जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. पावसामुळे पिकात तण फोफावले असून पिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. विशेषतः औरंगाबाद तालुक्यात चिकट्या गवताचा सर्वाधिक प्रादूर्भाव झाला आहे. या गवतामुळे कापूस वेचणीत अडथळा निर्माण झाला आहे.
↧