भ्रष्टाचार, अत्याचार, आत्महत्या, अन्याय या मानवी असंवेदनशीलतेचे विविधरंगी पदर उलगडताना त्याला विनोदाची झालर लावत दिग्दर्शक सुमीत साळवे यांनी ‘विदाउट संबळ स्वर्गात गोंधळ’ नाटकाची आखणी केली आहे. लेखक चरण जाधव यांनी नाटकासाठी निवडलेला फॉर्मच्या सादरीकरणात विसंगती असूनही विषयाच्या टोकापर्यंत सलगपणा टिकला आहे.
↧