‘अधिकाऱ्यांना बोलविल्यानंतरही अधिकारी येत नाहीत, एखादी माहिती विचारली तर तीदेखील मला कोणीच देत नाही. कारभार हाती घेऊन दोन महिने उलटले तरीदेखील मला कोणी विचारतच नाही. केवळ मी ग्रामीण असल्याने माझ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे,’ हे हताश उद्गार आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शारदा जारवाल यांचे.
↧