पीक विम्यातून मदतीचे नाटक
उस्मानाबाद जिल्ह्यातील ६० हजार ३०७ शेतकऱ्यांना खरीप २०१२ च्या पीक विम्यापोटी ९ कोटी १ लाख ६० हजार रुपये मिळणार आहेत.
View Articleफक्त २८ फिडर भारनियमनमुक्त
महाराष्ट्रातील ८२ टक्के भाग भारनियमनमुक्त झाला असला तरी औरंगाबाद परिमंडळातील ८४ टक्के भागात भारनियमन सुरू आहे.
View Articleपालिकेला पडला शाळाबाह्य मुलांचा विसर
महापालिकेच्या शिक्षण विभागाला शाळाबाह्य मुलांचा विसर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाकडून निधीच मिळाली त्यामुळे शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले नाही अशी माहिती शिक्षणाधिकारी ए. एम. शेख यांनी दिली.
View Articleजुन्या मोंढ्यात चार दुकाने फोडली
जुना मोंढा भागात चोरट्यांनी चार दुकाने फोडल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.
View Articleलातूरला पावसाने झोडपले
गेल्या चार दिवसांपासून लातूर शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. शुक्रवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले.
View Article'बीपीओ' नोकरीत भारताचा वाटा सर्वाधिक
'बीपीओ' क्षेत्रात जगभर नोकरीच्या प्रचंड संधी असून एकट्या भारतात तब्बल ३६ टक्के नोक-या उपलब्ध आहेत. यामुळे रोजगारभिमुख शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळावे, असे प्रतिपादन इन्फोसिसचे उपाध्यक्ष...
View Articleवर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांच्या टेबल बदलले
जिल्हा परिषदेच्या एकाच विभागात एकाच टेबलवर पाच वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना थेट विभाग बदलून जिल्हा परिषद प्रशासनाने साफसफाई सुरू केली आहे.
View Articleन्यायालयाच्या आदेशाचा अवमान
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल झाली.
View Articleविद्यार्थी आणि शिक्षक संभ्रमात
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर 'नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट' (नीट) घेण्याची अधिसूचना सुप्रीम कोर्टाने रद्दबादल ठरवली.
View Articleउमेदवारीसाठी जालना काँग्रेस कमिटीचे शर्तीचे प्रयत्न
विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा वेळपत्रक जाहीर होताच राजकीय हालचालीना अधिक वेग आला आहे. सर्वाधिक संख्याबळ असलेल्या काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांनी गर्दी...
View Articleयंदा जुलैमध्येच नाथसागराकडे येणार पाणी
गेल्यावर्षी कमी पाऊस आणि कालव्यांतून वळविण्यात आलेले पाणी, यामुळे मराठवाड्यासाठी महत्वाचा असलेला जायकवाडी प्रकल्प संकटात सापडला होता.
View Articleपालिका शाळेत आता वसतीगृह
महापालिकेच्या ७७ पैकी एका शाळेत आता निवासी वसतीगृह तयार केले जाणार आहे.
View Articleपॅचवर्कच्या फायली चौकशीसाठी द्या
शहराच्या विविध भागात करण्यात आलेल्या पॅचवर्कच्या कामाच्या फायली चौकशीसाठी उपलब्ध करून द्या असे पत्र पालिकेच्या मुख्यलेखापरिक्षकांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.
View Articleसिंचन प्रकल्पातील पाणीसाठयात वाढ
जिल्ह्यातील दोन मोठया व नऊ मध्यम आणि ८० लघु प्रकल्पात १७ जुलै अखेर एकूण १९३.९४ दस लक्ष घन मीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. उपयुक्त पाणीसाठयाची टक्केवारी ३६ टक्क्यावर पोहोचली आहे.
View Articleजिल्हा परिषद अध्यक्षांचे पद धोक्यात
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नाहिदबानो फिरोज खान पठाण यांचे पद धोक्यात आले आहे. मोमीन जातीचे त्यांचे वैधता प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीने रद्दबातल ठरविले आहे.
View Articleपरिषदेसाठी सेनेची आकडेमोड सुरू
गेल्या पाच वर्षात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पीछेहाट झाल्यामुळे यावेळेसच्या विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिवसेनेत आकडेमोड सुरू झाली आहे.
View Articleचक्क गृह विभागाचा बनावट 'जीआर'!
'क' व 'ड' संवर्गातील निलंबीत कर्मचा-यांना कामावर रुजू करून घेण्याबाबतचा चक्क गृह विभागाचा बनावट शासन निर्णय (जीआर) तयार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे.
View Articleस्थानिक उद्योजकांना प्राधान्य हवे
देशभरातील प्रमुख औद्योगिकनगरींना जोडणारा दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्प औरंगाबादलाही जोडून घेणार आहे.
View Articleज्ञानाधारित उत्पादनाची सुरवात
१९८४मध्ये औरंगाबादेत ऑटोमोटिव्ह उद्योगांना सुरवात झाली. १९८६पासून अॅटो अॅन्सिलरी विकसित होऊ लागल्या. १९९६मध्ये कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगची सुरुवात झाली, पण हे छोट्या स्केलपर्यंत मर्यादित होते.
View Articleआता गरज सामूहिक प्रयत्नांची
औरंगाबाद शहराला येत्या काळात उज्ज्वल भवितव्य आहे. हे भवितव्य गाठण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. शहराची सध्याची अवस्था फारच वाईट आहे.
View Article