औरंगाबाद, जालना जिल्ह्यांसह मराठवाड्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत विभागात ५.७२ मिली मीटर पाऊस पडला.
औरंगाबाद, जालन्यासह मराठवाड्यात पाऊस
↧
↧
भरपाई मिळणार केवळ एक हेक्टरपर्यंतच
दुष्काळामुळे खरीप, रब्बी हंगामाच्या नुकसानीपोटी भरपाई देण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत सरकारने एका हेक्टरची कपात केली आहे. त्याचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे.
↧
गढूळ पाण्यामुळे सगळेच हैराण
कामगार वस्ती असलेल्या एसटी कॉलनी वॉर्डात चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, सुरुवातीची दहा मिनिटे गढूळ पाणी येत असल्याने उरलेल्या दहा मिनिटांत नागरिक कसेबसे पाणी भरतात.
↧
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
तालुक्यातील डागपिंपळगाव येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी सविता शिवाजी राशीनकर (वय २३) या महिलेने पती शिवाजी राशीनकर, सासरा सोमीनाथ, सासू रुख्मणी, दीर नवनाथ व संजय यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
↧
RPF कर्मचा-यांची रेल्वेतील संख्या वाढवा
रेल्वे गाड्यांमध्ये महिलांसोबत छेडछाड, तसेच चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रेल्वे सुरक्षा दलात कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे या घटनेत वाढत आहे. यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीने केली आहे.
↧
↧
तहसिलदारांच्या रजेमुळे ८० लाखाचे अनुदान अडले
तहसिलदार रजेवर असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे ८० लाख रुपयांचे अनुदान अडले आहे. कापूस लागवडीचा तिसरा हंगाम सुरू होऊनही तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप एक कोटी रुपयांची भरपाई मिळाली नाही.
↧
जिगरबाज पोलिसाची कथा 'योद्धा'
'योद्धा' ही एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची कथा आहे. सिनेमा व्यावसायिक असला तरी वास्तविकता दाखवली आहे. हिंदी किंवा दाक्षिणात्य सिनेमाप्रमाणे अशक्यप्राय फाइट्स टाळून प्रेक्षकांना खरेखुरे मनोरंजन देण्याचा प्रयत्न केला आहे' असे अभिनेता सौरभ गोखले याने सांगितले.
↧
समांतरमध्ये तंगडे का घालता ?
महापौर कला ओझा यांनी समांतर जलवाहिनीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधकांना बजावले आहे. शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी 'समांतरमध्ये तंगडे का घालता' असा सवाल उपस्थित करताना 'समांतरमध्ये भ्रष्टाचार केला नाही, ज्यांनी केला ते तोंड लपवतील' असे ठणकावले आहे.
↧
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत अतिवृष्टी
मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या ४८ तासांत अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपूर्वी मान्सूनचे आगमन झाले. दक्षिण मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्याचा काही भाग मान्सूनने व्यापला होता.
↧
↧
MBBS च्या वाढीव ५० जागांचा प्रस्ताव त्रूटींमुळे पडून
घाटी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस प्रथम वर्षाच्या वाढीव ५० जागांचा प्रस्ताव स्थानिक कार्यालयाच्या त्रूटीमुळे वर्षभरापासून पडून आहे. त्यामुळे जागा वाढवून मिळण्याचे स्वप्न यंदाही अपुरेच राहणार आहे.
↧
मोसंबी उत्पादकांच्या पदरी निराशा
दुष्काळामुळे खरीप, रब्बी हंगामाच्या नुकसानीपोटी भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली. पिकांसाठी हेक्टरी तीन हजार रुपये जाहीर करताना मोसंबी उत्पादकांना फक्त हेक्टरी आठ हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
↧
राज्यभरात पावसाचा जोर कायम
मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या ४८ तासांत अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. राज्याचा बराचसा भाग मान्सूनने व्यापला असून, मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाचा जोर कायम आहे. या पावसाने मुंबईलाही झोडपून काढले आहे.
↧
दृष्टीदानात मराठवाडा 'दीन'
लहानपणी ऐश्वर्या रायची टीव्हीवरची नेत्रदानाची जाहिरात आठवली का? किती सरळ आणि थेट मनाला भिडणारी! तिचे ते निवेदन आणि 'मी पण नेत्रदान केलं आहे' हे तिने सांगितल्यानंतर तर कुतूहल निर्माण व्हायचे.
↧
↧
अकरावीला मागेल त्याला प्रवेश
दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी, पालकांची प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. कोणते कॉलेज घ्यावे, शाखा कोणती निवडावी, याची चर्चाही घराघरात चालू आहे. मराठवाड्यात सर्व शाखांच्या जागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी 'नो टेन्शन.' ठराविक कॉलेजांना मात्र गर्दी होण्याची शक्यता आहे.
↧
बस स्टँडवर 'हिरकणी कक्ष' सुरू
आपल्या तान्हुल्याला घेऊन बसस्टँडवर येणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी 'हिरकणी' या विशेष कक्षाची सुरूवात करण्यात आली आहे. अनेकदाक बसची वाट पहात बसावे लागते. त्यातच तान्हुल्याला भूक लागली तर त्याला पाजण्यासाठी वेगळी जागा महिलांना मिळावी म्हणून या विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
↧
शिवसेनेचा पुन्हा हिंदुत्वाचा धावा
शिवसेनेने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुन्हा एकदा 'हिंदुत्वाचा धावा' करण्यास सुरूवात केली आहे. २० व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात विधीमंडळ गटनेते सुभाष देसाईंपासून स्थानिक लोकप्रतिनधींपर्यंत सगळ्यांनी हिंदुत्वाचा 'राग' आळवला.
↧
पोलिसांच्या खब-यांचे नेटवर्क जॅम?
शहरात मागील काही महिन्यांपासून मंगळसूत्र चोरी आणि खून प्रकरणातील आरोपी शोधण्यास पोलिस यंत्रणेला नाकीनऊ येत आहेत. पोलिसांपेक्षा चोर, दरोडेखोर आणि खुनी आरोपी हुशार झाल्याची टिका सुरू झाली आहे.
↧
↧
जायकवाडी प्रकल्प क्षेत्रात पाऊस
संकटात असलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत दमदार पावसाने हजेरी लावली.जलसंपदा खात्याच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंदरसूल येथे ६२ मिली मीटर, श्रीरामपूर ३४, कोपरगाव ९५, राहाता ४६, देवगाव रुही २३, राहाता ४६, शिर्डी ३२, म्हैसमाळ येथे ५३ मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.
↧
दिल्लीत वजन असेल तर तिकीट
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने १५ वर्षे चंद्रकांत खैरेंच्या रुपाने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
↧
'संगीत विशारद'साठी यापुढे ८ वर्षे
'अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ'ने यंदापासून संगीत विशारद पदवी अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलानुसार विशारद पदवीसाठीचा कालावधी सात वर्षांऐवजी आता आठ वर्षांचा करण्यात आला आहे; तसेच व्यावसायिक दृष्टीकोनातूनही अभ्यासक्रमात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
↧
More Pages to Explore .....