Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वीज गळती थांबवून थकबाकी वसूल करा

$
0
0

औरंगाबाद : घरगुती, व्यापारी, औघोगिक, पथदिवे, पाणी पुरवठा व कृषिपंप वीज ग्राहकांकडे चालू बिलासह असलेली थकबाकी वसूल करा. त्याचबरोबर या भागातील वीज गळती कमी करा, अशा सूचना ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी यांनी केल्या आहेत.
महावितरण औरंगाबाद परिमंडळ कार्यालयात विशेष आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. श्रीमाळी यांनी महावितरणच्या कामाचा आढावा घेतला. विजेची थकबाकी वसूल करण्यावर भर देण्यात यावा. त्याशिवाय वीज गळतीचे प्रमाणही मोठे आहे. ही गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

३५० कोटी थकबाकी
महावितरणच्या औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण आणि जालना जिल्हा या तीन परिमंडळात सुमारे ३५० कोटी रुपये थकबाकी आहे. महावितरणने गळती थांबविण्यासाठी चार महिन्यांपूर्वी मोहीम सुरू केली आहे. त्यात साडेसह हजार आकडे पकडण्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या निर्णयाला दोन शेतकऱ्यांनी सुप्रीम कोर्टात ‘विशेष परवानगी अर्ज’ सादर केला आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, गृह विभागाचे सचिव आणि पोलिस महासंचालक यांना नोटीस बजावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्या.जगदिशसिंह केहर, डॉ. डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. एल. नागेश्वरराव यांनी दिले.

महंमद हिशाम उस्मानी आणि राजेंद्र किसन भालकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्रात ‘गोहत्याबंदी’ कायदा १९७६पासून अंमलात होता. राज्य शासनाने कायद्यात दुरुस्ती करून ४ मार्च २०१५ रोजी ‘गोवंश हत्याबंदी’ कायदा लागू केला. या दुरुस्ती कायद्यास आव्हान देणाऱ्या अनेक जनहित याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी झाली असता औरंगाबाद खंडपीठाने त्या याचिका फेटाळल्या होत्या. दुरुस्ती कायद्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वात जास्त हाल होत आहेत. त्यामुळे हा दुरुस्ती कायदा रद्द करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकाकर्त्यांची बाजू शेख अहेमद व एस. एस. काझी मांडत आहेत.

शेतकऱ्यांवर अन्याय व बोजा

शेतकऱ्यांचा गोहत्याबंदी कायद्यास विरोध नाही, मात्र त्यात दुरुस्ती करून गोवंश हत्याबंदी अंमलात आणल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. कारण बैल ५ वर्षांचा झाल्यानंतर नसबंदीनंतर तो शेतीच्या उपयोगी होतो. बैलाचे आयुष्यमान १८ ते २० वर्षे असते. नसबंदीनंतर बैलाचा वंश वाढू शकत नाही. गोहत्याबंदी कायद्याच्या कलम ६नुसार जनावर भाकड झाल्याचे डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिल्यानंतर अशा जनावरांची कत्तल करता येत होती. दुरुस्ती कायद्यानंतर शेतीच्या कामास न येणाऱ्या भाकड जनावरांना कोणताही शेतकरी विकत घेत नाही. अशा जनावराला दिवसाला २५ ते ३० किलो चारा, २ ते ३ किलो खल्ली आणि २५ ते ३० लिटर पाणी लागते. एका जनावरामागे दरमहा ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. कोणताही बैल अपंग अथवा आजारी झाल्यास तो शेतकऱ्यावर बोजा लादल्यासारखे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे काम कार्यालयातून: अंबादास दानवे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शिवसेनेचा गट आणि गणनिहाय दौरा सुरू आहे. इच्छुक उमेदवारांचा डाटा गोळा झाला आहे. आम्ही फिल्डवर जाऊन काम करीत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे काम कार्यालयात बसून सुरू आहे, असे असले तरी भाजपबरोबर युती करण्याची आमची तयारी आहे,’ अशी बोचरी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी ‘मटा’ शी बोलताना केली.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सर्कलनिहाय दौरे करून उमेदवारांची चाचपणी करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती झाली होती. यंदा मात्र भाजपने स्वतःच्या पातळीवर तालुकानिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. या संदर्भात दानवे यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले, ‘आमचे दौरे सुरू आहेत. प्रत्येक गटात, गणात कोण कोण इच्छुक आहे त्याची माहिती आम्ही गोळा करीत आहोत. गट-गणामध्ये राजकीय वातावरण कसे आहे, हे देखील आम्ही जाणून घेत आहोत. आमचे फिल्डवर काम सुरू आहे. भाजपचे काम कार्यालयात बसून सुरू आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यावर इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घेऊन त्याच्या याद्या तयार केल्या जातील. वरिष्ठांच्या आदेशानुसार उमेदवार ठरविले जातील.’

इनकमिंगमध्ये भाजप मशगुल
‘भाजपचे नेते, पदाधिकारी इनकमिंगमध्ये मशगुल आहेत. इनकमिंग मुळे आपली ताकद वाढत आहे असा त्यांचा समज आहे. त्यामुळे खरे कार्यकर्ते डावलले जात आहेत, तरीही आमची त्यांच्याबरोबर युती करण्याची तयारी आहे,’ असा उल्लेखही दानवे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांची दाटी, पक्षांसमोर आव्हान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय नेते तयारीला लागले आहेत. इच्छुकांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण, जिल्ह्या परिषदेतील तालुक्यातील चारपैकी तीन गट सर्वसाधारण असल्याने प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे निवडून येणारा उमेदवार ठरवण्यासाठी नेत्यांची कसोटी लागणार आहे.
फुलंब्री तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीचे आठ गण आहेत. जिल्हा परिषदेचे बाबरा, वडोदबाजार, पाल हे तीन गट सर्वसाधारण गटासाठी सुटले आहेत, तर गणोरी गट सर्वसाधारण महिला राखीव आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजप या दोन पक्षांतून उमेदवारी मिळवण्यासाठी चारही गटात मोठी चुरस आहे. जिल्हा परिषदेच्या तीन जागा सर्वसाधारण गटासाठी आहे, त्यामुळे येथे इच्छुक पुरूष उमेदवारांची गर्दी झाली आहे. ज्यांना पंचायत समिती निवडणूक लढवायची होती, त्यांनी सुद्धा आता जिल्हा परिषदेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. महिला गट सुद्धा सर्वसाधारण आहे. यामुळे सुद्धा घरातील महिलांकरिता उमेदवारी मागण्यासाठी पुरूष मंडळींची तयारी सुरू आहे. एका गटासाठी प्रत्येक पक्षातर्फे किमान १० जण इच्छुक आहेत. दरम्यान, नवखा असला तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवाराकडे पक्षांचा कल आहे.

पाच वर्षातील घडामोडी
मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातून दोन जागा शिवसेना व प्रत्येकी एक जागा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. पंचायत समितीमध्ये काँग्रेसला दोन व राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीनंतर आघाडी करून पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन केली. पण, गेल्या पाच वर्षात पंचायत समितीमध्ये अनेक घडामोडी घडल्या. सध्या पंचायत समितीचे सभापती शिवसेनेचे आहेत. शिवाय जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत.

नेत्यांचे दौरे सुरू
काही महिन्यापूर्वी झालेल्या फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची तयारी नीट केल्याने काँग्रेसने बाजी मारली. या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी तालुक्यात दौरा सुरू केला आहे. फुलंब्री मतदारसंघाचे आमदार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे विकासकामांचे भूमिपूजनच्या माध्यमातून तालुक्यात दौरे करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तालुक्याचे दोन दौरे केले आहेत.

जिल्हा परिषदेचे प्रमुख इच्छुक
बाबरा ः राजेंद्र चव्हाण, देविदास गाडेकर, आबाराव सोनवणे, गंगाधर सोनवणे (काँग्रेस), जितेंद्र जैस्वाल, रामेश्वर चोपडे, मनोहर सोनवणे, राजू कुंटे (भाजप), काकासाहेब मोटे (शिवसेना), अजिनाथ शेळके, सुनील तायडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पाल ः शिवाजीराव पाथ्रीकर, डॉ. गिरीश गाडेकर, विनोद मानकापे, विकास गायकवाड, अभिषेक गाडेकर (भाजप), वरूण पाथ्रीकर, पुरुषोत्तम गाडेकर, गणेश काळे, भगवान जाधव (काँग्रेस), राजेंद्र ठोंबरे (शिवसेना), लक्ष्मण औताडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
वडोदबाजार ः डॉ. सारंग गाडेकर, किशोर बलांडे, संतोष मेटे, शामराव साळुंके (काँग्रेस), कुणाल जिवरग, गोविंद वाघ, सर्जेराव मेटे, तारू अप्पा मेटे (भाजप), राजेंद्र पाथ्रीकर, राहुल डकले (राष्ट्रवादी काँग्रेस), राधाकिसन कोलते, अंबादास मेटे (शिवसेना)
गणोरी ः अनुराधा चव्हाण, ज्योती विलास उबाळे, बेबी विवेक चव्हाण (भाजप), सीमा जाधव, सीमा दादासाहेब बोरसे, पुष्पा गणेश तांदळे, पुष्पाबाई सुदाम मते (काँग्रेस), ताराबाई सुभाष गायकवाड, वंदना बाबासाहेब तांदळे (राष्ट्रवादी काँग्रेस), लताबाई नारायण तांदळे, निर्मलाबाई प्रभाकर मते (शिवसेना).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेसाठी मंडळाची कसरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळात फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांची लगीन घाई सुरू आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावी, बारावीच्या परीक्षार्थींची संख्या ३० हजाराने वाढली आहे. त्यानुसार नियोजनासाठी मंडळाची कसरत होणार आहे.
शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी दहावी, बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती १ जुलै रोजी होत होती. यंदा वेळापत्रकला विलंब झाला. २८ फेब्रुवारीपासून बारावीची, तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. यावर्षी यंदा दहावी, बारावीच्या परीक्षार्थींची संख्या सुमारे ३० हजारांनी वाढण्याची शक्यता आहे. दहावीच्या तुलनेत बारावीच्या परीक्षार्थीची संख्येत वाढ झाली आहे. यावर्षी बारावीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १९ हजार ७०४ परीक्षार्थींची भर पडली आहे. दहावीच्या परीक्षार्थींच्या तुलनेत ती दुप्पट आहे. आजपर्यंत मंडळाकडे दहावीसाठी १ लाख ९० हजार १८५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. बारावीसाठी १ लाख ६२ हजार १३० परीक्षार्थींची नोंद झाली आहे. त्यात आणखी दीड ते दोन हजार परीक्षार्थींची संख्या वाढेल, असे मंडळाचे अधिकारी सांगत आहेत.

सततची वाढ; केंद्रावरील ताण वाढणार
परीक्षार्थी संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. त्यातुलनेत विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रावर आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात मंडळ अपयशी ठरते आहे. मागील वर्षी काही केंद्रावर अनेक विद्यार्थ्यांनी जमिनीवर बसून परीक्षा दिली. यंदा विद्यार्थीसंख्या ३० हजाराने संख्या वाढल्याने नियोजन करण्यासाठी मंडळात लगीन घाई सुरू आहे. त्यामुळेच अद्याप परीक्षा केंद्रांची रचनाही पूर्ण केलेली नाही. परीक्षा केंद्रांमधील सुविधांबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. परीक्षक आणि नियामकांची जुळवणी करण्यात मंडळाची दमछाक झाली आहे.

दहावी, बारावीचे परीक्षार्थी
...............२०१५...........२०१६.......२०१७
दहावी.........१२६२०७.......१८१६७८.....१९०१८५
बारावी........१७२२४२.......१४२४२६.....१६२१३०

विद्यार्थी संख्या दरवर्षी वाढते आहे. त्या संख्येच्या तुलनेत आवश्यक असलेली परीक्षा केंद्रे, बैठक व्यवस्था, सोयीसुविधा यांकडे प्रशासन कटाक्षाने लक्ष देत आहे.
- वंदना वाहुळ, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीचे १५ लाख मतदार बजावणार हक्क

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रशासनाने जाहीर केली, असून त्यात १५ लाख ७ हजार ४०७ मतदारांचा समावेश आहे. २१ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात ६२ गटांतील मतदारांची यादी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली. या मतदारयादीबाबत आक्षेप व हरकती मागवण्यात आल्या असून १७ जानेवारीपर्यंत आक्षेप दाखल करण्याची मुदत आहे. या आक्षेपावर सुनावणी घेवून २१ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रमाचा तपशील सांगितला. अर्जामध्ये चुका होऊ नये म्हणून यंदा उमदेवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. हा अर्ज वेबसाइटवरून डाऊनलोड करुन त्यानंतर आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावा लागणार आहे. उमेदवारांना अर्ज व शपथपत्र भरण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आता आवश्यकतेनुसार हेल्पडेस्क तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी आचारसंहिता कक्षही तयार करण्यात येणार आहे. या कक्षामध्ये सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून येथे एक मोबाइल किंवा दूरध्वनी क्रमांकही देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद निवडणूक लढणार्या उमेदवाराला तीन लाख, तर पंचायत समिती निवडणुक लढणार्या उमेदवारांना दोन लाख रुपये खर्चाची मर्यादा आयोगाने घालून दिलेली असल्याचे यावेळी उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे स्वबळ आजमावणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर संपूर्ण ६० जागी उमेदवार देणार असून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे,’ अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सात सदस्य विजयी झाले होते. यंदाची जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे अंतर्गत राजकारण व तक्रारीमुळे कार्यकारिणी गेल्या महिन्यात बरखास्त केली आहे. माजी जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर यांची तीन दिवसांपूर्वीच जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा ‌परिषद निवडणूक लढवण्यासाठी मनसेकडे कमी कालावधी आहे. तसेच त्यांची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आलेली नसल्याने इच्छुक उमेदवार संभ्रमात आहे. भास्कर गाडेकर हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. यंदाची निवडणूक देखील लढवण्याची तयारी पक्षाने केली आहे. जिल्हा परिषद गटांचा गटनिहाय आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात येत असून पुढील आठवड्यात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळ आजमावणार आहे. झेडपीच्या सर्व जागी उमेदवार देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. - भास्कर गाडेकर, जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त जागांचे विद्यापीठासमोर आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासमोर आगामी वर्षात रिक्त जागांचे आव्हान असणार आहे. शिक्षक, शिक्षकतेर कर्मचाऱ्यांच्या मंजूर जागांपैकी तब्बल ३५० जागा रिक्त आहेत. दहापेक्षा अधिक विभागांचा कारभार एका शिक्षकांवर सुरू आहे. विद्यापीठात शिक्षकांच्या ९३ आणि कर्मचाऱ्यांच्या २५३ जागा रिक्त आहेत.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये पात्र शिक्षक नसल्याचे प्रकार समोर असताना आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या विद्यापीठातच रिक्त जागांचा आकडा मोठा आहे. शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही रिक्त जागांमुळे विद्यापीठासमोर आव्हान आहे. सेवानिवृत्तीनंतर वाढत जाणारा रिक्त आकडा ३५० गेला आहे. शिक्षक प्रवर्गातील रिक्त जागांचा आकडा मोठा आहे. विद्यापीठात २५९ शिक्षकांच्या जागा मंजूर आहेत. त्यातील १६६ जागा भरलेल्या आहेत, तर ९३ जागा या रिक्त आहेत. त्यामुळे अध्यापनावर परिणाम होत आहे. विविध प्रवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर पदे ७७७ एवढी आहे. त्यापैकी ५२४ पदे भरलेली आहेत, तर २५३ पदे रिक्त आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यापीठासमोर रिक्त जागांचे आव्हान असणार आहे.

अध्यापन, प्रशासकीय कामावर परिणाम
भूगोल, संस्कृत, नॅनो टेक्नॉलॉजी, पाली आणि बुद्धिझम, परकीय भाषा आदी दहा विभाग एक-दोन शिक्षकांवर सुरू आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचा आकडाही प्रशासकीय कामकाजावर परिणाम करीत असून, अनेक कर्मचाऱ्यांकडे दोन विभागांचे पदभार आहेत. मुख्य इमारतीच्या हाकेच्या आंतरावर असलेल्या विभागांमध्येच उच्चशिक्षणाचे असेच हाल आहेत.

मटा भूमिका ः अक्षम्य अनास्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार (१९९४) होऊन २३ वर्षे उलटली, पण अजूनही या विद्यापीठाच्या किमान गरजा भागविल्या जात नाहीत. विभाजनानंतर चार जिल्ह्यांचा कारभार चालविताना विद्यापीठाला खस्ता खाव्या लागत आहेत. विद्यापीठ म्हणजे केवळ इमारत नव्हे. शिक्षकांविना विद्यापीठाचा गाडा किती काळ हाकता येईल? शिक्षकांअभावी शिक्षणाचा दर्जा राखणे अशक्य होऊन बसते आणि मग प्रवेशांवर त्याचा परिणाम होतो. याच अवस्थेतून हे विद्यापीठ सध्या जात आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पुरेसे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करून हा अनुशेष तत्काळ दूर केला जावा. अन्यथा विद्यापीठाची शैक्षणिक घसरण होण्याचा धोका आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या
वर्ग...........मंजूर.. भरलेले....... रिक्त
अ............५४........२८...........२६
ब............४७........३८...........९
सी............४२७.....२७६........१५१
ड............२४९.....१८२..........६७
एकूण.......७७७.....५२४....... २५३

शिक्षकांची पदे
वर्ग....................... मंजूर........विद्यमान... रिक्त
प्राध्यापक..................३५............१३.........२२
सहाय्यक प्राध्यापक......८०............४९........३१
सहयोगी प्राध्यापक.......१३४..........९४........४०
एकूण....................२५९...........१६६.......९३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपण रंगभूमीसाठी जगतो ः साळवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘व्यावसायिक रंगभूमीच्या झगमगाटाला न भुलता आपण मराठवाड्याचे प्रश्न नाटकातून मांडले पाहिजे. नाटकाचा धंदा करणे आपल्याला जमणार नाही. कारण आपण रंगभूमीवर जगत नसून रंगभूमीसाठी जगतो’ असे प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी प्रा. डॉ. अनिलकुमार साळवे यांनी केले. सत्कार समारंभात ते बोलत होते.
प्रगतीशील लेखक संघ आणि शिवछत्रपती महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र फाउंडेशनचा (अमेरिका) ‘रा. शं. दातार नाट्यकर्मी पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त प्रा. डॉ. अनिलकुमार साळवे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी रंगमंचावर ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दिलीप घारे, रंगकर्मी सुजाता कानगो, प्राचार्य डॉ. पी. व्ही. आष्टेकर, प्रा. वीरा राठोडे आणि प्रा. सिद्धार्थ तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या वाटचालीवर साळवे यांनी भाषणात प्रकाश टाकला. ‘बीड जिल्ह्यातील अनेक दुष्काळ आमच्या पिढीने गिळले आहेत. मागील वर्षी प्रसारमाध्यमात दुष्काळाचे अतिरंजित वर्णन आले. मराठवाड्याचा दुष्काळवाडा होईल, असे काहीजण म्हणाले. अशा बेजबाबदार वक्तव्यामुळे हजारो लोकांनी स्थलांतर केले. दुष्काळ आणि ऊसतोड कामगारांचे दुःख बालपणी अनुभवले होते. या दुःखाने मनावर घाव केले. अनुभवाची नाटकात कशी मांडणी करतात ते माहीत नव्हते. मात्र, सुचले ते लिहिण्यापेक्षा टोचलेले जास्त लिहिले,’ असे प्रा. साळवे म्हणाले.

लघुपटाला दाद
प्रा. साळवे दिग्दर्शित ‘१५ ऑगस्ट’ आणि ‘डोंब’ लघुपट दाखवण्यात आले. या लघुपटांना रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘आतापर्यंत साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार शेतकऱ्यांच्या उघड्या पडलेल्य लेकरांना अर्पण करतो,’ असे प्रा. साळवे यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर. एच. बाली यांना मिलिंद समता पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद : जालंधर येथील ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत एल. आर. बाली यांना यंदाचा मिलिंद समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी पुरस्काराची गुरुवारी घोषणा केली.
पंजाब प्रांतातील एल. आर. बाली यांना अगदी तरुण वयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभला. आंबेडकरी विचारांनी ते खूप प्रभावित झाले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी केंद्र सरकारच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी आंबेडकरी चळवळीत झोकून दिले. १९६४मध्ये झालेल्या भूमिहीन सत्याग्रहात त्यांना आणि त्यांची पत्नी व दोन मुलांना तुरुंगवास सोसावा लागला. प्रारंभीच्या रिपाइंचे अनेक वर्षे ते जनरल सेक्रेटरी होते. बाली यांनी पंजाबी व हिंदी भाषेत लिहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लोकप्रिय ठरले. त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांनी देशभरात खळबळ निर्माण केली. बाली यांनी काश्मीर ते कन्याकुमारी असे शेकडो दौरे केले. १९५८पासून इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशित होणाऱ्या ‘भीमपत्रिका’ या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. ८६ वर्षांचे बाली अजूनही संघर्षशील आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा ही पुरस्कारामागील भूमिका आहे, असे प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी सांगितले. यापूर्वी मिलिंद समता पुरस्कार बाबुराव बागुल, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. सुखदेव थोरात, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. रुपा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचा सोहळा लवकरच घेण्यात येणार असल्याचे डॉ. प्रधान यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालनाट्यमध्ये ‘संगीत गर्वहरण’ प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेड येथे झालेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत औरंगाबादच्या पंचमवेद रंगभूमी निर्मित ‘संगीत गर्वहरण’ नाटकाच्या गीत-संगीतासाठी अभय आणि अर्पिता कुलकर्णी यांना प्रथम पारितोषिक मिळाले. याच नाटकाच्या अभिनय व गायनासाठी अथर्व अभयार्पिता कुलकर्णी यास रौप्य पारितोषिक मिळाले. या स्पर्धेचे निकाल महाराष्ट्र राज्य संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले.
राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘संगीत गर्वहरण’ नाटक सादर झाले. बालरंगभूमीवरील हा आगळावेगळा प्रयोग अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशींसह सर्व परीक्षकांना भावला. ‘संगीत गर्वहरण’चे लेखक, दिग्दर्शक पंचमवेदचे अभय कुलकर्णी यांनी केले आहे. गायक तानसेन व बैजूच्या जीवनावरील या नाटकात शास्त्रीय संगीताचा बाज अतिशय समर्पकरितीने गीत-संगीतातून अभय-अर्पिता कुलकर्णी यांनी पेरला आहे.
हे नटराजा ह्या नांदीपासून गीततसंगीत सुरू होते. ‘दरबार भरा है नवरत्नोंका’ ह्या पदामध्ये राग केदार व ताल एकतालामध्ये खूप सुरेख संगम साधला आहे. ‘आवो रे आवो हीरन मृग और पशू पंच्छीयो’ हे पद राग सारंग व तोडीमध्ये खूप योग्य सूरतालात नाटकाचा सर्वोच्च क्षण साधते. तानसेनाचे गर्वहरण बैजू अर्थात अथर्व कुलकर्णी याच्या सुरेल सुरातून प्रकटले व परीक्षकांनी त्यास मनापासून दाद दिली. बादशहाचे पात्र अमेय अचलगावकर याने दमदारपणे केले. सर्वांनी कसदार अभिनय केला. दर्जेदार संगीतरचना अभिनयासह अथर्व कुलकर्णीने सादर केल्या. अरुण बडसावळे, सुरेंद्र केतकर, श्याम शिंदे, संध्या रायते, पूनम चांदोरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अहमदनगर येथे झालेल्या कांकरिया करंडक स्पर्धेत या नाटकाला अभिनयासाठीचे पहिले पारितोषिक अथर्वने यापूर्वीच मिळवलेले आहे. अभयार्पिता कुलकर्णी यांचा ‘फुलोरा’ हा कार्यक्रम राज्यभर प्रसिद्ध आहे. त्यांचे अनेक अल्बम निघाले आहेत. अथर्व हा या दाम्पत्याचा मुलगा असून तो ही शास्त्रीय संगीतात पारंगत आहे. त्यांच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.

राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. अंतिम फेरीत हे नाटक परीक्षकांच्या पसंतीस उतरले. आम्हाला बक्षीस मिळाले. आम्ही केलेल्या मेहनतीचे चीज झाले आहे. याचा खूप आनंद झाला. अथर्वच्या अभिनयाचे स्वतः मोहन जोशी यांनी कौतुक केले. या पारितोषिकाने पुढचे काम करण्यासाठी हुरूप आला आहे.
- अभयार्पिता कुलकर्णी, लेखक-दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मकर संक्रातीच्या निमित्ताने बाजारपेठ फुलली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

मकरसंक्रांत सण एक दिवसावर येऊन ठेपल्याने बाजारात (सुगडी) खण त्याचबरोबर विविध प्रकारचे वाण, तिळगुळ, मिठाई, बांगड्या आदीसाहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

सुवासिनींचा मकरसंक्रात हा महत्वाचा सण असल्याने या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे वाण घेण्यासाठी व तिळगुळ वाटण्यासाठी खणाची (सुगडी) आवश्यकता असल्याने खरेदीसाठी महिला गर्दी करू लागल्या आहेत. लहान खण २० ते २५ मध्यम ४० ते ५० व मोठा खण ८० ते १०० या दराने विक्री सुरू आहे.
१४ जानेवारी रोजी शनिवारी मकरसंक्रांत असल्याने या दिवशी तिळगुळ घ्या... गोड बोला... असा संदेश देत प्रेम, आपलुकी शिवाय एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा रुढ आहे. भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण म्हणून मकर संक्रांताकडे पाहिले जाते.

ग्रामीण भागात मरक संक्रांतीच्या आदल्या दिवशी सुवासिनी कुंभाराकडून पाच सुगड असलेले खण घरी आणून त्याची विधीवत पूजा करतात. या खणात तिळगुळ, ज्वारीचे कणीस, बोर, गाजर, खोबरे आदी वस्तू टाकतात. मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन सुवासिनी एकमेकांना तिळगुळ देत ओवासनी करतात.
शहरातील नेहरु चौक, बार्शी नाका आदी ठिकाण सद्या मकरसंक्रांतीच्या साहित्याची विक्री सुरू आहे. ग्रामीण भागातून सुगड्याची उतरंड लावण्याची पद्धत आहे. मात्र, आता हा उपक्रम केवळ संक्रातीपुरताच मर्यादित केला जावू लागला आहे. मकरसंक्रांत संपताच उतरंड धान्य, बि-बियाणे भरून ठेवण्यासाठी पूर्वी वापर केला जात असे. मात्र, बदलत्या जीवन शैलीनुसार आता ही पद्धती शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातून हद्दपार होताना दिसत आहे.

संक्रांतील वाण वाटण्याची प्रथा आता प्रतिष्ठेची झाली आहे. पूर्वी लहान-मोठ्या वस्तू वाण म्हणून वाटप जात होत्या. परंतु, आता प्रतिष्ठेनुसार या वस्तूही वाटण्या येवू लागल्या आहेत. राजकीय नेतृत्वात वावरणाऱ्या महिला नेत्या वाण वाटून संपर्क वाढविण्यासाठी आता या सणाचा सर्रास वापर करताना दिसताहेत. संक्रांतीसाठी मिठाई दुकानातून तिळगुळ, तीळपापडी, गुड-गजग असे पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेेत. बांगडी व्यावसायिक सुद्धा या सणासाठी दुकाने थाटून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाख खात्यांवर ‘संक्रांत’

$
0
0

dhananjay.kulkarni@timesgroup.com
Tweet : @dhananjaykMT
औरंगाबाद ः राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी बँकांच्या औरंगाबाद शहरातील तब्बल सव्वा लाख खात्यांवर संक्रांत आली आहे. नोटबंदीच्या काळात खात्यात पॅन कार्डाशिवाय ५० हजारांहून अधिक रक्कम भरणे, ‘केवायसी’ अपूर्ण ठेवणे असे प्रकार प्राप्तिकर विभाग व बँकांना आढळले आहेत. त्यामुळे ही बँकखाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात सर्व बँकांची मिळून दहा लाखाच्या आसपास बँकखाती आहेत. प्राप्तिकर विभागाची नोटबंदीनंतर शहरातील सर्व बँक खात्यांवर नजर होती. आता या विभागाने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. आता केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज पूर्ण नसलेल्या खात्यांवरही करडी नजर आहे. शहरात नोटबंदीच्या काळात सव्वा लाख बँक खात्यांत ५० हजारा‍ं रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. विविध बँकांच्या विभागीय कार्यालयातील सूत्रांनी व प्राप्तीकर कार्यालयातील सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
ही सव्वालाख खाती औरंगाबादेतील स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद या प्रमुख बँकांसह औरंगाबाद जिल्हा सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, काही सहकारी आणि खासगी बँकांमधील आहेत.

‘जनधन’च्या सक्र‌िय खात्यांवर नजर
नोटबंदीच्या काळात जनधन योजनेची सुमारे ६७ हजारांहून अधिक खाती सक्रिय झाल्याचे समोर आले. यामुळे या खात्यांवरही आता करडी नजर असून, त्यांचीही चौकशी सुरू केली आहे. औरंगाबादमध्ये काही जनधन खात्यांत ५० हजार व त्यापेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचे आढळल्याने ही खातीही गोठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

नोटबंदीतील व्यवहारांची तपासणी
केवायसी पूर्ण असलेल्या खातेदारांनी त्यांच्या खात्यात नोटबंदीनंतर ५० हजार रुपयांवर रमकेचा भरणा ‌केला, पण त्याची समर्पक कारणे दिली नाहीत, अशी खातीही गोठविणे सुरू केले आहे. संबंधितांना त्या आशयाच्या नोटीसही बजावून जादा रक्कम भरण्याची कारणे विचारण्यात आली आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेची २० हजार खाती गोठवली
महाराष्ट्र ग्रामीण बँकेची खाती रडारवर आली आहे. राज्यात या बँकेच्या ३९७ शाखांमधील सुमारे २० हजार खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांनी केवायसी पूर्ण न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. केवायसी पूर्ण होईपर्यंत ही सर्व खाती गोठविलेलीच राहतील. केवायसीपूर्ण झाल्यावर या खातेधारकांना लगेच नि‌यमित व्यवहार करण्याची परवानगी मिळेल, असे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कारवाईला दुजोरा
औरंगाबाद शहरातील स्टेट बँक, महाराष्ट्र बँक आणि काही खासगी बँकांकडून बँकखाती प्राप्तिकर विभागाने खाती गोठविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यात राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांमधील खात्यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राप्तिकर विभागाने आता शहर व जिल्ह्यात चौकशी सुरू केली असून, काही प्रकरणे अधिक गंभीर असल्याचेही सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५०० मद्यालयांवर टांगती तलवार

$
0
0

vijay.deulgaonkar@timesgroup.com
Tweet : @vijaydeulMT
औरंगाबाद ः देशात महामार्गावरील दारुची दुकाने १ एप्रिल २०१७पर्यंत हटवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे ५०० दारू विक्रेत्यांना याच फटका बसणार आहे. त्यात परमिट रूम, वाइन शॉप, बियर शॉपी व देशी दारुच्या दुकानांचा समावेश आहे. हायवेपासून ५०० मीटर परिसरात असलेल्या दारू विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
सुप्रीम कोर्टाने १५ डिसेंबर २०१६ रोजी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. यामध्ये देशभरातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर असलेली दारू विक्री १ एप्रिलनंतर बंद करण्यात यावी; तसेच जोपर्यंत दुकान मालकांचा परवाना आहे, तोपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. मार्च महिन्यामध्ये या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येऊ नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दारू विक्रीची दुकाने हायवेपासून ५०० मीटर अंतरावर असली पाहिजे, असे आदेशात म्हटले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ६८२ मद्यालये आहेत. यामध्ये परमिट रूम, वाइन शॉप, बियर शॉपी व देशी दारुच्या दुकानांचा समावेश आहे. यापैकी हायवेवर सुमारे ५०० दुकाने आहेत. या दुकानांना टाळे लागणार आहे. हायवेपासून ही दुकाने किती अंतरावर आहेत, याची मोजणी सुरू करण्यात येणार आहेत. ५०० मीटरच्या आत असलेल्या दुकानदारांना नोटीस बजाविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी दिली.

मद्यालये व विक्रेते
..................औरंगाबाद जिल्हा......औरंगाबाद शहर
परमिट रूम.............४२६...................१२५
देशी दारुची दुकाने...११७..................१७
बियर शॉपी...........१०६..................३२
वाइन शॉप............३२....................१४

सुप्रीम कोर्टाने १ एप्रील २०१७नंतर हायवेवरील दारू विक्रीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार ही दुकाने बंद करण्यात येणार आहेत. औरंगाबाद‌ जिल्ह्यात सर्व प्रकारची मिळून एकूण ६८२ ठिकाणे आहेत. हायवेवरील ५०० ठिकाणे या आदेशानुसार बंद होणार आहेत.
- सी. बी. राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादच्या रस्त्यांसाठी १०० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकार अर्थसंकल्पात किमान १०० कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे महापालिकाचे प्रशासन रस्ते विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या कामाला लागले आहे.
औरंगाबादेतील रस्ते विकासासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून किमान १५० कोटी रुपयांचा निधी महापालिकेला द्यावा अशी मागणी सहा महिन्यांपासून केली जात आहे. तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले होते, पण त्यांच्या कार्यकाळात शासनाकडून पालिकेला निधी मिळाला नाही. तुपे यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे भगवान घडमोडे महापौर झाले. त्यामुळे आता राज्य सरकार महापालिकेला रस्ते विकासासाठी नक्की निधी देईल, असे मानले जाते.
रस्त्यांच्या कामांना निधी मिळावा म्हणून घडमोडे यांनी आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘निधी देतो, पण शहरातील मुख्य रस्त्यांची कामे करा. गल्लीबोळातील कामे करू नका,’ असे त्यांनी घडमोडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितले. पोलिस क्रीडा स्पर्धेनिमित्त दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शहरात आले होते. त्यावेळीही घडमोडे यांनी त्यांच्याकडे निधीचा विषय काढला, तेव्हा ‘निधी नक्की दिला जाईल,’ असा शब्द त्यांनी दिला.
मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; राज्याच्या अर्थसंकल्पात औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी तरतूद केली जाणार आहे. पहिल्या वर्षी किमान १०० कोटींची तरतूद असेल, असे मानले जात आहे. तरतूदीपूर्वी महापालिकेने रस्ते विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा, असे शासानतर्फे कळविण्यात आले आहे.

रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक आहे. मुख्य रस्त्यांची कामे करा, असे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार मुख्य रस्ते व वर्दळीच्या रस्त्यांची यादी करून त्याचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत शासनाला ‘डीपीआर’ सादर केला जाणार आहे.
- भगवान घडमोडे, महापौर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाभोलकर, पानसरेंचे मारेकरी आधी शोधा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘संभाजी राजे यांच्या बाबत आपल्या साहित्यातून गलिच्छ लिखाण करणाऱ्या गडकरींचा पुतळा हटविण्यामागील मास्टरमाइंड शोधण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आधी दाभोलकर, पानसरे यांच्या खुनाचे मास्टरमाइंड कोण याचा शोध घ्यावा,’ असे आवाहन विचारवंत श्रीमंत कोकाटे यांनी शुक्रवारी भीमायन महोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी केले.
महोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, पॅथर्स रिपब्लिकन पार्टीचे गंगाधर गाडे, कुलगुरू डॉ. बाळू चोपडे, विद्रोही विचारवंत संभाजी भगत, डॉ. प्रतिमा अहिरे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात कोकाटे म्हणाले, ‘सध्या देशात आणि राज्यात लोकशाही धोक्यात आली आहे. नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणणारे कायदे तयार केले जात आहेत. राज्यात नवीन कायदा तयार होत आहे. यात घरातील एखादया कार्यक्रमासाठी पोलिस ठाण्याकडून परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. अल्लाउद्दिन खिल्जीच्या वेळी असे कायदे तयार करण्यात आले होते. आताही तसेच कायदे तयार केले जात आहेत. तुघलकाप्रमाणे शासन चालविण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीला तडा देण्याचा हा प्रकार आहे,’ असे कोकाटे म्हणाले.

आनंदराजांमुळे संघर्ष टळला
‘नोटबंदी निर्णयामुळे शंभर जणांचा मुत्यू झाला. या मृत्यूस जबाबदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करण्यात यावा. आरएसएसचा विविध मोर्चांच्या नावाखाली समाजाला लढविण्याचा डाव होता. मात्र, आनंदराज आंबेडकरांनी घेतलेल्या भुमिकेमूळे समाजातील संघर्ष टळला. ही आरएसएससारख्या जातीवादी संघटनेला चपराक आहे,’ असे कोकाटे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ खातेदार बॅँकेत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदी काळात सातत्याने पन्नास हजारांपेक्षा जास्त भरणा करणे, केवायसी अपूर्ण व पॅन कार्ड नसल्यामुळे गोठविलेल्या खात्यांच्या खातेदारांनी शुक्रवारी बॅँकेत गर्दी केली. महाराष्ट्र टाइम्सने शुक्रवारच्या अंकात ‘सव्वा लाख बॅँक खातेदारांवर संक्रात’ ही बातमी दिली होती. त्यानंतर या ग्राहकांनी बॅँकेत धाव घेतली.
खाते गोठविलेल्या खातेदारकांनी सुमारे १४ राष्ट्रीयकृत बँका आणि १५ ते १६ खासगी बँकांमध्ये शुक्रवारी गर्दी केली. शहरातील विविध बँकांनी खातेदारांना वैयक्तिक दूरध्वनी करत बँकेत बोलावून घेऊन केवायसी (नो युवर कस्टमर) फॉर्म आणि इतर सोपस्कार पूर्ण करण्यास सांगितले आहे. सोपस्कारांमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा देणे बंधनकारक केले आहे.
शहरात सर्वाधिक बँक खातेधारक स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँकेचे आहेत. राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँका मिळून सुमारे १० लाख खातेदार आहेत. १ लाख २५ हजार खातेदारांचे केवायसी पूर्ण करण्याचे व नोटबंदीच्या काळात ५० हजाराच्या वर भरणा केल्या निमित्त स्पष्टीकरण देण्याचे काम सुरू झाले आहे.

सीएंकडे गर्दी
अनेकांना प्राप्तिकर विभागाच्या नोटीस मिळाल्याने त्यांनी सीएंचे मार्गदर्शन घेणे सुरू केले आहे. याशिवाय प्राप्तिकर विभागाने बँक खातेदारांवर गेल्या ६० दिवसांपासून नजर ठेवली आहे. यात अनेक जणांच्या व्यवहारानुसार नोटीस बजावण्यात आल्या ओहत. या नोटीसला उत्तर आणि प्राप्तिकर विभागास रितसर स्पष्टीकरण देण्यासाठी सीएंकडे गर्दी केली आहे. शहरातील नामांकित सीएंनी नाव न छापण्याच्या अटीवर गेल्या दोन-तीन दिवसांपासून आमच्याकडे बँकखातेदार गर्दी करत आहेत. प्राप्तिकर भरण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन घेत असल्याचे सांगितले.


महाराष्ट्र ग्रामीण बँकेत केवायसी पूर्ण नसलेल्या खातेदारांना फोन करून बोलावून घेत आहोत. त्यांना पॅन कार्ड काढून देत आहोत. लवकरच काम पूर्ण होईल. - सचिन विलासधर्म, जनरल मॅनेजर, महाराष्ट्र ग्रामीण बँक

राष्ट्रीयकृत बँकांचे १०० टक्के खातेदारांचे केवायसी फॉर्म पूर्णच असतात. यामुळे त्यांच्याकडून पुन्हा केवायसी पूर्ण करण्याचा प्रश्नच येत नाही.- रवी धामणगावकर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांच्या पाठी आमदार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नगरसेवकांच्या मदतीसाठी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील शुक्रवारी महापालिकेत आले होते. त्यांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याशी एक तास चर्चा केली.
एमआयएमचे नगरसेवक फेरोज खान यांना दोन प्रकरणात नगरसेवक पदावरून अपात्र ठरविण्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना शिवीगाळ केल्याचे पहिले प्रकरण असून दुसरे प्रकरण अनधिकृत बांधकामाचे आहे. एमआयएमच्याच नगरसेवक सरवत बेगम यांनाही अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन्हीही नगरसेवकांना सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. हा अवधी पूर्ण होण्यापूर्वीच शुक्रवारी इम्तियाज जलील यांनी बकोरिया यांची भेट घेतली. चुकीच्या माहितीच्या आधारे नगरसेवकांना नोटीस बाजवण्यात आली असून पालिकेने नोटीस परत घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

प्रामुख्याने फेरोज खान यांच्या संदर्भात इम्तियाज जलील भेटण्यासाठी आले होते. ज्या मालमत्तेच्या संदर्भात फेरोज खान यांना नोटीस पाठवली आहे, ती मालमत्ता २००८ पासून फेरोज खान यांच्या नावावर नाही. त्यामुळे दिलेली नोटीस चुकीची आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्या मालमत्तेचे सर्व व्यवहार आम्ही तपासणार आहोत.
- ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे आली, गेट उघडे; चारचाकी रुळावर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालाननगर क्रॉसिंग गेटवर मनमाड पॅसेंजर आलेली. चारचाकीने धडक दिल्यामुळे रेल्वे गेट उघडे आणि छोटा हत्ती रुळावर आलेला, अशी काळजाची थरकाप उडविणारी आणि चित्रपटात शोभेलशी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. यावेळी मोठा अनर्थ थोडक्यात टळला.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मनमाड पॅसेंजर आल्याने जालाननगर येथील गेट बंद होत होते. त्यावेळी अचानक एक सुसाट मालवाहतूक करणारा छोटा हत्ती वाहन एका बाजूने आत घुसले. मात्र, तोपर्यंत गेटचा पुढचा दांडा लागला होता. चारचाकी थांबविता न आल्याने वाहनचालकाने रेल्वे गेटला धडक दिली. त्यामुळे गेटचा दांडा वाकडा झाला. गेटही उघडेच होते. वाहन रुळावर आलेले. या घटनेची माहिती गेटमनने रेल्वे विभागाला दिली. लोहमार्ग पोलिस कर्मचारी घटना स्थळी धावले. त्यांनी वाहतूक नियंत्रणात आणली. यावेळी मराठवाडा पॅसेंजरसह अन्य रेल्वे या गेटमधून गेल्या. त्यावेळेसही हे गेट उघडेच होते. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा गेटचा दांडा सरळ करून, पुन्हा गेट सुरू केले.

वाहनचालकावर गुन्हा
दरम्यान, रेल्वे गेटला धडक देणाऱ्या वाहनचालकावर रेल्वे संपत्तीचे नुकसान करणे, प्रवाशांचे जीव धोक्यात घालणे, अशा प्रकारचा गुन्हा नोंदविण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवेकानंद विज्ञानवादी, समाजवादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वामी विवेकानंद यांची धर्म, रूढी, परंपरा या अनुषंगाने काही परिवाराने खरी ओळख समाजाला दिलीच नाही. ते ‘विज्ञानवादी आणि समाजवादी’ होते त्यांनी विविध क्षेत्रात काय सुधारणा झाल्या पाहिजे यावर सखोल विचार मांडले आहेत. हीच त्यांची खरी ओळख आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय युवक दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त एस. एम. जोशी सो‌शलिस्ट फाउंडेशनच्या नानासाहेब गोरे व्याख्यानमालेत ‘स्वामी विवेकानंदाची खरी ओळख’ या विषयावर दाभोलकर बोलत होते. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात या व्याख्यनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंदांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यांचे दाखले, पत्र यातून त्यांचा सखोल विज्ञानवाद आणि समाजवाद समाजासमोर मांडला जाणे आवश्यक आहे, असे दाभोलकर यांनी यावेळी सांगितले.
विवेकानंद कायम म्हणत, धर्माच्या नावावर चालणारे शोषण संपले पाहिजे, सामाजिक विषमता संपली पाहिजे, देशात परिवर्तनाची लढाई असली पाहिजे, विषमतेचा पुरस्कार करत असलेल्या जातीप्रथेचा अंत झाला पाहिजे. जातीअंताची पहिली लढाई विवेकानंदांनी सुरू केली, अशी माहिती त्यांनी दिली.
व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे झाली. यावेळी विवेकांनदांच्या जीवनावरील पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. व्यासपीठावर यावेळी सभुचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सचिव सुभाष वारे, विश्वस्त सुभाष लोमटे, सभुचे सहचिटणीस ज्ञानप्रकाश मोदाणी यांची उपस्थिती होती.

‘पत्रांतून मांडले विचार’
स्त्री शिक्षण, स्त्री-पुरूष समानता, इस्लाम-ख्रिश्चन आणि इतर धर्मांना समान मानणारे विचार, अशा विविध मुद्यांचा विवेकानंदांनी पुरस्कार केला. रुढी परंपरा आणि देव यात धर्म अडकवू नका. आपला धर्म आता जुना होत चालला आहे, असे विचारही त्यांनी मांडले. हे विचार विवेकानंद यांनी भगिनी निवेदिता, मेरी, त्रावणकोरचे महाराजा यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारात मांडले आहेत, असे दाभोलकर यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images