शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी साडेअकराच्या सुमारास शाळेत गर्दी करण्यास सुरूवात केली. काही महिला तर, अक्षरशः रडतच येत होत्या. शिक्षक व शाळेतील अन्य कर्मचारी त्यांना धीर देत होते.
↧