यांनी केली.

...तरच जादा आकारणी
सभापतींनी देखील नियमित कर भरणाऱ्यांना व्याज दंड कशासाठी, असा सवाल केला. ‘प्रत्येक मालमत्ताधारकाला डिमांडनोट पोचलीच पाहिजे. डिमांडनोट पोचल्यावर निर्धारित कालावधीत कर भरला नाही, तर व्याजदंडाची आकारणी केली जावी,’ असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांची पुन्हा झाडाझडती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुणवत्ता ठरविणाऱ्या शाळा सिद्धी उपक्रमात राज्यातील साडेनऊ हजार शाळांनी स्वयंमूल्यमापनात ‘अ’ दर्जा मिळविला आहे. या शाळांचे ऑक्टोबरमध्ये बाह्य मूल्यमापन केले जाणार आहे.

शाळांमधील गुणवत्तावाढीचा प्रश्न कायम समोर येतो. त्या दृष्टिकोनातून ‘शाळ सिद्धी’ उपक्रम केंद्र सरकारने जाहीर केला. शाळांचे शैक्षणिक दर्जानुसार मूल्यमापन करण्यात येणार आहे. यात प्रारंभी शाळांना स्वतः मूल्यमापन करायचे होते. त्यात औरंगाबाद विभागातील २१ हजार ७४२ पैकी १८ हजार ६०४ शाळांनी उपक्रमात सहभाग घेतला. शाळांनी स्वयंमूल्यमापन करत अहवाल सादर केले. शिक्षण विभागाने ‘नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन प्लॅनिंग अँड अॅडमिस्ट्रेशन’कडे हे अहवाल सादर केले. त्यातून विभागातील ‘अ’ दर्जाच्या शाळांची संख्या ८५० असल्याचे समोर आले आहे. यातील बहुतांश जिल्हा परिषदांच्या शाळां आहेत. स्वयंमूल्यमापनात ‘अ’ दर्जा मिळविलेल्या शाळांची संख्या कमी आहे. त्याचवेळी उपक्रमात सहभागी नसलेल्या शाळांची संख्या तीन हजार १३८ एवढी आहे.

या निकषांचा समावेश
‘शाळा सिद्धी’ उपक्रमात सात टप्प्यात ४६ निकष निश्चित करण्यात आले होते. त्यामध्ये शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची प्रगती अपेक्षित क्षमता, शिक्षकांचे व्यवसायिक व्यवस्थापन मूल्यमापन, शालेय व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अशा विविध निकषांवर शाळांची गुणवत्ता तपासणी होते. औरंगाबाद विभागात त्यासाठी १२५ निर्धारकांचे प्रशिक्षण या आठवड्यात पूर्ण झाले.

बाह्य मूल्यमापन
स्वयं मूल्यमापन केल्यानंतर शाळांचे बाह्य मूल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी निर्धारकांची नेमणूक करण्यात आली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यात ‘अ’ दर्जा कायम राहील त्या शाळांना आयएसओच्या धर्तीवर ‘शाळा सिद्धी’ प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

शाळांना आपला दर्जा उंचावण्यास भौतिक सुविधा अडसर ठरू शकत नाहीत, हे शाळा सिद्धीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. शाळेचा ग्रेड ठरवताना विद्यार्थी आणि त्याच्या क्षमता विकास हा शाळा सिद्धी प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. या उपक्रमामुळे शाळांमध्ये एक प्रकारची गुणवत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. - अमोल महेंद्रकर, राज्य निर्धारक, शाळा सिद्धी

विभागाचे चित्र
- २१७४२ शाळा
- ४२४०२०३ विद्यार्थी
- १४०२१४ शिक्षक संख्या
- १८६०७ शाळा सिद्धीसाठी नोंद
- ८५० ‘अ’ दर्जाच्या शाळा
- ३१३८ सहभागी नसलेल्या शाळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images