म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद : मनमाड ते मुदखेड या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरू करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला खरा, परंतु अद्याप या मार्गाचे सर्वेक्षणच झालेले नसल्याचे लक्षात आल्याने हे काम लांबले आहे. नगरसोल नरसापूर रेल्वे इंजिन फेल झाल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे तीन तासांहून अधिक वेळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. औरंगाबाद रेल्वे मार्गावर सध्या डिझेल इंजिनद्वारे रेल्वे वाहतूक केली जात आहे. उन्हाळ्यात डिझेल इंजिन फेल होण्याच्या घटना वाढतात. यामुळे या रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिफिकेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनमाड ते मुदखेड ७८० किलोमीटर रेल्वे मार्गावर विद्युतीकरण करण्यासाठी रेल्वेने मंजुरी दिली आहे. विद्युतीकरण करण्यासाठी महाउर्जा विभागाला काम देण्यात आले आहे. या रेल्वे मार्गावर विद्युतीकरण करण्यासाठी फूट बाय फूट सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात सिग्नल, पॉईंट आणि लेव्हल क्रॉसिंगचा सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, संबंधित विभागाकडून हे सर्व्हेक्षण झालेलेच नाही. यामुळे सर्वेक्षणाच्या कामातच रेल्वे विद्युतीकरणाचे काम अडकले असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली. ……… मुदखेडकडे काम सुरू? मनमाड मुदखेड रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाच्या काम एकीकडे रखडले आहे. मात्र, त्याचवेळी मुदखेडकडे विद्युतीकरणासाठी उपकेंद्र तयार करणे तसेच अन्य कामाला सुरुवात करण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे. ... ………
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट