‘घुसमट बाहेर काढण्याचे माध्यम म्हणून चित्रपट-नाटकांकडे पाहतो. त्यामुळे नट नसतो तर, मी वेडा झालो असतो. आजूबाजूला घडणारे कसे व्यक्त करायचे हा प्रश्न पडतो. चित्रपट नसते तर, कदाचित मी गुन्हेगार झालो असतो. जगातील चित्रपटांचा गाभा दुःख असल्यामुळे ते प्रत्येकाला भिडतात. म्हणूनच या प्रभावी माध्यमातून व्यक्त होतो,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
↧