औरंगाबाद जिल्ह्यासाठी ७५१६२० पाकिटांची गरज आहे. प्रत्यक्षात दहा जूनपर्यंत २१३७५४० पाकिटे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये, कारण सर्व वाण समतूल्य आहेत; शिवाय फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना परवानाधारक विक्रेत्यांकडून पक्की पावती घेऊनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी सभापती विजया निकम चिकटगावकर यांनी केले.
↧