Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘त्या’नाही वेतन अनुदान द्या

$
0
0
शासन स्वतः चालवित असलेल्या बालगृहातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीप्रमाणे वेतन अदा करण्यात येते. त्याच तत्वावर शासनाने स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवत असलेल्या बालगृहातील कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी लागू करणे व वेतन अनुदान अदा करणे भारतीय घटनेप्रमाणे बंधनकारक आहे, असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

ऐन परीक्षेत अतिरिक्त शुल्कवसुली

$
0
0
शैक्षणिक शुल्क वाढल्याचे कारण पुढे करत कॉलेज अतिरिक्त शुल्क वसूल करते आहे, ही अतिरिक्त वसुली थांबवा अशी मागणी श्री साई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी या संदर्भात तंत्रशिक्षणसह, समाजकल्याण विभागाची दारे ठोठावली.

‘एमआयटी’चे दोन विद्यार्थी ठार

$
0
0
दुचाकी दुभाजकावर धडकल्याने दोन विद्यार्थी ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. दौलताबादजवळ रविवारी रात्री हा अपघात झाला. दोन्ही मृत एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, सोमवारी कॉलेज ‘बंद’ ठेवण्यात आले.

रस्त्याची ‘PMC’ अधिकाऱ्यांचे बाहुले

$
0
0
क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचे काम मजबूत आणि नियमानुसार व्हावे, यासाठी नेमलेली तटस्थ प्रकल्प सल्लागार समिती (पीएमसी) पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहे.

शाळेतून जुन्या पुस्तकांचे वितरण

$
0
0
नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालिकेच्या उस्मानपुरा येथील शाळेतून जुन्या पुस्तकांचे वितरण केले जात आहे. गतवर्षी वितरीत न झालेली पुस्तके यंदा शाळांना देऊन, कोटा पूर्ण करण्याच्या तयारीत पालिकेचा शिक्षण विभाग लागला आहे.

परभणीचा निकाल दोन वाजता समजणार

$
0
0
लोकसभा निवडणूक मतदानाची मोजणी शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. दुपारी दोनपर्यंत निवडणूक निकाल हाती येण्याची शक्यता आहे. ही मतमोजणी प्रोजेक्टरद्वारे ऑनलाइन स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था परभणीत करण्यात आली आहे.

उस्मानाबादेत निकालाची उत्सुकता शिगेला

$
0
0
लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद, मराठवाड्यासह राज्यात आणि देशात काय होणार? नरेंद्र मोदी विराजमान होऊन मोदी सरकार येणार काय ? याची उत्सुकता उस्मानाबादेतील जनतेमध्ये आहे. काही जणांनी यावरुन पैजाही लावल्या आहेत.

निवडणूक निकालांवर जालन्यात सट्टा जोरात

$
0
0
जालन्यात लोकसभा निवडणूकांच्या निकालावर सट्टा बाजारात मोठी उलाढाल होत आहे. सट्टा बाजारात बुधवारी (१४ मे) रात्री आठपर्यंत सुमारे ४५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. विभागात सट्टेबाजारांनी महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे.

पळसपूर येथील घाटावरून अवैध वाळू उपसा सुरूच

$
0
0
हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा तीरावर असलेल्या पळसपूर घाटावरून वाळू माफियांकडून अवैधरित्या वाळूचे उत्खनन केले जात आहे. तहसील प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करीत शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडवत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.

फुलंब्रीत बोगस खत जप्त

$
0
0
फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी व विठ्ठलवाडी येथे शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेल्या बोगस खताच्या ७० बॅगा जिल्हा परिषदेच्या पथकाने बुधवारी जप्त केल्या. ही कारवाई झाल्याचे समजताच बोगस खत घेऊन आलेला ट्रक व सोबतची माणसे पसार झाली.

जाहिरातींच्या भडिमाराने शेतकरी गोंधळला

$
0
0
खरीप हंगाम जवळ आल्यामुळे बाजारात बियाणे विक्रीसाठी कृषी सेवा केंद्रामार्फत बियाणे कंपन्याची स्पर्धा लागली आहे. कंपन्यानी जाहिरातींचा भडिमार केल्यामुळे बळीराजा गोंधळला आहे. योग्य बियाणांच्या निवडीसाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.

उन्हाचा चटका, फळबागांना फटका

$
0
0
उन्हाची वाढती तीव्रता आणि पाणी टंचाईमुळे मराठवाड्यातील फळबागा संकटात सापडल्या आहेत. या हंगामात लागवड झालेली रोपे जळाली असून काढणीला आलेला आंबा व मोसंबीच्या फळांवर काळे डाग पडले आहेत.

उस्मानपुऱ्यात काँक्रीटच्या रस्त्याला तडा

$
0
0
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या काँक्रिट रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल पालिकेचे अधिकारी, संबंधित लोकप्रतिनिधी व पीएमसी यांच्यात तेरी भी चूप, मेरी भी चूपचा खेळ सुरू आहे. ठेकेदार ठरवेल तिच गुणवत्ता, असे अघोषिेत धोरण असल्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जुन्या शहरात पाणीबाणी सुरूच

$
0
0
जायकवाडी धरणातून मुबलक पाणी मिळत असले तरी पाण्याची ओरड सुरूच आहे. गेल्या महिन्यापासून जुन्या शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित झाला असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सिडको भागातील पाण्याची ओरड थांबवण्यासाठी तिकडे पाणी वाढवले.

शेकडो अर्ज, पण बदल्या शंभरच

$
0
0
ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषदांच्या बदल्यांसाठी १७ मेचा मुहूर्त ठरविला आहे. दरवर्षी सर्वाधिक गर्दी असणाऱ्या शिक्षण विभागात यंदा मात्र फारशी गर्दी होणार नाही. जिल्हास्तरावर केवळ पाच टक्के विनंती बदल्याच होणार असल्याने शेकड्याने अर्ज येऊनही १०० बदल्याच केल्या जाणार आहेत.

गारपीटग्रस्तांना ४६० कोटींचा निधी

$
0
0
गारपीटग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेला ४६० कोटींचा निधी, विभागीय आयुक्त कार्यालयाला मिळाला आहे. हा सर्वात मोठा तिसऱ्या टप्प्यातला निधी आहे. आतापर्यंत एकूण ९९४ कोटी पैकी ९७० कोटी रूपयांचा निधी विभागाला मिळाला आहे. तर २४ कोटींचा निधी येणे बाकी आहे.

‘मेटल डिटेक्टर’चे स्टेशनवर बुजगावणे

$
0
0
चेन्नई येथे रेल्वे स्टेशनवर झालेल्या स्फोटानंतर रेल्वे विभागाकडून स्टेशनच्या सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या सुचनेनुसार औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

‘आरामदायी’ शिवनेरीचा खडतर प्रवास

$
0
0
सोमवारी पुण्याहून दुपारी बारा वाजता निघालेली एसटीची शिवनेरी गाडी ही सुप्याजवळ बिघडली. गाडीचे शॉकअप्स नादुरुस्त झाले. भररस्त्यात गाडी नादुरुस्त झाल्यामुळे दुसरी बस मिळविण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली. त्यांना पुढचा प्रवास निमआराम गाडीतून करावा लागला.

दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची टांगती तलवार

$
0
0
संपूर्ण संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम)योजनेंतर्गत लोहा तालुक्यातील पेनूर व अन्तेश्वर या दोन ग्राम पंचायतीचे काम पूर्ण न झाल्याचा ठपका ठेवत गटविकास अधिकाऱ्यांनी दोन ग्रामसेवकांना निलंबित केले आहे.

शंभू राजांच्या जागवल्या आठवणी

$
0
0
छत्रपती संभाजी राजेंची जयंती बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाहनफेरी, प्रसाद वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान असे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images